सोमवार, मे 19, 2025
Home Blog Page 1621

गुलाबाचे फूल आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा..

मुंबई, दि.6 :  स्थळ : मंत्रालयाचे प्रवेशद्वार;  सकाळचे पावणेदहा वाजलेले, मंत्रालयात प्रवेश  करणाऱ्या महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांचे गुलाबाचे फूल आणि शुभेच्छापत्राने  स्वागत होत होते. उत्सुकतेने, पत्र वाचताच सगळयांना सुखद अनुभव मिळाला. कारण पत्र लिहिले होते मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी. निमित्त ठरले, रविवारी साजरा होणारा जागतिक महिला दिवस. या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महत्चाचे योगदान देत असल्याबद्दल आभार मानले.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे  शुभेच्छापत्रात म्हणतात की, ”आपल्या महाराष्ट्रात राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदी गोपाळ अशा अनेक थोर महिलांच्या कर्तृत्वाचा सुवर्णमय इतिहास आहे आणि नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी हा इतिहास सदैव आपल्याला प्रेरित करीत असतो. आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुलगी, पत्नी, आई अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच, मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान देत असता. तुमच्या सहकार्यामुळेच आपण महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाची यशस्वीपणे अंमलबजावणी करु शकतो. या योगदानासाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने मी तुमचे आभार व्यक्त करतो.

मंत्रालयातील आरसा गेट, मेन गेट, गार्डन गेट या प्रवेशद्वारावर आज सकळापासूनच वातावरण भारावून गेले होते. स्वागत करण्यासाठी उत्सुक महिला- पुरुषांची लगबग सुरु होती. मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना अत्यंत आपुलकीने आणि आदराने गुलाबपुष्प आणि शुभेच्छा पत्र देण्यात येत होते. या अनोख्या स्वागताने समस्त महिला वर्ग मनापासून भारावून गेला आणि आनंदित झाला होता.

मंत्रालयाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली असावी. मुख्यमंत्र्यांची महिलांप्रती असलेली संवेदनशीलता आणि आपुलकीने सर्व महिला भारावून गेल्या. या  भारावलेल्या अवस्थेतच मंत्रालयात प्रवेश केल्यावर परिचित आणि सहकाऱ्यांना हे शुभेच्छापत्र आणि गुलाबाचे फूल दाखवत होत्या. काही महिलांनी मुख्यमंत्र्यांचे शुभेच्छा पत्र आणि फुलाचा स्मार्टफोनवर फोटो काढून आपल्या घरच्यांना, परिचितांना पाठवण्यास सुरुवात केली.  काही क्षणातच हे पत्र, फूल आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या पोस्टस सोशल मीडियावर शेअर व्हायला सुरुवात झाली. एकूणच मंत्रालयातील महिलांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/6 मार्च 2020

शेतकरी व गोरगरीब जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि.6 :- अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी,कष्टकरी,आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पाचे आपण स्वागत करतो अशी प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री श्री.पाटील म्हणाले,ग्रामीण भागातील जनतेला पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता ठेवणे तसेच हर घर नल से  जलया उद्देशाने राज्यातील प्रत्येक घरात नळजोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी सन 2020-21 या वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता या विभागासाठी  2 हजार  42 कोटी रुपये इतका नियतव्यय या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे.

मराठवाडा विभागातील सततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडची आखणी करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यातील अधिक टंचाईग्रस्त काही तालुक्यांसाठी उजनी तथा जायकवाडी धरणातून प्रकल्प अंमलबजावणी नियोजित आहे. त्यासाठी सन 2020-21 या वर्षात 200 कोटी रुपयांचा  नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.देशातील सर्व घरांना सन 2024 पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने यापूर्वी सुरू केलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम पुनर्रचित करून तो जलजीवन मिशन या नवीन कार्यक्रमांतर्गत अंतर्भूत केला आहे. राज्यातील एकूण दहा हजार नवीन पाणीपुरवठा योजनांचा समावेश या अभियानांतर्गत करण्यात आला येणार आहे. यासाठी सन 2020-21 या वर्षात 1 हजार 230 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. 

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई, पीक विमा योजनेत सुधारणा यासारखे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे  तसेच गरिबांना दहा रुपयांमध्ये जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या लाभार्थींची संख्या दुप्पट करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो असेही मंत्री श्री.पाटील यांनी म्हटले आहे.

००००

देवेंद्र पाटील/विसंअ/6.3.2020

प्रकल्पग्रस्त शेतकरी कै.धर्मा पाटील प्रकरणी अधिक मदत देण्याबाबत शासन सकारात्मक

मुंबई, दि. 6 : प्रकल्पग्रस्त शेतकरी कै. धर्मा पाटील यांच्या कुटुबियांना जमिनीचा उचित मोबदला देण्यात यावा. यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन झालेल्या नुकसानीबाबत अधिक मदत करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अध्यक्ष श्री.पटोले यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्त शेतकरी कै.धर्मा पाटील यांना न्याय देण्यासाठी आढावा बैठक झाली.

यावेळी ऊर्जा विभागाचे सहसचिव श्री.वाळूज, प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देताना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. याची दक्षता घेऊन त्यांना नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. शेजारच्या शेतकऱ्यांना मिळालेल्या मोबदल्याच्या तुलनेत नियमानुसार शेतकरी धर्मा पाटील यांनाही मोबदला देण्यात यावा. यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी आणि धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. असेही अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.‍

यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्त शेतकरी कै. धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना अधिक मदत मिळवून देण्याबाबत या आधीच्या बाबी तपासून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल व अधिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

नुकसानभरपाई देताना अन्यायकारक वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कारवाई केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगून या प्रकरणाची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असेही संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका

मुंबई दि.6 : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर व लाखणी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजना, आरोग्य विभागांर्तगत रूग्णवाहिका वाहन चालकांना राज्यस्तरावर समायोजन करणे, तसेच इतर समस्यांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे  संबंधित अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री पटोले यांनी पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना सांगितले की, जनतेला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी  दक्षता घ्यावी. व लवकरात लवकर आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. शहरासाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना करावी असेही श्री. पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

आरोग्य विभागाअंर्तगत रूग्णवाहिकांचा आढावा घेताना श्री पटोले म्हणाले की, रूग्णवाहिकेची वेळोवेळी तपासणी करून या रूग्णवाहिकेचा जनतेसाठी आवश्यक व सुयोग्य वापर करण्यात यावा. जनतेला सेवा देण्यासाठी शासनाने रूग्णवाहिका सुरू केली असून याचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन ग्रामीण भागातील या रूग्णवाहिकेची परिस्थिती जाणून घ्यावी अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना श्री. पटोले यांनी दिल्या. बैठकीत आरोग्य विभागांतर्गत कार्यरत रूग्णवाहिका वाहन चालकांना राज्यस्तरावर समायोजन करणे, समान काम, समान वेतन देण्याबाबत  चर्चा करण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील विविध विकासकामांचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ६ : महाड दिवाणी न्यायालयाची इमारत ब्रिटीश काळातील असून या इमारतीस१८८वर्ष पूर्ण झाली आहेत. नवीन इमारत बांधकामासंदर्भात रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महाड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीसाठी पोलीस लाईन येथील जागेवर ही नवीन प्रस्तावित इमारत उभारण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक त्या परवानग्या घेऊन इमारत बांधकामाची प्रक्रिया पूर्ण करावी.

तसेच माणगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या उपलब्ध इमारतीसंदर्भात  आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, श्रीवर्धन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम ऐतिहासिक इमारतींच्या धाटणीत कसे करता येईल याचा आराखडा सादर करण्यात यावा.

महाड येथील श्री.विश्वेश्वर देवस्थान (ट्रस्ट) बाबत प्रकल्पासंदर्भात समिती गठित करून त्यामध्ये विश्वस्त मंडळातील सदस्यांचा समावेश करणे.

कारीवणे ता. रोहा येथील जलसंधारण कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी याबाबतही आढावा घेण्यात आला. उपलब्ध नैसर्गिक पाण्याच्या साठ्याची जपणूक करण्यासाठी पाच बंधारे करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार सुनिल तटकरे, कृषी,विधी व न्याय, बांधकाम, गृह आदि विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.

कुपोषणमुक्तीच्या कामात सहयोगाचे सीआयआयच्या कंपन्यांचे अभिवचन

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह कार्यक्रम 

मुंबई, दि. 6 : महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. माता व बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये खासगी उद्योग (कॉर्पोरेट) क्षेत्राने सहयोग देण्याचे जाहीर अभिवचन शासनाला दिले.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी- शर्मा, कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या इंडियन वुमन नेटवर्कच्या (सीआयआय-आयडब्ल्यूएन) अध्यक्षा श्रीमती अनिता मधोक, वरिष्ठ पत्रकार तथा सिटीजन अगेन्स्ट मालन्युट्रीशन या संस्थेच्या नीरजा चौधरी यांच्यासह कार्पोरेट क्षेत्रातील 30 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री ॲड. श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सर्वच क्षेत्रात सक्षमतेने काम करत असताना सकारात्मक विचारांचे मुक्तपणे स्वागत केले पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजनांची अंमलबजावणी करत असतानाच त्यांच्या संरक्षणाकडेही सरकारचे लक्ष आहे. प्रत्येक विभागीय आयुक्तालय स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे, असेही त्या म्हणाल्या.

मंत्री ॲड. ठाकूर यांना दिले अभिवचन

       महिला व बालविकासमंत्री ॲड. श्रीमती ठाकूर यांना ‘सीआयआयच्या’सुमारे30 प्रतिनिधींनी बालके, महिला तसेच किशोरवयीन मुलींमधील कुपोषणनिर्मूलनसाठी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील महिला यांच्या विकासासाठी सहभाग देण्यास इच्छुक असल्याचे लेखी अभिवचन दिले. बालसंस्थांमधील मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच पुनर्वसन आदींसाठी राज्यशासनाने स्थापन केलेल्याबाल न्याय निधीमध्येही या संस्था योगदान देणार आहेत.

कार्यक्रमात पोषण पंधरवड्याचा शुभारंभ, ‘यशोदा माता अंगत पंगतयोजनेचा शुभारंभ तसेच पोषण अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा सत्कार करण्यात आला.

पोषण पंधरवड्याचा शुभारंभ

पोषण पंधरवडा दि.8 ते दि. 22 मार्च, 2020 या कालावधीत संपूर्ण राज्यभरात साजरा केला जाणार आहे. पोषण पंधरवडादरम्यान पूर्ण पोषणया संकल्पनेवर भर देण्यात आलेला असून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

यशोदा माता अंगत-पंगतयोजनेचा शुभारंभ

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत‘यशोदा अंगत-पंगतही नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यभरात राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरोदर मातांनी अंगणवाडी केंद्रात एकत्र येऊन सहभोजन करावयाचे आहे. सहभोजनादरम्यान अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या (एएनएम) गरोदर मातांना पोषण आहाराबाबतचे महत्त्व सांगणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत भोजनानंतर लोह आणि फॉलिक ॲसिडच्या (आयएफए) गोळ्या अंगणवाडी केंद्रातच देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर नांदेड जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेली ही योजना आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

यावेळी सचिव श्रीमती कुंदन यांनी माहिती दिली, पोषण अभियानअंतर्गत राज्य शासनाने पोषण संकल्पकेला असून त्याअंतर्गत पुढील दोन वर्षात बाळाचे पहिले 1 हजार दिवस, योग्य स्तनपान, पूरक पोषण आहार, वाढीचे सनियंत्रण व संवर्धन आणि किशोरवयीन मुलींचे शिक्षण, आहार व लग्नाचे योग्य वय या पंचसूत्रावर विशेष लक्ष देण्याचे निश्चित केले आहे.

पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित पुरस्कारार्थी :

अ) कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे (सीएएस) उत्कृष्ट व्यवस्थापन आणि अंमलबजावणी :

उत्कृष्ट जिल्हा:1. प्रथम क्रमांक : धुळे,

                         2. द्वितीय क्रमांक (विभागून) : 1) चंद्रपूर,

2) यवतमाळ.

