शुक्रवार, जुलै 25, 2025
Home Blog Page 479

आवास योजनेतील प्रत्येक घर सौर ऊर्जेवर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना 450 कोटी रूपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात यावा. ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे या आवास योजनेतील घरे सौर उर्जेवर करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

राज्यातील ग्रामीण रस्ते तयार करतांना ते सिमेंटचेच करावे, अशा सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्रामीण रस्त्यांची कामे थांबवू नयेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच पाणंद रस्ते यातील निकष नव्याने ठरविण्यात यावे. कोकणातील साकव तसेच पाणंद रस्त्यांची कामे तात्काळ हाती घेण्यात यावी. गावखेड्यातील प्रत्येक तांड्याकरिता निधी देण्यात आला असून यातील किती कामे झाली यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिल्या.

ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना त्याचबरोबर ग्रामविकासाच्या विविध योजना शंभर दिवसांमध्ये प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

संजय ओरके/विसंअ/

 

महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. त्यामुळे मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथील चित्रनगरीत व्हावे यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करावे. कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्ष सोहळ्याचे विशेष आयोजन करून त्याचे कार्य सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालयांपर्यत पोहोचले पोहोचण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य देशभरात खूप मोठे असल्याने त्यांच्यावर एक चांगला व्यावसायिक चित्रपट तयार करण्यात यावा. या चित्रपटासाठी शासनाकडून अनुदान देण्यात यावे. हर घर संविधान अंतर्गत प्रत्येक घरात संविधान पोहचले पाहिजे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000

कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि  शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याकरण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

परिवहन सेवेला गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. जुनी 13 हजार शासकीय वाहने भंगारात काढली जावी अशा सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, टॅक्सी, ऑटो, शहर बस सेवेच्या तिकीट दरासंदर्भातही निर्णय घेण्यात यावेत. वडसा-गडचिरोली तसेच सोलापूर-धाराशीव येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे. राज्य परिवहन सेवेच्या 15 वर्षे झालेल्या बसेस भंगारात काढून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. यंत्रणा बसविण्यात यावी जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर अभियांत्रिकी उपाययोजना शोधून काढावी. यावेळी बंदरे तसेच विमानतळ प्राधिकरण आदिंबाबतची चर्चा झाली.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

संजय ओरके/विसंअ/

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 29 :-गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी शाळेच्या विविध 50 विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात श्री. भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारला.

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असणार आहेत. आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विभाग काम करणार आहे.  राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सव्वा दोन कोटी विद्यार्थी आहेत. एक लाख 8 हजार  शाळा असून 7 लाख 29 हजार  शिक्षक आहेत. विविध उपक्रम योजनांसाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल. पुढील काही दिवसात शिक्षक, विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनोगत आणि अनुभव जाणून घेणार आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात येतील. यासाठी ग्रामस्थ आणि पालकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी विभाग कटिबध्द असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राला शैक्षणिक चळवळीचा वारसा आहे. शिक्षण क्षेत्राला देदिप्यमान परंपरा आहे. पुढेही ही परंपरा कायम राहणार असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित विविध 50 विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संवाद साधला, प्रांजली जाधव या विद्यार्थिनीने महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह महापुरुषांनी स्त्री स्वातंत्र्यासह शिक्षणाचे महत्व पटवून दिले. याची माहिती भाषणातून दिली.

000

श्रद्धा मेश्राम/ससं/

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप

पुणे, दि. 30 : पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तेथील सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘विजयस्तंभ सुविधा’ उपयोजक (ॲप) तयार केले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 28) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपचा उपयोग करुन अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

पेरणे येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी येत असतात. शासनाच्यावतीने त्यांना बससेवा, आरोग्य सेवा, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शौचालय सुविधा, निवारा कक्ष, पिण्याचे पाणी, पोलीस मदत कक्ष आदी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या सुविधांपर्यंत अनुयायांना लवकरात लवकर पोहोचता यावे व त्यांचा लाभ घेता यावा यासाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार करण्यात आले आहे.

हे ॲप https://initiatorstechnology.com/VijayStambhSuvidha.apk या लिंकवरून डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे. या ॲपमध्ये अनुयायांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सुविधांचे गुगल लोकेशन मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे ॲपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आवश्यक त्या सुविधा निवडल्यास त्या सुविधेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुगल मॅपवर दिसतो व अनुयायांना इच्छित सुविधेपर्यंत पोहोचणे सोपे जाते, अशीही माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

0000

 

 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

परभणी, दि. 30 (जिमाका) – केंद्रीय सामाजिक न्याय  व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज  दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दोन्ही कुटुंबांना शासनाच्यावतीने निश्चितपणे मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

श्री. आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून त्यांची व्यथा जाणून घेतली. परभणीत घडलेली घटना ही  दुर्दैवी आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कार्यवाई करण्यात यावी,  यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेणार आहोत.   शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी  असून त्यांना सर्वोतोपरी मदत केल्या जाईल. असे  श्री. आठवले यांनी  यावेळी सांगितले.

आंबेडकरी चळवळीतील दिवंगत लोकनेते विजय वाकोडे  यांच्या कुटुंबियांची त्यांच्या राहुलनगर स्थित घरी जावून श्री. आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. समाजासाठी तळमळीने काम करणारा एक चांगला लोकनेता जिल्ह्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या स्मारकासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे श्री. आठवले यांनी याप्रसंगी सांगितले.

दरम्यान, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत श्री. आठवले यांनी  जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्याकडून घटनेचा व याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी  दत्तु शेवाळे उपस्थित होते.

0000

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट

बीड, दि. 30 (जिमाका) : केज तालुक्यातील  मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे झालेल्या हत्येचा तीव्र निषेध केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केला. आज श्री आठवले यांनी दिवंगत देशमुख यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली.  यावेळी त्यांनी सर्वोतपरीने मदत करण्याचे आश्वासन  दिले.

सकाळी श्री आठवले यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आई आणि विधवा पत्नी यांना अश्रु अनावर झाले. त्यांनी त्यांच्या भावना श्री आठवले यांच्या पुढे मांडताना न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. श्री आठवले यांनी आपण या प्रकरणाचा पाठपुरवा करून कुटूबीयांना न्याय मिळवून देण्याचा पुर्ण प्रयत्न करू असे ते म्हणाले. घडलेली घटना अतिशय वेदनादायक असून समाजाला काळीमा फासणारी आहे, अशा भावनाही श्री आठवले यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी कुटुंबासोबतच गावकऱ्यांशी संवाद साधला .

00000

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुन अहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोनही विभागांनी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता व त्याच रस्त्यालगत होत असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मनपा समवेत संयुक्त तांत्रिक पाहणी करावी व अहवाल सादर करावा. पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये पाणीपुरवठा  सुरु होईल असे नियोजन करावे, असे निर्देश इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शहर पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीबाबत आज बैठक पार पडली. राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नविनीकरण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान पाटील भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधानसभा सदस्य आ. अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मजिप्राच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, मनोज पाठक मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अनिकेत कुलकर्णी, जेव्हीपीआर कंपनीचे जी.मेहंदर, खलील अहमद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता रवींद्र इंगोले, महानगरपालिकेचे अभियंता ए. बी. देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता किरण पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी पाणीपुरवठा योजनेचे कामकाज करणारे कंत्राटदार आणि शेतकरी बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत प्रारंभी मजीप्रातर्फे माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेला २०१९ मध्ये मान्यता मिळाली. या योजनेचा अमृत २.० योजनेत समावेश करुन त्यास सुधारीत मंजूरी घेण्यात आली. आता पर्यंत १८०८ कोटी ३९ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत १५८३ कोटी ३२ लक्ष रुपये इतका निधी खर्च झाला आहे.

याअंतर्गत उद्भव विहिरीच्या (जॅकवेल) उभ्या भिंतीचे काम ११.९ मिटर उंचीपर्यंत पूर्ण झाले असून वर्तुळाकार भिंतीचे २२.७ मिटर उंचीचे काम पूर्ण झाले आहे. उपांग कामांमध्ये पुलाचे काम ७५ टक्के पूर्ण आहे. पाईपलाईन अंथरण्याचे काम ८८ टक्के पूर्ण झाले आहे.जलाभिसरण कारंजाचे आरसीसी काम ९० टक्के, आऊटलेट चेंबर ७२ टक्के पूर्ण, सीएलफचे काम ९५ टके पूर्ण,पम्प हाऊस व केमिकल हाऊसचे काम अनुक्रमे ७० व ७५ टक्के पूर्ण झाले आहे. या शिवाय ४७ उंच जलकुंभ व ३ बैठे जलकुंभ असे एकूण ५० जलकुंभ तयार करण्यात येणार आहेत. त्यातील ७ उंच जलकुंभ पूर्ण झाले आहेत. २ बैठे जलकुंभ पूर्ण झाले आहेत. उर्वरीत जलकुंभ ९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या जलकुंभांच्या कार्यकक्षेत घरगुती जोडण्यांचे कामेही सुरु आहेत,अशी माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत रस्त्याच्या कामाबाबत माहिती सादर करण्यात आली. या योजनेसाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्यालगत ८ मिटर अंतरापर्यंत अस्तित्वातील १२०० मिमी पाईप लाईनच्या बाजूने नवीन २५०० मिमी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. जमिनीखाली मंजूर पाईप लाईन टाकल्यास व त्यावरुन  रस्ता गेल्यास भविष्यात पाईपलाईनची देखभाल करण्याविषयी निर्माण होऊ शकणाऱ्या प्रश्नांबाबत व याबाबतच्या तांत्रिक शक्यतांवर चर्चा करण्यात आली.

श्री. सावे म्हणाले की, रस्त्याचे व जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करतांना रस्ता खोदावा लागू नये. यासाठी कार्यान्वयन यंत्रणा व मनपा या तिघाही यंत्रणांनी मिळून संयुक्त तांत्रिक पाहणी करावी. येत्या चार दिवसात त्याचा अहवाल सादर करावा.  येत्या मार्च पर्यंत पहिल्या टप्प्यातील २०० दलघमी पाणी शहराला पुरवठा करावे,असे निर्देश श्री. सावे यांनी दिले. तसेच या कामाची हायड्रॉलिक तसेच  रेडिओग्राफिक चाचणी घेतल्यानंतरच संबंधित ठेकेदाराचे देयक अदा करावे,अशी सुचनाही श्री. सावे यांनी दिली.

ही योजना आगामी ५० वर्षांसाठी तयार करण्यात आली असून आगामी कालावधीत कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याबाबत उपाययोजना कराव्या. लोकांना पाणी मिळावे, पैठणकडे जाणारी तसेच बिडकीन व चितेगाव या रस्त्यालगतच्या गावातील रहदारी सुरळीत व्हावी, यादृष्टीने उपाययोजना कराव्या,असे निर्देश खा. संदिपान भुमरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की. कार्यान्वयन यंत्रणांनी आपापसात समन्वय राखून काम वेळेत पूर्ण करावे.

मनपा आयुकत जी.श्रीकांत यांनी या योजनेचे काम पूर्ण करुन शहरवासियांना पाणीपुरवठा करणे हेच मनपाचे प्राधान्य असून त्यासाठी सर्व कार्यान्वयन विभागांनी मिळून संयुक्त प्रयत्न करावे,असे सांगितले.

०००००

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत

मुंबई दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दि. 3 जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 2, शुक्रवार दि. 3, शनिवार दि. 4 आणि सोमवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी तर दुसरा भाग मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणासाठीच लढा दिला नाही, तर त्यांनी देशातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अस्पृश्यता, बालविवाह, सती प्रथा, विधवा पुनर्विवाहाला बंदी यासारख्या वाईट गोष्टींचा त्यांनी विरोध केला. आयुष्यभर त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे तसेच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले आणि यासाठी त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी बजावली. त्यांचे योगदान आणि विचार आजही कसे मार्गदर्शक आहेत, याविषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे.

०००

 

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. 30 : कृषी विभागातील केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. राज्याचे कृषिमंत्री म्हणून पदभार घेताना मंत्रालय येथे ते बोलत होते.

कृषी विभागात आवश्यक तिथे सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राज्यात राबवताना अधिक समन्वय साधला जाईल. कृषी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. प्राधान्याने हाती घ्यावयाचे विषय, नवीन धोरणे यांचा अभ्यास करण्यात येईल. शेती आणि शेतकरी यांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असल्याचेही कृषिमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, उपसचिव हेमंत म्हापनकर, उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, उपसचिव अंबादास चंदनशिवे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

अनेक वर्षांपासून अतिक्रमित शीवरस्ता खुला; विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचे कौतुक

0
सांगली, दि. २४ (जि. मा. का.) - सांगली जिल्ह्यातील आळते (ता. तासगाव) आणि कार्वे (ता. खानापूर) या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला...

..ही तर महाराष्ट्रासाठी अमर्याद संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि,२४: भारत आणि युनायटेड किंग्डम दरम्यानच्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी अमर्याद संधींची कवाडे खुली झाली आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारचे...

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नवी दिल्ली, दि. २४ : भाषा  हे संवादाचे प्रभावी साधन असून या  माध्यमातून  ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने  आपल्या मातृभाषेचा  अभिमान  बाळगताना इतर  भारतीय...

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई दि. २४ :- महाराष्ट्र आता थांबणार नाही...! महाराष्ट्र सर्वच महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग तसेच वित्तीय संशोधन क्षेत्रातील...

स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड

0
यवतमाळ, दि.२४ (जिमाका) : आजचे युग हे कौशल्यावर चालते. त्यामुळे युवकांनी रोजगार स्वयंरोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकजन आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी...