बुधवार, जून 18, 2025
Home Blog

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आदींनी सहभागी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करुन यशस्वीपणे करण्याकरीता पुढाकार घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी प्रशासनास दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम,  पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे सकाळी ७.३० वाजता आयोजन करण्यात येणार आहे. योग कार्यक्रमास विविध मान्यवरांसह वारकरी सहभागी होऊन योग करणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पूर्व तयारी करावी.

शहरातील विविध शाळांमध्येदेखील वारकरी भक्तीयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनासहित स्वयंसेवकांना बसण्याच्या जागेसह, ओळखपत्र, एकसारखे टीशर्ट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी उपलब्ध करुन द्यावेत. शाळेत योगाकरीता लागणाऱ्या लागणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्याव्यात.

वारकरी भक्तीयोग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, याकरीता क्युआर कोड, फेसबुक लाईव्ह, अधिकाधिक वारकऱ्यांचा सहभागी होतील याकरीता अधिकाधिक जनजागृती करावी. यामध्ये शहरातील विविध भागात विशेषत: दिंडीचा मुक्कामाचे ठिकाण, मार्गावार महानगरपालिकेने जाहिरात फलके लावावीत. एकंदरीत वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

कार्यक्रमाचे संयोजक व संकल्पक राजेश पांडे यांनी ‘वारकरी भक्तीयोग’ नियोजनाबाबत माहिती दिली.

०००

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून या कामांना गती द्यावी असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व विदर्भ विकास महामंडळाकडील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस आमदार सर्वश्री अनुप अग्रवाल, राम भदाणे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, श्याम खोडे, संजय पुराम, चंद्रकांत रघुवंशी, अमश्या पाडवी, वसंत खंडेलवाल, खासदार शोभा बच्छाव ,माजी मंत्री सुभाष भामरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे तापी  व विदर्भ विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विविध सिंचन योजनेच्या कामांचा आढावा  घेताना मंत्री महाजन म्हणाले, सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी. धुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याकरिता महत्त्वाचे असलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत आवश्यक भूसंपादन करण्याबाबत कार्यवाही करावी. याबाबतचा  प्रस्ताव सादर करावा. गोंदिया जिल्ह्यातील कुवाडास नाला प्रकल्पासाठी  आवश्यक प्रशासकीय मान्यता घेण्याबाबतची कामे कालबद्ध पद्धतीने करावीत.

मंत्री महाजन यांनी जामनेर येथील भागपूर उपसा सिंचन योजनेचा सविस्तर आढावा घेऊन वाघूर उपसा सिंचन योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून घेण्यात येणाऱ्या शेततळ्यांची कामे अधिक गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शेळगाव बँरेजवरील यावल उपसा सिंचन योजना कामांना गती देण्याबरोबरच अमोदा सहकारी उपसा सिंचन योजना, बामनोद सहकारी उपसा सिंचन योजना आणि दादासाहेब जि. तु. महाजन सहकारी उपसा सिंचन योजना भालोद कामाचा आढावा घेऊन या योजनेच्या कामाबाबतही सूचना दिल्या.

बैठकीत तापी प्रकाशा बुराई उपसा सिंचन प्रकल्पाचा आढावा, अक्कलपाडा (निम्न पांझरा) धरण पूर्ण क्षमतेने भरण्या संदर्भात अतिरिक्त भूसंपादन करणे तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता बाबत भागपूर उपसा सिंचन योजना, टप्पा-१ व टप्पा २ ता. जामनेर,  वाघुर प्रकल्प शेततळयांच्या व उर्वरित कामांसदंर्भात, ता. जामनेर, यावल उपसा सिंचन योजना (उध्भव शेळगांव बॅरेज) ता. यावल, जि. जळगाव व बामनोद, भालोदा, आमोदा प्रकल्पांची आढावा, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत कुवाडहास नाला प्रकल्प आढावा, इसापूर जलाशय उपसा सिंचन योजना प्रस्तावित करणे, अकोला शहर विकास योजनेसाठी पाटबंधारे विभागाद्वारे विट्टपा व मोर्णा नदीचे निळी व लाल ते रेष आखणी सर्व्हेक्षण नकाशे निरस्त करणे आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात उच्चस्तरीय संयुक्त बैठक झाली.

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, उपसचिव अरविंद पगार, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव श्री. मराळे, दिव्यांग कल्याण विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री कडू म्हणाले की, पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या सर्व मजुरीची कामे मनरेगात समाविष्ट करावीत, फळपिके व दुग्धव्यवसायालाही ‘मनरेगा’शी जोडावे, ‘मनरेगा’मधील मजुरी ३१२ रुपये वरून ५०० रुपये करण्यात यावी, दिव्यांग व विधवांना दरमहा ६ हजार रुपये मानधन द्यावे या मागण्या बैठकीत करण्यात आल्या.

या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री गोगावले म्हणाले, या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी चर्चा करून, योग्य तो अभिप्राय घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्य शासन या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याची ग्वाही मंत्री गोगावले यांनी दिली.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन अदा करावे, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

मंत्रालयात नागपूर व रत्नागिरी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री भुजबळ बोलत होते. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रधान सचिव विनीता वेद सिंघल, रत्नागिरी जिल्हा बैठकीस आमदार शेखर निकम, नागपूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाबा आष्टणकर उपस्थित होते. रत्नागिरी बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्ष श्री. कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारशी संबंधित विषयांबाबत विभागाने सर्वंकष माहिती तयार करावी. यासंदर्भात लवकरच दिल्ली येथे केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येईल. रेशनकार्ड शोध मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेत अपात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांचे धान्य वितरण बंद झाल्यास धान्याचा कोटा वढविणे शक्य होईल. धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल कमिशन वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांना ओळखपत्र देण्यात यावे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना प्राधिकृत करावे. तसेच ऑफलाईन धान्य वितरणाची परवानगी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, शेखर निकम, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भू-संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करुन काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावे. मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. प्रगती पथावरील कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. प्रस्तावित प्रकल्पांचा परिपूर्ण अभ्यास करून नियोजन करावे. पाणी वितरण प्रणालींची तातडीने अंमलबजावणी करावी. प्रकल्पांची गळती रोखण्यासाठी तज्ज्ञ संस्था आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा सूचना मंत्री राठोड यांनी यावेळी दिल्या.

यावेळी रत्नागिरी व राजापूर मतदार संघांतील मृद व जलसंधारण प्रकल्प व भूसंपादनाची सद्यःस्थिती, कामांची सद्यःस्थिती व नवीन कामांसह तिवरे, (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) धरणाची उंची वाढविण्याविषयी आढावा घेण्यात आला.

०००

राजू धोत्रे/विसंअ

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या कामांचा मंत्री संजय राठोड यांच्याकडून आढावा

मुंबई दि.१७ : बुलढाणा जिल्ह्यातील मृद व जलसंधारण अंतर्गत नवीन प्रकल्प मापदंडात बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

मंत्रालयात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी आमदार संजय गायकवाड, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील तसेच विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी हरमोड सिंचन तलावाची उंची वाढवून मोहेगाव नदीवर बांध टाकून पावसाचे पाणी लिफ्ट करून तलावात साठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच, गिरडा (ता. बुलढाणा) येथे साठवण क्षमतेसह नवीन स्टोरेज डॅम, नळगंगा धरण (ता. मोताळा) शेजारील किन्होळा शिवारातील १८५ हेक्टर ई-क्लास जमिनीवर नवीन स्टोरेज डॅम आणि उबाळखेड (ता. मोताळा) येथील मव्हाडी शिवारात नवीन धरणाच्या निर्मितीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागांना लवकरात लवकर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश यावेळी मंत्री राठोड यांनी दिले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्वयंपूर्ण व्हावे – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (0.5979167, 0.5979167); modeInfo: ; sceneMode: 32768; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

मुंबई, दि १७ : हळद उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी हिंगोली येथे मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र स्वंयपूर्ण करावे, असे निर्देश राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.

हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राविषयी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते. बैठकीस केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, कृषी उपसंचालक सत्यवाना नऱ्हे, कृषी विभागाच्या अवर सचिव वैशाली तांबे उपस्थित होते.

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध करून देता यावे, तसेच उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करून त्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद ) संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले असल्याचे सागून राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, या प्रकल्पामधून अधिक नफा होईल याप्रकारे वाटचाल करायची आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागणीचा प्रस्ताव मागवावा. प्रकल्प स्वअर्थसहाय्य बनायला हवा व त्यासाठी आवश्यक तो आराखडा तयार करून कामांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिले.

गेल्या दोन वर्षात या हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत पिकाची होणारी वाढ व पीक परिस्थिती पाहून काय उपाययोजना हाती घ्यायला हव्यात याबाबत जनजागृती करणे, उत्पादन खर्चात बचत करून उत्पादकता वाढवणे, हळद लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार करणे यांसारख्या कामात यश मिळवले आहे. हे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र पूर्णत्वात आल्यानंतर यामार्फत शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण माहिती व अर्थसाह्य मिळावे असे, राज्यमंत्री जयस्वाल यांनी सांगितले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

मौजे साखर सुतारवाडीचे दर्जेदार पुनर्वसन करा – मंत्री मकरंद जाधव – पाटील

filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (0.3229167, 0.3229167); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

मुंबई, दि. १७ : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर सुतारवाडी गावात २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी होवून नुकसान झाले होते. गावाच्या पुनर्वसनासाठी नागरी सुविधांची कामे करण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्या घरांसाठी वाढीव रक्कम देण्याविषयी प्रस्ताव सादर करावा. मौजे साखर सुतारवाडी गावचे पुनर्वसन दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिले.

मंत्रालयात साखर सुतारवाडी गावाच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरे, सहसचिव (मदत) संजय इंगळे, अवर सचिव बाळासाहेब हजारे उपस्थित होते, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे रायगड जिल्हाधिकारी किसन जवळे उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, पुनर्वसन करताना ४ टक्के निधी हा राज्य व्यवस्थापन कक्ष, गृहनिर्माण यांना द्यावा लागतो. या निधीबाबत फेरविचार करावा. पुनर्वसन करताना निधी द्यावा लागू नये. टाटा ट्रस्ट, कोटक बँक यांना पत्र पाठवून घरे बांधण्याची विनंती करण्यात यईल. तसेच इर्शाळवाडीच्या धर्तीवर सुतारवाडीचे पुनर्वसन सिडकोकडून करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र द्यावे.

जिल्हा प्रशासनाने मौजे साखरवाडी येथे भेट देवून पुनर्वसन तातडीने कसे पूर्ण करता येईल, याबाबत कार्यवाही करावी. जोपर्यंत शासनाकडून ग्रामस्थांची कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत शासनाच्यावतीने पुनर्वसन करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तात्पुरत्या निवासाची व्यवस्था असणारे निवारे चांगले असावे. कामाचा दर्जा उत्तम असावा. कुठलीही आपत्ती येण्यापूर्वी प्रशासनाने सजग राहून उपाययोजना कराव्यात, असेही मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत – मंत्री ॲड. आशिष शेलार

Milind Kadam M4B

मुंबई दि. १७:  जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. 21 जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सायंकाळी 4.30 वाजता हा सोहळा आयोजित  करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

Milind Kadam M4B

मराठी भाषा आणि कलाकारांसाठी नवे व्यासपीठ

रेडिओ क्षेत्राला गौरव प्राप्त करुन देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओमार्फत झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती रेडिओमार्फत जतन करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे. महाराष्ट्रात आकाशवाणीनेही भूमिका निभावली आहे. तसेच खासगीकरण आणि आधुनिकीकरणाच्या काळात खासगी एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही भूमिका अधोरेखित केली आहे. मराठी संगीत, गाणी, शास्त्रीय संगीत जपणारे, उद्यमशील आणि सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मराठी निवेदक, मराठी अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन करण्यात यावे. तसेच ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, राजकारण, सामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले जात आहे. त्यांना या माध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार

आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम,  महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक,  महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक,  महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम अशी या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येतील. यासाठी संबंधित कलाकार तंत्रज्ञ रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करावी लागेल. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यासाठी रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार, तंत्रज्ञ, अभ्यासक यांसारख्या शासकीय सदस्यांच्या माध्यमातून पुरस्कारमूर्तींची निवड करण्यात येईल, असे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार आहेत तर दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून सन्मानिका सांस्कृतिक कार्य संचालनालयात दिनांक १९ पासून उपलब्ध होतील. सर्व रेडिओप्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

रेडिओचे योगदान

‘आकाशवाणी’ हे एक लोकप्रसारणाचे महत्त्वाचे माध्यम म्हणून गणले गेले आहे. १९२७ सालापासून सुरू झालेल्या आकाशवाणीने भारताच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी भर घातलेली आहे. जनसंवादाचा आणि जनसंपर्काचा ‘मास मीडिया’ म्हणून ओळखले जाणारे आकाशवाणी हे भारतीय माध्यमाचे एक अविभाज्य अंग आहे. आकाशवाणीमुळे अनेक कलाकार घडले असून, अनेक कलाप्रकारांना प्रोत्साहन आणि संरक्षणही मिळाले आहे. नवमाध्यमांच्या आक्रमणात व नवमनोरंजनाच्या या काळात आकाशवाणीनेही कालसुसंगत परिवर्तन केले आहे. आजही ग्रामीण भागात आकाशवाणीच्या कार्यक्रमांना मोठी पसंती मिळत असते.

महाराष्ट्रात आज घडीस ऑल इंडिया रेडिओची २८ केंद्रे, एफएम रेडिओची सोळा केंद्रे आणि ५४ कम्युनिटी रेडिओची केंद्रे हे काम करत आहेत. रेडिओ सिटी, रेडिओ वन, मॅजिक एफएम, माय एफ एम, टोमॅटो एफ एम, अशी विविध एफ एम चॅनल्स सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध संस्थांची विविध कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सही सुरू आहेत.

रेडिओ महोत्सवामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. मराठीसाठी काही पुरस्कार राखीव असल्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी भाषा यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा राहणार आहे.  नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एफएम रेडिओ व कम्युनिटी रेडिओने मराठी भाषेच्या प्रचाराच्या प्रसिद्धीसाठी उल्लेखनीय काम केलेले आहे. अनेक मराठी कलाकारांना रेडिओमुळे नाव मिळालेले आहे. रेडिओ या सशक्त माध्यमाची दखल घेणे, सांस्कृतिक कार्य विभाग व पर्यायाने राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रेडिओ माध्यमांचा वापर करणे हा या महोत्सव व पुरस्काराचे आयोजन करण्याचा हेतू असल्याचे सांस्कतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

धुळे शहर, परिसरातील विविध विकासकामे गतीने पूर्ण करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

RAJU DONGARE Govt Photographer

मुंबई, दि. १७ : धुळे शहर आणि परिसरात पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी देवपूर, वलवाडी व इतर भागात सुयोग्य सांडपाणी गटाराची व्यवस्था करण्यात यावी. सखल भागात साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यात यावा. तसेच महानगरपालिका परिसरात होत असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करावीत, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

RAJU DONGARE Govt Photographer

धुळे महानगरपालिकेच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, धुळे महानगरपालिका तापी पाणी पुरवठा योजना सुकवद ते बाभळे, बाभळे – धुळे – मालेगाव रोड, दगडी टाकी या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम तातडीने करावे. तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या अवधान येथील ७५ एकर क्षेत्र जमिनीवर १५-२५ मेगावॅट क्षमतेचा स्वमालकीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा. पाणीपुरवठा योजना व पथदिवे उभारणी करण्यात यावी, हा प्रकल्प समाजहिताचा असल्याने यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

ताज्या बातम्या

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील

0
पुणे, दि. १८: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,...

सिंचन योजनांची कामे जलद गतीने करा – मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १७: राज्यातील  सिंचन योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण  होणे आवश्यक आहे. ही कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्याचे सूक्ष्म, सुयोग्य नियोजन करून...

‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

0
मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना,...

स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ

0
मुंबई, दि. १७: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे मागील थकीत कमिशन अदा करण्याची कार्यवाही करावी. केंद्राचा निधी प्राप्त झाल्यानंतर राज्याला द्यावयाचा हिस्सा तातडीने देवून कमीशन...

रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवा – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील मृद व जलसंधारण प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून काम सुरू करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात...