शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 481

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. १५- देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान आणि राज्यगीत गायले गेले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री श्री.लोढा यांनी देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान असून राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना सुरू असल्याचे सांगितले. राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक, शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.लोढा यांनी स्वातंत्र्य सैनिक, उपस्थित विद्यार्थी, नागरिक, अधिकारी यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिष्यवृत्ती परीक्षांमधील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रमाणपत्र योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे महसूल पंधरवड्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.

00000

बी.सी. झंवर/वि.स.अ

 

विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. 15: विधानभवन, मुंबई येथे आज देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष, ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे माजी सदस्य ॲड. जयप्रकाश बाविस्कर, विधानसभेचे माजी सदस्य राम संभाजी गुंडीले, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे आणि डॉ.विलास आठवले, सहसचिव शिवदर्शन साठये, उप सचिव सुभाष नलावडे, उमेश शिंदे, अवर सचिव विजय कोमटवार यांच्यासह, सुनिल वाणी, रविंद्र खेबुडकर, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे उप मुख्य सुरक्षा अधिकारी श्रीराम कोरेगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

पाडळसी जलसिंचन प्रकल्प ,वाघूर उपसा सिंचन, वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेज मुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील हजारो बहिणींना मिळणार लाभ

जिल्ह्याचा ई – चावडी प्रकल्पात विभागात पहिला क्रमांक

महसूल पंधरवाडा आणि हर घर तिरंगा मोहिम उत्साहात संपन्न

जळगाव दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पातील पाडळसी जलसिंचन योजना जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्णत्वाच्या टप्यात आली आहे. तसेच वाघूर प्रकल्प उपसा सिंचन प्रणालीच्या टप्पा क्रमांक 1 व 2 ला मान्यता मिळाली असून वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेजलाही मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार असल्याची माहिती

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , सहायक जिल्हाधिकारी ( प्रशिक्षणार्थी)  वेवोतोलू केझो, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक,  विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

शासनाकडून नारीशक्तीचा सन्मान

   पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या संदेशात म्हणाले, नारीशक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेतून प्रत्येक कुटुंबातील दोन महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 34 हजार बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. पात्र बहिणींच्या बँक खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या नावावर घरगुती गॅस जोडणी आहे, अशा महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याच बरोबर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो युवतींचे फक्त पैशामुळे उच्च शिक्षण थांबणार नाही याची पुरेपुर काळजी शासनाने घेतली आहे.  युवक, युवतीचे पुढचं भवितव्य घडविण्यासाठी  कौशल्य व आर्थिक ताकत निर्माण व्हावी म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. यासाठी जळगाव जिल्हयात आतापर्यंत विविध आस्थापना, कंपन्याकडून 4630 पदे अधिसुचित झाली आहेत. उमेद‌वारांकडून ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. संबंधित आस्थापनांकडून रुजू आदेशाची कार्यवाही सुरु आहे.

ज्येष्ठ नागरिकांची काळजी

   शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी नावीन्यपूर्ण अशी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली असून  यासाठी ज्यांना 60 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना  31  ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. याबरोबर शासनाने जेष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत जिल्हयात आतापर्यंत 17485 लाभार्थी पात्र ठरले आहेत. या योजनेसाठी 65 वर्ष, पूर्ण झाली आहेत. अशा जेष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार असल्याची माहितीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

आरोग्य व्यवस्था बळकटीकरण

  जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थे बाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठी कामं झाली आहेत. त्यात आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे, शेतकरी, शेतमजूर, गोर-गरीब जनतेच्या आरोग्याला संजीवनी देणाऱ्या जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयाला गेल्या दोन वर्षात 40 कोटी पेक्षा अधिक आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसाठी दोन वर्षात 47 कोटी पेक्षा अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून दिल्यामुळे हे रुग्णालयं अद्यावत झाली आहेत.

पीक विम्याच्या पैशाचा हातभार

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. महाराष्ट्र शासनाने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सन 23-24 या खरिप हंगामात स्थानिक आपत्तीमुळे 2 लाख 49 हजार 488 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्याच्या भरपाई पोटी 132 कोटी 74 लाख एवढी रक्कम पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. तर उत्पन्नावर आधारित 3 लाख 87 हजार 973 शेतकऱ्यांना 523 कोटी 28 लाख मंजूर झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची महिती पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात दिली.

जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना वंदन केल्याचे सांगून महसूल प्रशासन हा शासनाचा, प्रशासनाचा कणा आहे. सर्व सामान्यांची छोटी छोटी कामं साध्या साध्या प्रमाणपत्रासाठी अडलेली असतात. याची जाणीव ठेवून जिल्हा महसूल प्रशासनाने 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या पंधरवाड्यात महसूल पंधरवाडा मोठ्या उत्साहात साजरा केला, त्यात प्रत्येक दिवशी एक विषयासाठी विशेष शिबीर घेवून लोकांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून यासाठी जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

ई – चावडी प्रकल्पात विभागात जिल्हा प्रथम

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याने सर्व गावांची 100% मागणी ई चावडी प्रणाली मध्ये नोंदणी केली त्यामुळे ई -चावडी अंमलबजावणी मध्ये नाशिक विभागात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आला, शेतकरी बांधवांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल जिल्हाधिकारी व महसूल प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले. पोलीस प्रशासनाच्या बळकटी करणासाठी दिलेल्या निधीचा उल्लेख करून कायदा व सुव्यस्था अधिक मजबूत होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा गौरव वाढवित राहण्याची ग्वाही देऊन स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

०००

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. यावेळी  मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयातील आजी-माजी न्यायाधीश, वकील व अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

००००००

एकनाथ पोवार/वि.स.अ

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

मुंबई, दि. 15 :  देशाच्या स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. त्यानंतर नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महसूल पंधरवडा २०२४ ची सांगता करण्यात आली.

यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी मुंबई शहर येथील उत्कृष्ट अधिकारी व  कर्मचारी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2024 मधील पारितोषिक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

आशिष राजपुत/प्रतिवेदक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : देशाच्या  ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी  पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
०००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

स्वातंत्र्यदिनी पुणे येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे, दि. १५: भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित महाराष्ट्रासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु

७८ व्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई, दि. 15-  राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम होत आहे. विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी  राज्य शासनाने राबविलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव,  प्रधान सचिव यांच्यासह सैन्य दलाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर, मंत्रालयातील राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. विदेशी गुंतवणूक, समाजातील दुर्बल, गोरगरीबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांप्रती असणारी बांधीलकी दाखवून दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवून जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरु आहे. त्यामध्ये आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची वाटचाल त्या दिशेने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यातील गुंतवणूकदार, उद्योजक किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम राज्य शासनाने केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,   कृषि, शिक्षण, ऊर्जा, निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, पर्यटन, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास,  पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आपण आमूलाग्र क्रांती आणत आहोत.  राज्यात 15 दशलक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. राज्याची लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली आहे. यातून येत्या पाच वर्षात 30 हजार कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळणार आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. गेल्या दोन वर्षात 5 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी करार झाले आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत तर आपण देशात प्रथम आहोत. त्या माध्यमातून अडीच लाख रोजगार निर्मिती आपण केली आहे.देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14 टक्के आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात आपले राज्य क्रमांक एकवर आहे. विदेशी पर्यटकांची पसंतीही महाराष्ट्र असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सुमारे दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे राज्यात सुरु आहेत.  समृद्धी महामार्गा सारखा गेम चेंजर असणाऱ्या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा पूर्ण होऊन नागपूर ते मुंबई पूर्ण वाहतूक लवकरच सुरु होणार आहे. पायाभूत सुविधांसोबतच गोरगरीब, दुर्बल, वंचित यांना विकासाच्या प्रक्रियेत समाविष्ट करुन घेतले जात आहे. राज्य शासनाच्या सात पथदर्शी (फ्लॅगशिप)  योजनांनी राज्याच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  राज्य शासनाने शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून तब्बल ४ कोटी लाभार्थींना लाभ दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधनापासून महिला भगिनींना मिळण्यास सुरुवात होईल. याशिवाय, युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण आणि भरीव स्टायपंड, गोरगरीब, दुर्बलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर,  शेतकऱ्यांना वीज सवलत, मुलीना संपूर्ण व्यवसायिक शिक्षण मोफत आणि सगळ्या धर्मातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशातल्या तीर्थस्थळांची यात्रा करत यावी म्हणून योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.  अठरा वर्षाच्या मुलीला १ लाख रुपये देणारी महत्वाची “लेक लाडकी” योजनाही सुरु असल्याचे ते म्हणाले.

गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून ३०० कोटी रुपये मदत केली आहे. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी आणि आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची  स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता  या सगळ्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी,  महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या संस्था मागास, दुर्बल, गरीब युवकांसाठी अनेक योजना घेऊन काम करताहेत. अल्पसंख्याकांसाठी मार्टी संस्था सुरु केली. मातंग समाजासाठी आर्टी संस्था सुरु केली. यातून राज्य शासनाची संवेदनशीलताच दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्य शासनाने  महिला आणि शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून भरीव तरतूद केली आहे. याशिवाय, गेल्या दोन वर्षांत विविध विभागांच्या माध्यमातून 44 हजार कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देत आहोत. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाण्यानं समृद्ध करण्यासाठी वैनगंगा- नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिल्याने पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचित होणार आहे, गेल्या दोन वर्षात 125 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

राज्यातल्या तळागाळातल्या व्यक्तीचे उत्पन्न वाढावं, शहर आणि ग्रामीण भाग असा भेद न करता सर्वांगीण विकासाचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. त्यादृष्टीने पावले टाकल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्यात 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून हर घर तिरंगा अभियान आपण राज्यभरात उत्साहाने राबवले. देशप्रेमाची ही ज्योत नेहमी आपल्या सर्वांच्या ह्रदयात तेवत राहिली पाहिजे, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

000

दीपक चव्हाण/वि.सं.अ

विषमुक्त रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्याहस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

महोत्सवात दुर्मिळ ३८ रानभाज्यांचा समावेश

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : अलिकडे फास्टफुडचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. शरीरास घातक अशा खाद्यपदार्थांचा वापर टाळत नागरिकांनी विषमुक्त अशा रानभाज्यांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जीवनोन्नती अभियानाच्यावतीने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डावरे, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माळोदे उपस्थित होते.

रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जुन्या लोकांना या भाज्यांचे महत्त्व माहित आहे. त्यामुळे घरातील जेष्ठ मंडळी आजही रानात जाऊन रानभाज्या आणून आपल्या घरातील मुलांना खावू घालतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर या भाज्या उपलब्ध होते. त्यामुळेच दरवर्षी पावसाळ्यात स्वातंत्र्यदिनी या भाज्यांचा महोत्सव आपण आयोजित करतो, असे पुढे बोलतांना पालकमंत्र्यांनी सांगितले.

महोत्सवाच्या निमित्ताने शहरी लोकांना रानभाजीचे महत्त्व समजून येईल. महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘रानभाज्यांचे महत्त्व आणि उपयोग’ या पुस्तिकेतून प्रत्येक रानभाजीचे महत्त्व, या भाज्या कशा बनवायच्या हे समजेल. रानभाज्यांचा आहारात समावेश वाढविण्यासाठी या भाज्यांचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक असल्याचे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले. उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी महोत्सवातील रानभाज्यांच्या स्टॅालला भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी केले. महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका त्यांनी विशद केली. महोत्सवात 38 पेक्षा जास्त रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. भाजी खरेदीसाठी यवतमाळकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे यांनी केले तर आभार संजय भोयर यांनी मानले.

000

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांची कुटुंबात, समाजात भागिदारी वाढेल – पालकमंत्री संजय राठोड

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण

सर्वसामान्यांसाठी अनेक नवीन कल्याणकारी योजना; महिला, वृध्द, कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : राज्य शासनाने नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात, कुटुंबात भागिदारी वाढविण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आणि क्रांतीकारी ठरणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 68 हजार अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 4 लाख 60 हजार अर्ज लाभ वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विभाग प्रमुख अधिकारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले, अशा सर्व शुरविरांना पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. स्वातंत्र्यानंतर देशाची जशी प्रगती होत गेली तसा महाराष्ट्र देखील झपाट्याने विकासाच्या बाबतीत अग्रेसर होत गेला. समाजातील सर्वच घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने नवनवीन योजना राबवित असल्याचे पालकमंत्री म्हणाले. युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. प्रशिक्षणाची मागणी असलेल्या प्रत्येक युवकास या योजनेतून प्रशिक्षण दिले जातील. मासिक 6 ते 10 हजारापर्यंत विद्यावेतन सुद्धा शासन देणार आहे.

गृहिनींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली. 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती मोफत तीर्थ स्थळांना भेटी देऊन शकतील. जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री नावाची आणखी एक योजना शासनाने सुरु केली. 65 वर्षावरील नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी 3 हजाराचे अर्थसहाय्य या योजनेतून दिले जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु करण्यात आली. 7.5 एचपी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व कृषी पंपधारक शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी केंद्र शासन ‘प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ राबविते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 544 प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. यापैकी 127 प्रकल्पांना अनुदान देखील वितरीत करण्यात आले.

तुती, फळबाग आणि बांबू लागवडीस रोजगार हमी योजनेतून आपण प्रोत्साहन देतो आहे. यावर्षी 2 हजार एकरवर तुती लागवडीचा कार्यक्रम आपण हाती घेतला. 34 हजार हेक्टरवर बांबू तर 4 हजार 725 हेक्टरवर फळबाग लागवड केली जात आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेत यावर्षी देखील 3 लाख 47 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला. या शेतकऱ्यांचे 6 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. जिल्ह्यात 1 लाख 46 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 557 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी कापुस व सोयाबीन पिकाच्या किंमतीत घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच प्रति हेक्टर 5 हजार याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 3 लाख 73 हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना 263 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असून नुकसानग्रस्तांना लवकरच वाढीव दराने मदत वाटप केली जाणार आहे.

इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गासाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे मोदी आवास घरकुल योजना सुरु केली. या योजनेतून 29 हजार 999 घरे बांधली जात आहे. खनिज विकास निधीतून 21 हजार शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या निधीतूनच 63 शाळा आपण मॅाडेल स्कूल तर 15 प्राथमिक आरोग्य केंद्र, 4 उपजिल्हा रुग्णालये व 1 ग्रामीण रुग्णालय मॅाडेल रुग्णालय बनवतो आहे. वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत सोई सुविधा असलेले 4 मॅाड्युलर ऑपरेशन थिएटर सुरु करण्यात आले. महाविद्यालयाची प्रशासकीय ईमारत पुर्णत्वास आली. सुपर स्पेशालिटी हॅास्पिटलची 288 बेड असलेली फेज 3 बिल्डींग पुर्ण झाली असून रुग्णसेवेत दाखल झाली आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार विनामुल्य केले जातात. जिल्ह्यात 6 लाख 81 हजार लाभार्थ्यांनी योजनेचे गोल्डन कार्ड काढले आहे. बांधकाम मंडळाच्यावतीने विविध योजनेंतर्गत यावर्षी 11 हजार 794 कामगारांना 12 कोटी 85 लक्ष रुपयांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. 15 हजार 550 कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 32 हजार 442 कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वितरण करण्यात आले, असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 1 हजार 800 मुलांना विनामुल्य प्रवेश देतो आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून गेल्यावर्षी जिल्ह्यात 628 उद्योजकांचे प्रस्ताव मंजूर केले. यावर्षी 800 युवकांना उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. आदिम जमातीच्या विकासासाठी ‘प्रधानमंत्री जनमन योजना’ केंद्र शासनाने सुरु केली. जिल्ह्यात कोलाम या आदिम जमातीच्या नागरिकांना या अंतर्गत विविध विकास योजनांचा लाभ दिला जात आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

सुरुवातीस पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. त्यानंतर राष्ट्रगित व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत उपस्थित सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.

000

ताज्या बातम्या

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले...

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0
मुंबई, दि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता...

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

0
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे...