मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 1040

विकसित भारत संकल्प यात्रा अभियान जनआंदोलनाद्वारे यशस्वी करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

मुंबई, दि. 30 : विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जनआंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित भारत संकल्प यात्रा अभियान’ यशस्वी करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

आज विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत सहभागी झारखंड, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यातील लाभार्थ्यांसोबत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला.

१५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत या यात्रेचे महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा महानगरपालिकांची निवड करण्यात आली असून, त्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचादेखील समावेश आहे. या उपक्रम अंतर्गत बृहन्मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विशेष अशा चार वाहनांद्वारे २८ नोव्हेंबर २०२३ ते  १ जानेवारी २०२४ पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मुंबईतील ‘डी’ वॉर्ड कार्यालयात मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कळ दाबून ‘ड्रोन दीदी’ आणि ‘प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना’ यांचे उद्घाटन केले. यावेळी या दोन्ही योजनांवर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. जन औषधी केंद्र 25 हजार करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री यांनी  सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना शुभेच्छा दिल्या आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती इतर गावांमधे पोहोचविण्याचे आवाहन केले. कृषी क्षेत्रात ड्रोनचे महत्त्व असून, याद्वारे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  महिलांचा या योजनांमधला सहभाग प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. १५ हजार ड्रोन वितरित करण्यात आले आहेत.  महिला बचत गटांच्या सहायाने महिलांना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माय भारत अभियानातही सहभाग नोंदविण्याचे त्यांनी यावेळी आहवान केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जनजाती दिवसानिमित्त सुरू झालेली संकल्प यात्रा देशातील 12 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमधे पोहचली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामधे सहभाग नोंदविला असून, या यात्रा अभियानाला जनआंदोलनाच्या रूप देऊन भारताच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, सेवाभावाने कार्य करून देशातील सर्व गावांमधे या यात्रेद्वारे शासकीय योजना पोहचविण्याचे काम केंद्र शासन करीत आहे. शेतीला आधुनिक बनविणे, जनतेला कमीत कमी दरात औषधांचा पुरवठा करणे, युवकांना रोजगार देणे तसेच गरीबांना मोफत राशन देण्याचे कार्य केंद्र शासन करीत असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितले.

यात्रेचे उद्द‍िष्ट

मुंबईतील 227 ठिकाणांवर ही चार वाहने फिरणार असून विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या आयुष्मान हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, आधार कार्ड आदी विविध योजनांची माहिती पोहोचविणे व त्याबाबत जागृती करणे. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणी करणे आदी या यात्रेची उद्दिष्टे आहेत. या यात्रेदरम्यान विविध योजनांचे लाभार्थी या वाहनांना भेट देऊन थेट लाभ घेऊ शकतात.  ही यात्रा राज्यातील एकूण 418 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थातील 2084 परिसरातून फिरणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरिता प्रयत्न करणार : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक 30 (जिमाका वृत्तसेवा) : वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला व निफाड तालुक्यातील वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी येवला बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी निफाड हेमांगी पाटील, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड  तहसिलदार शरद घोरपडे, येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे जलदगतीने करण्यात यावेत यात एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये. बाधित शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शालेय शिक्षण फी माफीबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी क्रॉप कव्हर योजना आणण्यात येईल. तसेच बाधित क्षेत्राचा विचार करता पीक विम्याबाबत सुद्धा शासन स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी  शेतकऱ्यांना अश्वासित केले. ‘खचून जाऊ नका’अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला.

आज मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील कातरणी, सोमठाण देश व निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव नजिक, वनसगांव या गावांत वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी केली.

000000

समाज उन्नतीसाठी सेवकांना मिळणारे पुरस्कार हे प्रेरक व ऊर्जादायी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिकदि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आदिवासी विकास विभागासोबतच आदिवासी सेवक हा महत्वाचा दुवा आहे. सेवाभावी मनोवृत्तीतून आदिवासी सेवक व सेवा संस्था या दुर्लक्षित समाजास मदत करीत असतात. समाज उन्नतीसाठी या सेवकांना मिळणारे पुरस्कार हे त्यांच्यासाठी प्रेरक व ऊर्जादायी असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिरात आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्थांना सन 2019 ते 2022 या चार वर्षाच्या राज्य पुरस्कारांचे आज मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते एका सोहळ्यात वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळीमाजी आमदार उत्तम इंगळेशिवराम झोलेएन.डी. गावितसंजय कुलकर्णीसंतोष ठुबेसुदर्शन नगरे यांच्यासह पुरस्कारार्थींचे कुटुंबीयनातेवाईकआदिवासी विकास विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले कीआदिवासी हा समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्यांपासून इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल. आपल्या हातून यापुढेही समाजाची सेवा घडत राहो व पुरस्कार्थींनी यापुढेही जोमाने काम करावे ही अपेक्षा मंत्री डॉ. गावित यांनी व्यक्त केली. ज्या आदिवासी बांधवांना स्वतःचे घर नाही त्यांना येत्या दोन वर्षात हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी सहावीपासूनच अॅकॅडमी सुरू करणार असून स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. डिजिटल माध्यमातून शिक्षणासाठी  शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेच्या माध्यमातून सर्व वाड्यावस्त्यापाडे बारमाही रस्त्याने जोडण्यात येतील. आदिवासी बांधवांसाठी वनोपज स्थानिक पातळीवर संकलित करून त्यावर प्रक्रिया करून

उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया केलेले उत्पादने आदिवासी विकास विभाग खरेदी करण्यासाठी विक्री व्यवस्था उभारली जाणार आहे. आदिवासी बांधवांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी विभाग योजनाही राबवित आहेत, असेही मंत्री डॉ. गावित यांनी  सांगितले.

प्रास्ताविकात श्रीमती गुंडे यांनी पुरस्कारांची पार्श्वभूमी विशद केली. आदिवासी विकास विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी सेवकास 25 हजार तर संस्थेला 51 हजार रुपयांचा पुरस्कार दिला जातो. कोरोना कालावधीमुळे मागील चार वर्षाचे पुरस्कार एकत्रित देण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुरस्कारार्थीचा परिचय देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारार्थी डॉ. शशिकांत वाणीनुरानी कुतुबअलीनामदेव नाडेकरसंतोष जनाठेमधुकर आचार्य आदींनी मनोगत व्यक्त केले. अपर आयुक्त श्री. माळी यांनी आभार मानले.

असे आहेत आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कारार्थी

२०१९२०२० २०२०२०२१ २०२१२०२२ २०२२२०२३
श्रीरघुजी येसाजी गवळीनाशिक १६श्रीअनिल नामदेव वाघनाशिक ३१ श्रीज्ञानेश्वर सिताराम भोयेनाशिक ४६ श्रीदत्तात्रय हनुमंता मुठेअहमदनगर
श्रीमती अनिताताई रामदास घारेनाशिक १७श्रीगमन ईसन सोनवणेनाशिक ३२ श्रीसुरेश पुनाजी पवार, , नाशिक ४७ श्रीदेवरे श्रावण नानाजीनाशिक
श्रीउद्धव पांडुरंग मोरेनाशिक १८ श्रीमती सविता जगदीश जयस्वालनंदरबार ३३ श्रीगोसा बहादूर खर्डेनंदरबार ४८ श्रीईश्वर संतोष माळीनंदरबार
श्रीजितेंद्र बापूराव चव्हाणजळगांव १९ श्रीरवींद्र नागो भुरकंडेपालघर ३४ श्रीमतीसविता सहदेव मतेपुणे ४९ श्रीयुवराज दगाजीराव पाटीलनंदरबार
डॉशशिकांत जगन्नाथ वाणीनंदरबार २० श्रीनामदेव लक्ष्मण नाडेकरपूणे ३५ श्रीकिसन मारुती तळपाडेमुंबई ५० श्रीमधुकर श्रीराम आचार्यनाशिक
श्रीनुरानी हैदरअली कुतुबअलीनंदरबार २१ श्रीतुळा रुपा लांघीपूणे ३६ श्रीमहादेव आंबो घाटाळठाणे ५१ सौशिला सुरेश उईकेगोंदिया
श्रीदगडू रामचंद्र सोनवणेनाशिक २२ श्रीमती प्रमिला उध्दव मसरामठाणे ३७ श्रीनागोराव उरकुरडा गुरनुलेनांदेड ५२ श्रीजितेंद्र चंद्रसेन पाडवीनंदरबार
श्रीरुपसिंग बिरबा पाडवीनंदरबार २३ श्रीअशोक म्हाळू इरनकठाणे ३८ श्रीठकाजी नारायण कानवडेअहमदनगर ५३ श्रीमती ता गणपत किरवेपुणे
श्रीधाकल जान खुताडेपालघर २४ श्रीकडूदास हरिभाऊ कांबळेबीड ३९ श्रीसुरेश मुकुंद पागीपालघर ५४डॉपोपरे वाळिबा विठ्ठलठाणे
१० श्रीपक पांडुरंग साळुंखेपालघर २५ श्रीभागोराव नारायण शिरडेनांदेड ४० श्रीमरंजना किशोर संखेपालघर ५५ श्रीरत्नाकर तुकाराम घरतरायगड
११ श्रीप्रकाश रामचंद्र वायदंडेसातारा २६ श्रीभगवान आश्रु कोकाटेबुलढाणा ४१ श्रीवसंत नवशा भसरापालघर ५६ श्रीसंतोष शिवराम जनाठेपालघर
१२ श्रीजयपाल परशुराम पाटीलरायगड २७ श्रीधोंडिराम किसन थैलनाशिक ४२ श्री वसंत नारायण कनाकेयवतमाळ ५७ श्रीलक्ष्मण ढवळ टोपलेपालघर
१३ श्रीभास्कर लडकू दळवीपालघर २८ श्रीगणपत सहादु मुकणेनाशिक ४३ डॉमधुकर गणपत कोटनाकेचंद्रपूर ५८ डॉचरणजित सिंग बलविरसिंग सलुजागडचिरोली
१४ श्रीसुभाष केशवराव येणोरकरअमरावती २९ श्रीबिसन सिताराम सयामभंडारा ४४ श्रीताराम हावशा भिवनकरवर्धा ५९ श्रीबबन धुवालाल गोरामननागपूर
१५ श्रीरमेश मिरगुजी उईकेनागपूर ३० श्रीसखाराम ठका गांगडअहमदनगर ४५ श्रीवसंत श्यामराव घरटेधुळे ६० श्रीदिनेश अंबादास शेरामनागपूर

आदिवासी सेवा संस्था पुरस्कारार्थी

२०२१२०२२

२०२२२०२३

कैदिलवरसिंग पाडवी स्मारक स्मृती संस्थानंदरबार  कन्हैयालाल बहुउददेशिय संस्थाधुळे
दीनदयाल वनवासी विकास संस्थानंदरबार  शिक्षण प्रसारक मंडळ मोरचंडीयवतमाळ
 श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थागडचिरोली  अहिल्या मंडळरायगड
 ज्ञान विकास मंडळधुळे  वन संवर्धन संस्थाठाणे

 

0000

समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबईदि. 29 : समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही किंवा त्यांची शैक्षणिक, आर्थिक शिस्त यात कोणताही बदल होणार नाही. समूह विद्यापीठात सहभागी होण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले.

सिडनहँम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित समूह विद्यापीठ स्थापनेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या राज्यस्तरीय परिषदेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीउपसचिव अजित बाविस्करतंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरतंत्र शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राज्यातील स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्यप्राध्यापक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले कीनवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. समूह विद्यापीठ हा असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे उच्च शिक्षणाची गंगोत्री तळा-गाळापर्यंत पोहोचण्यास आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.

समूह विद्यापीठांच्या माध्यमातून शहर किंवा परिसरातील महाविद्यालयेविद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या एकत्रीकरणातून विविध प्रकारची मानवी आणि पायाभूत संसाधने एकत्रित आणणे व या संसाधनांचा प्रभावी वापर करून उच्च शिक्षणामध्ये सुसूत्रतानेमकेपणाबहु/आंतरशाखीय अभ्यासक्रमदर्जा आणि कौशल्य विकासाच्या संकल्पनेला अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले कीराज्यातील  शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापन्याकरिता शासनाने मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली आहे. यामुळे विद्यापीठांवरील प्रशासकीय भार कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे निर्माण  होईल आणि  विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील.

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना उच्च शिक्षण संचालक श्री. देवळाणकर म्हणाले की, राज्यात अनेक स्वायत्त शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारेआवश्यक ती पायाभूत सुविधाप्रशिक्षित अध्यापक तसेच समूह विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय, संस्था समूह विद्यापीठासाठी इच्छुक आहेत. यासाठी याविषयी सविस्तर चर्चाविचार मंथन व्हावे यासाठी राज्यस्तरीय परिषद आयोजित केली आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पुणेदि. 29 : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिकमानसिकभावनिकसामाजिक आणि अध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली जातेअसे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.

लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेचा शताब्दी सोहळा आणि शालेय शिक्षणात योगाचे एकत्रीकरण‘ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रपती श्रीमती मुर्मू बोलत होत्या.

कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैसमहिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेमाजी केंद्रीय मंत्री तथा शताब्दी समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभूकैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारीसचिव सुबोध तिवारी आदी उपस्थित होते.

स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेल्या कैवल्यधामच्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आनंद झालाअसे सांगून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या कीभारताचे योग शिक्षण ही जागतिक समुदायासाठी आपली अमूल्य देणगी आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. योग प्रणाली ही आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टिकोन प्रदान करते आणि ती संपूर्ण जागतिक समुदायाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्पष्ट केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या कीयोगाच्या अमूल्य ज्ञानाचा मुलांना आणि तरुण पिढीला लाभ व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भारतीय ज्ञान परंपरेत असलेल्या योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. प्राचीन भारतातील गुरुकुलमध्ये शिकणारे विद्यार्थीबौद्धिक ज्ञान तसेच अध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असत. आपल्या विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन परंपरेच्या उपयुक्त घटकांशी जोडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

भारतीय परंपरेत कैवल्य म्हणजेच मोक्ष हा सर्वोत्तम प्रयत्न मानला जातो. अर्थकाम आणि धर्म या पायऱ्या पार करून माणसाला कैवल्य प्राप्त करायचे असते. व्यावहारिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान एकमेकांना पूरक असल्याचे इश उपनिषदात स्पष्ट केले आहे. समग्र शिक्षणामध्ये व्यावहारिक आणि अध्यात्मिक ज्ञानाची सांगड घातली जाते.

योगाची शिस्त कैवल्यप्राप्तीसाठी उपयुक्त आहे हे सत्य आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी विस्तृत संशोधन आणि चाचण्यांनंतर मांडले होते. महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात योगविषयी महत्वपूर्ण संशोधन संकलित केले. विसाव्या शतकात स्वामी कुवलयानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींनी योगपद्धतीची वैज्ञानिकता आणि उपयोगिता नव्या ऊर्जेने मांडली. योग आणि अध्यात्मावर आधारित आधुनिक विज्ञानातील तत्वे त्यांनी जागतिक समुदायासमोर मांडली.

