रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 43

मौजे साखर सुतारवाडीचे दर्जेदार पुनर्वसन करा – मंत्री मकरंद जाधव – पाटील

filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (0.3229167, 0.3229167); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

मुंबई, दि. १७ : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील मौजे साखर सुतारवाडी गावात २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टी होवून नुकसान झाले होते. गावाच्या पुनर्वसनासाठी नागरी सुविधांची कामे करण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्या घरांसाठी वाढीव रक्कम देण्याविषयी प्रस्ताव सादर करावा. मौजे साखर सुतारवाडी गावचे पुनर्वसन दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिले.

मंत्रालयात साखर सुतारवाडी गावाच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस खासदार सुनील तटकरे, सहसचिव (मदत) संजय इंगळे, अवर सचिव बाळासाहेब हजारे उपस्थित होते, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे रायगड जिल्हाधिकारी किसन जवळे उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, पुनर्वसन करताना ४ टक्के निधी हा राज्य व्यवस्थापन कक्ष, गृहनिर्माण यांना द्यावा लागतो. या निधीबाबत फेरविचार करावा. पुनर्वसन करताना निधी द्यावा लागू नये. टाटा ट्रस्ट, कोटक बँक यांना पत्र पाठवून घरे बांधण्याची विनंती करण्यात यईल. तसेच इर्शाळवाडीच्या धर्तीवर सुतारवाडीचे पुनर्वसन सिडकोकडून करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र द्यावे.

जिल्हा प्रशासनाने मौजे साखरवाडी येथे भेट देवून पुनर्वसन तातडीने कसे पूर्ण करता येईल, याबाबत कार्यवाही करावी. जोपर्यंत शासनाकडून ग्रामस्थांची कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत शासनाच्यावतीने पुनर्वसन करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तात्पुरत्या निवासाची व्यवस्था असणारे निवारे चांगले असावे. कामाचा दर्जा उत्तम असावा. कुठलीही आपत्ती येण्यापूर्वी प्रशासनाने सजग राहून उपाययोजना कराव्यात, असेही मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत – मंत्री ॲड. आशिष शेलार

Milind Kadam M4B

मुंबई दि. १७:  जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. 21 जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सायंकाळी 4.30 वाजता हा सोहळा आयोजित  करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे.

Milind Kadam M4B

मराठी भाषा आणि कलाकारांसाठी नवे व्यासपीठ

रेडिओ क्षेत्राला गौरव प्राप्त करुन देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. राज्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपण्याचे काम रेडिओमार्फत झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती रेडिओमार्फत जतन करण्यात आल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे. महाराष्ट्रात आकाशवाणीनेही भूमिका निभावली आहे. तसेच खासगीकरण आणि आधुनिकीकरणाच्या काळात खासगी एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही भूमिका अधोरेखित केली आहे. मराठी संगीत, गाणी, शास्त्रीय संगीत जपणारे, उद्यमशील आणि सृजनशील रेडिओ चॅनलला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मराठी निवेदक, मराठी अभिनेते, संगीतकार, गीतकार, लेखक, तंत्रज्ञ, संपादक यांना एक व्यासपीठ मिळावे. त्यांच्या माध्यमातून मराठी कला, साहित्य, संस्कृतीचे जतन करण्यात यावे. तसेच ज्या रेडिओच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, राजकारण, सामाजिक जाणीव यासाठी भरीव योगदान दिले जात आहे. त्यांना या माध्यमातून योग्य सन्मान देण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदान करण्यात येणाऱ्या १२ रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदान लक्षात घेता हे नाव देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार

आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम,  महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक,  महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक,  महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम अशी या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात येतील. यासाठी संबंधित कलाकार तंत्रज्ञ रेडिओ केंद्र यांनी विहित नमुन्यातील माहिती संचालनालयास सादर करावी लागेल. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यासाठी रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार, तंत्रज्ञ, अभ्यासक यांसारख्या शासकीय सदस्यांच्या माध्यमातून पुरस्कारमूर्तींची निवड करण्यात येईल, असे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार आहेत तर दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील ज्या गाण्याच्या पार्श्वभूमीत रेडिओ दिसला आहे अशी गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून सन्मानिका सांस्कृतिक कार्य संचालनालयात दिनांक १९ पासून उपलब्ध होतील. सर्व रेडिओप्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.

रेडिओचे योगदान

‘आकाशवाणी’ हे एक लोकप्रसारणाचे महत्त्वाचे माध्यम म्हणून गणले गेले आहे. १९२७ सालापासून सुरू झालेल्या आकाशवाणीने भारताच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठी भर घातलेली आहे. जनसंवादाचा आणि जनसंपर्काचा ‘मास मीडिया’ म्हणून ओळखले जाणारे आकाशवाणी हे भारतीय माध्यमाचे एक अविभाज्य अंग आहे. आकाशवाणीमुळे अनेक कलाकार घडले असून, अनेक कलाप्रकारांना प्रोत्साहन आणि संरक्षणही मिळाले आहे. नवमाध्यमांच्या आक्रमणात व नवमनोरंजनाच्या या काळात आकाशवाणीनेही कालसुसंगत परिवर्तन केले आहे. आजही ग्रामीण भागात आकाशवाणीच्या कार्यक्रमांना मोठी पसंती मिळत असते.

महाराष्ट्रात आज घडीस ऑल इंडिया रेडिओची २८ केंद्रे, एफएम रेडिओची सोळा केंद्रे आणि ५४ कम्युनिटी रेडिओची केंद्रे हे काम करत आहेत. रेडिओ सिटी, रेडिओ वन, मॅजिक एफएम, माय एफ एम, टोमॅटो एफ एम, अशी विविध एफ एम चॅनल्स सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध संस्थांची विविध कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सही सुरू आहेत.

रेडिओ महोत्सवामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीस मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल. मराठीसाठी काही पुरस्कार राखीव असल्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी भाषा यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा राहणार आहे.  नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एफएम रेडिओ व कम्युनिटी रेडिओने मराठी भाषेच्या प्रचाराच्या प्रसिद्धीसाठी उल्लेखनीय काम केलेले आहे. अनेक मराठी कलाकारांना रेडिओमुळे नाव मिळालेले आहे. रेडिओ या सशक्त माध्यमाची दखल घेणे, सांस्कृतिक कार्य विभाग व पर्यायाने राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रेडिओ माध्यमांचा वापर करणे हा या महोत्सव व पुरस्काराचे आयोजन करण्याचा हेतू असल्याचे सांस्कतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

धुळे शहर, परिसरातील विविध विकासकामे गतीने पूर्ण करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

RAJU DONGARE Govt Photographer

मुंबई, दि. १७ : धुळे शहर आणि परिसरात पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी देवपूर, वलवाडी व इतर भागात सुयोग्य सांडपाणी गटाराची व्यवस्था करण्यात यावी. सखल भागात साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यात यावा. तसेच महानगरपालिका परिसरात होत असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करावीत, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

RAJU DONGARE Govt Photographer

धुळे महानगरपालिकेच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, धुळे महानगरपालिका तापी पाणी पुरवठा योजना सुकवद ते बाभळे, बाभळे – धुळे – मालेगाव रोड, दगडी टाकी या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम तातडीने करावे. तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या अवधान येथील ७५ एकर क्षेत्र जमिनीवर १५-२५ मेगावॅट क्षमतेचा स्वमालकीचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा. पाणीपुरवठा योजना व पथदिवे उभारणी करण्यात यावी, हा प्रकल्प समाजहिताचा असल्याने यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. १७: पैठण शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उर्वरित ४०० घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. यासाठीचा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. पैठण शहरातील इतर विकास कामांतर्गत पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे, आपेगाव येथील मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत पूर्ण करण्यात यावीत. याचबरोबर पैठण शहरातील विविध विकासकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

मंत्रालयात पैठण नगर परिषद हद्दीतील विविध समस्यांबाबत बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार विलास गुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी अंभोरे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, नगर परिषदेमार्फत स्थानिक निधीतून घनकचरा व्यवस्थापन कामे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यसेवेद्वारे करण्यात यावीत. कचरा संकलन, रस्ते झाडलोट, नालेसफाई, कचरा वाहतूक तसेच मान्सून तयारीच्या अनुषंगाने शहरातील मोठे नाले जेसीबीद्वारे स्वच्छ करण्यात यावेत. घनकचरा व्यवस्थापनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, जिल्हावार्षिक योजनेंतर्गत दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स व शिवाजी बालउद्यान, ६८ व्यावसायिक गाळ्यांची कामे पूर्ण करावीत.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

पालघर जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापण्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १७ : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवावा, याबाबतची कार्यवाही विभागाने जलदगतीने करावी, अशा सूचना कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या.

मंत्रालयात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत बैठक आयोजित बैठकीत कृषिमंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक काशीद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.वाय.सी.साळे, डॉ.एस.एस.नारखेडे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत कृषी विभाग सकारात्मक आहे. सध्या पालघर येथे एकही शासकीय कृषी महाविद्यालय नाही तसेच महाविद्यालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. येथील जनतेची मागणी लक्षात घेता याबाबत कृषी विभागाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, दि. १७: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील २५ वर्षापेक्षा जुने सर्व पूल, साकव तसेच इमारती यांचे सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने शासनास सादर करावा. तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, वारी महामार्ग सुरक्षित राहील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले  यांनी दिल्या.

राज्यातील सर्व पूल व साकवांचा आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मंत्री भोसले बोलत होते. बैठकीस सचिव (बांधकाम) संजय दशपुते उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा अदाज हवामान विभागाने दिला असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, पुल व साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर जर एखादा पूल धोकादायक असेल तर त्या ठिकाणी वाहतूक बंद करुन पर्यायी मार्ग तातडीन उपलब्ध करून द्यावा. तसेच त्या ठिकाणी नवीन पूल, साकव उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. धोकादायक पुलाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हवलता न येणारे बॅरिकेट्स लावावेत. स्थानिक पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांना धोकादायक पुलाविषयी माहिती कळवावी. पर्यायी रस्ता सुस्थितीत असेल याची काळजी घ्यावी. धोकादायक पुलावर ठळक अक्षरातील फलक लावण्यात यावेत. महामार्गावरील वापरात नसलेल्या पूलांच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून ते बंद करावेत. सार्वजनिक इमारतींचेही स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. यापूर्वी पावसाळापूर्व विभागामार्फत करावयाची कामे या बाबात मे महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती या मध्येही सर्व विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. या वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भोसले म्हणाले की, सर्व रस्ते खड्डे मुक्त राहतील याची काळजी घ्यावी. तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विशेषतः गणपती उत्सव काळात या मार्गावरून चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे गणपती उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वळण रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम पूर्ण करावे. विना अडथळा वाहतूक सुरू राहील, याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घ्यावी. परशुराम घाटात पर्यायी पुलाचा प्रस्ताव सादर करावा. नियमाप्रमाणे सर्व वळण रस्ते तयार करावेत. वळण रस्ते पूर्ण झाल्यानंतरच मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करावी. घाट रस्त्यांवर जाळी बसवणे, ते सुस्थितीत ठेवणे तसेच दरड कोसळल्यास किंवा इतर अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

वारी महामार्गावर वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधा उभाराव्यात. या मार्गावरील पुल, साकव यांचे कठडे दुरुस्त करावेत. तसेच या मार्गावरील पुलांचीही तपासणी करण्यात यावी. सुरक्षेच्या दृष्टीने वारी मार्गाची सर्व कामे करण्यात यावीत. वारीसाठी मार्ग पूर्ण सुरक्षित राहील याची दक्षता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. रस्त्यावरील खड्ड्यांविषयी विभागाने सुरू केलेल्या ॲपचा प्रभावी वापर करावा अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी दिल्या.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

मुंबई, दि. १७ : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक पाणी, खते आणि बियाणे पुरवठा यांच्याबाबत कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी १४५.८२ लाख हेक्टरवर अंतिम पेरण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा सरासरी आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. राज्यातील काही भागात सतत पाऊस सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना आणि लातूर जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. पालघर  बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील भागात येत्या दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे असे रस्तोगी यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व धरणाच्या जलाशयाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे, असे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी धरणात ५१५ मीटरपर्यंत पाणीसाठा करण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती कपूर यांनी यावेळी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

०००

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट

पुणे, दि. १७: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली. तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.

घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

अपघातग्रत पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येणार आहे. याशिवाय आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार

या ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला ८ फुटाचे दोन पदपथ करण्यात येणार आहे. तसेच हे पर्यटनस्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी (व्यूव्हींग गॅलरी) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसानंतर तातडीने पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे निर्देश यावेळी संबंधित बांधकाम कंत्राटदाराला दिले.

उपमुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात जखमींची विचारपूस

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पवना रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार होतील याची काळजी घ्यावी, असे डॉक्टरांना निर्देश दिले. या कामात समन्वयाची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर राहील, असेही ते म्हणाले.

०००

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदांसाठी १ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

मुंबई, दि. १७ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या अनुषंगाने अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यासाठी आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले असून आयबीपीएस कडून दिनांक 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत. आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र/ हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएस कडून पाठविण्यात येणार आहेत.

या परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्था, मध्यस्थ अथवा इतरांकडून तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १७ : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांद्वारे लाभार्थ्यांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन, वित्तीय मदत आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. राज्यातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

मंत्री  सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महामंडळ अंतर्गत सर्व उपकंपनी यांच्या संचालक मंडळाची बैठक झाली.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए. बी. धुळाज, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले, महामंडळाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. सर्व उपकंपनी यांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्धतेबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच महामंडळाच्या योजनांबाबत दिनदर्शिका तयार करण्यात यावी. महामंडळाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेतच असावे.

या बैठकीत यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात आली. महामंडळाच्या संचालक मंडळावर नवीन संचालकांची निवड करण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

ताज्या बातम्या

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...

“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” – सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञता

0
मुंबई, दि. 6: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्राथमिक ते...

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...