शुक्रवार, जुलै 4, 2025
Home Blog Page 20

महाराष्ट्र शासनाचे २०, २१ व २२ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे २० वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या २० वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

१ जूलै, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् १ जूलै, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २ जुलै, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी २० वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २ जुलै, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २ जुलै,२०४५ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी  २ जानेवारी आणि दिनांक २ जुलै  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे २१ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या २१ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

१ जूलै, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् १ जूलै, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २ जूलै, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी २१ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २ जुलै, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २ जुलै,२०४६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी  २ जानेवारी आणि दिनांक २ जुलै  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे २२ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र शासनाच्या २२ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

१ जूलै, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् १ जूलै, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २ जूलै, २०२५ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी २२ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २ जूलै, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २ जुलै,२०४७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा  लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी  २ जानेवारी आणि दिनांक २ जुलै  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

 

महिला कलाकारांच्या ‘रंग मल्हार’ प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

मुंबई, दि. २६ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित महिला कलाकारांच्या ‘रंग मल्हार’ या विशेष पावसाळी कला प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते 27 जून रोजी सायंकाळी 5 वाजता अकादमीच्या कलादालनात होणार आहे. हे प्रदर्शन १० जुलैपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान या राज्यांसह जर्मनी, लंडन आणि दुबई येथील महिला कलाकारांच्या कलाकृतींचा या प्रदर्शनात सहभाग आहे. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, वस्त्रकला, टेपेस्ट्री आणि कॅलिग्राफी अशा विविध माध्यमांतील कलाकृतींचे दर्शन यातून घडणार आहे.

ज्येष्ठ कलाकार मंगल पाडेकर, नीलिमा कढे आणि शुभा वैद्य यांच्यासह सुप्रिया अंबर (जबलपूर), दिपाली मेहेर, भावना सोनवणे, अलोका बॅनर्जी, हिरल भगत, जयालक्ष्मी, दीपा कुलकर्णी, कंचन टोडी, करिष्मा वाधवा, समीक्षा जावळे, स्मिता राणे, तेजस्विनी चाफेकर, सुषमा अदाते, स्नेहा वऱ्हाडे, यशश्री शीरधनकर यांसारख्या विविध माध्यमांतील मान्यवर कलाकार प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. ‘माउंटन इन मॉन्सून’ ही अलोका बॅनर्जी यांची टेपेस्ट्री, हिरल भगत यांचे कॅलिग्राफीतील काम आणि विविध ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज विशेष आकर्षण ठरणार आहेत. स्वरंग या संस्थेने प्रदर्शनास सह- प्रायोजकत्व दिले आहे.

रसिकांनी या अनोख्या कला अनुभूतीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रदर्शन : रंग मल्हार, स्थळ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई, कालावधी : २७ जून ते १० जुलै २०२५, वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७, प्रवेश : सर्वांसाठी विनामूल्य.

000

संजय ओरके/विसंअ/

१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा मुंबईचा आराखडा तयार करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे निर्देश

???????????????????????????????

मुंबई, दि. २६ : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५ मि. मी प्रत्यक्ष तासाची क्षमता असलेली आहे. त्यामध्ये वाढ करुन १०० मि.मी पेक्षा जास्त पाऊस पडला तर पाण्याचा निचरा होईल, या दृष्टीने एक स्वतंत्र आराखडा तयार करा, याबाबत केंद्रीय गृह खात्याच्या नॅशनल डिझास्टर  मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबईला अधिकचा निधी मिळणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

मुंबईत उद्भवणारी पूर परिस्थिती आणि पाण्याचा निचरा याबाबतच्या उपाय योजनांबाबत मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. शेलार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईत २०१७ मध्ये एकूण २६ दिवस तर सन २०२४ मध्ये २१  दिवस पाऊस पडला होता.  यावरुन असे लक्षात येते की, मुंबईत सरासरी दरवर्षी १६ ते २० दिवस पाऊस पडतो. हा पाऊस एका तासाला १०० मि. मी. पेक्षा जास्त असतो, असेही पालिकेच्या अभ्यासातून समोर आले आहे. सन २०१४ ते २०१९ या कालखंडात तासाला १३१ मि. मी तर १९ मे ला जो पाऊस झाला तो एका तासाला १८२ मि. मी एवढा होता. २६ जुलै २००५ ला जो जलप्रलय झाला त्यावेळी मुंबईत सुमारे १ हजार मि. मी पाऊस १६ तासात झाला होता तर तासाला १३९ मि. मी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी समुद्राला भरती असल्याने प्रचंड पुराचा फटका मुंबईला बसला होता. आताही १०० मि. मी. पेक्षा जास्त पाऊस एका तासाला होत असून त्याचवेळी भरती असेल पाण्याचा निचरा होत नाही व पूर परिस्थितीचा सामना मुंबईला करावा लागतो. २६ जुलै २००५ पूर्वी मुंबईत पावसाचा पाण्याचा निचरा करणारी जी गटारे होती त्यांची क्षमता ताशी २५ मि. मी पाऊस झाल्यावर पाण्याचा ‍निचरा करणारी होती. त्यानंतर गठित केलेल्या चितळे समितीने शिफारस केल्यानुसार त्यामध्ये वाढ करुन आता ५५ मि. मी. प्रत्येक तासाला पाऊस झाला तर पाणी वाहून नेणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र आता तासाला आता १०० मि. मी. पेक्षा जास्त पाऊस होत असल्याने ही क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. याबाबत मुंबई महापालिका ज्या उपाययोजना करीत आहे त्यामध्ये लहान मोठ्या चार पंपिंग स्टेशनची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे.

सध्या मुंबईत ९ छोटी पंपिंग स्टेशन असून यामध्ये वाढ करुन महाराष्ट्र नगर व धारावी टी जंक्शन येथे दोन नवीन छोटी पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. तसेच सध्या ६ मोठी पंपिंग स्टेशन असून त्यामध्ये वाढ करुन मोगरा व माहुल येथे दोन नवीन स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामुळे कुर्ला आणि अंधेरी येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे

दरम्यान, मुंबईच्या पुरपरिस्थितीची दखल केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात उपाययोजनांसाठी ५०० कोटींचा निधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिला आहे. तसेच शहरातील पूरपरिस्थितीचा अभ्यास करुन एक कृती आराखडा तयार करण्यासही सांगितले असून या कामी मुंबई महापालिकेने जो आराखडा तयार केला त्याचा अभ्यास आयआयटीची तज्ज्ञ समिती करीत आहे.

ज्या भागात पाणी तुंबते अशी ठिकाणे निवडून त्या भागातील पावसाळी पाण्याचा  निचरा करणारी यंत्रणा ही तासाला १०० मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा करु शकेल, अशी उभारण्यात येणार आहे. याबाबतचा हा अहवाल आयआयटीच्या मदतीने तयार करण्यात येणार असून यासाठी सुमारे ५ हजार कोटींचा खर्च येईल, असा प्राथमिक अंदाज आहे. यासाठी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील तंत्रज्ञानाचा वापर मुंबईतील पाण्याचा निचरा करण्यासाठी  करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचाही विचार करुन मुंबई महापालिका हा नवा आराखडा तयार करीत आहे. हा आराखडा तयार करताना मुंबईतील रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीए सह सर्व प्राधिकरणांचा समन्वय व चर्चा करुन हा अहवाल तयार करण्यात यावा, असे निर्देशही यावेळी मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. हा आराखडा येत्या एक महिन्यात तयार करावा, असे निर्देशही मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी दिले.

000

वंदना थोरात/विसंअ/

वाहतूक व्यावसायिकांच्या समस्या निराकरणासाठी समिती गठित करुन महिन्याच्या आत अहवाल सादर करावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २६ : वाहतूक व्यावसायिकांच्या ई-चलन विषयक समस्यांचे निराकरण करण्याची शासनाची भूमिका असून त्यासाठी परिवहन विभागांने संबंधितांची समिती गठित करावी व एका महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात ई-चलन प्रक्रिया सुधारणासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री.सरनाईक यांनी संबंधितांना मार्गदर्शन केले. बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) गृह विभाग संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, ई-चलन प्रणालीत सुधारणा करताना प्राधान्याने वाहनचालक व  मालक  यांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणारे निकष असावे, त्यात कुठेही जाचक अटी लादू नये.  एकाच दिवसात एका कारणासाठी वेगवेगळी चलन वसूल करु नये. त्यासाठी चलनाचा  ग्राह्यता कालावधी निश्चित करावा, व्यावसायिक वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी. मुंबईमध्ये जड वाहतूक वाहनांना प्राधान्याने पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. वाहतूक संघटनांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची सयुंक्त समिती गठित करावी, त्यामध्ये वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग घ्यावा, जेणेकरुन समितीच्या कामात पारदर्शकता व सर्वसमावेशकता येईल. तसेच पोलिस विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईत सध्याच्या ई-चलन निकषात शिथिलता आणावी. परिवहन विभागाच्या परित्रकाच्या निकषानुसार पोलिसांनी देखील आवश्यक तिथेच कार्यवाही करावी. चलन लावताना लाईव्ह फोटो अपलोड करावे, रिअल टाइम फोटो घ्यावेत. अनावश्यक कारवाई करणे थांबवावे. संपूर्ण चलन प्रक्रिया ही सहिष्णू, पारदर्शक आणि सुव्यवस्थितरित्या राबविण्याच्या दृष्टीने समितीने अभ्यास करावा. ई-चलनाचे जे निकष जाचक ठरणारे असतील त्यात सुयोग्य बदल करण्यात यावे. वाहनांसाठीची गती मर्यादा, पार्किंग नियमावली या सर्वांचा अभ्यास करुन समितीने अहवाल द्यावा. वाहतूक संघटनांच्या मागण्यांना न्याय देण्याची विभागाची भूमिका असल्याचे मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले.

उद्योग मंत्री उदय सामंत  यांनी  चलन प्रक्रियेतील जाचक अटी नियमांत बदलण करणे  आवश्यक असून  पार्किंग माफीयाच्या वाढत्या समस्येबाबत गांभिर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच  वाहतूक पोलिसांनी जुने फोटो अपलोड करुन चलन वसुली करण्याचे प्रकार थांबवण्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री रोजगार योजनेत वाहतूक व्यवसायाला समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री.सामंत यांनी आश्वासित केले.

बैठकीत वाहतूक संघटानांच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्या व समस्या मांडल्या.

०००

वंदना थोरात/विसंअ/

राजधानीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी अभिवादन

नवी दिल्ली, २६ : सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनच्या दर्शनी भागात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनच्या सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र परिचय केंद्रात माहिती अधिकारी अंजू निमसरकार  यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

0000

अंजु निमसरकर, माहिती अधिकारी – वृत्त विशेष 138

वाढवण बंदर व वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी प्रस्तावित उत्तन-विरार सागरी मार्ग जोडा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्तन-विरार सागरी मार्ग (यूव्हीएसएल) चा सुधारित आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. यावेळी, प्रस्तावित उत्तन विरार मार्ग वाढवण बंदर व समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावे. त्यामुळे हा सागरी मार्ग प्रकल्प मुंबईला महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रस्तावित उत्तन विरार सागरी मार्ग प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील मंत्रिमंडळ कक्षात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते. श्री. मुखर्जी यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती दिली.

उत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत हा सेतू वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे. हा प्रकल्प केवळ आर्थिक संधीच निर्माण करणार नाही, तर भारताच्या बंदर आधारित विकास दृष्टिकोनाला महत्त्वाची साथ देणारा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती

सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर, एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रकल्प रचनेचे 87,427 कोटी रुपयांपासून ते 52,652 कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे प्रस्ताव असलेल्या सहा वेगवेगळ्या पर्यायांचे सादरीकरण या बैठकीत केले. त्यातून आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक असलेला 52,652 कोटी रुपयांच्या पर्यायाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निवड केली. या पर्यायामुळे प्रकल्प खर्च ₹८७,४२७.१७ कोटींवरून ₹५२,६५२ कोटींवर आणण्यात यश आले आहे.

प्रकल्प खर्च कपातीमागील मुख्य कारणे :

१. लेन डिझाइनमध्ये योग्य ते बदल: पूर्वी ४+४ लेन आणि इमर्जन्सी लेन असा मोठा रस्ता ठेवला होता. आता तो ३+३ लेनवर आणला गेला आहे. कनेक्टरसाठीसुद्धा ३+३+इमर्जन्सी ऐवजी फक्त २+२ लेन ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिव्हिल आणि स्ट्रक्चरल कामांमध्ये खूप बचत झाली.

२. भविष्यातील जोडण्या लक्षात घेऊन नियोजन: भविष्यातले रस्ते जोडण्याचे टप्पे आणि सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले रस्त्यांचे जाळे हे सगळं विचारात घेऊन महागाईचा अंदाज लक्षात घेत बजेट ठरवलं आहे. त्यामुळे जास्तीचा खर्च टाळता आला.

३. जमीन अधिग्रहणाचा खर्च कमी : रचना आणि लेनची रुंदी कमी केल्यामुळे ‘राईट ऑफ वे’ म्हणजेच आवश्यक जागेची लांबी कमी झाली. त्यामुळे जमीन विकत घेण्याचा आणि प्रकल्पबाधितांवर होणारा खर्च बराच कमी झाला.

४. कनेक्टरच्या रचनेत सुधारणा: पूर्वी दोन खांबांवर (पिलर्स) असलेली रचना होती, त्याऐवजी एका खांबावर आधारित असेल. त्यामुळे बांधकाम स्वस्त आणि पर्यावरणपूरक बनलं.

५. तात्पुरते खर्च, सल्लागार फी आणि सुरुवातीचे इतर खर्च कमी: त्यामुळे एकूण खर्चात मोठी बचत झाली.

असा आहे प्रकल्प :

  • एकूण लांबी : ५५.१२ किमी
  • मुख्य सागरी मार्ग: २४.३५ किमी
  • कनेक्टर्स : ३०.७७ किमी
  • उत्तन कनेक्टर (९.३२ किमी) – बृहन्मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर लिंक रोडशी जोड
  • वसई कनेक्टर (२.५ किमी) – पूर्णपणे उन्नत
  • विरार कनेक्टर (१८.९५ किमी) – वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेला जोडणारा

सद्यस्थितीत मुख्य सागरी मार्गासाठी ३+३ लेन कॉन्फिगरेशन (२५.१ मीटर रुंद) आणि कनेक्टर्ससाठी २+२ लेन कॉन्फिगरेशन (१८.५५ मीटर रुंद) प्रस्तावित आहे. या रचनेमुळे पुढील तीन दशकांमध्ये प्रवाशांची सोय आणि कार्यक्षमतेची खात्री होते.

निधी संकल्पना

  • ₹३७,९९८ कोटी (७२.१७%) – जायका (JICA)/बहुपक्षीय निधीकडून प्रस्तावित (टोल वसुलीच्या आधारे परतफेड)
  • ₹१४,६५४ कोटी (२७.८३%) – महाराष्ट्र सरकार/एमएमआरडीएकडून भांडवली (इक्विटी) स्वरुपात

या अनुषंगाने एमएमआरडीएला सुधारित अद्ययावत तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल (पीपीआर) शासनाला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

उत्तन-विरार सी लिंक हा एमएमआरच्या भविष्यासाठी तयार वाहतूक प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो मुंबईच्या उत्तर उपनगरांमधून थेट वाढवण बंदर दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि उत्तर मुंबईच्या उपनगरांना थेट जोडणारा हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाला नवीन आर्थिक संधी व कनेक्टिव्हिटीचा व्यापक विस्तार देणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) तयार करावे. प्रस्तावित मार्गाला आवश्यक मंजुरीची प्रक्रिया वेगाने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक रामराव यांच्यासह मीरा भाईंदर महापालिका आयुक्त, वसई विरार महापालिका आयुक्त उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

 

विषमुक्त अन्न तयार करणारा आणि प्रोत्साहन देणारा पोशिंदा….!

यशकथा

महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. याच धोरणातून प्रेरणा घेत, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी विषमुक्त सेंद्रिय शेतीचा अवलंब करत स्वतःचा स्वतंत्र ब्रँड उभा केला आहे. पारंपरिक रासायनिक शेतीपासून दूर जाऊन पर्यावरणपूरक, आरोग्यदायी आणि शाश्वत शेतीची दिशा त्यांनी स्वीकारली. शासनाच्या कृषी विभागाच्या सहाय्याने व मार्गदर्शनातून त्यांनी निंबोळीपासून जैविक कीटकनाशक तयार करत एक छोटासा उद्योग उभा केला, जो आज हजारो शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. सध्या काही तांत्रिक कारणासाठी लोकांना देण्याचे शक्य होत नाही. पण लवकरच पुन्हा जैविक उत्पादनांची गरज ओळखून, सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांच्या शेतात मात्र ते पूर्णपणे सेंद्रिय अन्न पिकवतात. यासाठी शासनाने त्यांचा वेळोवेळी गौरव केला आहे. ते सेंद्रिय शेतीचे जिल्ह्याचे दूत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामावर प्रकाश टाकणारा व सेंद्रिय शेती कशी करावी यावर प्रकाश टाकणारा हा लेख….!!

 

सेंद्रिय शेती ही केवळ पर्यावरणपूरक शेतीची दिशा नसून, भविष्यातील शाश्वत अन्नसुरक्षेचा मूलमंत्र आहे. याच मार्गावर गेल्या २५ वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत असलेले प्रगतशील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी सेंद्रिय शेतीला व्यावसायिक व व्यावहारिक दृष्टिकोन दिला आहे. त्यांनी रसायनमुक्त उत्पादनांचा प्रसार करताना पर्यावरणाच्या रक्षणालाही प्राधान्य दिले आहे.

सेंद्रिय शेतीकडे वळण्यामागील प्रेरणा

राजेंद्र कांडेलकर यांनी पारंपरिक रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग २५ वर्षांपूर्वीच स्वीकारला. सुरुवातीला बाजारातून विकत घेतलेली कीटकनाशके व तणनाशके निकृष्ट दर्जाची असून पिकांवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी अनुभवलं. रासायनिक पदार्थांचा अतिरेक केवळ उत्पादनाचे नुकसान करत नव्हता, तर मातीची सुपीकता, जलस्रोत आणि पर्यावरणही बाधित होत होते. ही गंभीर बाब लक्षात घेत त्यांनी नैसर्गिक उपायांचा शोध घेतला.

प्रशिक्षण आणि जैविक उत्पादननिर्मितीची सुरुवात

श्री. कांडेलकर यांनी नैनीताल आणि पंजाब येथे जाऊन सेंद्रिय शेती व जैविक उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांनी ‘जय भोले नीम शक्ती अ‍ॅग्रो’ या नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी निंबोळीपासून जैविक कीटकनाशक – तेल, अर्क आणि पावडर तयार करण्यास सुरुवात केली. या उत्पादनांमध्ये कोणतेही रासायनिक घटक नसून त्याचा पिकांवर आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.

निंबोळी उत्पादने: शाश्वत कीटकनाशकांचा पर्याय

श्री. कांडेलकर दरवर्षी सुमारे १०० टन निंबोळी खरेदी करतात आणि त्याचे साठवण करून उत्पादन तयार करतात. त्यांच्या निर्मित निंबोळी अर्कात ३५% निंबोळीचा अंश असतो, जो बाजारातील अन्य अर्कांपेक्षा अधिक प्रभावी ठरतो. हे अर्क ८० रुपये प्रति लिटर दराने विकले जातात. उत्पादन ५, ३५ आणि ५० लिटरच्या प्लास्टिक डब्यांमध्ये पॅक करून शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवले जाते.

उत्पादन प्रक्रिया

२०० लिटर क्षमतेच्या टाकीत निंबोळी, बुरशीनाशक व उपयुक्त सूक्ष्मजीव एकत्र करून २१ दिवस नैसर्गिक किण्वन प्रक्रिया राबवली जाते. तयार अर्क फवारणीसाठी वापरण्यात येतो. याशिवाय ते जैविक गांडूळ खत, कंपोस्ट खत, व सुकवलेली निंबोळी पावडर देखील तयार करतात, जी फळबागांमध्ये खतासोबत मिसळून वापरली जाते.

लघुउद्योगाचा विकास आणि रोजगारनिर्मिती

फक्त ४ ते ५ लाख रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक करून त्यांनी एक लघुउद्योग सुरू केला. आज या यंत्रणेवर ७ ते ८ मजुरांचे कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाले आहेत. त्यांचे उत्पादन ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पिकांवर फवारणीसाठी वापरले जाते, जे पर्यावरणपूरक, कार्यक्षम व दीर्घकाळ टिकणारे आहे.

व्यापारीकरण आणि बाजारव्यवस्था

सुरुवातीला राजेंद्र कांडेलकर यांनी आपले उत्पादन स्थानिक पातळीवर विकण्याचा प्रयत्न केला, मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्थानिक कृषी कंपन्यांशी संपर्क साधला. त्यांची उत्पादन गुणवत्ता लक्षात घेऊन स्थानिक कंपन्यांनी त्यांना बाहेरील कंपन्यांच्या माध्यमातून विक्री करण्याचा सल्ला दिला. त्यांनी कृषी प्रदर्शनात भाग घेणे, पॅम्पलेट्स, पोस्टर लावणे आणि प्रत्यक्ष संवाद साधणे यावर भर दिला.

आज त्यांच्या उत्पादनांचा वापर नाशिक, अकोला, बुलढाणा ते मध्यप्रदेश या विस्तृत परिसरातील सुमारे दीड ते दोन लाख शेतकरी करत आहेत. केळी, द्राक्ष, संत्री, हळद अशा उच्चमूल्य पिकांमध्ये या जैविक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

शासनाची मदत आणि गौरव

शेती व जैविक उत्पादने यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा कृषी पुरस्काराने सन्मान केला आहे. शासनातर्फे त्यांना विविध योजना, अनुदान व बाजार सल्ला यांचे सहकार्य देखील लाभले आहे.

जैविक शेतीचा प्रचार आणि प्रसार

राजेंद्र कांडेलकर यांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, ते इतर शेतकऱ्यांनाही जैविक शेतीसाठी प्रेरित करतात. ते स्वतः केळी व मका यांसारख्या पिकांमध्ये जैविक पद्धतीने शेती करत असून कृषी प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतात. या माध्यमातून त्यांना शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 एक प्रेरणादायी यशोगाथा

आजच्या काळात जेव्हा रासायनिक शेतीमुळे आरोग्य व पर्यावरणाचे संकट निर्माण झाले आहे, तेव्हा राजेंद्र कांडेलकर यांचा सेंद्रिय शेतीचा प्रवास ही एक आशेची किरणं देणारी यशोगाथा आहे. त्यांनी शाश्वत शेती, पर्यावरण रक्षण आणि कृषी क्षेत्रातील उद्योजकता यांचा सुरेख संगम साधला आहे.

अशा शेतकऱ्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने व्यापक स्तरावर करावा, जेणेकरून इतर शेतकरीही सेंद्रिय शेतीच्या दिशेने प्रेरित होतील आणि शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

– युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न

अमरावती, दि. 25 (जिमाका): श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

खासदार बळवंत वानखडे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय आचलिया, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यावेळी उपस्थित होते.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, मी ‘डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ’चा विद्यार्थी आहे. न्यायिक शिक्षणाबाबत मला  महाविद्यालयाकडून बाळकडू मिळाले. मी या महाविद्यालयाच्या ऋणी आहे. येत्या काळातही माझ्या हातून संविधानाच्या चौकटीत राहून न्यायदानाचे कार्य सुरू राहील व यातून देशाची सेवा करीत राहील.

न्यायदानाचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाने सदसद विवेक बुद्धीने न्यायदानाचे कार्य करावे. येथील विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात वंचितांना न्याय मिळवून देण्याची आपल्या पदाचा उपयोग करावा. हा सत्कार सोहळा माझ्या महाविद्यालयात होत असल्यामुळे मला हा कौटुंबिक सोहळा वाटत असल्याचे ते यावेळी म्हणाले

उच्च न्यायालयाचे न्या. श्री. आचलिया,तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेच्या वतीने सरन्यायाधीश न्या. श्री. गवई यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य वर्षा देशमुख यांनी तर आभार प्राची कडू यांनी मानले.

जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्यासाठी सर्व यंत्रणानी अलर्ट मोडवर काम करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

रायगड जिमाका, दि. 26 – राज्य व केंद्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहॆ. या सर्व योजनांचा तत्परतेने लाभ देण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्यासाठी सर्व यंत्रणानी अलर्ट मोडवर काम करावे, असे निर्देश  सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्रीमती बोर्डीकर यांनी आज सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम  विभागांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके, माजी आमदार पंडित पाटील यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन व अंमलबजावणी तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा योजनेची प्रगती आणि उर्वरित गावांमध्ये जलवाहिन्या पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या पाणी प्रश्न, जलजीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विषयावर मंत्रालयात विशेष आढावा बैठक घेण्यात येईल असे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी जाहीर केले.  सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती प्रक्रिया तातडीने करावी. आरोग्याच्या सुविधा आणि योजना १०० टक्के राबविल्या जातील याकडेही लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. वीज वितरण विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे.  अखंडित वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी सर्वांनी नेहमी दक्ष रहावे.  भूमिगत वायरिंगचे काम पूर्ण झाले असल्यास ओव्हरहेड वायरिंग हटविण्यात यावेत. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वारंवार बदलावे लागतात त्याची कारणमिमांसा करून उपाययोजना करावी. सेवा सप्ताह अंतर्गत जी धोकादायक क्षेत्र निश्चित केली आहेत त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना कारव्यात अशा सूचना श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या.
प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने जनतेच्या प्रश्नाची गांभीर्याने व तत्परतेने दखल घेऊन ते प्रश्न मार्गी लावावेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी  सविस्तर माहिती दिली.  जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन दक्ष असून विविध योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री बोर्डीकर यांचे अभिवादन
रायगड जिमाका दि. 26- सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  सार्वजनिक आरोग्य आणी कुटुंब कल्याण, ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर या आज रायगड जिल्हा दौऱ्यावर असून आढावा बैठकीपूर्वी त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले. यावेळी खा. धैर्यशील पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले,  माजी आमदार पंडित पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके उपस्थित होते.

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांची मुलाखत

मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रम’ या विषयावर आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, दि. 28 आणि सोमवार दि. 30, जून 2025 तसेच मंगळवार दि. 1 जुलै 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 1 जुलै, 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रात्री 8.00 वाजता तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासन अनेक दीर्घकालीन योजना राबवत आहे. डिजिटल शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालये यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊन विद्यार्थी सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहेत. यंदा १६ जून रोजी राज्यातील सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पोषण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. यासाठी सुदृढ पोषण आहार, नियमित वैद्यकीय तपासणी, परिचारिका नियुक्ती अशा उपाययोजना ही राबविण्यात येत आहेत. या योजनांची आदिवासी विकास मंत्री श्री. वुईके यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/ससं/

ताज्या बातम्या

विधानसभा कामकाज

0
आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके मुंबई, दि. 4 : आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या...

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा ८ जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार

0
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा सत्कार महाराष्ट्र विधानमंडळातर्फे करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा मंगळवार,...

प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून – केंद्रीय गृहमंत्री अमित...

0
पुणे, दि. ४ : संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला देश पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा पहिले बाजीराव...

‘विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत’ योजनेद्वारे ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ...

0
मुंबई,  दि. ४ : राज्यातील काही भागात १६ जून पासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित...

वन क्षेत्रातील निर्धारित जागांवर मेंढ्यांना चराई करण्यास परवानगी – वनमंत्री गणेश नाईक

0
मुंबई, दि. ४ : वनांमध्ये विशिष्ट वयापर्यंत वाढलेल्या झाडांच्या परिसरात मेढ्यांना चरण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अशा ठिकाणी मेंढपाळांना अडवू नये, असे निर्देश वनमंत्री...