राष्ट्रपिता महात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर स्वामी कुवलयानंद यांच्या संपर्कात होते. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा देशातील महान व्यक्तिमत्त्व आणि सामान्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. स्वामीजींची योग शिकवण त्यांच्या शिष्य परंपरेने पुढे नेली जात आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

रायरंगपूरओडिशा येथील श्री अरबिंदो इंटेग्रल एज्युकेशन सेंटर‘ मध्ये शिकविण्याची आणि आज कैवल्यधामच्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनात सहभागी होण्याची संधी मिळाली हे आनंददायी असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

स्वामी कुवलयानंद शाळांमध्ये योगशिक्षणाच्या प्रसाराला खूप महत्त्व देत असत. कैवल्यधाम संस्थान संचालित कैवल्य विद्या निकेतन नावाची शाळा इतर शाळांसमोर याबाबतचे उदाहरण ठेवण्यास प्रेरणा देईलअसेही त्या म्हणाल्या.

श्री. प्रभू म्हणाले कीलोणावळा या पुण्यभूमीत देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशाचे राष्ट्रपती आले आहेत. योग ही एक विद्या आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास व्हावा. ते शास्त्र आणि कला असल्यामुळे त्याचे आकलनतसेच संस्कृतीचा एक हिस्सा असल्यामुळे त्याचे जतन व्हावे. आस्था असल्यामुळे स्मरण व्हावेअध्यात्म असल्यामुळे चिंतन व्हावे आणि स्वीकार व्हावा म्हणून विश्लेषणही झाले पाहिजे. या सर्व बाबी कैवल्यधम येथे एकच ठिकाणी मिळतात, कैवल्यधाम हे येणारी हजारो वर्षे विश्वाला ऊर्जा देणारे स्थान ठरेलअसेही श्री. प्रभू म्हणाले.

यावेळी संस्थेचे सचिव श्री. तिवारी यांनी स्वागत केले. याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा माहितीपट दाखविण्यात आला. तसेच कैवल्यधाम प्रकाशनाच्या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपती महोदयांनी कैवल्यधामचा इतिहास चित्ररूपाने मांडणाऱ्या गॅलरीला भेट देऊन पाहणी केली.

0000

महापरिनिर्वाण दिनासाठी अनुयायांच्या सोयी-सुविधांचे काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. २९ :- ‘महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे,’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने दादर चैत्यभूमी, आणि मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत विविध स्थळांच्या ठिकाणी दर्शन व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील मध्यवर्ती व्यवस्था याठिकाणी जय्यत सुरू आहे. या तयारीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, अविनाश महातेकर, रामभाऊ पंडागळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आए.एस. चहल, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. एच. के. गोविंदराज, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे तसेच शासनाचे विविध विभाग, मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, भिक्खू संघ आणि महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गतवर्षी लाखो अनुयायी आले होते. त्यांची मुंबई महापालिका आणि सर्वच यंत्रणांनी उत्तम व्यवस्था केली होती. यंदाही आवश्यकता वाटल्यास आणि गतवर्षीच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जास्तीत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. बेस्ट, एसटी यांची परिवहन व्यवस्था, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत चोख नियोजन करण्यात यावे. आरोग्य आणि स्वच्छता, साफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडली पाहिजे, यांची दक्षता घेण्यात यावी. अनुयायींची भोजन, निवास आणि आरोग्य सुविधा याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या.

पालकमंत्री श्री. केसरकर यांनीही स्वच्छताविषयक तसेच निवास आदींबाबत सूचना केल्या.

बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, महापरिनिर्वाण दिन मानवंदना शासकीय कार्यक्रम, पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, “लोकराज्य” चा विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व निर्देश देण्यात आले.

मुंबई महापालिका महापरिनिर्वाण दिनाची विशेष माहिती पुस्तिका काढत आहे . यंदा या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिकस्तरावरील विशेष कार्य या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती संकलित केल्याची माहिती समितीचे सरचिटणीस कांबळे यांनी दिली.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीनेही नियोजनाची माहिती देण्यात आली. महापरिनिर्वाण दिन समितीचे पदाधिकारी आदींनीही विविध सूचना केल्या.

000

लातूर, धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबईदि. 29 :- लातूरधाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी संबधित विभागांनी प्राधान्य द्यावे. या  कामासाठी निश्चित कालमर्यादा आखून त्यानुसार कार्यवाही करावीअसे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.

लातूर आणि धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्यांबाबत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक झाली. बैठकीस आमदार अभिमन्यू  पवार, आमदार ज्ञानराज चौगुलेमदत व पुनर्वसन विभागाचे उप सचिव सत्यनारायण बजाजलातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेवन विभागाचे अवर सचिव गणेश जाधव यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी व लातूर आणि धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्यासन १९९३ मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही भूकंपग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्नसोडवण्यास जिल्हा प्रशासनाने व शासनाने गती देणे आवश्यक आहे. भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना वाणिज्य वापरासाठी भूखंड वाटप करण्यापूर्वी प्रत्येक गावात किती भूखंड शिल्लक आहेत याची पडताळणी करून त्याबाबतचा प्रस्ताव संबधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर करावा.

जर त्याठिकाणी भूकंपाचा तीन स्केल पेक्षा  मोठा धक्का असेल, तर त्याभागातील लोकांना मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत एनडीआरएफ च्या निकषांचा अभ्यास करून मदत दिली जावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अद्यापही जी मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी निश्चितच शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

मालकी हक्काने वाटप केलेल्या दुकानांच्या हस्तातरणांबाबत ज्या पद्धतीने शासन निर्णय घेण्यात आला आहे त्याच पद्धतीने भूकंप बाधितांच्या घरांच्या हस्तातरणांबाबत निर्णय घेण्याबाबत कार्यवाही व्हावी. भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसित वसाहतीमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांसाठीचा प्रस्ताव सादर करावा. गढीबाधित भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाच्या पुनर्वसन विभागाने कार्यवाही करावी,  ८  व्या व  ९ व्या फेरीत घरे वाटप,घरे पुनर्बांधणीपाणीपुरवठा योजना, विद्युत पंपास स्वतंत्र रोहित्र बसवणे यांचाही आवश्यक बाबींचा प्रस्ताव सादर करावाअसेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत सूचित केले.

भूकंप बाधित गावांमध्ये अद्यापि भूकंपामुळे काय परिणाम जाणवत आहेत याबाबतचा अभ्यास करून त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल सादर करावा. तसेच या गावातील महिलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत वेगळा उपक्रम सुरू करणेभूकंपग्रस्तांच्या वसाहतीमध्ये सुविधांसाठी सीएसआर (CSR) फंडातून निधी मिळणे बाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

——

सावळीविहीर येथे नवीन एमआयडीसीस मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मुंबईदि. २९ : सावळीविहीर (जि. अहमदनगर) येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीवर रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याची माहिती, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे असलेल्या सलग व समतल जमिनीचा सुयोग्य वापर करताना त्यावर औद्योगिक विकास क्षेत्र निर्मितीसह आणि रोजगार वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. व सावळीविहीर खु. तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शेती महामंडळाच्या ५०२ एकर जमिनीचा सुयोग्य वापर होणार आहे.

नवीन एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले ठिकाण शिर्डी शहरापासून ५ किलोमीटरसमृद्ध महामार्गाच्या इंटरचेंजपासून केवळ ३ किलोमीटर व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १४ किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेमार्गरस्तेमार्ग तसेच हवाईमार्गाने देशभरातील सर्व प्रमुख शहरांना अत्यंत सुलभतेने जोडणारी औद्योगिक वसाहत म्हणून भविष्यात उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. सहकार पंढरी म्हणून नावलौकीक असलेले प्रवरानगरसाईबाबांची पावनभूमी असलेली शिर्डी तीर्थक्षेत्रयाचबरोबर आता उद्योग नगरी म्हणून परिसराचा नावलौकीक होण्यास हातभार मिळणार आहे.

०००

किरण वाघ/विसंअ/

 

खंडकरी शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईदि. २९ : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यासतसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने वाटप करण्यात आलेल्या होत्या. ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी वर्ग-१  च्या जमिनी खंडाने दिलेल्या होत्या, त्या परत मिळताना त्यांना वर्ग-२ म्हणून मिळाल्याने या जमिनींचा धारणा प्रकार वर्ग-१ करुन मिळण्याबाबत खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीपासूनची मागणी होती. या खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करुन मंत्रिमंडळ बैठकीत मांडलेल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग करण्याच्या या सुधारणेमुळे ६ जिल्ह्यांतील१० तालुक्यामध्ये वाटप करण्यात आलेल्या ३८ हजार ३६१ एकर क्षेत्राचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-१ असा होणार असून सुमारे २ हजार ६०० खंडकरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या सुधारणेमुळे दीर्घ कालावधीपासूनची खंडकरी शेतकऱ्यांची मागणी पूर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच शेती महामंडळाची जमीन मिळण्याबाबत वेगवगळ्या सार्वजनिक प्रयोजनांसाठी ग्रामपंचायतींकडून मागणी करण्यात येत होती. परंतु सिलिंग कायद्यातील तरतुदीनुसार नगरपालिका हद्दीपासून ५ कि.मी. अंतराबाहेरील जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी देता येत नसल्याने या जमिनी ग्रामपंचायतींना देण्यास कायदेशीर अडचण निर्माण झालेली होती. शासकीय घरकूल योजनागावठाण विस्तार योजनाघनकचरा व्यवस्थापनपाणी पुरवठा योजना या कारणांसाठीची ग्रामपंचायतींची गरज विचारात घेऊन सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणेनुसार आता ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करुन देता येईल.

०००

किरण वाघ/विसंअ/

 

 

 आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक रोजगार निर्मितीस अधिक चालना देणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नाशिक, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व सक्षमीकरणासाठी  आदिवासी भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस अधिक चालना देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. आज सुरगाणा तालुक्यातील भोरमाळ येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक अंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दुधाळ गायी वितरण सोहळ्याप्रसंगी मंत्री डॉ. विजयकुमार गावित बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास शबरी महामंडळ नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण विशाल नरवाडे, तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी महेश पोतदार, शबरी महामंडळाचे महाव्यवस्थापक (प्रशासन/ वित्त) बाबासाहेब शिंदे, एन.डी.गावित, चिंतामण गावित, सुमुल डेअरी सूरत चे व्यवस्थापकीय संचालक अरूण पुरोहित, बॅक ऑफ बडोदाचे क्षेत्रीय उपप्रबंधक संजय वानखेडे, बँक ऑफ बडोदा पुणे वरिष्ठ प्रबंधक प्रसाद पल्लेवाड, बँक ऑफ बडोदा नाशिक वरिष्ठ प्रबंधक विक्रांत काशिकर यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यावेळी म्हणाले, रोजगाराच्या शोधार्थ महाराष्ट्रातील आदिवासींची भ्रमंती थांबावी यासाठी नवनवीन योजनांची निर्मिती करून आदिवासी बांधवांना त्यांच्या गावातच रोजागार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या सक्षमीकरणास नवी उमेद मिळणार आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्ट्रॉबेरी लागवडीस अधिक प्राधान्‍य देण्याच्या दृष्टीने त्यांना लागवडीचे प्रशिक्षण, बियाणे यासह विक्री व्यवस्थापनास आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाईल. तसेच आदिवासी भागात घेण्यात येणारी पिके, वनउपज, औषधी वनस्पती यांच्यावर प्रकिया उद्योग उभारणीस येणाऱ्या काळात अधिक प्राधान्य देणार असल्याचे मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले.

मंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले, आज आदिवासी भागात पेयजल योजनांच्या माध्यमातून घराघरात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. येणाऱ्या काळातही आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज, पाणी यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी होण्याच्या दृष्टीने शाळेतच त्याचे शिक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी शाळेतच इंटरनेट व डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेवून त्यांना भविष्यात येणाऱ्या  आव्हानांना सामोरे जायचे आहे. आज केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दुधाळ गायी वितरण लाभार्थ्यांना केले जात आहे. यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध होऊन या गायींपासून मिळणारे दूध हे गावातील केंद्रात संकलित केले जाऊन त्याचा मोबदला त्यांना बचत गटांच्या खात्यावर उपलब्ध होणार आहे. आदिवासी बांधवांना येणाऱ्या काळात अशा अनेक प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, प्राप्त संधींचे संवर्धन व जतन करून त्यांनी आर्थिक उन्नती साधावी अशी अपेक्षा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीतील बांधवांसाठी उत्पन्न निर्मितीच्या आणि उत्पन्न वाढीच्या योजनेमध्ये संयुक्त दायित्व गटांना दुधाळ जनावरांचे पालन करणे याचा समावेश आहे. सदरची योजना प्रकल्प कार्यालय नंदुरबार, धुळे, डहाणू, जव्हार व कळवण या कार्यक्षेत्रात पथदर्शी स्वरूपात शबरी वित्त व  विकास महामंडळ, नाशिक यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे तसेच त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणे, प्रकल्प क्षेत्रातील जनावरांची गणना व दुध उत्पादन वाढविणे, त्यांच्याबरोबरच उत्पादित दुधास योग्य बाजारभाव उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. गुजरात राज्यातील धरमपूर येथील बाजारातून बचत गटांना दुधाळ गायी खरेदी करता येणार असून. बचत गटांनी येथे जाऊन दोन दिवस गायींपासून प्रतिदिन मिळणाऱ्या दुधाची लिटरनुसार खात्री करून मगच गायी खरेदी करावयाच्या आहेत. या गायींपासून प्राप्त होणाऱ्या दुधविक्रीसाठी गुजरात येथील सुमुल डेअरीशी महामंडळाकडून करार करण्यात आलेला असून आदिवासी बांधवाकडून गायींचे उत्पादित दुधाचे गावातच संकलन करून त्यांचे वितरण व विक्री या डेअरीकडे केले जाणार असल्याचे शबरी महामंडळ, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.डी गावित यांनी केले तर आभार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण विशाल नरवाडे यांनी मानले. कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना दुधाळ गायी खरेदीसाठी निधीचे पत्र, धनादेश, दुधाळ गायींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले.

या संयुक्त गटांना झाले प्रातिनिधीक स्वरूपात वाटप

  • जय माता लक्ष्मी संयुक्त गट आंबेपाडे
  • बजरंगबली संयुक्त गट, बिबड
  • बिरसा मुंडा संयुक्त गट, बिबड
  • आयुष्यमित्र संयुक्त गट, सुकापुर
  • बिरसा मुंडा संयुक्त गट , चिंचले
  • कंसरा संयुक्त गट, चिंचले
  • पालवा संयुक्त गट, चिंचले
  • भोये संयुक्त गट, चिंचले
  • जय बजरंगबली संयुक्त गट, चिंचले
  • आदिवासी संयुक्त गट, चिंचले
  • बारागाव डांग संयुक्त गट, चिंचले
  • आदिवासी संयुक्त गट, बर्डीपाडा

तत्पूर्वी सुरगाणा तालुक्यातील हिरीडपाडा येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, मंडळ कृषी अधिकारी हंसराज भदाणे, मंडळ अधिकारी प्रभू गवळी, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, तलाठी स्वप्निल पाडवी, प्रशांत कडाळे, कृषी सहाय्यक राजेंद्र साबळे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...