शनिवार, जुलै 26, 2025
Home Blog Page 823

मुंबई शहर जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर ६१ तक्रारी प्राप्त, सर्व तक्रारीचे निवारण

मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात १६ मार्च पासून आज पर्यंत ६१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व तक्रारीचे जिल्हा निवडणूक विभागाकडून निवारण करण्यात आले.

कोणताही नागरिक निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकतो. या तक्रारीवर अवघ्या १०० मिनीटात कार्यवाही करण्यात येते.

जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे, ती तक्रार प्राप्त होताच विहित कालावधीत त्यावर कार्यवाही होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोग यांनी नॅशनल ग्रिव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) हे नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात. https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर मुंबई शहर जिल्ह्यातील  १६ मार्च ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत मतदार नोंदणीशी संबंधित एकूण ७७४ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ७६९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.उर्वरित ५ तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून दिली.

0000

शैलजा पाटील/विसंअ

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

१९ एप्रिल रोजी मतदान ; १० हजार ६५२ मतदान केंद्र

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत 95,54,667 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) 21,527 तर कंट्रोल युनिट (सीयु) 13,963 आणि 14,755 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून 97 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ.राहुल तिडके उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 97 उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही      रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह    मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या  ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण 9,416 मतदार तर 12डी या अर्जाद्वारे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण 6,630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यातील पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 11 एप्रिलपर्यंत 43,893 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 723 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 70,967 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

        राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 39.10 कोटी एकूण रोख रक्कम तर 27.18 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 63.82 कोटी रुपये, ड्रग्ज 212.82 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 78.02 कोटी रुपये अशा एकूण 421.41 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

18722 तक्रारी निकाली

16 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2337 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2331 (99.63%) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 19018 तक्रारीपैकी 18722 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 54 प्रमाणपत्र वितरित

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय तयारीची माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र. मतदार संघाचे नाव मतदान केंद्रे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या बॅलेट युनिट (बीयु) कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट
1 09 – रामटेक 2405 28 5904 3283 3372
2 10- नागपूर 2105 26 5165 2874 2951
3 11- भंडारा-गोंदीया 2133 18 5518 2866 3097
4 12- गडचिरोली-चिमूर 1891 10 2330 2330 2517
5 13-चंद्रपूर 2118 15 2610 2610 2818
एकूण 10,652 97 21,527 13,963 14,755

 

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण ETPBS द्वारे मतदान करणारे सेवा मतदार 85 +  व दिव्यांग मतदारांकडून प्राप्त झालेल्या  12D अर्जांची संख्या.
1 9- रामटेक 10,44,891 10,04,142 52 20,49,085 1867 1070
2 10 – नागपुर 11,13,182 11,09,876 223 22,23,281 1001 1385
3 11- भंडारा-गोंदिया 9,09,570 9,17,604 14 18,27,188 3211 1465
4 12-गडचिरोली -चिमुर 8,14,763 8,02,434 10 16,17,207 1483 1438
5 13-चंद्रपुर 9,45,736 8,92,122 48 18,37,906 1854 1272
एकूण 48,28,142 47,26,178 347 95,54,667 9,416 6,630

मतदारांची संख्या खालीलप्रमाणे

 

वयोगटानुसार मतदार संख्या

अ.क्र. मतदार संघाचे नाव 18-19 20-29 30-39 40-49 50-79 80 +
1 9- रामटेक 31,725 3,83,276 4,90,339 4,76,971 6,20,361 46,413
2 10 – नागपुर 29,910 3,37,961 5,06,372 5,07,640 7,70,700 70,698
3 11- भंडारा-गोंदिया 31,353 3,66,570 3,99,115 3,98,749 5,93,132 38,269
4 12-गडचिरोली -चिमुर 24,026 3,28,735 3,56,921 3,48,585 5,25,381 33,559
5 13-चंद्रपुर 24,443 3,42,787 4,25,829 4,20,965 5,86,402 37,480
एकूण 1,41,457  17,59,329 21,78,576  21,52,910 30,95,976 2,26,419

 

मतदारांचा तुलनात्मक तपशील :-

अ.क्र. मतदार संघाचे नाव 2014 मधील मतदार संख्या 2019 मधील मतदार संख्या 2024 मधील मतदार संख्या
1 9- रामटेक 16,77,266 19,22,764 20,49,085
2 10 – नागपुर 19,00,784 21,61,096 22,23,281
3 11- भंडारा-गोंदिया 16,55,852 18,11,556 18,27,188
4 12-गडचिरोली -चिमुर 14,68,437 15,81,366 16,17,207
5 13-चंद्रपुर 17,53,690 19,10,188 18,37,906

 

 

पहिल्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघ General Observer Police Observer Expenditure Observer
09 – रामटेक 1 1 2
10- नागपूर 1 1
11- भंडारा-गोंदीया 1 1 1
12- गडचिरोली-चिमूर 1 1
13-चंद्रपूर 1 1 1
एकूण 5 3 6

 

दुसऱ्या टप्प्यातील 05 बुलढाणा, 06 अकोला, 07 अमरावती, 08 वर्धा, 14 यवतमाळ-वाशिम, 15 हिंगोली, 16 नांदेड, 17 परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.             तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील 02, पश्चिम महाराष्ट्रातील 07 व कोकणातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात दि.15.04.2024 पर्यंत रायगड -08 , बारामती – 05, धाराशीव (उस्मानाबाद) – 03, लातूर -01, सोलापुर – 03, माढा -02, सांगली -03, सातारा – 03, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 01, कोल्हापुर -06, हातकणंगले -10  इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2024 अशी आहे.

तिसऱ्या टप्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील दि.11 एप्रिल 2024 पर्यंत अद्यावत मतदारांच्या संख्येचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकुण मतदान केंद्रे
1 32-रायगड 8,20,025 8,47,220 4 16,67,249 2185
2 35-बारामती 12,38,600 11,27,679 116 23,66,395 2516
3 40-धाराशीव (उस्मानाबाद) 10,51,461 9,39,949 81 19,91,491 2139
4 41-लातूर 10,34,358 9,40,611 61 19,75,030 2125
5 42-सोलापुर 10,40,089 9,87,115 199 20,27,403 1968
6 43-माढा 10,34,999 9,55,035 69 19,90,103 2030
7 44-सांगली 9,52,005 9,13,843 112 18,65,960 1830
8 45-सातारा 9,58,431 9,30,098 76 18,88,605 2315
9 46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 7,13,690 7,35,311 12 14,49,013 1942
10 47-कोल्हापुर 9,83,371 9,50,197 91 19,33,659 2156
11 48-हातकणंगले 9,24,878 8,87,274 95 18,12,247 1830
एकूण 1,07,51,907 1,02,14,332 916 2,09,67,155 23,036

        तिसऱ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदार संघातील सन 2014 व सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांमधील मतदारांचा तुलनात्मक तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. मतदार संघाचे नाव 2014 मधील मतदार संख्या 2019 मधील मतदार संख्या 2024 मधील मतदार संख्या
1 32-रायगड 15,32,781 16,52,965 16,67,249
2 35-बारामती 18,13,553 21,14,663 23,66,395
3 40-धाराशीव(उस्मानाबाद) 17,59,186 18,89,740 19,91,491
4 41-लातूर 16,86,957 18,86,657 19,75,030
5 42-सोलापुर 17,02,739 18,51,654 20,27,403
6 43-माढा 17,27,322 19,09,574 19,90,103
7 44-सांगली 16,49,107 18,09,109 18,65,960
8 45-सातारा 17,19,998 18,48,489 18,88,605
9 46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 13,67,362 14,55,577 14,49,013
10 47-कोल्हापुर 17,58,293 18,80,496 19,33,659
11 48-हातकणंगले 16,30,604 17,76,555 18,12,247

 

वयोगटानुसार मतदार संख्या :-

अ.क्र मतदार संघाचे नाव 18-19 20-29 30-39 40-49 50-59 60-69 70-79 80 +
1 32-रायगड 19,564 2,95,690 3,48,303 3,35,888 2,81,510 2,02,553 1,20,837 62,904
2 35-बारामती 29,774 4,29,270 5,72,452 5,09,486 3,69,188 2,41,593 1,40,168 74,464
3 40-धाराशीव (उस्मानाबाद) 39,695 4,01,530 4,31,239 3,91,588 3,17,572 2,05,724 1,30,056 74,087
4 41-लातूर 36,862 4,05,298 4,54,498 4,20,326 2,99,545 1,86,622 1,04,595 67,284
5 42-सोलापुर 32,680 3,98,876 4,64,302 4,20,367 3,30,036 2,10,664 1,16,140 54,338
6 43-माढा 35,005 3,88,673 4,19,234 4,02,264 3,35,536 2,20,702 1,24,933 63,756
7 44-सांगली 31,107 3,51,041 3,88,291 3,74,133 3,22,448 2,12,235 1,25,028 61,677
8 45-सातारा 36,419 3,27,199 3,96,003 4,00,510 3,24,336 2,20,607 1,26,838 56,693
9 46-रत्नागिरी -सिंधुदुर्ग 16,289 2,38,495 2,70,453 3,04,855 2,68,328 1,82,718 1,12,274 55,601
10 47-कोल्हापुर 28,265 3,52,763 3,90,758 3,97,548 3,40,427 2,28,267 1,38,538 57,093
11 48-हातकणंगले 26,090 3,34,672 3,80,756 3,71,971 3,24,152 2,09,192 1,17,152 48,262
          एकूण 3,31,750  39,23,507  45,16,289  43,28,936 35,13,078 23,20,877 13,56,559 6,76,159

 

तिसऱ्या टप्प्यातील Observer (निरिक्षक):-

क्रमांक व मतदारसंघ General Observer Police Observer Expenditure Observer
32-रायगड 1 1 1
35-बारामती 1 1
40-धाराशीव(उस्मानाबाद) 1 1 1
41-लातूर 1 1
42-सोलापुर 1 1 1
43-माढा 1 1
44-सांगली 1 1 1
45-सातारा 1 1
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 1 1 1
47-कोल्हापुर 1 1 1
48-हातकणंगले 1 1
एकूण 11 6 11

तिसऱ्या टप्प्यातील Electronically Transmitted Postal Ballet System (ETPBS) द्वारे मतदान करण्यास पात्र मतदारांची माहिती :-

अ.      क्र. क्रमांक व मतदारसंघ मतदारांची संख्या
1 32-रायगड 1350
2 35-बारामती 2212
3 40-धाराशीव(उस्मानाबाद) 3740
4 41-लातूर 3363
5 42-सोलापुर 1800
6 43-माढा 4840
7 44-सांगली 5997
8 45-सातारा 9573
9 46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग 1032
10 47-कोल्हापुर 6321
11 48-हातकणंगले 4119
  एकुण 44,347

००००

 

 

‘दिलखुलास’मध्ये पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ या विषयावर गुरुवार व शुक्रवारी मुलाखत

मुंबई, दि. १६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पुणे जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात गुरुवार दि. १८  व शुक्रवार १९ दि. एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे.

पुणे जिल्ह्यात  असलेले  लोकसभा मतदार संघ, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, माध्यम प्रमाणीकरण समितीचे कामकाज, सर्व घटकातील मतदारांसाठी पुण्यात करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत डॉ. दिवसे यांनी माहिती दिली आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा – राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

जळगाव, दिनांक 16 एप्रिल (जिमाका) : जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाना पहिले औषध हे दयाळूपणाचे द्या. प्रत्येक रुग्णाप्रती दयाळू रहा. त्यांच्या चिंता समजून घ्या आणि प्रत्येक रुग्णाशी भावनिक नाते निर्माण करा. हेच सूत्र आपल्याला उत्कृष्ट डॉक्टर बनवणार असल्याने महाविद्यालयातून बाहेर पडताना हा विचार नेहमीच डोक्यात असू द्या, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे पहिल्या बॅचचा आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पार पडला. यावेळी आपल्या व्हिडीओ संदेशात राज्यपाल श्री.बैस बोलत होते.

