रविवार, मे 11, 2025
Home Blog Page 718

पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे दि. २ व ३ मार्च रोजी बारामती येथे आयोजन

सोलापुर, दि. 29 :(जिमाका) :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक व युवतींसाठी दि. 2 व 3 मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योजक आस्थापनांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे तसेच  नोकरी इच्छुक युवक व युवतींनी नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त हणमंत नलावडे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक व युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी पुणे विभागातंर्गत पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात 200 पेक्षा जास्त नामाकिंत उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. सदर मेळाव्यात त्यांच्याकडून 20 हजार पेक्षा अधिक रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत. ही सर्व रिक्त पदे 10 वी, 12 वी, ड्राव्हर, पदवीधर, एमएस्सी, बी.कॉम, डिमई, बीबीए, एमबीए, एम. फार्म, कोणत्याही शाखेचा आटीआय, डिप्लोमा, ट्रेनी इंजिनिअर अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे विभागातील जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स, इनकुबेटर्स यांनी देखील या मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे.

नोकरीइच्छुकांनी  https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळाला भेट देऊन नांव नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील उमेदवाराला अर्ज करता येईल, प्रत्यक्ष मुलाखती देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. व ज्या उमेदवारांच https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी नसेल अशा उमेदवारांची नमो महारोजगार मेळावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष नोंदणी करून अशा उमेदवारांचे देखील मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस उपस्थित राहून मुलाखत देवू शकतील. या माध्यमातून दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा राज्य व विभागीय प्रशासनाचा मानस आहे.

नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, जिल्हा लघुउद्योग केंद्र सोलापुर तसेच उद्योग व कामगार विभाग सोलापुर यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. कुमार आर्शिवाद यांनी निर्देश दिले आहेत.

तसेच उद्योजक आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 0217-2956956 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच उमेदवारांनी या नमो महारोजगार मेळाव्यास मुलाखतीस येताना सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायाकिंत प्रती सोबत आणाव्यात. जिल्हायातील अधिकाधिक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त नलावडे यांनी केले आहे.

000

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १४ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, ‍‍दि. २९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वीरशैव-लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी काम करीत असलेल्या संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी १४ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

सन २०२३-२४ या वर्षाकरिता पात्रतेचे निकष व अटींची पूर्तता करीत असलेल्या वीरशैव – लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व  संस्थांनी अर्ज करावेत. पात्रतेचे निकष व अटींची पूर्तता करीत असलेले अर्ज सहायक संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, मुंबई उपनगर कार्यालय, ४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-४०००७१ या पत्त्यावर दि. १४ मार्च २०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत करावेत. तद्नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

अधिक माहितीसाठी 022-25222023 या क्रमांकावर संपर्क साधावा.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

अमेरिका-महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार 

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी आज अमेरिकेतील विद्यापीठांना महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. त्या शिवाय विद्यार्थी, शिक्षक तसेच सत्रांची देवाण घेवाण व ऑनलाईन पद्धतीने क्रेडीट हस्तांतरण करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले.

अमेरिकेतील १४ विद्यापीठांचे प्रमुख आणि राज्यातील निवडक पारंपरिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची संयुक्त बैठक आज राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.

अमेरिका व राज्यातील विद्यापीठांमधील शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याला चालना देण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एजुकेशन या संस्थेच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माईक हॅन्की, शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, अमेरिकेच्या पब्लिक डिप्लोमसी अधिकारी सीता रायटर, इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन (IIE) चे अध्यक्ष विवेक मनसुखानी, सह-अध्यक्ष जेसन सिझ आदी उपस्थित होते.

आगामी शैक्षणिक सत्रापासून राज्यात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार असून हे धोरण उच्च शिक्षण प्रणालीच्या आंतरराष्ट्रीयीकरणाला चालना देणारे आहे, असे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

या धोरणानुसार अधिकाधिक परदेशी विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठांमध्ये आकर्षित करणे व देशातच शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणे अभिप्रेत असल्याचे  राज्यपालांनी सांगितले.

हे धोरण परस्पर क्रेडिट मान्यता आणि हस्तांतर, परदेशी विद्यापीठांना भारतात विद्यापीठ परिसर स्थापन करणे तसेच देशांतील विद्यापीठांना विदेशात कॅम्पस उघडण्यास प्रोत्साहन देते असे राज्यपालांनी सांगितले.

उच्च शिक्षणातील सकल विद्यार्थी नोंदणी सध्याच्या 26 टक्क्यांवरून 2035 पर्यंत 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे नमूद करून महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थती आणि लोकांची विविधता लक्षात घेता, दूरस्थ आणि मुक्त शिक्षण हा सहकार्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल, असे राज्यपालांनी सांगितले.

कौशल्य क्षेत्रात अमेरिकेतील विद्यापीठांकडून सहकार्य मिळाल्यास त्याचे स्वागतच होईल असे सांगून भारतातील बहुसंख्य तरुणांना अमेरिकेतील विद्यापीठांकडून कौशल्य प्रशिक्षण, कौशल्य वर्धन आणि पुनर्कौशल्य ग्रहण क्षेत्रात संधी मिळाल्यास आनंद होईल असे राज्यपालांनी सांगितले.

पूर्वी भारतात उत्कृष्ठ उच्च शिक्षण व्यवस्था होती व अनेक नामांकित विद्यापीठे होती. भारत वेद, उपनिषद, योग, न्यायशास्त्र आणि इतर अनेक विषयांच्या प्राचीन ज्ञानाचे भांडार असून विद्यापीठ स्तरावरील सहकार्यामुळे अमेरिकेतील विद्यापीठांना भारताकडून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, योग, आयुर्वेद, ज्योतिष, खगोलशास्त्र, वैदिक गणित इत्यादी क्षेत्रांमध्ये सखोल अध्ययनाची संधी मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी बोलताना अमेरिकन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना व्यावसायिक कार्य अनुभवासह अनेक गुणात्मक लाभ देत असल्याचे अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माईक हॅन्की यांनी सांगितले.

आज 2.7 लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत असून एकट्या मुंबई दूतावासाने 90,000 विद्यार्थी व्हिसा जारी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाधिक अमेरिकन विद्यार्थी महाराष्ट्रात उच्च शिक्षणासाठी आले तर आपल्याला आनंदच होईल, असे हॅन्की यांनी सांगितले.

बैठकीला सलमा घानेम, प्रोव्होस्ट, डीपॉल युनिव्हर्सिटी, स्टेफनी डॉशर, फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, रंजन मुखर्जी, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी, जेनी अकुने, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले, राजीव मोहन, युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टन, मलिसा ली, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, जेफ्री सिम्पसन, ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटी, वेंडी लिन-कुक, मॉन्टक्लेअर स्टेट युनिव्हर्सिटी, मोहिनी मुखर्जी, रटगर्स युनिव्हर्सिटी, जीत जोशी, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी हे उपस्थित होते.

राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा सुरेश गोसावी, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा अजय भामरे, एसएनडीटीच्या प्र कुलगुरू प्रा रूबी ओझा आदी यावेळी उपस्थित होते.

००००

Universities in USA seek academic, research partnership with Maha Universities 

Governor calls for facilitating Exchange of Semester, Internship, Faculty and Student Exchange 

Governor Bais, US Consul Gen address meeting  of Senior Leaders of U.S. Universities and Maharashtra

 

The Governor of Maharashtra and Chancellor of State universities Ramesh Bais addressed the senior leaders of 14 U.S. universities and leaders of universities in Maharashtra to explore the possibility of facilitating semester exchange, internship programs, research, curriculum development, online learning, faculty and student exchanges with universities in Maharashtra.

The U.S. Consulate General, Mumbai supported IIE to organize a roundtable discussion between the U.S. universities delegation and leaders of Maharashtra state’s public universities at Raj Bhavan on February 29, 2024.

U.S. Consul General Mike Hankey provided U.S. government perspective on collaborative priorities to guide potential programs between the U.S. and Indian institutions.

In addition, the roundtable was attended by Vikas Chandra Rastogi, Principal Secretary Higher and Technical Education, Government of Maharashtra; Sita Raiter, Deputy Cultural Attache, U.S. Consulate General in Mumbai; Jason Czyz, Co-President, IIE; and Vivek Mansukhani, Director IIE India office among others.

Stating that the National Education Policy (NEP) 2020 launched by India and being implemented in Maharashtra from the forthcoming academic session seeks to promote internationalization of higher education, Governor Bais said NEP provides for credit recognition and credit transfer, establishment of campuses of Indian universities in other countries and opening of campuses by foreign Higher Educational Institutions in India.

Noting that NEP 2020 aims to improve the Gross Enrollment Education from the present 26 per cent to 50 per cent by 2035, the Governor said considering the vast geography and the profile of the people of Maharashtra, distance and open learning will be the best option to reach out to the majority of students.  He said that a majority of India’s youth will be happy to receive skilling, skill upgradation and re-skilling support from the universities in the U.S. He remarked that skilling will be an important area where India will welcome collaboration with universities in the U.S.

The Governor said India has had a top educational system in the past. He said India remains a repository of the ancient knowledge of the Vedas, Upanishads, Yogas, Jurisprudence and many other subjects. The Governor said university level collaboration will help U.S. universities to learn about India’s work in the areas of Preventive Healthcare, Yoga, Ayurveda, Astrology, Astronomy, Vedic Mathematics and so on.

Speaking on the occasion, U.S. Consul General Mike Hankey said the U.S. education system offers several advantages to the students, including professional workspace experience. He said 2.7 lakh Indian students are already pursuing higher education in various universities in the United States and that Mumbai alone issued 90,000 student visas. Consul General Hankey said he would be happy to see more U.S. students coming to Maharashtra.

Salma Ghanem, DePaul University; Stephanie Doscher, Florida International University; Ranjan Mukherjee, Michigan State University; Jennie Akune, University of California, Berkeley; Rajiv Mohan, University of Missouri; Michael Pelletier, University of Houston; Malisa Lee, University of California, Davis; Jeffrey Simpson, Oklahoma State University; Wendy Lin-Cook, Montclair State University; Mohini Mukherjee, Rutgers, The State University of New Jersey; Jeet Joshee, California State University, Long Beach were among those present.

Prof Suresh Gosavi, Vice Chancellor, Savitribai Phule Pune University (SPPU); Prof. Sanjeev Sonawane, Vice Chancellor, Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU); Prof. Apoorva Palkar, Vice Chancellor, Maharashtra State Skills University; Prof Ajay Bhamre, Pro Vice Chancellor, University of Mumbai; Prof Ruby Ojha, Pro Vice Chancellor,  Shreemati Nathibai Damodar Thackersey (SNDT) Women’s University were among those present.

 

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

मुंबई, दि. २९ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षान्त समारंभ आज विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या सरचिटणीस डॉ. श्रीमती पंकज मित्तल यांनी यावेळी दीक्षान्त भाषण केले.

यावेळी दीक्षान्त समारंभात १९७१६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या तर ११८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व २०५ स्नातकांना पीएच.डी.  प्रदान करण्यात आल्या.

कुलगुरु प्रो. विजय माहेश्वरी, प्रकुलगुरु सोपान इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, कुलसचिव डॉ विनोद पाटील तसेच विविध अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.

0000

Governor presides over 32nd Convocation of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University through online mode

 

Mumbai, 29th Feb : Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the 32nd Annual Convocation of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon (KBCNMU) through online mode on Thu (29 Feb).  Secretary General of Association of Indian Universities (AIU) Dr (Mrs) Pankaj Mittal delivered the Convocation address.

Vice Chancellor Prof. Vijay Maheshwari, Pro Vice Chancellor Prof. Sopan Ingle, Director of Board of Examinations and Evaluation, Registrar Dr. Vinod P. Patil, Members of various boards of authorities, Deans, faculty and graduating students were present.

Degrees were presented to 19716 graduating students while 118 students were awarded Gold Medals. In all 205 graduating students were awarded Ph.Ds.

000

नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वाटपाचा कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ

राज्यातील साडे चार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

 

कोल्हापूर, दि.29 (जिमाका) : जिल्ह्यातील कामगार विभागामार्फत 1.15 लाख कामगारांना मागणीनूसार गृहपयोगी वस्तू संच वाटप होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या साडेचार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. साडे चार कोटींपैकी काहीच नोंदीत कामगार आहेत. उर्वरीत शेत कामगार, कापड उद्योग कामगार, हॉटेल व्यवसायातील कामगार, ट्रक चालक, रिक्षा चालक तसेच इतर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्यांसाठी मंडळे स्थापन करून त्यांचेही जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करता येईल. भारत देश महासत्ता बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीनमधे आणण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठीच येत्या काळात कामगारांसाठी प्राधान्याने शासनाकडून विविध योजना आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके, इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचे सह मोठ्या संख्येने नोंदीत बांधकाम कामगार उपस्थित होते.

   या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात 10 नोंदीत कामगारांना कामगार विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे लाभ वितरीत करण्यात आले. पालकमंत्री मुश्रीफ यांचे स्वागत तृणधान्याचे बकेट देवून सहायक कामगार आयुक्त घोडके यांनी केले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना शासकीय योजनांचे चांगल्या प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, कामगार विभागात कामगार मुलांच्या शिक्षणासाठी, पत्नी किंवा तीच्या गरोदरपणात अर्थिक मदत, आरोग्यासाठी ५ लाखांचा विमा, मृत्यू पश्चात अर्थिक मदत अशा अनेक योजनांमधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मदत देत आहे. कामगारांच्या जीवनात आनंद देण्याचे कार्य शासन करीत असून येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून उर्वरीत कामगारांनासुद्धा या योजनांमधे आणण्यासाठी प्रयत्न होतील. मात्र हे करीत असताना यामधे कामगारांची नोंदणी करताना बोगस कामगारांची नोंदणी होवू नये यासाठी संबंधित विभागाने काम करावे. सद्या राज्य शासनाकडे 15 हजार कोटी रूपये या मंडळाकडे बँकेत असून त्यावरील मिळणाऱ्या व्याजातून ही योजना कार्यन्वित करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या बांधकामावेळी त्या कामाच्या किंमतीमधून 1 टक्का कामगार सेस या रकमेत जमा होतो असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या हस्ते शुभारंभ केलेल्या गृहपयोगी संचामधे किचनमधे आवश्यक साहित्य यात थाळ्या, वाटया, ग्लास, प्रेशर कुकर, पाण्याचा पिंप आदी साहित्याचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले. ते म्हणाले, कामगारांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजना सुरू करून विभागाला अधिकचे बळ दिले. कोल्हापूर जिल्हा राज्यात नोंदीत कामगरांच्या कामात अग्रेसर असून 3 लाखहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यातील 1.15 लक्ष जीवीत नोंद कामगार आहेत. आता गृहपयोगी वस्तू संच वाटपाला जिल्हयात सुरूवात होत आहे. सर्वांना त्याचे वाटप होणार असून पुढिल दोन वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. त्यामुळे कामगारांनी घाई न करता या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी जानकी भोईटे यांनी मानले तर सुत्रसंचलन सीमा मकोटे यांनी केले. यावेळी या योजनेतील लाभार्थी वैभव जौंधाळ यांनी आपल्या वडिलांना मिळालेल्या लाभामुळे जीवनमान सुधारल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी आज कृषि सहायक म्हणून काम करतोय याचे श्रेय ही योजना आहे.

नोंदीत कामगारांनी गृहपयोगी संच मिळविण्यासाठी हे करा

 कोल्हापूर जिल्हयात 1.15 लाख नोंदीत कामगार यासाठी पात्र आहेत. ही योजना दोन वर्षे सुरू राहणार असून एका कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे संच मिळविण्यासाठी घाई न करता, कामगारांनी 9307059989 या मोबाईल क्रमांकावर संच मिळण्यासाठी नोंदणी करावी. किंवा प्रत्यक्ष येवून मुस्कान लॉन, कोल्हापूर येथे टोकन घ्यावे. नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संच वाटप होईल. या प्रक्रियेत त्याचे बायोमेट्रीकही तपासले जाणार आहे. दर दिवशी 500 संच वितरीत केले जाणार आहेत. त्यामुळे कामगार विभागाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’च्या ५०० कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी – उपमुख्यमंत्री अजित पवार 

मुंबई, दि. 29 : राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. हा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकार आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल ‘जमिअत-उलेमा-ए-महाराष्ट्र’ सह अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे आभार मानले आहेत.

अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी शासनातर्फे विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक विकासासाठी कर्जयोजना राबविण्यात येते. या योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’ कडून महामंडळाला कर्जपुरवठा करण्यात येतो. या कर्जपुरवठ्यासाठी राज्यशासनाच्या हमीची मर्यादा आठ वर्षांसाठी 30 कोटींवरुन 500 कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला होता. त्या निर्णयात सुधारणा करुन 500 कोटींची शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम समाजातील युवकांच्या रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. अल्पसंख्याकांसाठीच्या विकास योजना अधिक प्रभावी        व शाश्वत होण्यास मदत होणार आहे. यातून मुस्लिम बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाला गती मिळणार आहे, अशी भावना मुस्लिम संस्था, संघटनांकडून व्यक्त होत आहे.

००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याचे वितरण, प्रशिक्षणाचे उद्धाटन

मुंबई, दि. २९ :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील ३० विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.

कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज, सँडोज प्रायव्हेट लिमिटेड,  एमेरिकेअर्स  इंडिया फाऊंडेशन यांच्या वतीने सामुदायिक वैद्यकीय साहित्याचे तसेच ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

साहित्य वितरण व उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले यांच्यासह  कोपरन लॅबोरेटरीजचे सुरेंद्र सोमाणी, वरूण सोमाणी, अजित जैन, राकेश दोशी, संजय दोशी, सुनील सोधानी, ललित राजपुरोहीत, श्रीमती व्ही.पी.एस. नायर,  सँडोजचे सुधीर भांडारे, समीर कोरे, पंकज गुप्ते, अजित जांभळे, लुसी दास यांच्यासह अमेरिका केअरचे अनिर्बण मित्रा, अशोक राणा, गुरुप्रसाद जानवेकर उपस्थित होते. तसेच या सर्व कामात सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी वाशिमच्या अस्मिता मल्टीपर्पज एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज भगत, वैशाली भगत, स्वराज्य सेवा वाघमोडे प्रतिष्ठानच्या डॉ. राजकुमार वाघमोडे, अक्षय पाटील यांच्यासह  सावरोलीचे सरपंच संतोश बैलमारे, खोपोलीच्या वायएके पब्लिक स्कूलच्या उपप्राचार्या पूनम गुप्ता , सहकार देवगिरी फाऊंडेशनचे अनंत अंतरकर, डॉ. राजेंद्र जोशी उपस्थित होते.

प्रत्येक उत्सव मंडळाच्या माध्यमातून किमान पाचशे ते सहाशे  कुटुंबांना तसेच दहा ते बारा चाळी, सोसायट्यांमधील नागरिकांपर्यंत वैद्यकीय साहित्य पोहोचविण्यात येणार आहे.  यासाठी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक उत्सव मंडळे, को-ऑप सोसायटी यांना एकूण २९१ संच तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड एकूण ७९ संच, रायगड जिल्ह्यातील खालापूर व बिरवाडी, महाड येथे १२ वैद्यकीय साहित्य संच देण्यात आले. आठवी, नववी, दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी HTML व Coding चे बेसिक प्रशिक्षण मिळाल्यास पुढील भविष्यासाठी उपयोगी ठरू शकेल. शहरी भागातील मुलांसोबत स्पर्धेत उतरताना आत्मविश्वास तयार होईल. यासाठी  रायगड मधील सावरोली, उंबरे, ता.खालापूर, बिरवाडी, ता. महाड येथील ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या साहित्य वितरण कार्यक्रमाचे संयोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख तथा राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, समन्वयक मनोज घोडे-पाटील, सतिश जाधव आदींनी केले.

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

मुंबई, दि. २९: आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

आरोग्य विभागाने युद्धपातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्या माध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले होते. ६५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन अंतिम गुणवत्ता यादीनुसार १४४६ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना आज पदस्थापनेचे आदेश देण्यात आले.

 

वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत शासनाने ३० जानेवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती. याबाबत दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली होती. पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. १ ते १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून आज आदेशही देण्यात आले. अत्यंत कमी दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.

विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा इतर कामकाज

मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही, शिक्क्याप्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. २९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसेभत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे  उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

०००

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा शुभारंभ, लोकार्पण

यवतमाळ,दि.२८ :  वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडीचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून ई-उद्घाटन केले. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तडस, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

वर्धा –यवतमाळ- नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग झाला असून आज दि. २८ फेब्रुवारी रोजी या मार्गावरील वर्धा ते कळंब या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगीच वर्धा ते कळंब रेल्वेगाडी देखील सुरु करण्यात आली.

शुभारंभानंतर दि. २९ फेब्रुवारीपासून वर्धा ते कळंब गाडी क्रमांक 51119 आणि कळंब ते वर्धा गाडी क्रमांक 511120 च्या नियमित सेवा सुरू होणार आहेत. या गाड्या रविवार आणि बुधवार वगळता आठवड्यातून पाच दिवस चालतील, याशिवाय या गाड्यांना देवळी आणि भिडी स्थानकावर नियोजित थांबे असतील आणि मार्गावरील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतील.

या रेल्वे सेवांचा परिचय प्रदेशातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याचा लाभ प्रवासी, व्यवसाय आणि स्थानिक समुदायांना होईल, सुरळीत कनेक्टिव्हिटी सुलभ होईल आणि कळंब आणि वर्धा दरम्यान अखंड प्रवास शक्य होणार आहे.

०००

 

ताज्या बातम्या

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत बाधित क्षेत्रासह आरोग्य व शाश्वत विकासाला प्राधान्य – पालकमंत्री चंद्रशेखर...

0
️नियामक परिषद बैठक संपन्न नागपूर, दि. १० : जिल्ह्यातील प्रत्यक्ष खाण बाधीत क्षेत्र व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार येत्या आर्थिक वर्षात...

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे...

तणावाच्या परिस्थितीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा दौरा रद्द

0
मुंबई, दि.10 : तणावपूर्ण परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी "आय.ओ.टी. सोल्यूशन वर्ल्ड काँग्रेस अँड बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस...

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
भोपाळ, दि. 10 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या...

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि.10  : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज...