शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 720

मुंबई, दि. १२ :- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – २ चा मुख्य उद्देश संपूर्ण राज्य २०२४-२५ पर्यंत हागणदारीमुक्त करणे हा आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील ३३ हजार ९४७ गावे हागणदारी मुक्त झाली असून, ६ हजार ५२८ गावे जुलैपर्यंत हागणारी मुक्त करण्यासाठीची कार्यवाही तातडीने राबविण्यात यावी. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येणारी कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री पाटील यांनी दिले.

आज मंत्रालयात स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा – २ च्या कामकाजाचा आढावा आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी प्रधान सचिव संजय खंदारे, सहसचिव तथा अभियान संचालक शेखर रौंदळ, अवर सचिव चंद्रकांत मोरे, स्मिता राणे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गावे १४ हजार ९०७ असून, उर्वरित २५ हजार ५६६ गावे मॉडेल बनविण्यासाठी, वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रगतीतील एक लाख १२ हजार शौचालयांचेही बांधकाम, तसेच सार्वजनिक शौचालय बांधकाम अंतर्गत १ लाख २१ हजार बांधकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांसाठी निधी केंद्र शासनाकडून प्राप्त होतो, त्या बांधकामांच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव सादर करावा.

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्याकडून ट्रायसायकल व बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकलची मागणी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. कचरा विलगीकरण केंद्र, गोबरधन प्रकल्प प्रगती, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगती, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प प्रगती, मैला गाळ व्यवस्थापन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामांचा यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी आढावा घेतला.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि.12 : राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पाणी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. यामुळे ‘हर घर नलसे जल’ या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्यासाठी राज्यात सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिले.

मंत्रालयातील दालनात राज्यातील जलजीवन मिशनबाबत आढावा बैठकीत मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन, सहसंचालक श्रीकांत अनारसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ,आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील ग्रामीण जनतेला पाणीटंचाई भासू नये, यासाठी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत जलजीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. राज्यातील  1 कोटी 46 लाख 71 हजार 918 कुटुंबापैकी 1 कोटी 25 लाख 98 हजार 195 कुटुंबांना नळ जोडणी देऊन  पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शाळा, अंगणवाड्यांनाही 99 टक्के नळजोडणी देण्यात आली आहे. जलजीवन मिशनचे सुधारित प्रस्ताव त्वरित पाठविण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या. शिवाय राज्यभरातून सुधारित प्रस्तावासाठी आणि कामे मिशन मोडवर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागांतर्गत शिबीरे आयोजित करावीत.

अमरावती, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात जिथे निधीची कमतरता आहे, तिथे त्वरित निधी वितरित करावा. जिल्हा परिषदस्तरावर कामे वेगाने होण्यासाठी गट स्थापन करावेत. येत्या एक महिन्यामध्ये योजनेला गती देण्याचे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासाठी ज्या जिल्ह्यांची निधीची मागणी आहे, त्यांना निधी देण्यात येणार असून महिन्याभरात कामांना सुरळितपणा आणण्याची ग्वाही प्रधान सचिव श्री. खंदारे यांनी दिली.

राज्यात यावर्षी आतापर्यंत 1 लाख 5206 नळजोडणी केली तर 17221 गावे हर घर जल म्हणून घोषित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं

शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सुविधा निर्माण करा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई दि. १२ : शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी पणन विषयक सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या १५२ व्या संचालक मंडळाची सभा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. सदर बैठकीमध्ये पणन मंत्री श्री. सत्तार यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

महाराष्ट्र राज्य पणन मंडळातर्फे बापगाव, काळडोंगरी, छत्रपती संभाजीनगर तळेगाव दाभाडे तसेच सिल्लोड श्रीरामपूर येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांचे  सादरीकरण यावेळी करण्यात आले. याशिवाय काजू बोर्ड, आंबा बोर्ड, शासन अनुदानित नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे उभारण्यात येणा-या संत्रा प्रकल्पांचे कामकाज याचा आढावा घेण्यात आला. आंबा उत्पादकांसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधूरत्न योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कुलिंग व्हॅन, स्मार्ट प्रकल्पातून निर्माण करण्यात येणाऱ्या पणन विषयक सुविधा, ई-नाम योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १५ बाजार समित्यांबाबत ई- नाम योजनेनुसार पुढे करावयाची कार्यवाहीबाबत सद्यस्थितीची माहिती श्री.सत्तार यांनी यावेळी दिली.

सिल्लोड तालुक्यातील उत्पादित होणाऱ्या मिरचीचे उत्पादन व गुणवत्ता विचारात घेऊन तेथे मिरचीसाठी सुविधा केंद्र निर्माण करावे, दोन जिल्हा मिळून पणन मंडळाचे एक उपविभागीय कार्यालय करावे, तळेगाव दाभाडे येथील प्रक्षेत्रावरील कव्हेंशन सेंटरचे काम जलद गतीने पूर्ण करावे तसेच तळेगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुल लिलाव केंद्र निर्माण करावे, अशा सूचना श्री.सत्तार त्यांनी यावेळी दिली.

सदर बैठकीस पणन मंडळाचे संचालक प्रवीण कुमार नहाटा, चरणसिंग ठाकूर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी भवेश कुमार जोशी, कार्यकारी संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

महाराष्ट्रातील चार केंद्रीय राज्यमंत्र्यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली, दि. 11 : महाराष्ट्रातील चार केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आज त्यांना सोपविण्यात आलेल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला. या मंत्र्यांमध्ये रामदास आठवले, प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.

रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सामाजिक न्याय क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताना त्यांनी औषधीय वनस्पती रोपण करून आरोग्य क्षेत्रात नव्या कल्पनांचा प्रारंभ केला.

श्रीमती रक्षा खडसे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री आहेत.

मुरलीधर मोहोळ यांनी सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सहकार मंत्रालय महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, असा विश्वास श्री. मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.

******

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना पद्म भूषण पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 11 : ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना राष्ट्रपतींच्या वतीने राज्य शासनामार्फत पद्म भूषण पुरस्कार प्रदान करून आज सन्मानित करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर तसेच अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी श्री. शर्मा यांच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्याचबरोबर शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे, प्यारेलाल शर्मा यांच्या पत्नी सुनीला आणि कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्यारेलाल शर्मा यांनी यावेळी केंद्र सरकारसह राज्य शासनाचे आभार मानले.

या वर्षीचा पद्म पुरस्कार प्रदान सोहळा 9 मे 2024 रोजी राष्ट्रपती भवन येथे झाला. या सोहळ्यामध्ये श्री. शर्मा उपस्थित राहू शकले नसल्याने राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांच्या हस्ते श्री. शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0000

 

बी.सी.झंवर/विसंअ/

‘सचेत’ प्रणाली- आपत्ती काळातील ‘संदेशदुत’

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे होय.  नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ, भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळ यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. आपत्ती व्यवस्थापन करताना कोणत्याही आपत्तीची पूर्व सूचना मिळणे खूप महत्वाचे असते ज्यामुळे होणारी हानी कमी करता येऊ शकते.

        यासाठी National Disaster Management Authority म्हणजेच NDMA ने एक एप्लिकेशन म्हणजेच ॲप कार्यान्वित केले आहे. ज्याचे नाव आहे सचेत. या सचेत विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. हे ॲप वापरण्यास अगदी सोप्पे आहे.Google App Store किंवा iOS प्रणालीवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. डाऊनलोड केल्यानंतर इतर ॲप प्रमाणे आपला मोबाईल क्रमांक भरून नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP क्रमांक येतो तो टाकला की आपण हे ॲप वापरू शकतो. नोंदणी केल्यावर आपण आपले लोकेशन टाकले की आपल्या परिसरातील हवामान तसेच इतर आपत्ती विषयक माहिती तात्काळ उपलब्ध होते. विशेष म्हणजे ह्या app मधील Subscribe Location मध्ये जाऊन आपण पाहिजे त्या ठिकाणचे हवामान, आपत्ती विषयक परिस्थिती जाणून घेऊ शकतो.

            ह्या app मधील Disaster Survival Guide या विशेष चौकटीमध्ये (Window) गेल्यावर आपल्याला विविध आपत्ती परिस्थितीमध्ये जसे की हिमस्खलन, चक्रीवादळ, त्सुनामी, पुर, भूकंप, रासायनिक गळती, जैविक आणीबाणी काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे जी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. शिवाय हा app मध्ये जगामध्ये लगतच्या काळात कुठे भूकंप झाले,  त्याची तीव्रता काय अशा अनेक घटकांची माहिती देखील उपलब्ध आहे. तसेच आपल्याला आपत्तीच्या प्रसंगी काही मदत हवी असल्यास ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याची देखील सुविधा देण्यात आलेली आहे. सर्वांनी आपल्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.  चला तर मग जाणून घेऊया या ॲप विषयी….

‘सचेत’ ही प्रणाली जागतिक स्तरावर स्विकृत कॉमन अलटिंग प्रोटोकॉल (CAP) मानकांवर आधारित असून याची संकल्पना NDMA द्वारे प्रत्यक्षात आणली गेली तसेच ही योजना पूर्णतः NDMA पुरस्कृत आहे.

        ही प्रणाली गृह मंत्रालय तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांच्या नागरिकांना स्थानिक भाषांमध्ये स्थान आधारित आपत्ती सतर्कतेचा संदेश प्रसारित करणे, लोकांना वेळेवर पूर्वसूचना देणे व त्या माध्यमातून जोखीम कमी करण्याची सुविधा प्रदान करते. यामुळे जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होते.

ही प्रणाली IMD, CWC, INCOIS, DGRE, ICAR, ICMR यासारख्या अलर्ट जनरेटिंग एजन्सींना राष्ट्रीय स्तरावरील समान व्यासपीठावर एकत्रित करते. सदर प्रणाली तंत्रज्ञान सिद्धता व पायलट प्रोजेक्ट अंतर्गत तामिळनाडू राज्यात 1 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे. CAP – सचेत, प्रकल्पाची संपूर्ण भारतात अंमलबजावणी करण्यासाठी NDMA आणि C-DOT यांच्यात 23 ऑगस्ट 2021 रोजी सामंजस्य करार झाला आहे.

          सद्यस्थितीत या प्रणालीचा पहिला टप्पा पूर्णतः कार्यान्वयित करण्यात आला असून सचेत प्रणालीच्या पहिल्या टप्या अंतर्गत Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea, MTNL,BSNL या मार्फत स्थान आधारित मेसेज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी कालवधीत आपत्तीबाबत पूर्वसूचना देणे शक्य झाले आहे. याचा वापर सामान्य व्यक्ती तसेच मच्छिमार यांना सूचना देण्यासाठी होऊ शकतो. प्राथमिक स्तरावरील पारंपारिक मोबाईल नेटवर्कचा उपयोग करून या प्रणालीचा वापर करता येतो, हा या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा आहे.

        ‘सचेत’ या प्रणालीच्या पुढील टप्प्यात Cell Broadcast म्हणजे मोबाईलवर व्हॉइस संदेश पाठवणे तसेच रेडीओच्या माध्यमातून संदेश प्रसारित करणे, T.V च्या माध्यमातून नागरिकांना संदेश देणे तसेच भारतीय रेल्वेच्या प्रवासी माहिती उद्घोषण प्रणालीद्वारे संदेश प्रसारित करणे अशा प्रकारची यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. सदर प्रकल्पासाठी (प्रणाली देखभाल खर्च) पुढील 10 वर्षाकरिता येणारा खर्च हा NDMA द्वारे केला जाणार असल्याने राज्य व केंद्रशासित प्रदेशांवर याचा आर्थिक भार पडणार नाही.

        भारत सरकार, दूरसंचार विभाग यांनी सन २०२० मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार आपत्ती दरम्यान अथवा आपत्ती प्रवण भागात सबंधित प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पाठवण्यात येणाऱ्या SMS अथवा Cell Broadcast याकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपत्ती व्यतिरिक्त कारणासाठी सदर प्रणालीचा वापर केल्यास त्यासाठी येणारा खर्च भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण व भारतीय दूरसंचार विभाग यांनी निर्धारित केलेल्या दरानुसार राज्य / केंद्रशासित प्रदेश यांना करावा लागेल.

CAP-इंटिग्रेटेड अलर्ट सिस्टमची वैशिष्ट्ये

       CAP-इंटिग्रेटेड अलर्ट सिस्टम आपत्ती सूचना माहितीच्या देवाणघेवाणीसाठी जागतिक स्तरावर स्वीकृत ITU-T x.१३०३ CAP मानक आधारित प्रणाली असून या प्रणालीचा मुळ उद्देश सर्व एजन्सींना एका छत्राखाली आणणे आणि माहिती देवाण-घेवाणीमध्ये वाया जाणारा मौल्यवान वेळ वाचवणे हा आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही धोक्यासाठी सर्व संभाव्य प्रसार पद्धतीचा वापर करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणे शक्य आहे. राज्यात शहरापासून ते गावापर्यंत मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ‘सचेत’ प्रणालीचा वापर करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहचविणे शक्य आहे.

     या प्रणालीद्वारे प्रभावित क्षेत्रातील स्थानिक लोकसंख्येव्यतिरिक्त हंगामी किंवा पर्यटन लोकसंख्येला देखील समाविष्ट करून संदेश किंवा माहिती पोहोचविणे शक्य आहे. या प्रणालीचा वापर करून विशिष्ट भौगोलिक भागातील लोकसंख्येला विशिष्ट संदेश पोहोचविणे शक्य आहे. यामुळे त्याची उपयोगिता आणि प्रभावीपणा वाढण्यास मदत होते. स्थानिक जनतेला संदेशाचे अवलोकन करता यावे यासाठी स्थानिक भाषेत संदेश पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. दृष्टिहीन व्यक्तींना संदेश पोहोचविण्यासाठी ध्वनिमुद्रित संदेश पाठवण्याची सुविधा या प्रणालीत उपलब्ध आहे.

       सचेत या एकाच यंत्रणेचा वापर करून पावसासंबंधी इशारे, पूर, चक्रीवादळ, संभाव्य भूस्खलन, त्सुनामी, गारपीठ, वीज पडणे, उष्णतेची लाट थंडीची लाट अशा वेगवेगळ्या आपत्ती प्रकारांबाबत वेगवेगळ्या प्रकारचे संदेश / सूचना देणे शक्य आहे. सर्व नागरिकांना आरोग्य विषयक सल्ले, कायदा व सुव्यवस्था याबाबत सूचना प्रसारित करणे तसेच मच्छिमारांना हवामान विषयक पूर्वसूचना देणे शक्य आहे. सर्व नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी सर्व TSP (दूरसंचार सेवा प्रदाता), मोबाईल अप्लिकेशन, सार्वजनिक संकेतस्थळे, इंटरनेट ब्राउजर नोटिफिकेशन, शासकीय सोशल मिडिया, T.V. रेडीओ, बस व रेल्वे यांची सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली तसेच GAGAN, IRNSS व NavIC या सारख्या भारतीय भौगोलिक स्थिती दर्शक प्रणाली या सारख्या बहुस्तरीय यंत्रणेचा वापर या प्रणालीद्वारे केला जाऊ शकतो. या यंत्रणेच्या गैरवापरास प्रतिबंध करण्यासाठी बहुस्तरीय सुरक्षित प्रमाणीकरण आणि विश्वसनीय उपकरण यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापनाकरिता ‘सचेत’ प्रणाली वापर पुढील प्रमाणे करता येऊ शकतो

अ) आपत्ती पूर्व वापर –

१. मुसळधार / अति मुसळधार पावसाचा इशारा देणे.

२. संभाव्य पुराबाबत इशारा देणे.

३. चक्रीवादळाबाबत इशारा देणे.

४. त्सुनामीबाबत धोक्याची सूचना देणे.

५. विजेपासून होणाऱ्या जीवितहानीबाबत पूर्वसूचना देणे.

६. मच्छिमार लोकांना हवामानाबाबत पूर्वसूचना देणे.

७. निवाराकेंद्र / स्थलांतर याबाबत सूचना देणे.

८. माहितीकरिता संपर्क क्रमांक प्रसारित करणे.

ब) आपत्ती दरम्यान वापर

१. आपत्तीबाबत अद्ययावत सूचना प्रसारित करणे.

२. सुरक्षित स्थळांची माहिती देणे.

३. आपत्ती दरम्यान ‘काय करावे व काय करू नये’ याबाबत सूचना देणे.

४. मदतीकरिता संपर्क क्रमांक प्रसारित करणे,

क) आपत्ती नंतर वापर

१. मदत व पुनर्वसन या संबंधित माहिती प्रसारित करणे.

२. पूर, भूकंप, भूस्खलन अथवा इतर कारणांनी बंद झालेले रस्ते, महामार्ग, घाटमार्ग, पूल यांची माहिती देणे.

लघुरूप

  CAP : Common Alert Protocol

NDMA: National Disaster Management Authority

 IMD : Indian Metrological Department

CWC: Central Water Commission

INCOIS: Indian National Centre for Ocean Information Services

DGRE: Defence Geoinformatics Research Establishment

 ICAR : Indian Council of Agriculture Research

ICMR: Indian Council of Medical Research

C-DOT: Centre for Development of Telematics

SOP : Standard Operating Procedure

TSP:  Telecom Service Provider

 GAGAN: GPS Aided Geo Augmented Navigation

NavIC: Navigation with Indian Constellation

IRNSS: Indian Regional Navigation Satellite System

 

मुकुंद चिलवंत

जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदूर्ग

राम नाईक, राजदत्त, उदय देशपांडे, कुदंन व्यास सन्मानित; बाल पुरस्कार विजेता आदित्य विजय ब्राह्मणे मरणोपरांत सन्मानित

मुंबई, दि. 11 : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक (पद्मभूषण), ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजदत्त (पद्मभूषण), ‘मुंबई समाचार’चे अध्यक्ष होर्मुसजी कामा   (पद्मभूषण), ‘जन्मभूमी’चे संपादक कुंदन व्यास (पद्मभूषण), मल्लखांबचे प्रचारक व प्रशिक्षक उदय देशपांडे (पद्मश्री), ग्रामीण – आदिवासी भागात निःशुल्क नेत्रचिकित्सा देणारे डॉ. मनोहर डोळे (पद्मश्री), अंजुमन ई इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी (पद्मश्री) व नागपूर येथील मज्जाविकार तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा राज्यपालांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

नंदुरबार येथील पिंप्राणी येथे नदीत पडलेल्या आपल्या भावांचे जीव वाचवल्यानंतर वीरमरण आलेल्या १२ वर्षाच्या आदित्य विजय ब्राह्मणे याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मरणोपरांत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिवंगत आदित्यच्या शौर्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्याच्या लहान भावाला यावेळी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले,  कार्याध्यक्ष अविनाश नाईक, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, दीपक पाटील व निमंत्रित उपस्थित होते.

००००

Governor felicitates Padma awardees from Maharashtra

Ram Naik, filmmaker Rajdutt, Mallakhamb guru Uday Deshpande,

Hormusji Cama, Kudan Vyas honoured

Bal Shaurya Awardee Aditya Vijay Brahmane honored posthumously

Mumbai, 11th June : Maharashtra Governor Ramesh Bais felicitated the Padma Awardees from the State at a felicitation held at Raj Bhavan Mumbai on Tue (11 Jun).

The felicitation function was organized by the Vasantrao Naik Agricultural Research and Rural Development Foundation.

Former Governor of Uttar Pradesh Ram Naik (Padma Bhushan), Film Producer – Director Raj Dutt (Padma Bhushan), President of ‘Mumbai Samachar’ Hormusji N. Cama (Padma Bhushan), ‘Janmabhoomi’ Chief Editor Kundan Vyas (Padma Bhushan), Mallakhamba Guru and promoter Uday Deshpande (Padma Shri), Ophthalmic surgeon Dr. Manohar Dole (Padma Shri), President of Anjuman I Islam Institute Dr. Zaheer Kazi (Padma Shri) and Neurologist from Nagpur Dr Chandrasekhar Meshram were felicitated by the Governor.

Twelve year-old recipient of the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar from Maharashtra Aaditya Vijay Brahmane, who sacrificed his life after saving the lives of his cousins in Nandurbar, was honoured posthumously. Late Aaditya’s younger brother was felicitated by the Governor on the occasion.

The Governor garlanded the portrait of former Chief Minister Vasantrao Naik and released a souvenir on the occasion.

President of the Vasantrao Naik Foundation Rajendra Barwale, Working President Avinash Naik, MLA Nilay Naik, MLC Indranil Naik, Trustee Mushtaq Antule, Deepak Patil and invitees were present.

0000

उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या व उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना शासनाकडून मदतीचे निकष निश्चित करावेत – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि. ११ : नैसर्गिक आपत्तीत वीज पडून मृत्यू झाल्यास आपद्ग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. त्याच धर्तीवर उष्माघाताने मृत रुग्णांनाही मदत मिळण्याबाबत नैसर्गिक आपत्तीचा निकष लावावा, जेणेकरून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत मिळेलृ, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची नोंद होत नाही त्यामुळे याबाबतचा आढावा शासन स्तरावून घेण्यात यावा. तसेच उष्माघाताने मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदतीची तरतूद नसल्याने आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे उष्माघातातील रुग्णांना मदतीबाबत निकष ठरविण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

बाल धोरण व कृती आराखड्यासंदर्भात ३० जून पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ११ : महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी गठित समितीने तयार केलेला मूळ मसुदा इंग्रजी भाषेत असून, मराठी भाषेमध्ये त्याचे भाषांतर करण्यात आले आहे. मसुदा शासनाच्या https://womenchild.maharashtra.gov.inhttps://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांकडून मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना ३० जून २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वा. पर्यंत मागविण्यात आल्या असल्याची माहिती, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

नागरिकांनी हरकती व सूचना महिला व बाल विकास आयुक्तालय, २८ राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे- ०१ या पत्त्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठवाव्यात. प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मूळ इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आला असून त्याचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे.

०००

काशिबाई थोरात/विसंअ/

खरीप हंगामासाठी बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ११ : राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे टॅंकरद्वारे पाणी पुरवठा आणि चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य द्यावे. आपत्तीकाळात सर्व विभागांनी समन्वयातून काम करून नागरिकांना वेळेवर मदत पोहोचेल यादृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

टंचाईच्या ठिकाणी टॅंकर भरण्यासाठी सोलर पंप वापरावेत

टंचाईच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध होत नसेल तर त्याठिकाणी जिल्हा विकास निधीतून सोलर पंप बसविण्यासाठी आणि पाणी साठवणुकीसाठी प्लास्टीक टाक्या घेण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत सद्यस्थिती व पर्जन्यमानाबाबतचा आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे, शंभूराज देसाई, धनंजय मुंडे, दादा भुसे, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आदी उपस्थित होते.

यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणेने अधिक सज्ज रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

पाणी साठवणुकीसाठी प्लास्टीक टाक्यांचा वापर करावा

राज्यात गेल्या दहा दिवसात सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला असून जेथे पुरेसा पाऊस आहे तेथे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात यावे. खरीपासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणांचा काळाबाजार आणि बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने धडक कारवाई करावी. त्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पाणी टंचाई ज्या भागात जाणवते तेथे टॅंकर भरण्यासाठी सोलर पंप वापरण्याची परवानगी देतानाच हे पाणी विहिरीत न साठवता त्यासाठी प्लास्टीक टाक्या वापराव्यात जेणेकरून पिण्याचे स्वच्छ पाणी मिळेल. या टाक्यांना नळ बसविण्यात यावे जेणेकरून महिलांना पाणी भरण्यासाठी सुलभता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  वीजबिल थकीत असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घ्यावी. अशा योजनांचा वीज पुरवठा खंडीत करू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मदतीचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. त्याच्या वितरणाच्या प्रक्रियेला गती द्यावी. केवायसी अभावी निधी बॅंकेत पडून राहता कामा नये, असे सांगतानाच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे, घरांचे पंचनामे तातडीने करण्यात यावे. जेथे पुरेसा पाऊस झाला नाही तेथे टँकर, चारा डेपो सुरू ठेवावे. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने फिल्डवर जाऊन कामांना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, प्रधान सचिव विकास खारगे, ब्रिजेश सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी अधिकारी उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

००००

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...