बुधवार, ऑगस्ट 20, 2025
Home Blog Page 1500

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकतीच भारतीय जलसंस्थांची पहिल्यांदाच गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरित्या राबविणाऱ्या राज्यांचा समावेश आहे. देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख….

महाराष्ट्राने देशाचा पश्चिम आणि मध्य भाग व्यापलेला आहे. त्यास अरबी समुद्राजवळ सुमारे 720 किलोमीटर लांब किनारपट्टी लाभलेली आहे. एकीकडे सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेकडील राज्याला भौतिक आधार देतात, तर उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्वेकडील भरणरागड-चिरोली-गायखुरी पर्वतरांगा त्याच्या नैसर्गिक सीमा म्हणून काम करतात.

लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्रफळ या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 2011 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,74,333 आहे तर राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3,07,713 किमी आहे.

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. नुकतेच, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून 2018-19 मध्ये पहिली जलसंधारण जनगणना जाहीर करण्यात आली, ज्यात याचा उल्लेख आहे. देशात जिथे-जिथे पाणी साठवलं जाऊ शकतं, अशा सर्व जागांची गणना आणि सर्वेक्षण या अहवालासाठी करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तलाव आणि जलाशय आहेत, तर आंध्र प्रदेशात सर्वाधिक पाण्याच्या टाक्या आहेत आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक तलाव आहेत.

जलसंधारणाच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्र, देशात आघाडीवर आहे. जलसंधारणाच्या योजनांतर्गत, संपूर्ण देशाच्या तुलनेत, महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 97,000 पेक्षा अधिक जलस्त्रोत आहेत. यात, 96,343 (99.3%) ग्रामीण भागात तर उर्वरित 719 (0.7%) शहरी भागात आहेत.

देशात असलेल्या सर्व जलस्त्रोतांचा आकार, स्थिती, अतिक्रमणांची स्थिती, वापर, साठवण क्षमता, साठवण करण्याची स्थिती इत्यादि बाबींचा केलेला अभ्यास तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्रोतांसह भारतातील जलसंपत्तीचा या अहवालात नोंद घेवून, जलशक्ती मंत्रालयाने, देशासमोर एक व्यापक डेटाबेस ठेवण्याचे उद्दिष्ट साधले आहे.

या अहवालानुसार, देशात २४,२४,५४० जलस्रोतांची गणना करण्यात आली आहे, त्यापैकी ९७.१% (२३,५५,०५५) ग्रामीण भागात आहेत आणि फक्त २.९% (६९,४८५) शहरी भागात आहेत. 59.5% (14,42,993) जलस्रोत तलाव आहेत, तर टाक्या (15.7%, म्हणजे 3,81,805), जलाशय (12.1%, म्हणजे 2,92,280), जलसंधारण योजना/पाझर तलाव/चेक बंधारे, 93% म्हणजे 2,26,217), तलाव (0.9%, म्हणजे 22,361) आणि इतर (2.5%, म्हणजे 58,884) आहेत.

हा अहवाल सादर झाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी महाराष्ट्रासाठी ही अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून, जलसंधारण योजना मोठ्या प्रमाणावर व यशस्वीपणे राबविण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राला पाण्याची समस्या यापुढे जाणवणार नाही याबद्दल सरकार कटिबद्ध आहे. त्यास अनुसरुन विविध योजना देखील यशस्वीपणे सरकार राबवित असल्याचे गौरवोद्गगार मुख्यमंत्री यांनी काढले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या पाहणी अहवालाचे स्वागत केले असून राज्यातील लोकांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येथे राबविण्यात आलेल्या विविध योजनांना यश आल्याचे त्यांनी सांगितले.

अहवालात घेतलेल्या महाराष्ट्रातील जलस्त्रोतांच्या नोंदीविषयी :

महाराष्ट्रात, 97,062 जलस्रोतांची गणना करण्यात आली असून, त्यापैकी 96,343 (99.3%) ग्रामीण भागात आणि फक्त 719 (0.7%) शहरी भागात आहेत. जलस्रोतांच्या विविध वापरात औरंगाबाद, जालना आणि नाशिक हे पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात 574 नैसर्गिक आणि 96,488 मानवनिर्मित जलसाठे आहेत. मानवनिर्मित जलकुंभांची मूळ बांधकाम किंमत रु 5 लाख ते 10 लाख एवढी आहे.  ५७४ पाणवठ्यांपैकी ९८.४% (५६५) ग्रामीण भागात आहेत तर उर्वरित १.६% (९) शहरी भागात आहेत. 96,488 मानवनिर्मित पाणवठ्यांपैकी 99.3% (95,778) जलस्रोत ग्रामीण भागात आहेत आणि उर्वरित 0.7% (710) शहरी भागात आहेत.

महाराष्ट्रातील एकूण जलस्रोतांपैकी 98.9% (96,033) जलस्रोत “वापरात” आहेत तर उर्वरित 1.1% (1,029) कोरड पडणे, गाळ साचणे, दुरुस्तीच्या पलीकडे नष्ट झालेले तसेच इतर कारणांमुळे “वापरात नाही”. ‘वापरात असलेल्या’ जलसाठ्यांपैकी, जलस्रोतांचा मोठा भाग भूजल पुनर्भरणासाठी वापरला जातो, त्यानंतर घरगुती/पिण्याच्या आणि सिंचनाच्या उद्देशाने वापरला जातो. वापराच्या प्रकारानुसार पाण्याचे वितरण टक्केवारी खाली दिलेल्या आकृतीमध्ये दाखवले आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना आणि नाशिक हे तीनही जिल्हे, भूजल पुनर्भरणाच्या तसेच जलस्त्रोतांच्या विविध उपयोगात, देशातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समाविष्ट आहेत.

मागील 5 वर्षात साठवण क्षमता भरण्याच्या निकषांवर आधारित, 5,403 जलकुंभांपैकी 63.2% (3,414) जलसाठे दरवर्षी भरलेले आढळतात, 35.8% (1,935) साधारणपणे भरले जातात, 0.7% ( 38) क्वचितच भरले जातात आणि 0.3% (16) कधीही भरले जात नाहीत. ‘भरण्याची स्थिती’ आणि ‘भरलेली साठवण क्षमता’ यानुसार जलस्रोतांचे वाटप टक्केवारी खाली दिलेल्या आकृतीमध्ये दाखवले आहे.

अहवालात, महाराष्ट्रातील सर्व जलस्रोतांपैकी 60.7% (58,887) जिल्हा सिंचन योजना/राज्य सिंचन योजनेत समाविष्ट आहेत. यापैकी 90.8% (53,449) जलसंधारण योजना/पाझर तलाव/चेक डॅम आणि उर्वरित 9.2% (5,438) टाक्या, तलाव, जलाशय इ. ‘वापरात असलेल्या’ पाणवठ्यांपैकी, ८२.५% (७९,२३८) एका (०१) शहर/शहराला फायदा होत असल्याचे नमूद आहे. १७.१% (१६,४०६) जलस्रोत २-५ शहरे/नगरांच्या गरजा पूर्ण करत आहेत आणि उर्वरित ०.४% (३८९) पाच (05) पेक्षा जास्त शहरे/नगरांना लाभ होत आहे.  राज्याने 251 जलकुंभांमध्ये अतिक्रमण नोंदवले असून, त्यापैकी 233 जलसंधारण योजना/पाझर तलाव/चेक डॅम आहेत.

साठवण क्षमतेच्या दृष्टीने, महाराष्ट्रातील 94.8% (92,026) जलसंचयांची साठवण क्षमता 0-100 घनमीटर दरम्यान आहे तर 4% (3,885) जलसंचय क्षमता 100 ते 1,000 घनमीटर दरम्यान आहे.

जलसंख्येच्या बाबतीत पहिल्या पाच राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि आसाम आहेत. या राज्यांमध्ये भारतातील एकूण पाणवठ्यांपैकी सुमारे ६३ टक्के पाणीसाठा आहे. तलाव आणि जलाशयांच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक संख्या आहे, तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू अनुक्रमे टाकी आणि तलावांच्या संख्येत आघाडीवर आहेत.

000000000000

A.Arora/ 09.05.203/ विशेष लेख /

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 9 : शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर  आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार ज्ञानराज चौगुले यांचेसह वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या उद्दिष्टाने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतून ६ हजार कृषि फीडर्स सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहेत असे सांगून शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलासाठी वीज पुरवठा खंडीत करु नये असे निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  सव्वा दोन लाख सौर कृषि पंप देण्याचे उद्दिष्ट असून गेल्या वर्षी ७५ हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. ज्यांना वीजेची जोडणी नाही त्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्याचे धोरण असून ज्यांच्याकडे वीजजोडणी आहे, त्यांनी मागणी केल्यास त्यांनाही सौर कृषिपंप देण्यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

केवळ एक रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असा निर्णय अर्थसंकल्पात घेतला असून विम्याच्या हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे, त्यासाठी ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक अशा विविध योजना शासन राबवित  असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला जागतिक बॅंकेने मान्यता दिली आहे. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल.  प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी  महा सन्मान  निधी योजना जाहीर केली आहे, यात प्रतिवर्ष प्रति शेतकरी ६ हजार रुपये अतिरिक्त राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत, त्यासाठी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  अवकाळी, गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७ हजार कोटी रुपये वाटप केले आहे, सिंचनाच्या २८ योजना मंजूर केल्या आहेत, त्यातून ५ लाख हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

कर्जवसुलीसाठी मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष द्या, छोट्या शेतकऱ्यांच्या मागे लागू नका, त्यांना त्रास देऊ नका अशा सूचना जिल्हा बॅंकांना देण्यात आल्या आहेत. हे सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई, दि. 9 : नवी मुंबई ते कफ परेड बेस्ट बस सेवा सुरु करण्याची मागणी लक्षात घेता याबाबत स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

फोर्ट येथील मुंबई महापालिकेच्या ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला  उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, आज 909 तक्रारी दाखल झाल्या असून 132 तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचेदेखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती  महिलांना देण्यात आली.

अंधेरी गुंदवली येथील  के ईस्ट वॉर्ड येथे  दिनांक 10 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम  31 मे 2023 पर्यंत  दुपारी 3 ते 5.30 या वेळेत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते.

****

संध्या गरवारे/विसंअ/

 

सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन

मुंबई, दि. 9 : ग्रामीण, डोंगरी भागात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. अशा वेळी सर्पदंश झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वेळेत योग्य औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. सदानंद राऊत यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न या राज्य शासनाच्या पुरस्काराने त्यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली आहे.

आपल्याकडे पावसाळ्यात सर्पदंशाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे, त्याला दिलासा देणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. मात्र, केवळ भयाने आणि अंधश्रद्धेमुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशा वेळी सर्पदंश होऊ नये म्हणून नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, तसेच सर्पदंश झाल्यास कोणते औषधोपचार घ्यावेत याबाबत सविस्तर माहिती डॉ. सदानंद राऊत यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, बुधवार दि. १०, गुरूवार दि. ११ मे २०२३ रोजी सकाळी ७. २५ ते ७. ४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. ९: पुणे येथे जूनमध्ये होणाऱ्या जी-२० प्रतिनिधींच्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली व भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त ए. राजा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वैज्ञानिक संजय कौल, लवजीत सिंग, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्सचे (एनजीईडी) मुख्य कार्यकारी अधिकारी जगमोहन कथैत, अनुज कौशल आदी उपस्थित होते.

जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशात करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे शहरात जानेवारीमध्ये जी-२० ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची बैठक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. आता जूनमध्ये तिसरी ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठक आणि चौथी ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ बैठक अशा दोन बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सांगितले, जी-२० च्या जानेवारीमधील यशस्वी आयोजनाचा अनुभव लक्षात घेत सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी कमीत कमी कालावधीत शहर सौंदर्यीकरणावर लक्ष केंद्रित करुन चांगले काम केले होते. पोलीस विभागाने सुरक्षिततेच्यादृष्टीने सर्व काळजी घेतली. भारताचे, महाराष्ट्राचे आणि पुण्याचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्य जगासमोर आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करण्यात येत आहे, असेही श्री. राव यांनी सांगितले.

यावेळी पुणे महानगरपालिकेने गतवेळच्या आयोजनाप्रसंगी राबविलेले उपक्रम, शहर सौंदर्यीकरण आदींविषयी चित्रफीत दाखविण्यात आली. सायकल फेरी (सायक्लॉथॉन), वॉकॅथॉन, स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग, शिक्षण संस्थांमध्ये जी-२० बाबत विद्यार्थ्यांसाठी माहिती सत्रांचे आयोजन, चौक सुशोभिकरण, प्रकाशमान करणे मुख्य मार्गांलगतच्या भिंतींवर आकर्षक, रंगकाम आदी उपक्रम कमीत कमी कालावधीत चांगल्याप्रकारे राबवण्यात आल्याचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी सांगितले. आगामी बैठकीसाठीही सर्व तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

क्रीडा आयुक्त श्री. दिवसे यांनी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पायाभूत सुविधांची माहिती दिली. बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विभागाने तयार केलेल्या चित्रफीत दाखविण्यात आल्या.

पुण्यातील ऐतिहासिक महत्त्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, माहिती तंत्रज्ञान संबंधीत तसेच इतर उद्योग, पायाभूत सुविधा आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन येईल. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सौंदर्यीकरणाचे काम गतीने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल लढ्ढा यांच्यासह पर्यटन विभाग, उद्योग विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, आरोग्य, महसूल विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.

0000

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

          सातारा दि. 9 : राष्ट्रीय मतदानाच्या टक्केवारी पेक्षा जास्त मतदान कसे होईल याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या.

          जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे निवडणूक पूर्व आढावा  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे उपस्थित होते.

          यावेळी श्री. देशपांडे म्हणाले की, मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. मतदार यादीची छाननी  करुन मयत मदारांना वगळण्यात यावे. यासाठी आवश्यक असल्यास संबंधितंना स्पीड पोस्टद्वारे नोटीस पाठवावी. प्रभाग‍ निहाय मेळावे घेऊन नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करावी. यामध्ये मतदार यादीचे वाचन करुन मतदार नोंदणीबाबत नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात. मतदान केंद्रासाठी पोलीस स्टेशन निहाय पाहणी करावी. मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात.  18 ते 19 वयोगटातील मतदारांसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये मेळावे घेऊन विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणी अर्ज भरुन घ्यावेत. तसेच महाविद्यालयामध्येच त्या अर्जाचे निराकरणासाठी यंत्रणा उभारावी, अशा सूचना त्यांनी केल्या.  यावेळी त्यांनी तहसिलदार, बीएलओ व डेटा ऑपरेटर यांच्याही अडचणी जाणून घेतल्या.

          या बैठकीस  मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसिलदार व बीएलओ उपस्थित होते.

                                                                 0000

कुकडी डाव्या कालव्याचे २२ मे पासून चौथे आवर्तन सोडण्याच्या सूचना

पुणे, दि. ९: अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात कुकडी डाव्या कालव्यातून २२ मे पासून चौथे आर्वतन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, अशोक पवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुदाम पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे; पाण्याची गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे.

धरणातील गाळ काढल्यास धरणातील पाणीसाठी वाढण्यास मदत होते. त्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याबाबत नियोजन करावे. पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर हद्दीतील १५ कि.मी. अस्तरीकरणाच्या कामाला नियामक मंडळाच्या मंजूरीनंतर  सुरुवात करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागात मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दाही यावेळी चर्चिला गेला. सध्या शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रक्रिया ही सुरु आहे. तूर्तास क आणि ड संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरून काम सुरू करावे, अशा सूचनाही पालककमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व उन्हाळी हंगाम २ च्या नियोजनाबाबत सादरीकरण केले.

बैठकीस कार्यकारी अभियंता स. ज. माने, उ. द. धायगुडे, स्वप्निल काळे आदी उपस्थित होते.

0000

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढविण्यासाठी आराखडा तयार करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सोनचाफा, हळदीचे लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना

खरीप हंगामात खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घ्या

ठाणे, दि.09(जिमाका) :– जिल्ह्यात भात वरी पिकांबरोबरच सोनचाफा, हळदी, भेंडी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढावे, यासाठी आराखडा तयार करावा. तसेच खरीप हंगामात खते, बियाणे, पिककर्ज पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिले.

            पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री श्री. देसाई हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. आमदार किसन कथोरे हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी सारिका शेलार, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस उपस्थित होते.

जिल्हा कृषि विभागाने केलेल्या खरीप हंगामा 2023च्या नियोजनाचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, जिल्ह्यातील लागवडी योग्य क्षेत्र दुप्पटीने वाढविण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी ठाणे जिल्ह्यात सोनचाफा फुलाचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे हे क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा कृषि विभागाने आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषि पतपुरवठा मिळावा, याकडेही लक्ष द्यावे. एक रुपयात पिक विमा या योजनेपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी.

ग्रामीण भागातील भाजीपाला तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहरी भागात मोक्याच्या जागी तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध मॉलमध्ये जागा मिळावी, यासाठी आराखडा तयार करावा. महानगरपालिकांच्या क्षेत्रात महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक घेऊन सूचना देऊ, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

आमदार श्री. कथोरे म्हणाले की, जिल्ह्यात आंबा पिकाऐवजी फणस, काजू, हळद या पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीसाठी शहरी भागात जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना ताजा भाजीपाला मिळेल व शेतकऱ्यांच्या मालाला रास्त किमतही मिळेल.

आमदार श्री. मोरे यांनीही नागली, वरई व बांधावरील तूरच्या उत्पादनावर भर देण्याची सूचना केली.

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील कृषि क्षेत्राची माहिती दिली. श्री. शिनगारे यांनी सांगितले की, जिल्ह्यात भात व नागली या पिकांबरोबरच हळद, सोनचाफा फुलांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. तसेच भात पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यावर कृषि विभाग भर देत आहे. सन 2022 मध्ये भात उत्पादकतेमध्ये सरासरी 23 टक्के वाढ झाली आहे. यंदा सन 2023-24 मध्ये एकूण 56 हजार  हेक्टर क्षेत्रावर भात पेरणीचे लक्षांक ठेवले असून 2700 किलो प्रति हेक्टर उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे.

जिल्ह्यात नाचणी पिकाची  सरासरी उत्पादकता 949 किलो प्रति  हेक्टर  एवढी असून खरीप हंगाम 2022  मध्ये 1138.12 किलो प्रति हेक्टर उत्पादकता होती. सन 2023-24 मध्ये एकूण 3542 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे, असेही श्री. शिनगारे यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुटे यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम सन 2023चे नियोजनाची माहिती दिली. या हंगामासाठी सुमारे 12 हजार क्विंटल बियाणांची मागणी केली असून त्याप्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 842 हेक्टर क्षेत्रावर संकरित बियाणाचा वापराचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते व बियाणांचे पुरवठा करण्यात येणार असल्याचे श्री. कुटे यांनी सांगितले.

असे आहे सन 2023-24 चे नियोजन

  • नागली या पौष्टिक तृणधान्याच्या क्षेत्रामध्ये 30 टक्के तर वरी पिकामध्ये 10 टक्के वाढ करण्यात येणार
  • शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेअंतर्गत 30 हजार 400 मिनी किट वाटपाचे नियोजन
  • प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगातून नागली व वरी पिकावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देणार
  • सगुणा भात लागवड तंत्रज्ञान पद्धतीने एक हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन
  • रत्नागिरी 6 व 8 या वाणांचा 100 हेक्टर क्षेत्रावर ग्रामबिजोत्पादन घेणे
  • बांधावर तूर लागवड क्षेत्रात 10 टक्के वाढीचे उद्दिष्ट
  • मग्रारोहयो अंतर्गत मोगरा,सोनचाफा, जांभूळ, फणस या पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन
  • भेंडी व इतर पिकांच्या निर्यातीस चालना देण्यात येणार
  • विकेल ते पिकेल अंतर्गत भाजीपाला व प्रक्रियायुक्त शेतमालाची थेट शहरी ग्राहकांना विक्री

                                                                      0000000000

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 9 मे 2023 (जिमाका वृत्त): शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिल्या आहेत.

‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात पालकमंत्री डॉ.गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ नाव बदलून आता ‘शासन आपल्या दारी ’ हे नाव देण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे ही उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे इत्यादी कार्यवाही ही 15 मे पूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपूर्वी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.

0000000000

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

          नंदुरबार, दिनांक 9 मे 2023 (जिमाका वृत्त): जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.

           जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंसंदर्भात आढावा बैठक काल संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी र.मो.खोडे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

           यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यातील धरणे, लघुपाटबंधारे, जलसाठे प्रकल्पात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पानात भरीव वाढ होणार आहे. यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यापूर्वीच्या योजनेत शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता. नव्या धोरणानुसार शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येणार आहे. तसेच अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना  त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च देण्यात येईल. व बहुभुधारक शेतकरी हे स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असल्यास त्यास प्राथमिकता देण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व ठिकाणी गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव करुन जिल्हास्तरीय समितीस प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गाळ काढण्यासाठी अशासकीय संस्थाची निवड करण्यात येणार असून अशासकीय संस्थेने त्वरीत कामे सुरु करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

अनुदानाची मर्यादा

शेतकऱ्यांना पसरविण्यात आलेल्या गाळाच्या रु.35.75 /- प्रति घनमीटर प्रमाणे एकरी 15 हजार च्या मर्यादेत म्हणजेच एकरामध्ये 400  घनमीटर गाळाच मर्यादेत अनुदान देण्यात येईल. हे अनुदान फक्त अडीच एकर पर्यंत म्हणजेच 37 हजार 500 अधिकाधिक देय राहील, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सुध्दा ही मर्यादा लागू राहील.

याठिकाणी होणार कामे

           जिल्हास्तरीय समितीत मंजुरी मिळालेल्या नंदुरबार तालुक्यातील कोकणीपाडा, शनिमांडळ, ठाणेपाडा, पावला, धनीबारा, नवापूर तालुक्यात खोलघर, खेकडा, मुगधन, नावली, खडकी, खोकसा, सोनखडकी, सुलीपाडा, हळदाणी, विसरवाडी, शहादा तालुक्यातील दुधखेडा, कोंढावळ, लोंहरे, शहाणे, लंगडीभवानी,राणीपूर, तळोदा तालुक्यात रोझवा, गढावली, सिंगमपूर, पाडळपूर, धडगाव तालुक्यात उमराणी तर अक्कलकुवा तालुक्यातील महुपाडा लघु पाटबंधारे येथे कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

0000000000

ताज्या बातम्या

दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ‘सद्भावना दिना’ची प्रतिज्ञा मुंबई, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला...

राजभवन येथे सद्भावना प्रतिज्ञा; दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन

0
मुंबई, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव तसेच परिवार...

रायगड जिल्हा, पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांसह नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट...

0
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुंबई, दि. २० : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

0
मुंबई दि. 20 : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चिंचभुवन गावठाणातील तयार नागरी सुविधा मनपाला हस्तांतरित

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मिहान लि. कडून ५० लाखांचा धनादेश सुपूर्द सीएसआर फंडातून जीएमसी, आयजीएमसी, मनपा व एलएडी महाविद्यालयास धनादेश सुपूर्द नागपूर, दि. 20:  चिंचभुवन...