सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1145

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर, दि.१७: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त  विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त जगदीश मीनियार, अलीस पोरे, अनंत गव्हाणे, सुरेश बेदमुथा, भारत कदम, तहसीलदार अरुण पावडे, अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री.राजेअर्दड यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव; श्रीमती देशपांडे यांना त्यांच्या जागेवर जाऊन भेटले

छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली.

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी गेले. तेथे भेटत असतांना समोरुन 90 हून अधिक वर्षे वय असणाऱ्या श्रीमती विमल देशपांडे या त्यांना भेटण्यासाठी येत असतांना मुख्यमंत्र्यांना दिसल्या. त्यांना वयोमानामुळे गर्दीतून वाट काढणे शक्य होत नव्हते. त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्यांना तेथेच बसू द्या, मीच तेथे येतो. असे म्हणत मुख्यमंत्री श्रीमती देशपांडे यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली.

000

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका)- मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा  शिक्का आता पुसणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार  सय्यद इम्तियाज जलील, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधान सभा सदस्य  आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त  जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्य गीतानंतर मुख्यमंत्र्यांनी  उपस्थितांना मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची प्रतिज्ञा दिली.

उपस्थितांना संबोधित करतांना श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाड्याच्या  मुक्तिसंग्रामात अनेकांनी  योगदान दिले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या राष्ट्रीय शाळांमधून या चळवळीची सुरुवात झाली. ‘वंदेमातरम’ने या चळवळीला गती दिली. विद्यार्थ्यांच्या चळवळीतून या मुक्तिसंग्रामाची सुरुवात झाली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान जनता सदैव स्मरणात ठेवेल.

श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामाची प्रेरणा कायम राखण्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे पुढील पिढ़्यांना या मुक्तिसंग्रामाची प्रेरणा मिळत राहिल. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी 45 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विकास कामांचा संकल्प करण्यात आला आहे

मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाच्या पर्वाची ही सुरुवात आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना सरकार गती देत आहे. ही गती देत असतांना नवे प्रकल्पही कार्यान्वित करण्यात येत आहेत. केंद्रशासनाच्या मदतीनेही अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मराठवाड्यात रस्ते विकास, आरोग्य , शिक्षण, सिंचन, कृषी अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मराठवाड्याची भुमि ही इथल्या जनतेने मोठ्या कष्टाने समृद्ध केली आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा एक रुपयात पीक विमा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जी  मदत लागेल ती मदत देण्यास शासन कटीबद्ध आहे. मराठवाड्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. मराठवाड्याला विकासित प्रदेश म्हणून आपण पुढे नेण्याचा संकल्प करु या,असे आवाहन यावेळी श्री. शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांशी संवाद

ध्वजारोहण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी  उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर स्मृतिसंग्रहालयास भेट देऊन पाहणी केली.

माहिती जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज सिद्धार्थ उद्यानात मुख्य शासकीय समारंभस्थळी माहिती व जनसंपर्क महासंचालनातर्फे आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

सिद्धार्थ उद्यानात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया आदी उपस्थित होते. या प्रदर्शनास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधिर मुनगंटीवार तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रधान सचिव विकास खारगे यांनी भेट दिली.

या प्रदर्शनात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाशी निगडीत महत्त्वाची छायाचित्रे व महत्त्वाच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच डॉ. मंगला बोरकर यांनी तयार केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या रेखाचित्रांची मांडणीही प्रदर्शनात करण्यात आली आहे.
जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांनी संपादित केलेल्या ‘मराठवाडामुक्ति संग्रामाची स्मृतिगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम,एक आकलन’ ही माहिती पुस्तिका, आणि स्मृतिदर्शिका 2023-24 चे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रदर्शनास नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनींनी , शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी भेट दिली.

000

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका)- मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का आता पुसणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सय्यद इम्तियाज जलील, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधान सभा सदस्य आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्य गीतानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची प्रतिज्ञा दिली.

उपस्थितांना संबोधित करतांना श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामात अनेकांनी योगदान दिले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या राष्ट्रीय शाळांमधून या चळवळीची सुरुवात झाली. ‘वंदेमातरम’ने या चळवळीला गती दिली. विद्यार्थ्यांच्या चळवळीतून या मुक्तिसंग्रामाची सुरुवात झाली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान जनता सदैव स्मरणात ठेवेल.

श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामाची प्रेरणा कायम राखण्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे पुढील पिढ़्यांना या मुक्तिसंग्रामाची प्रेरणा मिळत राहिल. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी 45 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विकास कामांचा संकल्प करण्यात आला आहे
मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाच्या पर्वाची ही सुरुवात आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना सरकार गती देत आहे. ही गती देत असतांना नवे प्रकल्पही कार्यान्वित करण्यात येत आहेत. केंद्रशासनाच्या मदतीनेही अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मराठवाड्यात रस्ते विकास, आरोग्य , शिक्षण, सिंचन, कृषी अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मराठवाड्याची भुमि ही इथल्या जनतेने मोठ्या कष्टाने समृद्ध केली आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा एक रुपयात पीक विमा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जी मदत लागेल ती मदत देण्यास शासन कटीबद्ध आहे. मराठवाड्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. मराठवाड्याला विकासित प्रदेश म्हणून आपण पुढे नेण्याचा संकल्प करु या,असे आवाहन यावेळी श्री. शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांशी संवाद

ध्वजारोहण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर स्मृतिसंग्रहालयास भेट देऊन पाहणी केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ

  • नमो कामगार कल्याण अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच

  • नमो शेततळी अभियानातून ७३ हजार शेततळयांची उभारणी

  • नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून ७३ गावे आत्मनिर्भर करणार

  • नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातुन वस्यांमिचा सर्वांगिण विकास करणार

  • नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी

  • नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानातून स्मार्ट शाळांची उभारणी

  • नमो दिव्यांग शक्ती अभियानातून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणार

  • नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियानातुन सुसज्ज क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी

  • नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून ७३ शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार

  • नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियानातुन ७३ पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा 

  • छत्रपती संभाजी नगर, दि. १७ सप्टेंबर (विमाका) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण राज्यात “नमो ११ कलमी कार्यक्रम” राबविण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. सुभेदारी विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारत देशाचा गौरव व सन्मान वाढविला आहे. जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही देशाच्यादृष्टीने गौरवाची बाब आहे. जी 20 ची परिषद राज्यातील अनेक शहरांमध्ये झाली. आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती इतर देशापर्यंत पोहोचविण्याची संधी या परिषदांच्या माध्यमातुन मिळाली. दिल्ली येथे झालेल्या जी 20 च्या बैठकीत प्रधानमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयांना, ठरावांना विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांनी एकमुखाने संमती दिली. ‘वसुधैव कुटूंबकम’ हा आपला मुलमंत्र आहे. सबका विकास, सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास या ठरावावरही एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नमो महिला सशक्तीकरण अभियान

नमो ११ कलमी कार्यक्रमात नमो “महिला सशक्तीकरण अभियान” राबविण्यात येणार असुन ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. ४० लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडण्यासोबतच २० लाख नवीन महिलांच्या शक्ती गटाची जोडणी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत ५ लक्ष महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण, ५ लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल तसेच 3 लाख महिला उद्योजिकांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नमो कामगार कल्याण अभियान

भारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान म्हणून “नमो कामगार कल्याण अभियान” अंतर्गत ७३  हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नमो शेततळी अभियान

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी “नमो शेततळी अभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ७३ हजार शेततळयांची उभारणी करण्यात येणार असुन पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब अन् थेंब याद्वारे साठविण्यात येणार आहे. शेततळयाच्या माध्यमातुन शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करुन देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच याच शेततळयातून मत्स्य व्यवसायासारखे शेती संलग्न व्यवसाय उभारण्यावरही भर देण्यात येणार आहे.

नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान

“नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान” राबविण्यात येऊन 73 आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार आहेत. बेघरांना किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्के घर बांधुन देणे, घरांमध्ये शौचालय बांधुन त्याचा वापर होण्यासाठी प्रयत्न करणे, पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारणे, गरजू नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देणे, महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनविणे, दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना पुर्णपणे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन व साह्य, सेंद्रिय उत्पादनांसाठी विशेष बाजारपेठ, उत्पादन निर्यातीसाठी मार्गदर्शन, उत्पादंनावर प्रक्रियेसाठी मार्गदर्शन व 73 यशस्वी प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव या अभियानातुन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान

गरीब व मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी “नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान” राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व मागासवर्गीयांना पक्की घरे बांधुन देण्यात येणार आहेत. तसेच वस्त्यांमध्ये पक्क्या रस्त्यांची उभारणी, घरांमध्ये वीज पुरवठा, समाज प्रबोधनाचे काम व्हावे यासाठी समाज मंदिराची उभारणी, गरीब व मागासवर्गीय महिलांना सामाजिक व आर्थिक सक्षम होण्यासाठीही या अभियानातुन मदत करण्यात येणार आहे.

नमो ग्राम सचिवालय अभियान

“नमो ग्राम सचिवालय अभियान” राबवुन प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असुन याठिकाणी पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. सव ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये वेगवान इंटरनेट सुविधा देण्यात येणार असुन संपुर्ण गावाचे नियंत्रण कक्षाची उभारणीही याद्वारे करण्यात येणार आहे.

नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान

“नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान” राबवुन आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी व सुधारणा करण्याबरोबरच 73 विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहेत. आधुनिक संसाधनयुक्त शाळांच्या उभारणी, वेगवान इंटरनेट सुविधा, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षण, अंतराळविषयक व विज्ञानातील महत्वाच्या विषयांबाबत मार्गदर्शन, महत्वांच्या शोधांबाबत माहिती, प्रशिक्षण वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा तसेच अंतराळ दर्शन आदी सुविधा या शाळांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नमो दिव्यांग शक्ती अभियान

नमो दिव्यांग शक्ती अभियान राबविण्यात येऊन याद्वारे दिव्यांग पुनर्वसन केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. अभियान स्वरुपात दिव्यांगांचे सर्व्हेक्षण व ओळख निश्चित करण्यात येणार आहे. दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र, परिवहन व रेल्वे पास आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देणे, दिव्यांगांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, दिव्यांगांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल व कर्ज देण्याबरोबरच दिव्यांगांचे व त्यांच्या पालकांचे या अभियानातुन समुपदेशन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान

नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान राबवुन यातुन सुसज्ज क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी करण्यात येणार आहे. यातुन खेळाडुंना मैदानी क्रीडा सुविधा देण्याबरोबरच खेळाडुंचे समुपदेशन करुन त्यांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.

नमो शहर सौंदर्यीकरण अभियान

“नमो शहर सौंदर्यीकरण अभियान” राबवुन ७३ ठिकाणी शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे, तलाव, रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातुन सौंदर्यीकरण टिकून रहावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान

“नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान” राबवुन ७३ ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा जिर्णोद्धार, प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभिकरण व स्वच्छता आदी कामे या अभियानातुन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लेझर शोच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या जागवल्या आठवणी

छत्रपती संभाजी नगर, दि. 16 :(विमाका) मराठवाड्याचा विकास हाच शासनाचा ध्यास असून मराठवाड्याच्या विकासाला शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास ४५ हजारांहून अधिक कोटींच्या विविध विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. तर मराठवाड्यामध्ये पाणी वळविण्यासाठी १४ हजार कोटींची शासनाकडून तरतूद करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव दिनाच्या पूर्व संध्येला मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा श्री. शिंदे यांनी सर्व नागरिकांना दिल्या. तसेच मुक्ती संग्रामात ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना विनम्र अभिवादन केले.

शहरातील क्रांती चौक येथे ‘गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक संचालनालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त जी.श्रीकांत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या कार्याचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे राज्यात परत आणण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी संकल्प केला आहे, त्यांचा संकल्प लवकरच पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

चांगली काम करणाऱ्या गणेश मंडळांना यंदा एका वर्षाची परवानगी देण्याऐवजी पाच वर्षांची परवानगी द्यावी. निर्बंधमुक्त गणेशोत्सव, सण साजरे करण्यात यावेत, अशा सूचनाही महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना यावेळी केल्या.

नाविन्यपूर्ण पद्धतीने लेझर शोद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती या कार्यक्रमात सादर करण्यात आली. महापालिकेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. कलावंतांचा गौरवही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमास नामवंत कलकारांची उपस्थिती होती. या कलाकारांनी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी महानगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण, शासकीय सुटीसाठीचे आग्रही व्यक्तिमत्त्व : आर. डी. देशमुख 

15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. संपूर्ण भारतभर हा क्षण हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. मोठ-मोठे कार्यक्रमही पार पडले. इंग्रजांची जुलमी राजवट उखडून टाकल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान होताच. त्यामुळे देशातील प्रत्येकाला आनंदाचे, सुख, समृद्धीचे स्वप्न पडणे साहजिकच होते. असे असले तरीही मात्र या क्षणाचा उपभोग याच देशातील काही नागरिकांना घेता येत नव्हता. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात देश स्वतंत्र झाल्यानंतरही 13 महिने 2 दिवसांनी हैदराबादच्या निजामाची जुलमी राजवट उखडून टाकत, मराठवाड्याने पारतंत्र्यांचे जोखड फेकून देत मुक्त श्वास घेतला. मात्र हा क्षण साजरा करण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांना तब्बल अर्धशतकाची वाट पाहावी लागली. हा क्षण साजरा करता यावा, यासाठी परभणी येथील रामचंद्र देविदासराव देशमुख यांच्यासारख्या अनेक हाडाच्या कार्यकर्त्यांना प्रशासन आणि शासन दरबारी मोठा लढा देत पाठपुरावा करावा लागला…!

देशाला स्वातंत्र्य मिळाले; देशाने आणि देशवासीयांनी राष्ट्रध्वजही स्वीकारला. देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला. त्या दिवशी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आणि त्यानिमित्त समस्त देशभर सार्वजनिक सुटीही उपभोगायला मिळू लागली. हे देशातील कोणाही नागरिकासाठी नवीन नाही. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक संस्थान निजामाच्या अधिपत्याखाली होते आणि ते होते तेव्हाचे हैदराबाद. निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यापासून तो मुक्त‍िदिन राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मराठवाड्याला संघर्षच करावा लागलेला आहे.

 शासन दरबारी मराठवाडा मुक्ती दिन साजरा केला जावा, येथील जनतेला निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्याची माहिती व्हावी, या दिवसाचे भावी पिढीला चिरंतन ज्ञान व्हावे, त्यांना या दिनाचे महत्त्व कळावे, ही आंतरिक तळमळीची भावना आर. डी. देशमुख उर्फ अण्णा यांची होती. त्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. आजघडीला संपूर्ण देश गत वर्षभरापासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. सोबतच हैदराबाद संस्थानातून मराठवाड्यालाही मुक्त होऊन 75 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची कल्पना मनात येणे, त्या कल्पनेमागील देशभक्तीची भावना भावी पिढीमध्ये रुजण्यासाठी प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे! त्या  देशभक्तीच्या भावनेची गरज आर. डी. देशमुखांसह इतरांना भासू लागली. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले; ते 1991 हे वर्ष होय. त्यामुळे या भागात मराठवाड्याचा मुक्ती दिन साजरा करावा, या मागणीला सर्वप्रथम सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या मागणीला हेटाळणीचा सूर लाभला.

देशात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जातोच की, आता हा नवीन मुक्तिसंग्राम दिन कशासाठी ? अशी प्रश्नार्थक कुत्सीत भावनाही काहींनी व्यक्त केली. मात्र, आर. डी. देशमुख त्याला बधले नाहीत. त्यांनी शासन दरबारी आपली ही मागणी लावून धरली. त्यासाठी ते राज्य शासनापाठोपाठ केंद्राकडे सतत पाठपुरावा करत राहिले. त्यांच्या या आंतरिक‌ तळमळ, आणि सततच्या पाठपुराव्यातून त्यांनी मराठवाडा मुक्ती दिनाचे महत्त्व केंद्र शासनाच्या लक्षात आणून दिले. राज्य व केंद्र शासन जर बधले नाही तर म्हणून मग आर. डी. देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून न्यायालयीन पातळीवरही आपले प्रयत्न सुरुच ठेवले.

तत्कालीन मंत्रीमहोदय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आर. डीं.च्या या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक बोलावली, हा या मागणीचा पहिला टप्पा होय. या बैठकीच्या माध्यमातून ध्वजारोहण आणि शासकीय सुटीच्या लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

            याच लढ्याच्या भाग म्हणून तेव्हा आर. डी. देशमुखांनी तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांची  मुंबई येथील राजभवनात भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. सोबतच केंद्र शासनाचे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची शिष्टमंडळासह नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यांनाही मराठवाडा मुक्त झाल्याच्या किमान 50 वर्षानंतर का होईना, या भागातील जनतेला निजामाच्या जाचातून मुक्त झाल्याचा आनंदोत्सव साजरा करता यावा. त्यासाठी स्वातंत्र्यसैनिकाचे, त्यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण व्हावे, त्या दिवशी राष्ट्रध्वज उभारून सलामी देत, सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, याबाबत अवगत केले.

रामचंद्र देविदासराव देशमुख यांच्या या प्रयत्नाला यश येऊन तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आणि मराठवाड्यात 17 सप्टेंबर या दिवशी ध्वजारोहणासह सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत आदेश दिले. केंद्र आणि राज्य शासनाच्या झालेल्या पत्रव्यवहारानुसार 27 मार्च 1998 रोजी राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव शं. वि. नलावडे यांनी राज्य शासनाची अधिसूचना काढत 17 सप्टेंबर 1998 या दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. या अधिसूचनेचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र बुधवार दि. 6 मे 1998 रोजी काढले. आणि या राजपत्राचे स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक देण्याचे आदेशित केले. तत्पूर्वी मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिन ध्वजवंदनाने साजरा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 27 मार्च 1998 रोजी मराठवाड्यात दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याची अधिसूचना काढली.

दि. 4 सप्टेंबर 1998 रोजी दरवर्षी 17 सप्टेंबरला ध्वजारोहणाच्या परवानगीबाबतचे परिपत्रक काढले. त्यानंतर दि. 14 सप्टेंबर 1998 रोजी मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रम साजरा करण्याबाबतच्या सविस्तर सूचना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून प्रशासनाला देण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव व सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रे. शा. बेंजामिन यांच्या स्वाक्षरीने 4 सप्टेंबर 1998 रोजी मराठवाड्यात 17 सप्टेंबर 1998 या मुक्त‍िसंग्राम दिनी राष्ट्रध्वज लावण्याबबात एफ.एल.जी-1098/792/60 या क्रमांकाचे परिपत्रक काढले. या परिपत्रकात त्यांनी या परिपत्रकात त्यांनी सामान्य प्रशासन विभागाची 27 मार्च 1998 रोजीची अधिसूचना, गृह मंत्रालयाचे 19 ऑगस्ट 1998 च्या पत्राचा संदर्भ दिला आहे. सोबतच राज्य शासनाच्या 20 मार्च 1991, 5 डिसेंबर 1991 आणि ध्वजसंहितेबाबत 11 मार्च 1998 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकाचा उल्लेख आहे. तर भारत सरकारच्या गृह विभागाने दि. 16 सप्टेंबर 1999 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण करण्यास परवानगी दिली. तेव्हापासून आता दरवर्षी सार्वजनिकरित्या ध्वजारोहण आणि त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी लागू झाली आहे.

त्यामुळे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आता मराठवाडाही तितक्याच उत्साहाने गेल्या वर्षभरापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. मात्र असे असले तरीही मराठवाडा मुक्त‍िसंग्रामाचे हे 75 वे वर्ष असले तरीही शासन दरबारी हा मुक्त‍िसंग्राम दिन म्हणून साजरा करण्याचे यंदाचे हे 25 वेच वर्ष होय.

17 सप्टेंबर 1998 पासून केंद्र आणि राज्य शासनाच्या राजपत्रानुसार पहिला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यात शासनस्तरावर साजरा करणे सुरू झाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या दृष्टीने प्रशासन पातळीवर पहिला मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन हा नांदेड येथे 17 सप्टेंबर 1998 रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी सकाळी 7.30 वाजता विविध शाळा-महाविद्यालयामधून प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी सकाळी 9 वाजता नांदेड येथील गुरु गोविंदसिंगजी क्रीडा संकुलात पोहचली. सकाळी 9.05 मिनिटांनी शासकीय विश्रामगृह येथून प्रमुख अतिथींचे विसावा उद्यानाकडे प्रयाण झाले आणि अवघ्या पाच मिनिटांमध्ये पोहचले. सकाळी 9.10 ते 9.25 वाजेपर्यंत येथील स्मृतीस्तंभाच्या प्रतिकृतीचे अनावरण व पोलीस बँडपथकामार्फत हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी सकाळी 9.29 वाजता गुरु गोविंदसिंहजी क्रीडा संकुल येथे पोहचले. सकाळी 9.30 ते 9.32 दरम्यान प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण झाले, नंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर राष्ट्रीय सणांप्रमाणे प्रमुख अतिथींनी पोलीस विभाग, एनसीसी यांच्याकडून मानवंदना स्वीकारत चित्ररथाचे प्रदर्शन पाहिले.

सकाळी 9.45 वाजता सर्व प्रमुख पाहुणे मुख्य मंचावर विराजमान होताच त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गीत आणि मराठवाडा गीताचा कार्यक्रम पार पडला. सकाळी 10 वाजता तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे प्रास्ताविक आणि इतर उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे भाषण झाले. त्यानंतर मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील 7 ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

 या कार्यक्रमप्रसंगी आर. डी. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्रीमती सुशिलाबाई दिवाण आणि श्रीमती दगडाबाई शेळके यांचा सत्कार करण्यात आला. सोबत एका महिला स्वातंत्र्यसैनिकांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सभापती, माजी खासदार सुर्यकांत पाटील वहाडणे यांचे भाषण झाले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुख्य भाषण आणि वंदे मातरम् ने पहिल्या मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिनाची सांगता झाली. रात्री 7 वाजता स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि आतिषबाजी करण्यात आली. या दिवसापासून सुरु झालेल्या मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिनाच्या येथील नागरिकांच्या अस्मिता, जोपासण्याच्या आणि ती भविष्यात अखंडपणे सांभाळण्याच्या दिनाला ख-या अर्थाने सुरुवात झाली. त्यामुळे हा कार्यक्रम साजरा करण्याचे यंदाचे हे 25 वे वर्ष होय.

        नांदेड येथे पहिला मराठवाडा मुक्त‍िसंग्राम दिनाचा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सुवर्ण महोत्सवी दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमातील सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने औरंगाबादचे विभागीय आयुक्त प्र. ग. कुर्से यांनी आर. डी. देशमुखांना दि. 11 सप्टेंबर 1998 रोजी पत्र पाठविले. विभागीय आयुक्त या पत्रात म्हणतात, या दिवशी शासनाने स्वातंत्र्य दिनाप्रमाणे कार्यक्रम घ्यावेत व सुट्टी जाहीर करावी, म्हणून आपण जे न्यायालयीन प्रयत्न केले व वृत्तपत्रातून जनजागृती केली, त्याबाबत कृतज्ञतापूर्वक महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपला सत्कार नांदेड येथील कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्याचे आम्ही योजिले आहे. तरी कृपया या निमंत्रणाचा आपण स्विकार करावा, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती.

या मुख्य कार्यक्रमासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त प्र. ग. कुर्से यांनी परभणीचे जिल्हाधिकारी बलदेव सिंग यांना एका जबाबदार अधिकाऱ्याला आर. डी. देशमुख यांना परभणी येथून नांदेड येथे 16 सप्टेंबर 1998 रोजी घेऊन जाणे व 17 सप्टेंबर रोजीचा मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर परत आणण्यासाठी नियुक्त करण्याचे आदेश‍ दिले होते.

    त्यामुळे या दिवशी ध्वजारोहण आणि सार्वजनिक शासकीय सुट्टी मिळाली. येत्या 17 सप्टेंबरला त्या घटनेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. 17 सप्टेंबर 1998 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला खरा. मात्र, त्यासाठी मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा ध्वजारोहण आणि शासकीय सुट्टीला 1998 पासून सुरुवात झाली आहे. आणि आर. डी. देशमुख यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्यांचा विजय झाला. म्हणून मराठवाड्याला हा क्षण मिळवून देणारे, त्याचा शासन दरबारी आणि न्यायालयीन पातळीवर पाठपुरावा करणारे खंदे समर्थक आर. डी. देशमुख आहेत, असे म्हणता येईल!

प्रभाकर बारहाते,                 

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, परभणी

 

संदर्भ :-

1)      तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांचा तत्कालीन केंद्रीय उद्योगमंत्री मनोहर जोशी यांच्याशी केलेला 22 जुलै 2001 रोजीचा पत्रव्यवहार

2)     केंद्रीय उपसचिव एम. पी. सजनानी यांनी राज्याचे मुख्य सचिव ए.एल. बोंगीरवार यांच्याशी 16 सप्टेंबर 1999 केलेला पत्रव्यवहार

3)     विभागीय आयुक्त प्र. ग. कुर्से यांनी आर. डी. देशमुख यांना पहिल्या मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी दि. 11 सप्टेंबर 1998 रोजी दिलेले निमंत्रण

4)   सा.प्र.वि.चे उपसचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रे. शा. बेंजामिन यांनी 1 दि.19 ऑगस्ट 1998 रोजी काढलेले परिपत्रक

5)    बुधवार 6 मे 1998 रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव शं. वि. नलावडे यांनी काढलेले राजपत्र

6)     मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आर. डी. देशमुखांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेतील कागदपत्रे सादर करण्याबाबत केंद्रीय गृह विभागाचे सहसचिव यशवंत राज यांच्याकडे 18 जुलै 2000 रोजी दिलेल्या वेळेबाबतचे उपसचिव जी. बी. सिंग यांनी आर. डी. देशमुख यांना दिलेले पत्र

7)    केंद्र शासनाचे कक्ष अधिकारी ए. के. शर्मा यांचा आर. डी. देशमुख यांच्याशी 12 जुलै 2000 रोजीचा पत्रव्यवहार

8)    मनोहर जोशी यांचे केंद्रीय गृह मंत्री लालकृष्ण अडवानी यांना 14 जानेवारी 2000 रोजी केलेला पत्रव्यवहार

महाष्ट्रातील ७ कलावंताना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 16 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 84 कलाकारांना विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे.

ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांना हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत  75 वर्षांवरील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने गौरविण्यात आले. या दिग्गज कलाकारांमध्ये 70 पुरुष आणि 14 महिला उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वात वयस्क मणिपूरचे 101 वर्षांचे युम्नाम जत्रा सिंग आहेत. या यादीत गौरी कुप्पुस्वामी आणि महाभाष्याम चित्तरंजन या दोन महिला कलाकारांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.

लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी चरण गिरधर चाँद व डॉ. पद्मजा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या  मान्यवरांचा कला क्षेत्रातील योगदानासाठी आज  संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने  गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रापती, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री श्रीमती मिनाक्षी लेखी, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा उपस्थित होत्या.  ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

-पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती-

डॉ. प्रभाकर भानुदास मांडे

श्री प्रभाकर भानुदास मांडे यांना त्यांच्या मराठी लोककलातील विद्वत्तेबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रभाकर भानुदास मांडे हे लोककथा, लोकसंस्कृती आणि साहित्याचे ज्येष्ठ संशोधन अभ्यासक आहेत. त्यांनी 17 वर्ष मराठवाडा विद्यापीठात रीडर म्हणून काम केल्यानंतर 1993 मध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. गांवगड्या बाहेर, रामकथेची मौखिक परंपरा, लोक रंगभूमी, मागणी त्याचे मांगते, सहित अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या विविध प्रकाशनातून त्यांनी प्रचलित ज्ञान आणि कलेचे लपलेले पैलू शहरी लोकांसमोर आणले आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  पदव्युत्तर स्तरावरील या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

डॉ. पद्मजा शर्मा

कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल डॉ. पद्मा शर्मा  यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती पद्मा शर्मा यांनी 1959 मध्ये भातखंडे महाविद्यालयातून कथ्थकमधील नृत्य निपुराण ही पदवी  मिळवली होती. त्यांनी मुंबईतील ललित कला एज्युकेशन ट्रस्टमध्ये नृत्य शिक्षक आणि कोरिओग्राफर म्हणूनही काम केले आहे. त्या वल्लभ संगीत विद्यालय, मुंबईच्या नृत्य विभागाच्या प्रमुख म्हणूनही काम केले आहे.

शंकर कृष्णाजी अभ्यंकर

श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत सितारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री शंकर कृष्णाजी अभ्यंकर यांचा जन्म 1934 साली महाराष्ट्रातील सातारा येथे झाला, त्यांनी गांधर्व महाविद्यालय मंडळ सतार वादनात अलंकार ही पदवी मिळवली. त्यांचा संबंध ग्वाल्हेर घराण्याशी असून त्यांनी कुमार गंधर्व यांच्याकडून बंदिश आणि रचनेचे प्रशिक्षण घेतले आणि पंडित रविशंकर यांच्याकडून सतार वादनाचे प्रशिक्षण घेतले.

भिकल्या लडक्या धिंडा

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातून भिकल्या लडक्या धिंडा, हे उत्कृष्ट तारपावादक म्हणून  त्यांची ओळख आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही कार्यांतून जोपासली. अनेक युवकांना ते वादनाचे धडे देतात. जवळपास दहा फूट लांबीचा तारपा हे धांडा यांचे वैशिष्ट्य. भिकल्या धिंडा यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी तारपावादनाने रसिकांना मोहवले आहे. ते स्वतः तारपा वाद्याची निर्मिती करून चरितार्थ करतात. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी अवघे आयुष्य वेचणारे धिंडा यांच्यावर अमृत पुरस्काराने गौरव झाला.

हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर

महाराष्ट्राच्या लोकरंगभूमीतील (खादी गंमत) योगदानाबद्दल श्री हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 1946 रोजी जन्मलेल्या श्री. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांनी विदर्भातील खडी गंमत, डडार आणि दहाका या जुन्या पारंपरिक लोकनाट्यांचे पुनरुज्जीवन करून, नव्या पिढीपर्यंत नेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. श्री बोरकर यांना सांस्कृतिक मंत्रालयाची वरिष्ठ फेलोशिपही मिळाली आहे.

चरण गिरधर चाँद

श्री चरण गिरधर चाँद यांनी त्यांचे वडील नारायण प्रसाद यांच्याकडून कथ्थक नृत्याचे प्रारंभिक प्रशिक्षण घेतले. तसेच गायन आणि हार्मोनियम, तबला, पखावाज, नाळ आणि इतर वाद्ये शिकली. कथ्थक नृत्याच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कार्यशाळा आणि व्याख्याने-प्रात्यक्षिके मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली आहेत. कथ्थक नृत्यातील योगदानाबद्दल श्री चरण गिरधर चाँद यांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

उस्मान अब्दुल करीम खान

श्री उस्मान अब्दुल करीम खान यांना हिंदुस्थानी वाद्य संगीत – सतारमधील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील श्री उस्मान अब्दुल करीम खान हे संगीतकारांच्या घराण्यातील आहेत. ते सहाव्या पिढीतील संगीतकार आणि तिसऱ्या पिढीतील शास्त्रीय सितार वादक आहेत. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी सतार वादन शिकायला सुरुवात केली. 1985 मध्ये पॅरिसमध्ये 24 तासांचे राग सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये सितार वादक म्हणूनही त्यांनी भाग घेतला होता. 1988 मध्ये, त्याच शहरात 9 तासांच्या संपूर्ण रात्र त्यांनी मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. ललित कला मंदिर, मलेशियाच्या हिंदुस्थानी संगीताचे आंतरराष्ट्रीय डीन म्हणून त्यांचे नामांकन करण्यात आले असून, त्यांना ‘सतार नाद योगी’ ही पदवी देखील बहाल करण्यात आली आहे.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 172, दि.16.09.2023

छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय होणार – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍दि. 16 : छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय केले जाणार असल्याचा निर्णय आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून पारंपारिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरसांचे अनुदान दोन लाखावरुन 10 लाख करण्यात येणार आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...