रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 378

महात्मा फुले वाडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. २३: पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे.

पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांचे विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे पुनर्वसन या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर निधी पुणे महापालिकेला वितरीत केला जाईल. यामुळे स्मारकांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

००००

धुळे पोलीस दलाचे काम उल्लेखनीय; जिल्ह्यातील चारही तालुक्यात पोलिसांसाठी  निवासस्थाने बांधणार : पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 27 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्त) : धुळे जिल्हा पोलीस दलाचे काम अत्यंत उल्लेखनीय असून येत्या काळात जिल्ह्यातील चारही तालुक्यात पोलिसांसाठी निवासस्थाने  बांधण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

धुळे पोलीस दलातर्फे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस वेबसाईटचे उद्धाटन, मुद्देमाल हस्तांतरण सोहळा, धुळे मॅरेथॉन सीजन -3 टी-शर्ट तसेच लोगो अनावरण, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होत आहे हा अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून पोलिसांची प्रतिमा जनसामान्यात उंचावण्यास मदत होणार आहे.

पोलीस हे 24 तास तणावात काम करत असतात त्यांना अनेकदा टिकेला तोंड द्यावे लागते. परंतू पोलीसांमार्फत झालेले चांगले काम जनतेसमोर येणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष असलेला पोलीस व त्यांनी समाजासाठी केलेलं काम मांडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद होत आहे. येत्या काळात सुद्धा धुळे जिल्ह्याला अभिमान वाटेल, राज्यात आपले नाव होईल  असे काम यापुढे देखील करावे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार जनताभिमुख असे पोलीस दल झाले पाहिजे. त्यासाठी इंटरॲक्टिव्ह असे वेबपेज असले पाहिजे आणि महाराष्ट्रातील असं काम करणार पहिल माझ्या धुळे जिल्ह्याचे पोलीस दल आहे, याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यातील नागरिक हे शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असले  पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासन तसेच धुळे पोलीस दलामार्फत गेल्या तीनवर्षापासून धुळे मॅरेथॉन स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष साजरे करीत आहे. पोलीसांच्या माध्यमातून चोरी, मिसींग, पतीपत्नीचे भांडण, सामाजिक जातीय सलोखा असे अनेक लोकोपयोगी कामे होत आहे हे भुषणावह आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून 25 वर्ष तसेच जिल्ह्याचा एक भूमिपुत्र म्हणून आगामी काळात जिल्ह्यात चांगल्या कामास पाठिंबा देण्याचे काम त्याचबरोबर चुकीच्या गोष्टी रोखण्याचा काम देखील येत्या काळात करणार आहे. येत्या काळात जिल्ह्यातील पोलीस कार्यालयात नागरिकांसाठी बसण्याची व्य्वस्था, पंखा, लाईट, स्वच्छता, पाणी, शौचालय अशा मुलभूत व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील चारही तालुक्यात टप्पयाटप्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.  पोलीस विभागाचे बॅन्ड पथक अतिशय चांगले असल्याचे कौतुक देखील त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.धिवरे म्हणाले की, 2024 मधील लोकसभा, विधानसभा निवडणूकीत पोलीसांवर प्रचंड ताण होता. त्यातच अनेक मान्यवरांचे दौरे असूनही धुळे पोलीस दलाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. लोकसभा, विधानसभा कालावधीत आपल्याकडे अतिशय कमी गुन्हे दाखल झाले आहे. सन 2024 मध्ये 7 हजार 500 च्या वर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. त्यादेखील 2023 पेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभा व  विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्तीच्या (सीजर्स) च्या कारवाईत धुळे जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर होता. भरोसा सेल मार्फत 239 कुटूंबाचे समुपदेशन करण्यात आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्री श्री.रावल व मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस दलाच्या नूतन वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. तसेच धुळे पोलीसांनी गुन्ह्यांचा तपास लावून हस्तगत केलेले दागिने, मोबाईल तसेच विविध मुद्देमाल फिर्यादी, तक्रारदार यांना हस्तांतर, धुळे मॅरेथॉन सिझन-३ चे टी शर्ट व लोगोचे अनावरण तसेच धुळे जिल्हा पोलीस दलात विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र वाटप करुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती कल्याणी कचवाह यांनी तर अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांनी आभार प्रदर्शन केले.

असे आहे नविन संकेतस्थळ

धुळे पोलिसांचे नवीन आणि अद्ययावत अधिकृत संकेतस्थळ : https://dhulepolice.gov.in/ असे आहे. यात

  • नागरिकांना तक्रारी मांडण्यास आणि मौल्यवान सूचना करण्यास सक्षम करणे.
  • महत्वाची माहिती आणि आपत्कालीन संपर्क त्वरित  प्रदान करणे.
  • पारदर्शकता आणि विश्वास वाढवून पोलीस आणि जनता यांच्यातील बंध दृढ करणे.

0000000

महापारेषणमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 मुंबई, दि. 26 : महापारेषणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगंगा येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच महापारेषणच्या सात परिमंडळ कार्यालयांमध्येही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

प्रकाशगंगा येथील मुख्यालयात महापारेषणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण यांनी ध्वजवंदन केले. यावेळी महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरेयांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊर्जा विभागाच्या चित्ररथाने वेधले लक्ष

दादरच्या शिवाजी पार्कवर झालेल्या चित्ररथाच्या सादरीकरणावेळी महापारेषणच्या (ऊर्जा विभाग) चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. विशेषतः मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0., पारेषणचे वहन, नविनीकरणीय ऊर्जा या संकल्पनेवर असलेल्या चित्ररथाने उपस्थितांची वाहवा मिळविली. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्ररथ तयार करण्यात आला.

0000

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

  • जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य देणार
  • चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणार नाही; चांगल्या कामाला सहकार्य

लातूर, दि. २६ : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, संदीप कुलकर्णी, अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभदायक ठरणारी विकास कामे करण्यावर सर्व विभागांनी भर द्यावा. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वात घेवून काम करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमाला आपला पाठींबा राहील. मात्र, कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लातूर ते टेंभूर्णी महामार्गाचे रुंदीकरण, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला नवीन एमआरआय मशीन घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सीएसआर फंडातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले. लातूर जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रातील वेगळा पॅटर्न तयार केला आहे, याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विकासाचा नवा पॅटर्न निर्माण करावा. आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

 बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी सतर्क राहून काम करा

उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, त्यानंतर पाठविलेले उदगीर आणि अहमदपूर तालुक्यातील कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय अहवाल नकारात्मक आल्याने कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील कुक्कुट पक्ष्यांना सध्या बर्ड फ्ल्यूची लागण झालेली नाही. मात्र, बाजूच्या जिल्ह्यांमधून बर्ड फ्ल्यूचा प्रसार होवू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने सतर्क राहून काम करावे. विविध पथके प्रत्यक्ष फिल्डवर पाठवून सातत्याने परिस्थितीचा आढावा घ्यावा. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांची पीपीटीद्वारे माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पांदन रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने तहसीलदार यांनी कार्यवाही सुरु केली आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांचा अभ्यास करून जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी, आरोग्य, उद्योग, प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकास, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन यासह विविध विभागांचा पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.

 शासकीय जमिनींची माहिती आता एका क्लिकवर

लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व गायरान जमिनींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या संगणक प्रणालीचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध विकास कामांसाठी जिल्ह्यातील शासकीय जमिनींची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.

0000

 

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाला ४२ चारचाकी वाहने सुपूर्द

लातूर, दि. २६ : राज्य शासनामार्फत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांना ४२ चारचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ही वाहने संबंधित विभागांना सुपूर्द करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित या कार्यक्रमामध्ये पोलीस विभागाच्या अभया सुरक्षित प्रवास योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेल्या वाहनांना पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल विभागाला ९, जिल्हा परिषदेला ८, लातूर शहर महानगरपालिकेला १ आणि पोलीस विभागाला २४ वाहने राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत. महसूल, जिल्हा परिषद विभागाला मिळालेली वाहने जिल्हाधिकारी विविध कार्यालयांना सुपूर्द करण्यात आली. लातूर शहर महानगरपालिकेला एक अग्निशमन वाहन, तसेच पोलीस दलातील विविध पथके, अधिकारी यांच्यासाठी २४ वाहने प्राप्त झाली आहेत.

 अभया सुरक्षित प्रवास योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेल्या वाहनांना हिरवा झेडा

लातूर शहरातील महिला, बालक व वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित, कोणतीही भीती न बाळगता प्रवास करता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाने अभया सुरक्षित प्रवास योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे प्रवाशांना ऑटो रिक्षावर, सिटी बसमध्ये लावण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून तत्काळ पोलीस मदत मागवता येईल. याद्वारे मदत मागताना लोकेशन पाठविण्याची सुविधा असल्याने लवकर मदत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत क्यूआर कोड बसविलेली सिटी बस, ऑटोरिक्षाला पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हिरवा झेंडा दाखविला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मराठवाड्यात अशी योजना राबविणारा लातूर हा पहिलाच व राज्यात दुसरा जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

गड-किल्ल्यांवर लोककलेतून शिवरायांच्या शौर्यगाथा सादरीकरणासाठी प्रयत्नशील – मंत्री उदय सामंत

अहिल्यानगर, दि.२६: उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचे स्व.सदाशिव अमरापूरकर नाट्यनगरी येथे शानदार उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यातील गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांचा माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असे श्री.सामंत यावेळी म्हणाले.

अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त  मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रेमानंद गज्वी, नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, शिरीष मोडक, अजित भुरे, दिलीप कोरके, दीपा क्षीरसागर, प्रा. प्रसाद बेडेकर, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर येथील १०० वे विभागीय नाट्यसंमेलन ऐतिहासिक असून नवे कलाकार घडविण्याचे कार्य अहिल्यानगर नाट्य परिषद शाखेने नेहमी केल्याचे नमूद करून मंत्री श्री. सामंत म्हणाले की,  हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीकडे जाणारे कलाकार घडविण्याची गरज आहे. राज्यात लोककला, संगीत क्षेत्राच्या विकासात ज्येष्ठ कलाकारांचे मोठे योगदान आहे. शहरात नाट्यगृहाची सुविधा करतांना व्यावसायिक नाटकांवर होणारा खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नाट्यगृहांमध्ये सौर ऊर्जेचा वापर होणे गरजेचे आहे. स्थानिक हौशी रंगभूमी कलाकारांना कमी दराने नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. मराठी भाषेच्या विकासासाठी चांगल्या सूचना आल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यानगर परिसरात ३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प उभे राहणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. दावोस येथेदेखील जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी करार करण्यात आल्याची माहिती, श्री.सामंत यांनी दिली.

आमदार जगताप म्हणाले की, जिल्ह्यात २२ वर्षापूर्वी नाट्यसंमेलन झाले होते. या माध्यमातून नवीन कलाकार घडविण्याचे कार्य होते. यावर्षी विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करतांना १०१ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अहिल्यानगर शहराला मिळाल्यास त्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येईल. शहरात नाट्यगृह उभे राहत आहे. शहराचा औद्योगिक विकासाची वेगाने वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून पुढील पिढीतील कलाकार घडविण्याचे कार्य व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी विभागीय नाट्यसंमेलन सुनियोजित असल्याचे नमूद करून अहिल्यानगर उपनगर शाखेचे आयोजनाबद्दल अभिनंदन केले.

अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की, नवोन्मेष आणि नवी ऊर्जा असलेल्या रंगकर्मींसाठी ठोस कामगिरी होईल. हौशी रंगमंच सशक्त झाल्यास व्यावसायिक रंगभूमीला बळ मिळते. प्रायोगिक रंगभूमीसाठी गावोगावी मंच उभे राहिल्यास व्यावसायिक रंगभूमी सशक्त होते. राज्य पातळीवर यशस्वी एकांकिका ठिकठिकाणी दाखविण्यात याव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर लोककलाकारांच्या माध्यमातून शौर्याची गाथा मांडली गेल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. रंगकर्मी जेवढे मोठे होतील तेवढा समाजातील एकोपा टिकून राहील, असे त्यांनी सांगितले.

डॉ. कांडेकर, श्री.भुरे यांनी यावेळी विचार व्यक्त केले.

विभागीय नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी प्रास्ताविकात विभागीय नाट्यसंमेलनाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनानिमित्त अहिल्यानगरच्या १०० कलाकारांनी नांदी आणि १०० कलाकारांनी स्वागत नृत्य सादर केले. विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात नाट्यदिंडीने करण्यात आली. प्रोफेसर कॉलनी चौकापासून संमेलनस्थळापर्यंत नटराजाच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले.

०००

 

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. २६ : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विकास विभाग व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शायरी, गझल आणि सूफी संगीताचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, अल्पसंख्याक विकास विभागाचे आणि उर्दू साहित्य अकादमीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळाली. गझल गायक सिराज अहमद खान यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांच्या कडकडाटासह “वाह! क्या बात है!” असे शब्द ऐकू येत होते.

शायर मोनिका सिंग, शाहिद लतीफ, सिराज सोलापुरी, डॉ. कमर सुरूर फारूकी, नैम फराज, सदानंद बेंद्रे, अभिजित सिंग, वालिद जमाद, शौखत अली, तारीख जमाल, नईम फराझ यांनी आपल्या शायरीने कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कासिम इमाम यांनी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान; मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

मुंबई, दि. 26 : देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी संध्याकाळी राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी सुमती राधाकृष्णन, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, उद्योजक अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, आमदार अमीन पटेल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, अभिनेते जॅकी श्रॉफ, पार्श्वगायक उदित नारायण, वर्षा उसगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मुंबईचे मावळते आर्चबिशप ऑस्वाल्ड ग्रेशिअस व नवे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

0000

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव 2025  च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे, ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, आधुनिक शेतीची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातीवंत घोडे वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांत अग्रेसर आहेत. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे  वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, ऊसाचे उत्पादन वाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, आपल्या कृषी प्रधान देशात कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. शेतीतून मिळणारे उत्पादन खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते. आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो. निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. लांब आणि खंडीत जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल. सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जनावरांचे प्रदर्शन, घोड्यांची शर्यत, डॉग शो पाहिला व यातील उत्कृष्ट ठरलेल्या जनावरांच्या मालकांना बक्षिसे वितरीत केली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण केले.

०००

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार

पुणे, दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’  च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

श्री. पवार पुढे म्हणाले, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, आधुनिक शेतीची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातीवंत घोडे वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांत अग्रेसर आहे. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, ऊसाचे उत्पादन वाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

श्री. पवार पुढे म्हणाले, आपल्या कृषी प्रधान देशात कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. शेतीतून मिळणारे उत्पादन खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते. आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो. निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. लांब आणि खंडित जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल. सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये, असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जनावरांचे प्रदर्शन, घोड्यांची शर्यत, डॉग शो पाहिला व यातील उत्कृष्ट ठरलेल्या जनावरांच्या मालकांना बक्षिसे वितरीत केली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण केले.
0000

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...