उत्कृष्ट प्रकल्प:1. प्रथम क्रमांक (विभागून) : 1) धुळे-3 (ग्रा.), जि. धुळे, 2) चाकूर (ग्रा), जि. लातूर

                        2. द्वितीय क्रमांक : धुळे-1 (ग्रामीण), जि. धुळे

उत्कृष्ट मुख्यसेविका –

1. प्रथम क्रमांक : श्रीमती शर्मिला जाधव, प्रकल्प- मौदा, जि. नागपूर

2. द्वितीय क्रमांक : श्रीमती शिलाताई चरणदास वाळके, प्रकल्प-चामोर्शी, जि. गडचिरोली

उत्कृष्ट अंगणवाडी सेविका :

1. प्रथम क्रमांक – श्रीमती रेखा काशिनाथ शिंदे, प्रकल्प- मंठा, जि. जालना (अंगणवाडी क्र.27514120203)

2. द्वितीय क्रमांक- श्रीमती संगिता गजानन ठाकरे, प्रकल्प- वाशिम(ग्रामीण) (अंगणवाडी क्र. 27502060117)

उत्कृष्ट अंगणवाडी मदतनीस :

1. प्रथम क्रमांक : श्रीमती धोंडुबाई माधवराव बुटेकर, प्रकल्प -मंठा, जि. जालना

ब) जन आंदोलन–

उत्कृष्ट जिल्हा पुरस्कार :          1. प्रथम पुरस्कार अमरावती

                                                2. द्वितीय पुरस्कार कोल्हापूर

उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार :          1. प्रथम पुरस्कार औरंगाबाद-2, जि-औरंगाबाद.

                                                2. द्वितीय पुरस्कार वरुड, जि.अमरावती.

 क) समुदाय आधारित उपक्रम (कम्युनिटी बेस्ड इव्हेन्ट- सीबीई)/ व्यापक शैक्षणिक दृष्टीकोन (इनक्रिमेंटल लर्निंग अप्रोच- आयएलए)/ इ-आयएलए :

उत्कृष्ट जिल्हा –                       1. प्रथम क्रमांक – सातारा.

                                                2. द्वितीय क्रमांक – नागपूर.

ड) आकार बालशिक्षण कार्यक्रम :

1) उत्कृष्ट मुख्यसेविकाश्रीमती वंदना नानवटे, जि. यवतमाळ

2) उत्कृष्ट अंगणवाडी सेविकाश्रीमती विजयश्री प्रविण सावंत, साजेगाव, ता. माणगाव, जि. रायगड.

इ) स्वस्थ भारत प्रेरक, जिल्हा समन्वयक, गट समन्वयक, राज्य कक्षातील प्रकल्प सहाय्यक :

वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी अधिकारी– श्री. जे. बी. गिरासे, उप आयुक्त तथा सहप्रकल्प समन्वयक

वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी  श्री. रमेशबाबू वसीरेड्डी, वरिष्ठ तांत्रिक तज्ञ, जागतिक बँक

उत्कृष्ट स्वस्थ भारत प्रेरक:    1. प्रथम पुरस्कार – श्री.होशांगस्वामी काळे, जि. धुळे

                                            2. द्वितीय पुरस्कार – श्रीमती प्रियांका तोतरे, जि. गोंदिया

उत्कृष्ट जिल्हा समन्वयक:       1. प्रथम पुरस्कार – श्री.शिवानंद धनंजय वासनकर, जि. अमरावती.

                                             2. द्वितीय पुरस्कार – श्री.ज्ञानेश्वर भिक्कया किर्तनकर, जि. हिंगोली.

उत्कृष्ट गट समन्वयक :       1. प्रथम पुरस्कार – श्रीमती रोहिणी श्रीधर गुर्नुळे, चंद्रपूर (ग्रा), जि. चंद्रपूर

                                     2. द्वितीय पुरस्कार-श्री.राहुल मारोतीराव वाघमारे,बाळापूर आखाडा (ग्रा),

                                                                         जि. हिंगोली.

राज्य कक्षातील उत्कृष्ट प्रकल्प सहाय्यक :

                                                1. प्रथम पुरस्कार – श्री.साहिल शिंपी

                                                2. द्वितीय पुरस्कार – श्री.प्रशांत ठाकरे

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.6.3.2020

तरुणांचा कौशल्य विकास, अल्पसंख्याकांचे सक्षमीकरण याबरोबरच राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई, दि. ६ : राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी तरुणांच्या कौशल्य विकासाला मोठी गती देण्याचा संकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. अल्पसंख्याक विकासच्या योजनांसाठीही भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण विकास, महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी विकास अशा विविध घटकांसाठी भरीव तरतूद करणारा हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला मोठी चालना देईल, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, कौशल्य विकास व उद्योजकता विभागास कार्यक्रमावरील बाबींकरिता 501 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. यातून तरुणांच्या कौशल्य विकासासाठी चांगल्या योजना राबविता येतील. अल्पसंख्याक विकास विभागास 550 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. मौलाना आझाद मोफत शिकवणी व अन्य योजना राबविण्यात येणार आहेत. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, ग्रामीण क्षेत्र विकास योजना यांचा समावेश देखील अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला सहाय्यक अनुदानाचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समूहासाठी व युवकांसाठी क्रीडाविषयक योजनेचासुद्धा विचार अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या वसतिगृहात भोजनाची सुविधा करण्यात येणार आहे. मुंब्रा, कळवा येथे हज हाऊस प्रस्तावित करण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांसाठी पोलीस भरतीपूर्व निवासी परीक्षा प्रशिक्षण वर्ग योजना, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम यांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. अल्पसंख्याकांच्या विकासाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरेल.

स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य

दहावी उत्तीर्ण तरुणांना रोजगार प्रशिक्षण देण्याचा तसेच २१ ते २८ वर्ष वयोगटातील बेरोजगारांना सक्षम करण्यासाठी पाच वर्षात १० लाख बेरोजगारांना प्रशिक्षण देण्याचा निर्धार अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात नवीन उद्योगांसाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याबरोबरच स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे अशी शासनाची भूमिका आहे. राज्यातील ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळाव्यात यासंदर्भात कायदा करण्याचा महत्वपूर्ण निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. खासगी क्षेत्रातील उद्योजकांकडून आयटीआयच्या दर्जात वाढ करण्यासाठी १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यासाठी राज्यशासनाकडून आगामी ३ वर्षात १ हजार ५०० कोटी रुपये देण्याचे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा विविध योजनांमधून राज्यातील तरुणांच्या कौशल्य विकासाला मोठी गती मिळणार आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

०००००

इर्शाद बागवान/विसंअ/दि.०६.०३.२०२०

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा रॅली

मुंबई, दि. 6 : जागतिक महिला दिनानिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत रविवार दि. 8 मार्च, 2020 रोजी सायं. 5.30 वाजता एनसीपीए ते सुंदर महल जंक्शन, मरीन ड्राईव्ह दरम्यान पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा रॅली काढण्यात येणार आहे.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी देण्याची संकल्पना या रॅलीमागे असून त्यासाठी गृहमंत्री श्री. देशमुख यांनी पुढाकार घेऊन रॅलीच्या आयोजनाचे निर्देश दिले. या रॅलीमध्ये महिला पोलीस उप आयुक्त, पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी अशा सर्वच महिला अधिकारी-कर्मचारी, शालेय मुली, महिला सहभागी होणार आहेत.

महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, एनजीओ व समाजातील महिलांनी या रॅलीत सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा, प्रवाशांना सुविधा व महिलांना सुरक्षा प्रदान करणारा अर्थसंकल्प – गृह (शहरे), परिवहन व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज डी.पाटील

मुंबई: अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा, प्रवाशांना सुविधा व महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी ठोस तरतूद करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे आपण स्वागत करतो अशी प्रतिक्रिया गृह (शहरे), परिवहन व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले, महिला सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक योजना राबविण्याबाबत शासन कटिबद्ध आहे. महिला आयोगाचे कार्यालय राज्यात प्रत्येक विभागीय आयुक्त स्तरावर स्थापन करण्याचे या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक महिला पोलीस ठाणे स्थापन करण्यात येणार आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी महिलाच असतील. या पोलीस ठाण्यांमध्ये जिल्ह्यातील कोणत्याही महिलेस तक्रार करता येईल. महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी संदर्भात तपास करण्यासाठी विशेष तपास पथक निर्माण करण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी महिला शासकीय अभियोक्ता यांची नियुक्ती करण्यात येईल. महिलांवर अत्याचार घडू नयेत, गुन्हेगारांवर वचक राहावा तसेच जलद न्यायाकरिता कडक कायदा करण्याची शक्यता अजमावण्यात येत आहे.

परिवहन

ग्रामीण भागातील जनतेस आरामदायी व सुविधादायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बस बदलून त्याऐवजी अत्याधुनिक सुविधा असलेल्या वायफाययुक्त बस ग्रामीण जनतेला प्रवासासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. कमी अंतराच्या प्रवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या दर्जेदार मिनीबस खरेदी करण्याचेही प्रस्तावित आहे. येत्या काळात महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बस बदलून त्याऐवजी नवीन बस देण्याचा शासनाचा मानस आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या वेळापत्रकानुसार ये-जा करण्यासाठी गरजेनुरूप मार्ग व्यवस्थापन व समय व्यवस्थापन करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्यामधील जुन्या बस बदलून सुमारे 1600 नवीन बस विकत घेण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके अत्याधुनिक करण्यासाठी महामंडळास 400 कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित आहे.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना  ,अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई, पीक विमा योजनेत सुधारणा यासारखे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे तसेच गरिबांना दहा रुपयांमध्ये जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या लाभार्थींची संख्या दुप्पट करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे असेही राज्यमंत्री श्री.पाटील यांनी म्हटले आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते माहुलमधील प्रदुषणग्रस्त भागातील कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप

मुंबई : माहुल येथील प्रदुषणग्रस्त भागातील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी त्यांना घरे देण्याचा निर्णय पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे. आज काही कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

नर्वसन करण्याबाबत पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांच्या पुढाकारातून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काही दिवसांपुर्वी बैठक झाली होती. या पुनर्वसनासाठी सध्या म्हाडाकडे उपलब्ध असलेली 300 घरे मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, तसेच मुंबई महापालिकेने या घरांमध्ये अतिप्रदुषीत भागातील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अवघ्या काही दिवसात अंमलबजावणी होऊन आज प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात प्रातिनिधीक स्वरुपात कुटुंबांना मंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरीत कुटुंबांना तातडीने आज किंवा उद्यापर्यंत चाव्या सुपूर्द कराव्यात, अशा सूचना मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करणे आणि अति प्रदुषीत भागातील घरांचे पुनर्वसन करणे

ताज्या बातम्या

सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

0
नागपूर, दि. 18:- ज्या संवेदनेने शासन तळागाळातील सर्वसामान्यांपासून समाजातील सर्व घटकासाठी योजना आखते, शासन निर्णय काढते, लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून मदतीसाठी तत्पर राहते ती तत्परता प्रशासनाच्या...

सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधांची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दुर्धर आजाराच्या विळख्यातून रुग्णांना मुक्त करण्यासाठी येथील...

‘रेरा’ कायद्यामुळे महाराष्ट्रातील रियल ईस्टेट क्षेत्राला विश्वासार्हता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. 18 :- सर्वसामान्यांच्या मनात एखादी प्रॉपर्टी, घर, फ्लॅट घेतांना अनेक प्रकाराच्या शंका असतात. या शंकांचे तेवढ्याच पारदर्शिपणे समाधान होणे आवश्यक असते. रियल ईस्टेट...

विविध योजना व उपक्रमांसाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य -केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

0
हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करा कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहीमेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले कौतुक  नागपूर, दि. 18...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

0
रायगड जिमाका दि. 18- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रायगड जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाची हवाई आणि प्रत्यक्ष पाहणी करून...