शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 719

शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शासनाचे निर्देश

मुंबईदि. 28 : राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नाहीअशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम 4 मध्ये करण्यात आलेली आहे. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास आल्यास तसा अहवाल शासनास सादर करावाशासनास अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावरुन संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईलअसेही या अनुषंगाने स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदीच्या कालावधीत शाळा नियमित सुरु नसल्याने राज्य मंडळाच्या शाळा वगळून इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन 2022-23 च्या आठवीची बॅच 2023-24 ला नववी मध्ये व 2024-25 ला दहावीला जाईल त्यांना एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबत दिनांक 19 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयाद्वारे सवलत दिली आहे. ही सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे श्रेणी स्वरूपात करण्यात आलेल्या मूल्यांकनाच्या नोंदी संबंधित शाळांनी ठेवाव्यात व त्याबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. तसेच दिनांक 19 एप्रिल, 2023 च्या शासन निर्णयाद्वारे श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबतच्या सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. या सवलतीचा गैरवापर होत असल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावाअसे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या प्रचलित भाषा सूत्रानुसार व महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2020 पासून करण्यात येत आहे. यासंबंधीच्या अधिनियमाची सन 2020-21 पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सन 2022-23 च्या आठवीच्या बॅचला एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाची परीक्षा गुणांकनाची न ठेवता श्रेणी स्वरुपात मूल्यांकन करण्याबाबत सवलत देण्यात आली. ही सवलत फक्त एका बॅचपूरतीच मर्यादित होती. तसेच ही सवलत दिली असली तरीही राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. या सवलतीचा चुकीचा अर्थ लावून मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकविली जात नसल्याचे काही ठिकाणी दिसून येत असल्याने याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत.

00000

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/02/शाळांमध्ये-मराठी-अध्यापन-सक्तीची-अंमलबजावणी.pdf” title=”शाळांमध्ये मराठी अध्यापन सक्तीची अंमलबजावणी”]

बी.सी.झंवर/विसंअ/

शाळांमधील परसबागांसंबंधी मार्गदर्शनासाठी विठ्ठल कामत आणि विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समित्या स्थापन

मुंबईदि. 28 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नागरी भागातील पात्र शाळांना परसबाग निर्मितीपरसबागेतून उत्पादीत भाजीपाला यांचा पोषण आहारात समावेश याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात येत आहेत. मुंबई (कोकण विभाग)पुणेनाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांसाठी विठ्ठल कामत यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती आणि नागपूर विभागासाठी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या कार्य करतील.

कोकण आणि पुणे विभागीय समितीमध्ये शिशिर जोशी हे सदस्य असतील. कोकण विभागीय समितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य सचिव असतील. पुणे विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद पुणेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य तर पुणे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.

अमरावती विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद अमरावतीचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि नागपूर विभागासाठी जिल्हा परिषद नागपूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य सचिव राहतील. नाशिक विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद नाशिकचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय समितीमध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य सचिव असतील. विभागीय समितीमध्ये तीन सदस्य निवडीचे अधिकार संबंधित विभागीय समितीच्या अध्यक्षांना असणार आहेत.

ही समिती नागरी भागातील शाळांमध्ये परसबागा निर्माण करणेनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणेस्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करणेउत्पादित भाजीपाला व त्याचे पोषणमूल्य याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी उपाययोजनाभाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये समावेश करणेशिल्लक राहणाऱ्या आहाराबाबत उपाययोजना आदींबाबत मार्गदर्शन करणार आहे.

विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावीकृषी विषयाचे पायाभूत ज्ञान मिळावेविद्यार्थ्यांनी पिकविलेल्या ताज्या भाजीपाल्याचाफळांचा समावेश त्यांच्या पोषण आहारात व्हावा आदी हेतूने राज्यात सर्व शाळा स्तरावर परसबागा निर्माण केल्या जात आहेत. या परसबागा निर्मितीकरिता मार्गदर्शनासाठी विभागीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सांगली दि. २८ (जिमाका) : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय काय नियोजन केले जात आहे, याचा आढावा सर्व संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्याकडून जिल्हा नियोजन समिती सभागृहत घेतला. यावेळी डॉ. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले की, संबंधित ARO नी मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी यावे यासाठी तरुण, वयोवृद्ध व दिव्यांग तसेच महिला मतदार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या द्याव्यात, तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमधे दिव्यांगांसाठी रॅम्प, महिला पुरुष स्वच्छता सुविधा, लाईट, पाणी, निवारा-सावलीची व्यवस्था तसेच मॉडेल मतदान केंद्र याबाबत आवश्यक सूचना केल्या. लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे सांगून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला, एकमेवद्वित्तीय अशी आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी.

तसेच जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करुन आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणीप्रसंगी प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. महिला मतदारांची नोंदणी करुन मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना दिल्या.

मतदार यादीच्या माहितीचे (डाटा) दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधीतानी त्याचे निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यातील त्रुटींची पूर्तता करावी. त्याचबरोबर या निवडणुकीत 100 टक्के मतदान करणाऱ्या गावांचा जिल्हा प्रशासनातर्फे यथोचित सन्मान करावा अशी सूचनाही श्री. देशपांडे यांनी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी लोकसभा निवडणुकीकरिता सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती पीपीटीद्वारे सादर केली तसेच जिल्ह्यात एकूण 2421 मतदान केंद्रे असल्याचे सांगितले.  या पूर्वतयारी आढावा बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

०००

भटक्या विमुक्त जमातीच्या प्रतिनिधींसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली बैठक

सांगली (जिमाका) दि. २८ : भटक्या जाती -जमातीतील लोक निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नयेत, त्याचबरोबर त्यांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच त्यांच्या इतर प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील विविध प्रतिनिधी, संघटना व सहाय्यकारी संस्था यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली.

यावेळी त्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधा, विविध ओळखपत्र व मतदान कार्ड याबाबत त्यांनी आढावा घेतला. या समाजाविषयी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. मतदान प्रक्रियेत समावेश होण्यासाठी त्यांना मतदार ओळखपत्राची गरज आहे. त्यांना ते वेळेत देण्यात यावे तसेच त्यांच्या रेशन कार्ड, जातीचा दाखला याबाबतही आढावा घेवून दि. ३ मार्च पासून सर्व्हे सुरु करण्यात यावा, असे निर्देश श्री. देशपांडे यांनी  प्रांताधिकारी यांना दिले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयाधिनी यांनी, गायरान जमिनीवर भटक्या विमुक्त जातीतील लोकांना कायमस्वरूपी निवारा देता येईल का? या बाबत जिल्हा प्रशासनामार्फत कायदेशीर बाबी तपासल्या जातील, असे सांगितले.  तर या जमातीच्या लोकांचा डाटाबेस असण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित भटक्या समाजातील नागरिकांनी त्यांना येणाऱ्या विविध अडचणी श्री. देशपांडे यांना सांगितल्या.

०००

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रयत्न करावेत 

 सांगली  दि. २८ (जिमाका) : देशातील लोकशाहीसाठी तरुण मतदार हा अत्यंत आवश्यक घटक आहे. तथापि, मतदान प्रक्रियेबाबत दुर्दैवाने तो उदासीन राहतो. युवकांनी विशेषता महाविद्यालय युवकांनी मतदान प्रक्रियेत अत्यंत उत्साहाने सामील व्हावे, तसेच हे तरुण निवडणूक मतदान प्रक्रियेत कशा पद्धतीने अधिक सहभागी होतील याबाबत जिल्ह्यातील प्राचार्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत आज बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले की, युथ हे खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेचे आयकॉन असून त्यांचे काउंटिंग व पोलिंग प्रक्रियेत योगदान देण्यात येणार आहे. त्यांच्या या योगदानामुळे तो मतदानाकडे सकारात्मकरित्या पाहू शकेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला .

यावेळी स्वीप अंतर्गत मतदार नोंदणी कामी योगदान देणाऱ्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गौरविण्यात आलेली महाविद्यालये व विद्यार्थी पुढीलप्रमाणे. उत्कृष्ट महाविद्यालय – पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगांव, बळवंत कॉलेज विटा, श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर, मिरज महाविद्यालय मिरज, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी .

उत्कृष्ट नोडल अधिकारी – डॉ. काकासाहेब भोसले डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली), डॉ. नेताजीराव पोळ पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय कवठे महांकाळ, प्रा. किरण मधाळे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सांगली.

उत्कृष्ट कॅम्पस अम्बॅसडर (राजदूत) – कु. मानसी माने, मातोश्री बयाबाई श्रीपतीराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव, शंकर साळुंखे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिराळा, कु. शुभांगी माने राजे रामराव महाविद्यालय जत, अविनाश जगधन कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली.

उत्कृष्ट जिल्हा समन्वयक – सार्थक कोळेकर, अमन फयाज पटेल, सुयश नरडे, प्रशांत जाधव, कु. राधिका खोत आणि पृथ्वीराज चव्हाण यांना श्री. देशपांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

०००

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत 

सांगली दि. २८ (जिमाका) : राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बी.एल.ए. (बुथ लेव्हल एजंट) नियुक्त करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्यापरीने कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. देशपांडे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कामकाजाबाबत आढावा घेतल्याचे सांगून सर्व यंत्रणा त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले कामकाज व्यवस्थितपणे पार पाडत असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचाही सहभागी घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत  निवडणूकीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडीअडचणीबाबत त्यांनी यावेळी संबंधितांशी चर्चा केली.

०००

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवा

सांगली दि. २८ (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी बँकेतील खात्यावरून होणारे मोठे आर्थिक व्यवहार यावर बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच रेल्वे पार्सल, कुरिअर, चेक पोस्ट आदी ठिकाणी सुक्ष्म तपासणी करावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने इर्न्फोसमेंट एजन्सीची बैठक मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ‍रितू खोखर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे, जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे व्‍यवस्थापक विश्वास वेताळ यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क, जीएसटी, आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, आयकर, पोलीस, बँक, जीएसटी, राज्य उत्पादन शुल्क आदी यंत्रणांनी दक्ष राहावे. फ्लाईंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स आदी नियुक्त पथकांमार्फत आंतरराज्य सीमा, चेक पोस्ट या ठिकाणी 24×7 निगराणी ठेवावी. निवडणूक कालावधीत कायदेशीर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी भयमुक्त व निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी दिली.

०००

वेल्सच्या शिष्टमंडळाची विधानभवनाला भेट

मुंबई, दि.  28 : विधिमंडळाचे सध्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी इंग्लंडमधील वेल्सच्या शिष्टमंडळाने आज विधानभवनाला भेट दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. या शिष्टमंडळात वेल्सचे फ्युचर जनरेशन्स कमिशनर डेरेक वॉकर, वेल्स ट्रिनिटी सेंट डेवीड विद्यापीठातील उपकुलगुरु कार्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ डॉ. शोन ह्युजेस आणि विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ॲण्ड ह्युमॅनिटीज शाखेचे अधिष्ठाता डॉ. जेरेमी स्मिथ यांचा समावेश होता. त्यांनी विधानसभा व विधानपरिषद गॅलरीमध्ये उपस्थित राहून कामकाज पाहिले.

000

सांगवी गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

मुंबई दि. 28 :- रायगड जिल्ह्यातील मौजे सांगवी या दरडप्रवणग्रस्त गावात दरडप्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने करण्यात येणारी कामे व अन्य उपाय योजनांबाबत सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या.

मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात कर्जत तालुक्यातील (जि.रायगड) मौजे सांगवी या दरडप्रवणग्रस्त गावाच्या स्थलांतराबाबत बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त विवेक गायकवाड,  उप सचिव सत्यनारायण बजाज, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, सांगवी गावात भारतीय भूवैज्ञानिक विभागाने (जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया- GSI) यांनी सूचविलेली कामे करण्यास प्राधान्य देण्यात यावे.  पावसाळ्यापूर्वी कामे करणे महत्वाची असल्याने संरक्षक भिंतीसह अन्य कामांचा सुधारित प्रस्ताव पाठवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. तसेच हा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड यांच्यामार्फत तातडीने सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

०००

धान खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबईदि. 28 : खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनाने दि. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाली आहे. याचा विचार करता शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी दि. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मुंबई जिल्ह्यात ५ मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा; पंधरवड्यात अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करणार              

मुंबई दि. 28 : मुंबई जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी 5 मार्च 2024 पर्यंत अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता व्हावी याकरिता मुंबई जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.

अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावायाकरिता महिला बालविकास विभागामार्फत अब व कप्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडीलांचा मृत्यु दाखलाअर्जदाराचा जन्म दाखलानगरसेवक यांचा बालकांचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखलारहिवासी दाखलाआधारकार्डजात प्रमाणपत्रशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रबोनाफाईडफोटो कॉपी आदी कागदपत्रे अनाथ बालकांना पंधरवड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यान्वित आहे, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

असंघटित कामगारांनी मोठ्या प्रमाणात ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

 मुंबई, दि. 28 : टेलरिंग व्यवसायातील अल्प उत्पन्न, कमी शिक्षीत अशा कारागीरांना संघटीत करणे गरजेचे आहे. टेलरिंग व्यवसायातील कामगारांनी मोठ्या संख्येने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी वाढविण्यासाठी शासनामार्फत शिबिराचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.

असंघटित टेलरिंग कामगारांच्या समस्यांबाबत नरिमन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, प्रधान सचिव  विनिता वेद सिंगल, आयुक्त डॉ. एच. पी. तुंबोरे आदिसह संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री खाडे म्हणाले की, असंघटित कामगारांना संघटित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असून, जास्तीत – जास्त  कामगारांनी येथे नोंदणी करावी. टेलरिंग व्यावसायिकांना संघटित करून त्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. राज्यभरात आतापर्यंत अंदाजे दोन कोटी पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी झाली असून, त्यांना प्रशिक्षण, व्यवसायासाठी साहित्य, आर्थिक लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. इतर कामगारांप्रमाणे टेलरिंग कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी श्री. खाडे यांनी केले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा

ज‍िल्ह्यात २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार – पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

नामांकित ३०० पेक्षा अधिक कंपन्यांचा महारोजगार मेळाव्यात सहभाग व मेळाव्याला तरूणांचा उदंड प्रतिसाद

अहमदनगर दि. २८ फेब्रुवारी (जिमाका) :- बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे‌. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले‌ असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी आश‍िष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍िल सैंदाणे, ज‍िल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त न‍िशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

राज्यात नागपूर, लातूर नंतर अहमदनगर येथे नमो व‍िभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाण‍िक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व व‍िभागात रोजगार मेळावे आयोज‍ित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ म‍िळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार म‍िळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत.

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रश‍िक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे. राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५० तालुक्यातील ५११ गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक उद्योग व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

ज‍िल्ह्यात दोन ठ‍िकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य व‍िकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पंधरा दिवसांच्या आत राहाता (शि‍र्डी) व अहमदनगर येथे संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करण्यात येईल. एक महिन्याच्या आत अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय कौशल्य व‍िकास संस्था सुरू करण्यात येईल. या संस्थेच्या माध्यमातून कौशल्याबरोबर परदेशी भाषेचे शिक्षण दिले जाईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक आयटीआय सुरू करण्यात येऊन युवकांना १५ दिवसाचा कौशल्य अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.

ज‍िल्ह्यात २३ हजार रोजगार न‍िर्माण होणार – पालकमंत्री राधाकृष्ण व‍िखे पाटील

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, औद्योगिककरणाच्या दृष्टीने आपण मोठे पाऊल उचलले आहे. वर्षभरात दीड हजार एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आले. ५ हजार १४ कोटींचे सामंजस्य करारातून २३ हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे. ज‍िल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी ज‍िल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा सहा राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला आहे‌. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत पंचवीस वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. अशी आठवण ही त्यांनी यावेळी काढली. या रोजगार मेळाव्यात १२ हजार तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.

संत गाडगेबाबा कौशल्य संस्थेचे जिल्ह्यात राहाता तालुक्यातील शिर्डी व अहमदनगर शहरात केंद्र सुरू करण्यात यावे. अशी मागणी ही महसूलमंत्र्यांनी यावेळी केली.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील कमीत कमी एक लाख बेरोजगार तरूणांना हमीचा रोजगार उपलब्ध करून देणारे नमो रोजगार मेळावे एक नवी सुरूवात आहे. मागील वर्षभरात ज‍िल्ह्यातील १८ हजार तरूणांना रोजगार न‍िर्माण होईल असे उपक्रम राबव‍िण्यात आले. ५०० एकराच्या तीन एमआयडीसी ज‍िल्ह्यात न‍िर्माण करण्यासाठी शासकीय जम‍िन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्या. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे शेती महामंडळांची १८० कोटींची जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यातून अहमदनगर व नाश‍िक व‍िभागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले की, या विभागीय रोजगार मेळाव्यासाठी ६४ हजार तरूणांनी नोंदणी केली आहे. यात ३०२ कंपन्या व आस्थापनांनी सहभाग घेतला आहे. यामेळाव्यातून १० हजार रोजगार न‍िर्माण होणार आहेत. ज‍िल्ह्यात घेण्यात आलेल्या गुंतवणूक पर‍िषदेच्या माध्यमातून ६४८ उद्योजकांसोबत सामंजस्य करार करून ५ हजार १४ कोटींची गुंतवणूक झाली आहे.
कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या पहिल्या निर्यात सुविधा केंद्राचे दूरदृष्‍य प्रणालीच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‍ज‍िल्हा गुंतवणूक पर‍िषद सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या व देवाणघेवाण अहवाल प्रकाश‍ित करण्यात आला. यावेळी ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध उद्योजक उपस्थ‍ित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही यूवक-युवतींना ॲप्रेंटीशिप नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

कौशल्य व‍िकास व‍िभागाचे नाश‍िक व‍िभागीय उपायुक्त सुन‍िल सैंदाणे यांनी आभार मानले.

व‍िभागीय रोजगार मेळाव्यास तरूणांचा उदंड प्रतिसाद

भिस्तबाग महल शेजारील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात आल्या होत्या. या रोजगार मेळाव्याच्या पह‍िल्या द‍िवशी पाच ज‍िल्ह्यातील सुमारे ६५ हजार तरूणांनी सहभाग घेत मेळाव्याला उदंड प्रत‍िसाद द‍िला. महारोजगार मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक कंपन्या व आस्थापनांनी सहभागी झाल्या आहेत.

 

000

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी; मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

मुंबई दिनांक २८ : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली असून तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. यावरून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि.10  : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज...

खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री...

0
खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न सातारा दि.10  : भारतीय हवामान विभागाने 103 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे...

मालवण बंदराचा सर्वांगीण विकास करणार – पालकमंत्री नितेश राणे

0
महाराष्ट्र सागरी मंडळाची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि.१० (जि.मा.का.) :  आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असून मालवण हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मालवण बंदरामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने वाहनतळ...

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

0
खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक चंद्रपूर, दि. 10 मे : खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. या हंगामावरच शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा वर्षभर उदरनिर्वाह होतो. त्यामुळे जिल्ह्यात...

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

0
मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ च्या अर्हता प्राप्त उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर...