सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 711

उत्तम आरोग्यासह विश्वशांतीसाठी योग आवश्यक -राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. २१ : योग ही भारताची जगाला अनमोल देणगी आहे. योगाच्या अमूर्त ठेव्याचे रक्षण करणे व त्याचा प्रचार – प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.  शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य  उत्तम राखण्यासह योग विश्वशांती प्रस्थापित करण्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे ‘कैवल्यधाम’ व श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर योग या संस्थांतर्फे संयुक्तपणे आयोजित योगसत्रात राज्यपाल श्री. बैस बोलत होते. भारतीय तटरक्षक दल, सूचना प्रसारण कार्यालय व राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी राज्यपालांसह योगासने केली.

भारत जगातील सर्वाधिक युवा राष्ट्र आहे. योग देशातील युवाशक्तीच्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक सशक्तीकरणात मदत करून स्वस्थ भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहायक सिद्ध होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले. आपण स्वतः नियमित योगासने करतो व प्रत्येक दिवस आपल्याकरिता योग दिवस असतो, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेचे विश्वस्त आत्मप्रीत रक्षित, रतन लुणावत व अल्पा गांधी तसेच  कैवल्यधाम योग संस्थेचे रवी दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. रवी दीक्षित व देवकी देसाई यांनी योगसत्राचे संचलन केले.

०००

योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोगी राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई पोर्ट आणि इतर केंद्रीय संस्था, योग संस्थातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगसत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पवन बायेकर, जी.बी. मोरे यांच्यासह होमगार्ड, एनसीसी कॅडेट, अधिकारी, कर्मचारी, योग संस्थांचे योग गुरू उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज सर्व जगभर योगदिन साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी योगाचे महत्त्व ओळखून संपूर्ण जगभर योगाला ओळख निर्माण करून दिली. तर योगगुरू रामदेव बाबा यांनी योग जगभर पोहोचविण्याचे काम केले. आपली प्राचीन संस्कृती योगावर आधारित आहे. उत्तम आरोग्याचा नवा मंत्र योग आणि आयुर्वेद जडी-बुटी आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी कधीच योग विसरत नाहीत, म्हणून ते तंदुरूस्त आहेत. भारताला पुढे नेण्यात ते अग्रेसर असून महाराष्ट्र त्यांच्या विकास कामाला नेहमी साथ देत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २०१४ मध्ये योगाभ्यासाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून दिले. सध्या जगातील १५० हून अधिक देशात योगसाधना केली जाते. प्राचीन उपचार पद्धती जी आरोग्यदायी जीवनपद्धतीला सहाय्य करते, ही पद्धती जगाने स्वीकारली. आजच्या जीवनपद्धतीला योगसाधना उपयुक्त असून सर्वांनी नियमित योग करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

योग जीवनपद्धती सर्वांनी अंगिकारणे गरजेचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २१ : निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचा आहे. योग ही जीवनपद्धती आहे ती जर सर्वांनी अंगिकारली तर नक्कीच सुदृढ नागरिक घडू शकतात. सुदृढ नागरिक ही राज्याची संपत्ती असते, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत आयोजित योगासन सत्राच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह  योगा इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी जयदेव योगेंद्र यांच्यासह इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे  म्हणाले की, योगाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे. योगयुक्त जीवनशैलीमुळे जीवनात सकारात्मकता निर्माण  होते त्यामुळे प्रत्येकाने दररोज योग करणे गरजेचे आहे. शरीर आणि मन जोडण्याचे काम योग करते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अर्धा तास चालेल्या योगसत्रात मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्कचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा प्रधान सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

विधानपरिषद मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४: मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर           

मुंबई, दि. 20 :- लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५-ब नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्यानेत्यांना मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्त‍िक रजा जाहीर केलेली आहे. ही रजा त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्त‍िक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये विधानपरिषदेच्या कोकण विभाग व मुंबई पदवीधर तसेच नाशिक विभाग व मुंबई या शिक्षक मतदारसंघांच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

या निवडणुकीसाठीचे मतदान २६ जून२०२४ (बुधवार) रोजी सकाळी ७.०० ते सायं ६,०० पर्यंत व मतमोजणी ०१ जुलै२०२४ (सोमवार) रोजी होणार आहे.

‘लिपिक टंकलेखक’, ‘कर सहायक’ संवर्गाची टंकलेखन कौशल्य चाचणी सादर केलेल्या विकल्पानुसारच

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ या स्पर्धा परीक्षेमध्ये लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोगाकडून आयोजित केली आहे. या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र उमेदवारांना त्यांनी सादर केलेल्या विकल्पावरून टंकलेखन कौशल्य चाचणी होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदी व मुख्य परीक्षेवेळी अर्ज सादर करताना उमेदवारांनी सादर केलेल्या विकल्पानुसार आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व उमेदवारांना कोणत्या भाषेची टंकलेखन कौशल्य चाचणी द्यावयाची आहे याबाबत दोन्ही संवर्गाच्या स्वतंत्र याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर Candidates Information > Results > Results of Examination/Recruitment येथे प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

याद्यांमध्ये प्रसिद्ध केल्यानुसारच उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाईल. टंकलेखन कौशल्य चाचणीची भाषा बदलून देण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नसल्याचे  उमेदवारांनी नोंद घेण्याचे आयोगाने कळविले आहे.

दोन्ही संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीमधून सूट असलेल्या उमेदवारांच्या संवर्गनिहाय याद्या  प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीत सूट असल्यामुळे या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही. तसेच त्यांना आयोगाकडून टंकलेखन चाचणीसाठी प्रवेश प्रमाणपत्र निर्गमित केले जाणार नाही.

कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक व अनाथ प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीत सूट असल्यामुळे या वर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही तसेच त्यांना आयोगाकडून टंकलेखन चाचणीसाठी प्रवेश प्रमाणपत्र निर्गमित केले जाणार नाही. मात्र प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी या प्रवर्गातील उमेदवारांना कर सहायक संवर्गासाठी मराठी व इंग्रजी भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य राहिल.

टंकलेखन कौशल्य चाचणीत सुट असलेल्या उमेदवारांची त्यांच्या मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. लिपिक टंकलेखक संवर्गाचे सेवाप्रवेश नियम व जाहिरातीतील तरतुदीनुसार या संवर्गासाठी मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु काही उमेदवारांकडे इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्राऐवजी इंग्रजी ३० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. यास्तव ज्या उमेदवारांकडे इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्राऐवजी इंग्रजी ३० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र आहे व त्यांनी इंग्रजी भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याचा पर्याय निवडला आहे त्या उमेदवारांची मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

कर सहायक संवर्गाचे सेवाप्रवेश नियम व जाहिरातीतील तरतुदीनुसार या संवर्गासाठी मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे. कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य असल्याचेही आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

बनावट, अवैध मद्य विक्री विरोधात धडक कारवाई करावी – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई 

मुंबईदि. 20 : बनावट मद्य निर्मितीपरराज्यातील अवैध मद्य विक्रीची प्रकरणे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे विभागाने या प्रकरणांमध्ये धडक कारवाई करावी. परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व विक्री सीमेवरील कोल्हापूरसिंधुदुर्गसोलापूर या जिल्ह्यांमध्ये होत असते. या जिल्ह्यांतील कारवाईचे प्रमाण वाढविण्यात यावेअसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यात यावायासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे सामाजिक व आर्थिक अनुकूल परिणाम जनतेसमोर आणावेत. विभागाचे स्वत:चे बँड पथक तयार करण्यासाठी प्रशिक्षक देण्यात यावे. या पथकाला विशिष्ट असा गणवेश देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीअपर आयुक्त यतीन सावंतसह आयुक्त सुनील चव्हाणसंचालक प्रसाद सुर्वेउपसचिव रवींद्र आवटीउपायुक्त सुभाष बोडकेप्रदीप पवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले कीराज्य उत्पादन शुल्क विभाग शासनाला महसूल देणारा विभाग आहे. त्यामुळे विभागाचे बळकटीकरण आवश्यक आहे. यासाठी अधिकाधिक निधीची मागणी करण्यात यावी.  विभागाला दिलेल्या महसूल उद्दिष्ट पूर्तीसाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रयत्न न करता सुरूवातीपासूनच प्रयत्न करावेत. त्यामुळे विभागाला दिलेल्या महसूल प्राप्तीची उद्दिष्टपूर्ती होईल.

अधिकारी गणवेश भत्ता दरवर्षी मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. पोलिसांप्रमाणे हा भत्ता देता येईल. अनुज्ञप्तीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. जेणेकरून नियमावलीची सक्तीने अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. हातभट्टीवरील अवैध मद्य निर्मिती किंवा शहरात दाटीवाटीच्या वस्तीमध्येचिंचोळ्या ठिकाणी सुरू असलेल्या बनावट मद्य निर्मितीविक्री व्यवसायावर कारवाई करण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात यावा. त्यासाठी प्रत्येक अधीक्षक कार्यालयाला ड्रोन असायला पाहिजे. त्या पद्धतीचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. दारूबंदी गुन्हे अन्वेषणसराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि एमपीडीए कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. आंतरराज्य अवैध मद्याची आवक राज्यात होणार नाहीयाबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

दरम्यानमद्यमद्यार्कमळीचे नमुने पडताळणी करण्यासाठी उभारावयाच्या प्रयोगशाळा,  विभागातील रिक्त पदांची भरतीइमारती बांधकामहातभट्टी दारू निर्मूलन मोहिमेचे फलित आदींचा आढावाही घेण्यात आला. उपायुक्त श्री. बोडके यांनी विभागाचे सादरीकरण केले. बैठकीला राज्यभरातील अधीक्षक उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ/

मातंग समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 20 : मातंग समाजाच्या विविध मागण्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडून  कार्यवाही करण्यात येत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय स्मारक, वाटेगांव, जि. सांगली येथील अण्णाभाऊ साठे स्मारक, पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे स्मारक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना आदींबाबत वेगाने कार्यवाही करण्यात यावी. मातंग समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन सकारात्मक आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, मातंग समाज शिष्टमंडळाच्यावतीने प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, श्री. वाडेकर आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी सहभागी झाले होते.

काही राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गाचे जातीनिहाय उपवर्गीकरण केले आहे. त्या संदर्भात अवलंबिलेल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती पाठविण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये ही व्यवस्था तेथील पूर्ण अभ्यास करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी योजना राबविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

वाटेगांव येथील स्मारकासाठी जमीन भूसंपादन कायद्यानुसार संपादित करण्याच्या सूचना, मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी  सांगली जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसेच लहुजी साळवे स्मारकाच्या कामाला पुणे येथे असताना भेट देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

*******

निलेश तायडे/विसंअ/

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची उद्या मुलाखत              

मुंबईदि. 20 :योग’ अभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. दरवर्षी 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग‘ दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु)वरळीयेथील स्वस्थवृत्त व योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापकडॉ. वृषाली उजेडे यांची विशेष मुलाखत दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

आंतरराष्ट्रीय योग‘ दिवस आणि जागतिक संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योग‘ अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. तर माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी संगीत फायदेशीर आहे. कोविडनंतर योगचे महत्त्व वाढले असून केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगची मदत घेत आहेत. योग साधना आणि संगीत यांचे मानवी जीवनातील महत्व आणि योगाचे विविध प्रकारसंगीत थेरपी आशा महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास‘ कार्यक्रमातून डॉ. उजेडे यांनी माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवारदि. 21, शनिवार दि. 22 आणि सोमवार दि. 24 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. प्राध्यापक डॉ. सचिन उपलंचीवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR           

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR   

शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत – कृषी विभागाचे आवाहन

मुंबई, दि. 20 : चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र हे मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरिता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डीएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. 

डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त  खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे.  एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपी खतास चांगला पर्याय आहे.

एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26एनपीके-20:20:0:13एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुद्धा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याचबरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टीएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल डीएपी खतास उत्तम पर्याय आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

राज्यातील कृषी विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याबाबत लवकरच सामंजस्य करार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि. 20 : राज्यातील कृषी विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याबाबत भविष्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी  सांगितले.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 115 वी बैठक आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. यावेळी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी परिषदेचे संचालक डॉ.हरिहर कौसडीकर राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

कृषी विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधनात भरीव कामगिरी करावी. यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयातील इमारती, वसतिगृह आणि प्रयोगशाळा समवेत इतर पायाभूत सोयी सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात, अशीही सूचना यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केली.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

ताज्या बातम्या

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय...

0
मुंबई, दि. ७ :- पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक...

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे ८ जुलै रोजी सत्कार; ‘भारताची राज्यघटना’ विषयावर संबोधन

0
मुंबई, दि. 7 :- महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती श्री.भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार...

विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती

0
मुंबई, दि. 7 : छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल संबंधित वादग्रस्त निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मुंबईत आगमन

0
मुंबई, दि. 7 : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे विमानाने दुपारी १.३७ वाजता आगमन झाले. विधि व न्याय विभागाचे...

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण

0
मुंबई, दि. 7 : आषाढी वारीसाठी नांदेडहून आलेले वारकरी बालाजी संगेकर (वय 75) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वारीदरम्यान तब्येत खालावल्याने तातडीने त्यांना...