यावेळी दृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ.  मारोती पोटे (पदव्युत्तर), उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले (पदवीपूर्व), वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड मंचावर उपस्थित होते.

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  सांगितले की, आयुष्यात नक्कीच आपल्याला आपली ध्येय गाठायची आहेत. मात्र ही ध्येय गाठताना आपला विवेक शाबूत ठेवून व उत्कृष्ट माणूस म्हणून आपली समाजात प्रतिमा टिकून राहिली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्र हे आव्हानात्मक आहे. पण आपल्यामुळेच अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याचे काम होते. खरे तर ही देशसेवा आहे आणि या देशसेवेला आपण समर्पित झालो पाहिजे असे मत डॉ. कानिटकर यांनी व्यक्त केले.

यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आठवणींचा प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी व रोजगाराकरिता सदिच्छा दिल्या. रुग्ण सेवा करताना डॉक्टरांना दडपण असते. मात्र समर्पित भावनेने काम करताना डॉक्टर हे रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यात यशस्वी असतात असेही आयुष प्रसाद म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रास्ताविकामध्ये अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी प्रथम बॅचचा आढावा घेऊन, ही बॅच यशस्वीरित्या निपुण वैद्यकीय कौशल्य घेऊन आता सामाजिक क्षेत्रात जाणार असल्याबाबत अभिमान व्यक्त केला. रुग्णसेवा करताना सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांनी जपावी, असेही त्यांनी आवाहन केले.

यानंतर यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून त्यांना निस्वार्थी वैद्यकीय सेवेची शपथ देण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचा लोगो असलेले टपाल तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन डॉ. अब्दुल राफे आणि डॉ. आस्था गणेरीवाल यांनी केले. तर आभार डॉ. विजय गायकवाड यांनी मानले.  प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक या सोहळ्याला पाहण्यासाठी देशभरातून आलेले होते. यावेळी महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी,  परिचारिका आदी उपस्थित होते. सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांनी परिश्रम घेतले.

0 0 0 0 0 0

‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा स्वीपचे नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांची बुधवारी मुलाखत

मुंबई, दि. १६ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमात मतदार जनजागृती‘ या विषयासंदर्भात भंडारा जिल्ह्याचे स्वीप नोडल अधिकारी तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांची घेतलेली मुलाखत बुधवार दि. १७  एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  प्रसारित होणार आहे. ही मुलाखत भंडारा  जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ – दांदळे यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूररामटेकचंद्रपूरगडचिरोलीभंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे.यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. भंडारा  जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयीची माहिती दिलखुलास‘ कार्यक्रमातून स्विपचे नोडल अधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांनी दिली आहे.

0000

विविध ‘मोबाईल ॲप’च्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा

सातारा 16 :-   भारत निवडणूक आयोगाने विविध मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  तरी या ॲपचा जिल्ह्यातील मतदारांनी व उमेदवारांनी वापर करून  आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

c-VIGIL (Citizen’s Vigilance Initiative on Electoral malpractices) हे भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेले मोबाइल ॲप्लिकेशन आहे जे निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता (MCC) चे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्यासाठी नागरिकांना सक्षम करते. मतदारांना प्रभावित करण्यासाठी रोख, दारू किंवा भेटवस्तूंचे वाटप, द्वेषयुक्त भाषणे, बंनर किंवा पोस्टर्स आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेवर परिणाम करू शकणान्या इतर संबंधित क्रियाकलापांसारख्या निवडणूक गैरव्यवहारांच्या घटनांचा अहवाल देण्यासाठी ॲपची रचना करण्यात आली आहे.

CVIGIL ॲप वापरून, नागरिक आचार संहिता उल्लंघनाची छायाचित्रे किवा व्हिडिओ कॅप्चर करून आणि स्थान तपशीलांसह अशा घटनांची तक्रार करू शकतात. ॲप रिपोर्टरच्या ओळखीची गोपनीयता सुनिश्चित करते आणि त्यांना त्यांच्या तक्रारीची स्थिती ट्रॅक करण्यास अनुमतो देते. ॲपद्वारे सादर केलेले अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवले जातात.

VIGIL ॲपचे उद्दिष्ट पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि निवडणूक प्रक्रियेतील नागरिकांच्या सहभागाला चालना देण्याचे आहे. नागरिकांना उल्लंघनाची तक्रार करण्याचे अधिकार देऊन, ते निवडणुकीची अखंडता राखण्यात मदत करते आणि सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी समान संधीचे क्षेत्र सुनिश्चित करते. 2. Voter Helpline App:-मतदार हेल्पलाईन ॲप्लिकेशनला इलेक्ट्रोरल सर्च, फॉर्म सबमिशन, तक्रारी, उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र आणि निकाल लोकप्रिय केले जातात.

Saksham ECI App:- PwDs (दिव्यांग मतदार) ला मतदान करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी, त्यांचे मतदान केंद्र शोधण्यात आणि मतदान करण्यासाठी मदत करण्यासाठी Saksham ॲप अनेक सुविधा प्रदान करते. त्यामध्ये खालील वैशिष्ट्यांचा समावेश आहे:

व्हॉईस सहाय्य: ॲप दृष्टिहीन असलेल्या PWD (दिव्यांग मतदार) साठी आवाज सहाय्य प्रदान करते. 2. टेक्स्ट-टू-स्पीचः ॲप श्रवणदोष असलेल्या PwD (दिव्यांग मतदार) साठी टेक्स्ट-टू-स्पीच सहाय प्रदान करते. प्रवेश योग्यता वैशिष्ट्येः ॲपमध्ये अनेक प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये आहेत, जसे की मोठे फॉन्ट, उच्च- कॉन्ट्रास्ट रंग, इ.

मतदान केंद्रांविषयी माहितीः ॲप मतदान केंद्रांबद्दल माहिती प्रदान करते, ज्यामध्ये मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्रावर उपलब्ध प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये आणि मतदान अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशीलांचा समावेश आहे. तक्रारी: ॲप PWD (दिव्यांग मतदार) ला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबद्दल तक्रारी नोंदवण्याची परवानगी देते.

 ENCORE App :- या ॲपमध्ये सुविधामध्ये उमेदवार नामांकन डिजीटल करण्यासाठी योग्य आयसोटी हेल्पडेस्क केले गेले आहे का. सर्व नामांकन ENCORE ऍप्लिकेशनवर 100% डिजीटल केले आहेत की नाही. सर्व रिटर्निंग अधिकारी केवळ ENCORE येथे नामनिर्देशनांसाठीच्या सर्व अर्जाची छाननी करत आहेत आणि स्वीकृत, नाकारलेले/माघार घेतलेले म्हणून योग्यरित्या चिन्हांकित करत असल्याची खात्री केली जाते. Suvidha Permission App:-सर्व परवानग्या सुविधांव्दारे हाताळल्या आहेत की नाही? सर्व परवानग्या निर्धारित वेळेत दिल्या आहेत की नाही याची माहिती या ॲपव्दारे पुरविली जाते. Suvidha Candidate App:-उमेदवारांना परवानगीची स्थिती आणि नामांकन स्थितीचा पाठपुरावा करण्यासाठी याची माहिती या ॲपव्दारे पुरविली जाते. तसेच नामांकन अर्ज व प्रतिज्ञापत्र भरता येते. सदरचे सर्व ॲप गुगल प्ले स्टोअर वर आणि आयफोन साठी ॲप्पल स्टोअरवर मोफत डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहेत.

00000

वेगवेगळ्या थीमवर जिल्ह्यात ८५ मतदान केंद्रे

चंद्रपूर, दि. 16 : 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात 85 मतदान केंद्रे वेगवेगळ्या थीमवर सजविली जाणार आहेत.

2019 च्या निवडणुकीमध्ये ज्या मतदान केंद्रावरील मतदान 50 टक्क्यांपेक्षा कमी होते किंवा ज्या मतदान केंद्रावरील टक्केवारी 50 ते 65 टक्के इतकीच होती, अशा परिसरातील मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व त्यांचा संपूर्ण सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविता यावी, म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक समुहामार्फत 50 मतदान केंद्र, बांबु संशोधन व प्रक्षिक्षण केंद्रामार्फत 5, आदिवासी विकास प्रकल्पामार्फत 10, वन विभागामार्फत 10, महिला व बाल विकास कार्यालयामार्फत 10 अशा एकूण 85 मतदान केंद्रावर वेगवेगळया थीम ठेवून मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.

    यात औद्योगिक समुहामध्ये अल्ट्राटेक सिमेंट लिमी. आवाळपुर, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर, सी.टी.पी.एस.चंद्रपूर, अंबुजा सिमेंट लि. व दालमिया सिमेंट लि, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर, ए.सी.सी. सिमेंट लि., कोल माईन्स चंद्रपुर, वेकोली वणी-माजरी, साई वर्धा पॉवर जनरेशन प्रा.लि., एम.ई. एल (सेल) चंद्रपुर, बिल्ट बल्लारपुर इंडस्ट्रिस, राजुरी स्टिल मुल, पावर ग्रिड भद्रावती, एम्टा भद्रावती, श्री. सिध्दवली इस्पात लि.,लॉयड मेटल ॲन्ड एनर्जी लि., चमन मेटॅलिक लि., सनविजय रोलींग ॲन्ड इंजिनियरिंग लि., लाईमस्टोन प्रा.लि. कोरपना, एमआयडीसी असोसिऐशन, ऑरोबिंदो कोल माइन्स भद्रावती, केपीसीएल भद्रावती, जीएमआर वरोरा, सनफ्लॉग आर्यन ॲन्ड स्टिल प्रा.लि. वरोरा या कंपन्या मार्फत एकूण 50 मतदान केंद्रे सजविली जाणार आहेत.

    तर बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली मार्फत बल्लारपुर, पहामी, खुटाळा, लोहारा ही मतदान केंद्रे, वन विभागामार्फत बोरगाव देश, संजय नगर, शास्त्रीनगर, दुर्गापुर, चोरा, विसापुर, ब्रम्हपुरी, लोहारा, वाढोणा, पारोधी ही केंद्रे, आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर व चिमूर मार्फत धोपटाळा, नांदा, येरमी येंसापुर, म्हसली, चिमूर, जिवती, पिपरी नेरी, महिला व बाल विकास विभागामार्फत ब्रम्हपुरी, बल्लारपुर, घुग्घुस, कोरपना, वडाळा पैकु, गडचांदुर, राजुरा, पंचशील वार्ड, सास्ती, गोवारी या मतदान केंद्रावर वेगवेगळया थिम ठेवून ‘थिमॅटीक पोलिंग स्टेशन’ तयार करण्यात येणार आहेत.

    त्याचप्रमाणे स्वीप अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिका-यां मार्फत मतदान चिठ्ठी वाटप करण्यात आलेली आहे व त्याचा पडताळणी अहवाल रोज घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हातील शासकीय अधिकारी / कर्मचारी. आस्थापना, सर्व उद्योग समुह, महामंडळे, कंपन्या व संस्था आदींना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मतदान केंद्रावर प्रथमोपचार पेटी व वैद्यकीय सुविधा, दिव्यांग मतदाराकरीता व्हिलचेअर, जेष्ठ नागरिकांकरीता ई- ऑटो सुविधा, बाळंतपण महिला करीता हिरकणी कक्ष, पाळणाघर सुविधा, मतदारांच्या मदतीकरीता मदत कक्ष व प्रतिक्षा कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रांगेत असलेल्या मतदाराना उष्णतेपासून बचावाकरीता शेडची व्यवस्था, व सेल्फी पॉईट उभारण्यात येणार आहेत.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

००००००

गडचिरोलीत ६५ मतदान केंद्रावर २६७ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

गडचिरोली दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता १२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा ६५ मतदान केंद्रावरील ७२ निवडणूक पथकाच्या २६७ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या ३-एम.आय.- १७ आणि ४-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचविण्यात आले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे .

०००

A Mammoth Exercise

Gadchiroli-Chimur Constituency of Maharashtra state witnessed today beginning of a mammoth exercise of transporting polling personnel to interior polling stations. District Gadchiroli has a difficult terrain requiring the administration to use Helicopters for transportation of 850 poll personnel to 206 polling stations. ECI has given permission for this transportation at P-3 (3 days before poll-day). The exercise started today early morning at 6.30 a.m. and 65 polling parties comprising of around 267 polling personnel were dispatched for ‘Difficult to Reach’ polling stations. Blessings of weather added to the enthusiasm and vigour of polling parties to undertake the task of enabling first part of the ‘Festival of Democracy’ which is scheduled on 19th April.

0000

 

 

 

निवडणूक कालावधीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही असणार सज्ज; मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने उचलली पावले

मुंबई उपनगर, दि. 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात  सार्वत्रिक निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा घेऊन निवडणूक कालावधीत यंत्रणेने सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

सर्व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी तयारी ठेवावी

वाढता उन्हाळा आणि अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा यासह सर्व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी तयारी ठेवावी, असे क्षीरसागर यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासन हे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींमुळे मतदान प्रक्रियेची गती मंदावली जाऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मतदानाला येणाऱ्या मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यादृष्टीने प्रशासन खबरदारी घेतली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनी सांगितले.

आपत्कालीन मदत यंत्रणांना सज्जतेचा इशारा

वॉर्ड स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशन्स, हॉस्पिटल, रुग्णवाहिका यांची उपलब्धता याची माहिती ठेवणे आवश्यक आहे तसेच या यंत्रणांनीही या काळात सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

याशिवाय, वाढत्या उन्हाळ्याच्या अनुषंगाने हवामान विभागाने जारी केलेली माहिती तात्काळ निवडणूक यंत्रणेला देणे अत्यावश्यक राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर योग्य ती आवश्यक कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य होणार असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

—–000——

 

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी आता युद्धपातळीवर सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपास ५० हजार अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक कालावधीत या कर्मचाऱ्यांना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय कल्याण अधिकारी अर्थात वेल्फेअर ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणुक कालावधीत एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असतानाच या यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचीही काळजी आता विशेषत्वाने घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघात हे वेल्फेअर ऑफिसर नियुक्त केले आहेत. निवडणूक प्रक्रिया आणि विशेष करून मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवास, भोजन, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहे या सुविधा पुरविण्याबाबत येत आहेत.

कॅशलेस आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देणार

            आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास तत्काळ उपचार करण्याबाबतची कार्यवाहीही वेल्फेअर ऑफिसर यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

            या वेल्फेअर ऑफिसर यांच्याकडे मतदान केंद्राजवळ असलेली सर्व रुग्णालये, तेथे उपलब्ध असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा, रुग्णवाहिकेची उपलब्धता आदींची माहिती असणार आहे. याशिवाय, कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यकता भासल्यास तत्काळ कॅशलेस आरोग्य सुविधा संबंधित रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

            मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कालावधीत कोणतीही अडचण उद्भवू नये याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

००००

ताज्या बातम्या

आरोग्य शिबिरातून मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून...

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय  – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ : कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचे कर्तव्य, धैर्य, धाडस, शौर्य व बलिदान सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांना...

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ - पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी...

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य...

0
सातारा दि.२६ - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी ता. माण या संस्थेचे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे...

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणांनी सज्ज रहावे – महसूल मंत्री तथा पालकमंत्री...

0
नागपूर, दि. २६ : येत्या काळात जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सव व यात्रा प्रसंगी कायदा-सुव्यवस्था व शांतता कायम राखण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणांना...