शुक्रवार, जुलै 4, 2025
Home Blog Page 722

सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमद्वारे भारत-रशियातील उद्योग-व्यापार संधींना प्रोत्साहन, महाराष्ट्राचे स्थान केंद्रस्थानी – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई, दि. ७ : जागतिकस्तरावर नव्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत भारत-रशिया संबंधांना अतिशय महत्त्व आहे. विकास, तंत्रज्ञान, बाजारपेठ, सेवा, उद्योग, ऊर्जा, बांधकाम, वाहतूक, सांस्कृतिक आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रात सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम – २०२४ च्या माध्यमातून उद्योग-व्यापाराच्या विपुल संधी निर्माण होतील. महाराष्ट्र हे भारतातील औद्योगिक दृष्टीने अग्रगण्य राज्य असल्याने या व्यापारसंधी उभय देशांना लाभदायक ठरतील, यात मुंबईचे स्थान आणखी महत्त्वपूर्ण राहील, असे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या संकल्पनेनुसार येथे आयोजित सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम – २०२४ मध्ये ‘रशिया – भारत’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. याप्रसंगी अन्य मान्यवर आंतरराष्ट्रीय वक्त्यांबरोबरच भारताचे रशियातील राजदूत विनयकुमार उपस्थित होते.

भारत-रशिया मैत्री संबंध हे काल कसोटीवर सिद्ध झालेले आणि परस्पर विश्वास, सहकार्य, सामंजस्य हा मुख्य आधार असलेले असे आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष माननीय श्री. पुतिन आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातील परस्पर स्नेहसंबंध हे नेहमीच जागतिक शांतता आणि विकास यांना प्राधान्य देणारे ठरले आहेत. या फोरममुळे जागतिकस्तरावर सशक्त यंत्रणा उभी राहिली आहे ज्यातील सत्रात मला निमंत्रित करण्यात आले हा माझा बहुमान समजतो, असे यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. श्री.नार्वेकर म्हणाले.

रशियन नवउद्यमींना भारतातील सतत विस्तारणाऱ्या व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे आकर्षण आहे. त्याचप्रमाणे भारतातील उद्योजकांना देखील रशियातील उद्योग विस्ताराच्या संधी खुणावत आहेत. या फोरमच्या माध्यमातून दोन्हीकडील उद्योजकांना त्यासाठी उचित मार्गदर्शनाचा लाभ मिळावा. उभयपक्षी व्यापार हा २०२५ पर्यत आणखी पुढचे उद्दिष्ट गाठेल, असे संकेत दिसत आहेत, असेही विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

००००

सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण

सातारा दि. 7 (जिमाका): सध्या मोबाईल, संगणक, ऑनलाईन बँकिंग, सोशल नेटवर्किंग साईट, इत्यादी गोष्टींचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला असून मोबाईल, टॅब, संगणक व इंटरनेट हे व्यक्तीचे दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. मोबाईलमधील वेगवेगळ्या अॅप्लीकेशच्या माध्यमातुन विविध अॅपसद्वारे सायबर गुन्हयांमध्ये मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सायबर गुन्हयांमध्ये फेसबुक, इंन्स्टाग्राम, टेलीग्राम, शेअरचॅट, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करून व्यक्तींची बदनामी करणे, आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच सोशल मिडीयावरुन फिशींग, आयडेंटीटी श्रेष्ट, रैमसनवेअर अटॅक, हॅकिंग, सायबर स्कंमस, सायबर बुलींग, स्टाकिंग, सॉफ्टवेअर पायरसी, सोशस मिडीया फ्रॉडस, ऑनलाईन ड्रग्ज ट्राफिकिंग, इलेक्ट्रॉनिक मनी लॉन्डरींग, सायबर इक्स्टॉर्शन, ऑनलाईन रिक्रूटमेंट फ्रॉडस, इत्यादी प्रकारचे सायबर गुन्हे सध्या समाजामध्ये घडत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस विभागाकडील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकी प्रसंगी या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. याबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या सायबर कॉमिक बुकचे अनावरण पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याहस्ते झाले.

सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता करण्याकरीता ०१ जुलै २०२४ पासून सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने सातारा जिल्हयातील जिल्हा परिषद अंतर्गत व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरुकता वाढविण्याकरीता सायबर जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे.

यामध्ये सातारा जिल्हयातील सर्व शाळांमध्ये सायबर जागरुकता निर्माण करण्याकरीता सातारा जिल्हा पोलीस दलाकडून सायबर जागरुकतेसंबंधी सर्व सामग्री पुरविण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता ६ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांमध्ये सदरसामग्रीचा वापर करुन १ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीमध्ये जिल्हयातील सर्व शाळांमध्ये सायबर जागरुकतेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल व या परिक्षेमधून ज्या विद्यार्थ्यांना (१ मुलगा १ मुलगी) चांगले गुण मिळतील त्यांना त्याच शाळेचे सायबर अॅम्बेसीडर म्हणून निवडण्यात येईल व त्यांचे मनोबल वाढविणेकरीता ऑगस्ट २०२४ चे पहिल्या आठवडयामध्ये त्यांचा सत्कार घेण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा उपयोग सायबर गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता होणार आहे.

000000

 

पुनर्वसनाची कामे गतीने आणि दर्जेदार करा – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि. 7 (जिमाका):  पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी, (जिंती), काहीर, या अतिवृष्टीमुळे भूस्खलन बाधित गावांच्या पुनर्वसनास शासनाने मान्यता दिली आहे. या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाअंतर्गत बाधित कुटुबांना द्यावयाची प्रस्तावित असलेली 558 घरकुले व इतर सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ही कामे गतीने आणि दर्जेदारपूर्ण करा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील दरडग्रस्त व भूस्खलनग्रस्त गावांच्या पुनर्वसन, बांधकाम व पायाभूत सुविधांच्या कामांबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रातांधिकारी सुनील गाडे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
भूस्खलनबाधित गावांमधील कुंटुबांचे गोकूळ तर्फ पाटण, काहीर, शिद्रुकवाडी (धावडे), चाफेर, देशमुखवाडी, मोडकवाडी याठिकाणी घरकुले बांधून देवून पुनर्वसन करण्यात येणार आहे. 199 कोटी 57 लाख खर्चून पुनर्वसनाचे काम करण्यात येणार आहे. घरे बांधून देणे व तेथील ले ऑउट विकासकामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी करावी असा निर्णय झालेला आहे. पुनर्वसीत ठिकाणांमध्ये प्राथिमक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, समाजमंदिर, सार्वजनिक स्वच्छता गृहे, खेळाचे मैदान, कंम्पाऊंड भिंत, प्रवेश कमान, पथदिवे, पाणीपुरवठा सुविधा, वैयक्तिक एकल विद्युत जोडणी, रेनवॉटर हारवेस्टिंग, सोलार सिस्टीम, इमारतींकरीता आतील व बाहेरील विद्युतीकरण, पुनर्वसन गावांमध्ये 9 मीटर व 12 मीटर रुंदीचे डांबरी रस्ते, रस्त्यालगत दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या गटारी, जनावरांकरीता पिण्याच्या पाण्‍याची सुविध अशा सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या सर्व सुविधा व घरकुलांची कामे अत्यंत दर्जेदार करावीत आणि  वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी यंत्रणांना दिले आहेत.
बाधित कुंटुबांना देण्यात येणारी घरकुले 590 चौ. फूट बांधीव क्षेत्रफळाची सिमेंट काँक्रेटची दर्जेदार व आकर्षक असणार असून यामध्ये तळमजल्याला हॉल किचन आणि स्वच्छता गृह, पहिल्या मजल्यावर बेडरूम आणि स्वच्छता गृह अशी ती होणार आहेत. प्रत्येक घरकूल 15 लाख 40 हजार रुपये खर्चाचे होणार आहे. सदरची घरकुले अतिशय आकर्षक व दर्जेदार आणि भक्कम होणार असून त्याची संबंधित कुंटुबांना संकल्‍पना स्पष्ट व्हावी, यासाठी प्रत्येक कामाच्या साईटवर या घरकुलांची संकल्पना चित्रे फ्लेक्स स्वरूपात लावण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
00000000

सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प राज्यासाठी आदर्शवत – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि. 7 (जिमाका):  महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाचा भरोसा- सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा प्रकल्प राज्यासाठी निश्चितपणे दिशादर्शक व आदर्शवत ठरेल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.
महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस विभाग राबवित असलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील मागील पाच वर्षातील महिलांबाबत घडणा-या गुन्ह्याचा तपशील पाहता यामध्ये बलात्कार 248, पोक्सो अंतर्गत गुन्हे 964, कौटुंबिक हिंसाचार 869, लैगिंक अत्याचाराचे 1 हजार 399 गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षितेतकरीता सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये भरोसा केंद्राची उभारणी करुन पोक्सो, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, लैगिंक अत्याचार यामधील पिडीतांना सहाय्य व मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत पिडीतांना वेळेवर मदत देणे, पोलीस, वैद्यकीय, कायदेशीर मदत तसेच समुपदेशन हे एकाच छताखाली देण्याच्या दृष्टीने भरोसा केंद्र अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या केद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाला प्रक्षिक्षण द्यायला सुरूवात करा असे सांगून पिडीतांशी संवेदनशिलपणे वागणे, त्यांना अपमानास्पद, निष्ठुरपणे वागणूक यंत्रणेकडून मिळणार नाही याची दक्षता घेणे यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे यासंबंधी प्रशिक्षण घ्यावे, असे निर्देशही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्पांतर्गत करण्यात येत असणाऱ्या अन्य उपाययोजनांमध्ये पोलीस पेट्रोलिंगमध्ये गुलाबी स्कुटी पथकाचा समावेश, वाहतूकीच्या शेवटच्या माईलमोडमध्ये क्यूआर कोड आधारित लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग, राज्य परिवहन बसेसमध्ये आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये सीसीटीव्ही आणि डॅशकॅम चा वापर, महिलांना प्रशिक्षण देवून पिंक ईव्ही वाहनांचा वापर वाढविणे, महिलांसाठी 181 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करुन देणे आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी यावेळी सांगितले.
भरोसा केंद्र- महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात पोलीस विभागातर्फे करण्यात येत असणाऱ्या उपाययोजनांमध्ये भरोसा केंद्राची उभारणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. याद्वारे पिडीत महिलांना सुरक्षित वातावरण देणे आणि निपक्षपातीपणे न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणे, वेळेवर आपत्कालीन मदत देणे, यादृष्टीने हे भरोसा केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प या उपक्रमांतर्गत मानसिक आरोग्य सेवा समुपदेशन, वैद्यकीय तपासणी, भरपाई संदर्भात कार्यवाही, दंडाधिकाऱ्यांकडून जबाब नोंदविणे, कायदेशीर मदत, तात्पुरता निवारा, अशा आपत्कालीन सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच कल्याणकारी सेवांमध्ये स्वसरंक्षण वर्ग, पिडींतासाठी सामान्य जीवन पुनर्निमीतीसाठी मार्गदर्शन, किशोरवयीन गर्भधारणेबद्दल जागरुकता, व्यसनमुक्ती प्रशिक्षण आणि कौशल्य अभ्यासक्रम, लैगिंक शिक्षण, यासारख्या कल्याणकारी सेवाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
00000

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात

मुंबई, दि. 6 : लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधानमंडळादरम्यान सामंजस्य करार

विविध उपक्रमांना सामंजस्य कराराने चालना मिळेल – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सेंट पिटर्सबर्गरशिया दि. ६ :  महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते ९ जून२०२४ दरम्यान सेंट पिटर्सबर्ग (रशिया) च्या अभ्यास दौऱ्यावर असून आज दिनांक ६ जून रोजी दोन्ही विधानमंडळांमधील सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा सामंजस्य करार भारत-रशिया मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने तसेच मुंबई-सेंट पिटर्सबर्ग सिस्टर सिटीजच्या वाटचालीतील मानाचा तुरा ठरणार असल्याची भावना यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि अभ्यासदौरा शिष्टमंडळाचे नेते ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे विविध उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

या सामंजस्य करारावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झँडर बेलस्की यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  अंबादास दानवे,  विधानसभा सदस्य अमिन पटेल आणि श्रीमती गिता जैनविधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळेजनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह मुंबईतील रशिया हाऊसच्या संचालक श्रीमती एलिना रेमेझोव्हासेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे सन्माननीय सदस्यअधिकारी उपस्थित होते.

भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानमंडळाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोककल्याणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करणारे कायदेसखोल विचारमंथन आणि वाद-प्रतिवाद-सुसंवाद ही संसदीय लोकशाहीला अभिप्रेत असलेली सभागृहातील चर्चेची परंपरा याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही विधानमंडळांमध्ये वैचारिक आदान-प्रदानदोन्हीकडील सदस्यांच्या अभ्यासभेटीसंगीत-कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यक्रमांचे आयोजन या सामंजस्य करारामुळे आता अधिक चांगल्याप्रकारे करता येऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला.

विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी बोलताना रशियाने एक सच्चा मित्र या नात्याने आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताच्या भूमिकेला नेहमीच बळ दिल्याचे सांगितले. सुमारे ५५५ वर्षांपूर्वी भारत भेटीवर आलेले रशियन व्यापारी अफानासी निकीतीन यांचे अलिबाग जवळील रेवदंडा येथे उभारण्यात आलेले स्मारक तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा मॉस्कोतील रुदोमिनो राष्ट्रीय ग्रंथालयात समारंभपूर्वक बसविण्यात आलेला पुतळा आणि आता आजचा हा सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभ यामुळे हे मैत्रीसंबंध वेगळ्या उंचीवर पोहचले असल्याचे त्या म्हणाल्या. मराठीतील उत्तम साहित्य रशियन भाषेत अनुवादित करणाऱ्या मराठी भाषा प्रेमी आणि तज्ज्ञ डॉ. नीना क्रस्नादेम्बस्काया यांचा डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आवर्जून गौरव केला. महिला सशक्तीकरणअत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम (Student Exchange Programme) या बाबींना सामंजस्य करारामुळे निर्माण झालेल्या संयुक्त मंचाद्वारे प्राधान्य दिले जावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झँडर बेलस्की यांनी सप्टेंबर२०२३ मध्ये आपल्या मुंबई भेटीतील आठवणींना उजाळा दिला आणि सामंजस्य करारातील मुद्यानुसार यापुढील काळात परस्पर सर्वक्षेत्रीय संबंध आणखी दृढ होतील, अशी ग्वाही दिली.

सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरमला उपस्थिती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ आणि ७ जून रोजी सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरम – २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या अत्यंत महत्वाच्या परिषदेसाठी देखील या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभा ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे हे फोरमच्या  व्यासपीठावर आपले विचार मांडणार आहेत.

***

राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान

मुंबई, दि. ६ : राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

तीस (३०) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले, तर ७ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आली. अठ्ठयात्तर (७८) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

पोलीस अलंकरण समारंभाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

विनय कारगांवकर, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, वाहतूक मुंबई, आशुतोष डुंबरे, आयुक्त ठाणे शहर, अशोक अहिरे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण, विनोदकुमार तिवारी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर जिल्हा, प्रल्हाद खाडे, सेवानिवृत्त समादेशक, रा. रा. पो. बल – गट क्र. ६, धुळे, चंद्रकांत गुंडगे, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड व मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेग, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नांदेड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.

पदकाने सन्मानित पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी जोडली आहे.

0000

Governor presents President’s Police Medals

to 115 Police Officers, Personnel

Mumbai, 6th June : The Governor of Maharashtra Ramesh Bais presented the Police Medals for Gallantry, President’s Police Medals for Meritorious Service and Police Medals for Meritorious Service to 115 Police Officers and Police personnel at an Investiture Ceremony held at Raj Bhavan, Mumbai on Thursday (6th Jun).

The police medals announced on the Independence Day in 2021 and the Republic Day in 2022 were given away.

Addl Chief Secretary (Home) Sujata Saunik, Director General of Police Rashmi Shukla, Commissioner of Police Brihanmumbai Vivek Phansalkar, senior police officers, retired police officers, decorated police officers and police personnel and their family members were present.

Thirty police officers and police personnel were awarded the Police Medals for Gallantry, while President’s Police Medals were presented to 7 police officials. Seventy eight police officers and police personnel were given the Police Medals for Meritorious service on the occasion.

Vinay Kargaonkar, Retired DGP, Mumbai Traffic, Ashutosh Dumbre, Commissioner Thane City, Ashok Ahire, Retired Sub-Inspector of Police, Nashik Rural, Vinod Kumar Tiwari, Retd. PSI Chandrapur, Pralhad Khade, Retd Commandant, SRPF Group 6, Dhule, Chandrakant Gundge, retired Senior PI, Police Training Center Nanvij, Daund and Mirza Anwar Baig Ibrahim Baig, retired Sub-Inspector, Nanded were awarded the President’s Police Medal for Meritorious Service.

List of police officers who were presented medals is enclosed.

0000

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/06/06.06.2024-फाईनल-पदक-धारकांची-अवतरणानुसार-नावांची-यादी.pdf” title=”06.06.2024-फाईनल पदक धारकांची अवतरणानुसार नावांची यादी”]

नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस सेवा

मुंबई, दि. 6 : सध्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. टेलिमानस या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक 14416 (भ्रमणध्वनीसाठी) आणि 18008914416 (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या सेवेचा गरजू विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, सायक्याट्रिक नर्स आणि सायक्याट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत असून या सेवेसाठी मनोविकृतीतज्ज्ञदेखील नियुक्त आहेत. राज्यात आजपर्यंत 70 हजार व्यक्तींनी समुपदेशनाचा लाभ घेतला आहे. यामध्ये नैराश्य, ताणतणाव, निद्रानाश, दु:खी मन:स्थिती, पौगंडावस्थेतील मानसिक स्थित्यंतरे आदी समस्यांचे निराकारण केले जाते. राज्याच्या टेलिमानस कार्यक्रमाच्या उपयोगीतेमध्ये देशात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आयुक्त, आरोग्य सेवा यांनी कळविले आहे.

२७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई, दि 5:- 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच पार पाडण्यात आल्याचे 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

विहित नियमांनुसार मतमोजणी प्रक्रिया

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांननुसार दि 4 जून 2024 रोजी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात टपाली मतपत्रिकांची मोजणी ही विहित वेळेत म्हणजे सकाळी 8 वाजता सुरु करण्यात आली. ‘ईव्हीएम’ मशीनवरील मतमोजणी साडेआठ वाजता सुरु करण्यात आली फेरीनिहाय मत मोजणीदरम्यान प्रत्येक फेरीत उमेदवारांना मिळालेली मते मतमोजणी टेबलवर फॉर्म क्रमांक 17 C भाग 2 मध्ये भरून त्यावर मतमोजणी प्रतिनिधींची स्वाक्षरी घेण्यात आली. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत कोणत्याही फेरीत मतमोजणी प्रतिनिधींकडून कोणतीही हरकत प्राप्त झाली नाही. नियमाप्रमाणे प्रत्येक फेरीअखेर संबंधित फेरीत तसेच फेरीअखेर सर्व उमेदवारांना मिळालेली मते तसेच त्या फेरीअखेर आघाडीवर असलेल्या उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत जाहीर करण्यात येत होती. यानुसार 25 व्या फेरीची मतमोजणी जाहीर होत असताना टपाली मतपत्रिकांची मतमोजणी संपली, त्यामुळे पंचविसाव्या फेरीची तसेच पंचविसाव्या फेरी अखेरची मतमोजणी जाहीर झाल्यानंतर टपाली मतपत्रिकांच्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये उमेदवार अमोल कीर्तीकर यांना 1501 तर उमेदवार रवींद्र वायकर यांना 1550 मते प्राप्त होती. नियमाप्रमाणे टपाली मतपत्रिकांची संख्या ‘ईव्हीएम’ मतमोजणीच्या सर्व फेऱ्यानंतरची ज्यात बेरीज केली जाते. त्यामुळे 26 व्या फेरीतील मतदान यंत्रांची मतमोजणी संपल्यानंतर 26 व्या फेरीतील 26 व्या फेरीअखेर मतदान यंत्रांच्या मतमोजणीमध्ये आघाडीवर असणाऱ्या तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यात उमेदवार अमोल कीर्तीकर हे 1 मतांनी आघाडीवर होते.

नियमाप्रमाणे 26 व्या फेरीनंतर टपाली मतपत्रिकांची मतमोजणीची संख्या समाविष्ट करून उमेदवारनिहाय मते जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये उमेदवार श्री.वायकर हे 48 मतांनी आघाडीवर होते.

टपाली मतपत्रिका पुन:र्परीक्षण

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतमोजणी अखेर जर आघाडीच्या दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमधील फरक बाद टपाली मतपत्रिकांच्या संख्येपेक्षा कमी असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतःहून सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत बाद टपाली मतपत्रिका पुन:र्परीक्षण करणे बंधनकारक असल्याने व 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघात बाद टपाली मतपत्रिकांची संख्या 111 इतकी असल्याने या सर्व बाद टपाली मतपत्रिकांचे पुनर्परीक्षण उमेदवारांच्या उपस्थितीत करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. तपासणीअंती टपाली मतपत्रिकांच्या मोजणी संख्येत काहीही फरक पडला नाही.

मुद्देसूद हरकत घेतलेली नव्हती

यानंतर दोन्ही केंद्रीय मतमोजणी निरीक्षकांनी आवश्यक असलेले प्राधिकार दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीचा निकाल तसेच विजयी उमेदवार 7.53 वा जाहीर केला व श्री. कीर्तीकर यांच्या प्रतिनिधींनी 08.06  वाजता पुनर्मतमोजणीचे लेखी पत्र सादर केले. त्यांनी घेतलेली हरकत ही विहित मुदतीनंतर होती तसेच त्यांनी कोणतीही मुद्देसूद हरकत घेतलेली नव्हती तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया तसेच ‘व्हीव्हीपॅट’ मोजणी दरम्यान कोणतीही हरकत घेण्यात आली नव्हती असे 27- मुंबई उत्तर पश्चिमच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

—–000——

44-सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल घोषित; अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी

सांगली दि 4 (जि.मा.का.) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात  अपक्ष उमेदवार  विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा 44-सांगली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घोषित केले. त्यांना 5 लाख 71 हजार 666 इतकी मते मिळाली. विजयी उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. 44-सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना विधानसभा मतदारसंघनिहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे.

क्र.

नाव पक्ष 281-मिरज (अ.जा.) 282-सांगली 285-पलूस- कडेगाव 286-खानापूर 287-तासगाव- कवठेमहांकाळ 288-जत टपाली मते एकूण
1. चंद्रहार सुभाष पाटील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 8021 7156 13859 16956 7949 6174 745 60860
2. टिपू सुलतान सिकंदर पटवेगार बहुजन समाज पार्टी 755 758 772 897 1147 1173 58 5560
3. संजय (काका) पाटील भारतीय जनता पार्टी 84029 85993 59376 75795 85074 79125 2221 471613
4. आनंदा शंकर नालगे बळीराजा पार्टी 633 478 519 691 589 621 9 3540
5. पांडुरंग रावसाहेब भोसले भारतीय जवान किसान पार्टी 904 557 717 1167 968 1205 47 5565
6. महेश यशवंत खराडे स्वाभिमानी पक्ष 1049 536 941 1838 808 319 30 5521
7. सतीश ललिता कृष्णा कदम हिंदुस्थान जनता पार्टी 467 293 424 617 425 625 8 2859
8 अजित धनाजी खंदारे अपक्ष 224 161 205 348 205 237 18 1398
9 अल्लाउद्दीन हयातचांद काजी अपक्ष 1843 1305 1278 1732 1506 1605 13 9282
10 डॉ. आकाश  व्हटकर अपक्ष 146 111 136 153 119 138 11 814
11 जालिंदर मच्छिंद्र ठोमके अपक्ष 295 139 169 220 186 248 3 1260
12 तोहीद इलाही मोमीन अपक्ष 213 193 217 316 211 310 0 1460
13 दत्तात्रय पंडीत पाटील अपक्ष 231 214 230 299 283 211 1 1469
14 प्रकाश शिवाजीराव शेंडगे अपक्ष 575 600 553 1008 2110 3304 101 8251
15 बंडगर नानासो बाळासो अपक्ष 243 221 168 234 170 256 8 1300
16 रविंद्र चंदर सोलनकर अपक्ष 623 438 423 777 565 823 9 3658
17 विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील अपक्ष 109110 105185 95558 92459 94485 72854 2015 571666
18 शशिकांत गौतम देशमुख अपक्ष 495 289 475 609 539 736 12 3155
19 सुवर्णाताई सुधाकर गायकवाड अपक्ष 316 237 235 334 375 428 12 1937
20 संग्राम राजाराम मोरे अपक्ष 133 118 159 186 169 239 7 1011
 

21

 

नोटा 1125 1398 1032 1071 992 894 53 6565
  Rejected Vote 0 0 0 0 0 0 576 576
 

एकूण

 

211430 206380 177446 197707 198875 171525 5957 1169320

ताज्या बातम्या

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक सतीशकुमार खडके यांची मुलाखत

0
मुंबई दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'आपत्ती पूर्व व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन व अंमलबजावणी' या विषयासंदर्भात राज्य आपत्ती...

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

0
मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे....

विधानसभा प्रश्नोत्तर

0
राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू - वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ४ : गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या समुद्रकिनारी कांदळवन आहेत. या कांदळवनांचे...

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान – केंद्रीय मंत्री जीतन...

0
मुंबई, दि. ४ : भारत जगातील चौथी विकसित अर्थव्यवस्था आहे. भारताच्या सकल उत्पन्नात (जीडीपी) सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगाचे (एमएसएमई) ३०.१ टक्के, उत्पादन क्षेत्राचे ३५.४ टक्के तर...

नंदुरबार जिल्ह्यातील भरोसा सेल आणि दामिनी पथकांची कामगिरी उत्तम – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा...

0
नंदुरबार, दिनांक 04 जुलै, 2025 (जिमाका) : जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत जिल्ह्यात भरोसा सेल आणि दामिनी पथकांचे काम उत्तमरित्या सुरू आहे, तसेच बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि...