बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 480

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन

मुंबई, दि. 25 : भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. २५) राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Maha Governor pays tribute to Atal Bihari Vajpayee

Maharashtra Governor C. P. Radhkrishnan offered floral tributes to the portrait of former Prime Minister of India late Bharat Ratna Atal Bihari Vajpayee on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai on Wed (25 Dec). Principal Secretary to the Governor Pravin Darade, Comptroller of the Governor’s Household Jitendra Wagh and officers and staff of Raj Bhavan also paid their respects to late Atal Bihari Vajpayee on the occasion.

०००

 

मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून काम करावे – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

पुणे, दि. २४: मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. शामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, विभागाच्या कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या तामिळनाडू किंवा अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही आपल्या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवून गतीने पाठपुरावा करावा.

ते पुढे म्हणाले, दुसरे विश्व मराठी संमेलन 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे तीन दिवस पुणे येथे घेण्यात येईल. त्यासाठी विभागाने तयारी करावी. तसेच दिल्ली येथे होणाऱ्या विश्व साहित्य संमेल्लनात मराठी भाषेसाठी एक तास राखून त्या माध्यमातून जागतिक स्तरावर मराठी भाषा जाईल यासाठी प्रयत्न करावेत.

राज्यस्तरावर महिला साहित्य संमेलन तसेच विभागनिहाय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी दिले. देशातील सर्व बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांना आमंत्रित करुन मराठी भाषेसाठी काय योगदान देता येईल यासाठी त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात. सर्व महाविद्यालयात मराठी भाषा विभागाची प्रकाशने ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

सर्व विद्यापीठातील मराठी भाषा विभागात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव करावेत. पुस्तकांचे गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्यातील नामांकित लेखकांची नावांची यादी करावी, त्याचप्रमाणे कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करावे. शासनाच्या सर्व विभागांच्या प्रदर्शनात मराठी भाषा विभागाचे दालन असले पाहिजे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मराठी भाषेला अभिजात मिळाल्याचे महत्त्व तसेच त्यामुळे होणारे लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या सर्व संस्था, मंडळ, संचालनालयांना चांगली जागा मिळण्यासाठी प्रस्ताव करावेत, त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाची आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. २४: उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तेथे उद्योगांना जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

पिंपरी चिंचवड येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेंद्र राजपूत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे आदींसह उद्योग संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत हिंजवडी, पिंपरी चिंचवड, तळवडे आदी ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील उद्योगांच्या समस्यांचा आढावा मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, पीएमआरडीए च्या माण – म्हाळुंगे टी. पी. स्कीमला लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळणार असल्याने हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.

ते पुढे म्हणाले, वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकातील टपऱ्या पोलीस विभागाच्या सहकार्याने हटवाव्यात. उद्योगांनी त्यांच्याकडील वाहने रस्त्यावर थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी. एमआयडीसीने दोन्ही महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील मोकळ्या जागा शोधून तेथे उद्योगांसाठी येणाऱ्या ट्रक आदी वाहनांचे पार्किंगसाठी प्रयत्न करावेत.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यातील खड्डे, दुभाजक, पदपथ आदींची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. सुविधांसाठी उद्योगांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क उद्योगांना परवडेल अशा पद्धतीने त्यांचेशी समन्वय साधून वाढविण्यात यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील उद्योगांना वाटप केलेल्या भूखंडांबाबत वस्तुस्थिती तपासून घ्यावी. तसेच वाटप केलेले विनावापर भूखंड अन्य उद्योगांना देण्याबाबत विचार करण्यात येईल. तळवडे माहिती तंत्रज्ञान पार्क येथील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी संरक्षण विभागाशी संपर्क साधण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पोलीस विभाग, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, एनएचएआय, जिल्हा परिषद आदी सर्व संबंधित विभागांनी उद्योगांच्या समस्या समन्वयाने सोडवाव्यात.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील टप्पा क्र. 3 येथील पोलीस चौकीसाठी आवश्यक त्या जागेचा ताबा पोलीस विभागास देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही प्रकल्प, लक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पावसाळी पाण्याची वाहिनी तसेच बॉक्स कल्व्हर्टचे बांधकाम आदींच्या अनुषंगाने विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली.

0000

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिकुल परिस्थितीत लोकसेवेचा दीप ताईंनी तेवत ठेवला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर दि 24:- अत्यंत आव्हानात्मक अशा काळात सुमतीताईंनी खूप संघर्ष केला. अनेक लोकआंदोलने केली. त्यांच्या सोबत अनेक घटकातील कार्यकर्त्यांनी संघर्षाची बीजे घेऊन समाजात विश्वासार्हता निर्माण केली. ताईंच्या संघर्षाच्या समृद्ध वारशावरच आम्हाला यश प्राप्त करणे शक्य झाले. त्याकाळात ताईंसह अनेक निस्वार्थ कार्यकर्त्यांनी रचलेल्या पायावर आम्हाला कळसापर्यंत पोहोचता आले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सुमतीताई या केवळ लढवय्या ताई नव्हत्या तर त्यांना लोकमाता म्हणून संबोधने अधिक समर्पक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रद्धेय सुमतीताई सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहात ते बोलत होते. येथील स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. मिराताई खडतकर, कार्यक्रमाचे संयोजक अनिल सोले, माजी प्र-कुलगूरु योगानंद काळे, उपेंद्र कोठेकर, माजी आमदार अरुणभाऊ अडसड, चैनसुख संचेती व मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार चरणसिंग ठाकूर माजी मंत्री शोभाताई फडणवीस व मान्यवर होते.

भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्या सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाला लोकांची सहानुभूती असूनही मोठ्या प्रमाणात गैरसमजही होते. अशा काळात समाजाच्या प्रत्येक घटकात जाऊन त्यांच्यासाठी विविध आंदोलने करण्याची जबाबदारी सुमतीताईंनी समर्थपणे पेलली. सर्वांची मने त्यांनी पुन्हा जुळवली. आपली भूमिका लोकांपर्यंत जावी, आपल्या विचाराचा दीप घरोघरी पोहोचावा यासाठी त्यांनी निवडणुकीत अनेक पराभव सहन करुनही तेथून पळ काढला नाही. शुद्ध भावनेतून त्यांनी ए.बी. बर्धन पासून सर्वांची मने एक ताई म्हणून, आई म्हणून जिंकली. राजकारणातला एक आदर्श वस्तुपाठ सुमतीताईंनी आमच्या पुढे ठेवला आहे, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला.

माझ्यासाठी त्या आत्याच होत्या. माझे वडील गंगाधरराव व काका बाळासाहेब यांचे हक्काचे घर म्हणजे सुमतीताईंचे घर होते. शोभाताईंनी त्यांच्या बरोबरीने संघर्ष केला. त्यांनी स्थापन केलेल्या बाल जगतच्या माध्यमातून मला घडता आले. नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून मला लहानपणी पहिल्यांदा दिल्लीला जाता आले. लहान मुलांवर संस्काराच्या जबाबदारीपर्यंत त्यांनी आपली भूमिका समर्थपणे पेलली, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस जुन्या आठवणींना आठवतांना भावूक झाले.

ताईंनी जपलेली विश्वासार्हता व समाजात उभी केलेली संघटन शक्ती याचा प्रत्यय 1962 च्या काळात तेव्हाच्या प्रशासनाने घेतला. युद्धासाठी सुमारे 700 ते 800 सैन्यांची तुकडी नागपूर येथून जात असल्याचा निरोप तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ताईंना दिला. त्यांच्या जेवणाची व्यवस्था अवघ्या चार तासात करण्याचे आव्हान समोर होते.  ताईंना त्यांनी ही जबाबदारी सोपविली. देशप्रेमासाठी सदैव तत्पर असलेल्या ताईंनी ही जबाबदारी समर्थपणे पेलून आपल्या सर्व महिला शक्तीच्या माध्यमातून सगळ्या सैनिकांपर्यंत त्यांनी जेवन पोहोचविल्याच्या घटनेला उजाळा देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सूक्ष्म नियोजन शैलीचा गौरव केला.

प्रतिकुल परिस्थितीत लोकसेवेचा दीप ताईंनी तेवत ठेवला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी

ताईंचा काळ हा संघर्षाचा होता. निवडणुकीत पराभूत व्हायचे, त्याबद्दल दु:ख व्यक्त करुन पुन्हा कामाला लागायचे, लोकन्यायाची लढे लढायचे, पुन्हा निवडणूक, पुन्हा पराभव असे सातत्याने वाट्याला येऊनही सुमतीताईंनी जपलेला संघर्षाचा बाणा हा विसरता येणार नाही. त्या लढत राहिल्या. त्यांनी रणांगण सोडले नाही. एखादा नंदादीप तेवत ठेवावा तसे त्यांनी योगदान देऊन आमच्या यशाचा सूकर केला, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ताईंच्या जीवनकार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्या एक झुंझार रणरागीनी होत्या. राजकारणात कुठे थांबावे याचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. त्यांच्या जीवनकार्याचा अंश आम्हाला मिळाला असे त्यांनी सांगितले.

ताईंच्या या जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ मंडळी, कार्यकर्त्यांचा त्यांनी सन्मान केला. यावेळी सुमतीताई यांच्या जीवनकार्याला अधोरेखित करणाऱ्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतले बिरोबा देवाचे दर्शन

सांगलीदि. 24 : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.‌राम शिंदे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे बिरोबा देवाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकरप्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेअपर पोलीस अधीक्षक रितू खोखरकवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसेविधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्रीसुविद्य पत्नी व मुलगातसेच माजी आमदार रमेश शेंडगेजयसिंग शेंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा‌. राम शिंदे यांनी महाराष्ट्रातील दीनदुबळेवंचितशोषितसमाजाला न्याय देण्याचे काम हातून घडावेअधिक चांगले काम करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना बिरोबा देवाच्या चरणी केली.

याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार रमेश शेंडगे यांनी आभार मानले.

प्रारंभी आरेवाडी हेलिपॅड मैदान येथे  जिल्हा प्रशासनाच्या वतीने विधान परिषदेचे सभापती प्रा.‌ राम शिंदे यांचे प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांची अपशिंगे (मिलिटरी) गावाला भेट

सातारा, दि. २४ : अपशिंगे (मिलिटरी) गावाला मोठी परंपरा आहे. पहिल्या महायुद्धात गावातील ४६ जवान शहीद झाले होते. आताही या गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य सैन्यदलात कार्यरत असून देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहेत. त्यांच्या या बलिदानामुळे आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही माजी सैनिक कल्याण, पर्यटन, खनिकर्म मंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी दिली.

सातारा तालुक्यातील अपशिंगे (मिलिटरी) येथे आजी-माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंत्री श्री. देसाई बोलत होते. या प्रसंगी पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, सैनिक कल्याण विभागाचे संचालक दिपक ठोंगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे, गावचे सरपंच तुषार निकम, माजी कॅप्टन आर.डी. निकम, शंकर माळवदे आदी उपस्थित होते.

माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई म्हणाले, अपशिंगे (मिलिटरी) गावाला सैनिकी परंपरा आहे. या गावातील कुटुंबातील एकतरी व्यक्ती देशसेवा करीत आहेत. या गावातील माजी सैनिकांच्या शाैर्याची माहिती बाहेरील लोकांना व्हावी यासाठी वॉर मेमोरियल तयार करण्यात येईल. यातून युवा पिढीला प्रेरणा मिळून देश सेवेसाठी सैन्यदलात जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अपशिंगे (मिलिटरी) गावावर प्रेम, आपुलकी व आदर आहे. या गावातील रस्ते, शाळा व इतर अनुषंगिक बाबींसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार  नाही. या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी लवकरच प्रशासनाची बैठक लावण्यात येईल, अशी ग्वाहीही माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

मेळाव्यास आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वस्त्रोद्योग विभागात रोजगार निर्मितीला चालना देणार – मंत्री संजय सावकारे

मुंबई, दि.24 : वस्त्रोद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र हा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. वस्त्रोद्योग विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना देऊन राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टीक प्रोडक्ट) मध्ये हा विभाग मोलाचा वाटा उचलेल, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. सावकारे यांनी आज मंत्रालयात विभागाची आढावा बैठक घेतली.

या बैठकीस वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावकारे म्हणाले, वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. वस्त्रोद्योग विभागातील विविध योजनांना गती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केली.

विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सद्यस्थिती व माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.24 : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यालय अधीक्षक समाज कल्याण मुंबई शहर यांनी केले आहे.

अल्पसंख्याक विभागामार्फत सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे.

याबाबत शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ताज्या घडामोडींमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अल्पसंख्याक परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभार्थी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

1)  विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

2) विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा.पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व

पीएचडी साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल.

3) विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला

उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर

विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला

उमेदवाराने वडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे

आवश्यक आहे.)

4) परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन वर्षे कालावधीचा एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्ती

द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर

त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे

अधिकार निवड समितीला राहतील.

5) एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त

मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र

करून देणे बंधनकारक असेल.

6) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर

परीक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने

अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS

World University Rank) 200 च्या आत असावी.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत भाग 1, चौथा मजला, आरसी मार्ग, चेंबूर मुंबई 71 येथे संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता

मुंबई, दि. 24 : मुंबई दारुबंदी कायदा, 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता दि 24, 25 व 31 डिसेंबर, 2024 या दिवसांसाठी देण्यात आली आहे, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे

एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान) रात्री 10.30 ते पहाटे 1 वाजेपर्यंत, उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल 2 अनुज्ञप्ती यांना रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएलबीआर -2 आणि एफएलडब्ल्यू -2 यांना रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएल-3 (परवाना कक्ष) एफ एल-4 (क्लब अनुज्ञप्ती) यांना पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत आणि इतर क्षेत्राकरिता रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे.

बिअर बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, वाईन बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, ई-2 मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे.

सीएल -3 अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता 24, 25 व 31 डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे.

 

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा

मुंबई, दि. 24: केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत भूसंपादन विभाग व महाराष्ट्र राज्यात मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY 2.0) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘पाणलोट यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘पाणलोट यात्रेच्या’ माध्यमातून राज्यात पाणलोट विकासाची चळवळ उभारण्यात येईल असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागातील विविध प्रकल्प, कामकाज आणि ‘पाणलोट यात्रेची’ अंमलबजावणी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव मृदुला देशपांडे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री.कलशेट्टी, मुख्य अभियंता विजय देवराज, अवर सचिव प्रकाश पाटील व देवेंद्र भामरे, याचबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे पोपटराव पवार आणि विविध संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्याला पाण्याच्या क्षेत्रात समृद्ध व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाणलोट प्रकल्पांविषयी जनजागृती निर्माण करणे, थेट शेतकऱ्यांना या विषयाबद्दल शिक्षित करणे, तसेच लोकांमध्ये पाणलोट प्रकल्पांविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत ‘पाणलोट रथयात्रे’ चे आयोजन करण्यात येणार आहे. ही रथयात्रा जानेवारी 2025 मध्ये आयोजित केली जाणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून या योजनेविषयी व्यापक जनजागृती केली जाईल. या योजनेंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 140 प्रकल्प कार्यरत असून त्याचे क्षेत्र 5.65 लाख हेक्टर एवढे आहे. यासाठी केंद्र व राज्य शासन असे 60:40 यानुसार निधीचे प्रमाण असणार आहे. ‘पाणलोट रथयात्रे’ च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणलोट प्रकल्पांचे महत्त्व समजावून सांगण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती अधिक समृद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून गावागावात जनचळवळ उभारून जनतेच्या सहकार्याने पाणलोट शाश्वत विकास होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सुचनाही देखील यावेळी मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी पाणलोट यात्रेची राज्यात कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे याची माहिती दिली. या बैठकीत जलसंधारण क्षेत्रातील शाश्वत विकास, मृदा संरक्षण, जलसंपदा व्यवस्थापन आणि ग्रामविकास यासंबंधी योजनांवर चर्चा करण्यात आली.

 

000

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अनेकांसाठी ‘जीवनदायी’….

0
आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य...

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली विकासाचा टिळा…

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यान, दिवसभरात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...