सोमवार, जून 23, 2025
Home Blog Page 1033

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाची मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली पहिली बैठक

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची पहिली बैठक आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीला महामंडळाचे संचालक सदाशिव साळुखेसंजय दशपुते आदी उपस्थित होते.

मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी ब्रिजेश दिक्षित तसेच वरिष्ठ आर्थिक सल्लागार पदी खिमजी पांडव यांची नियुक्ती करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष मंत्री श्री. चव्हाण यांचे संचालक मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पुढील नियोजित कामांचा आढावा घेण्यात आला व त्यादृष्टीने भविष्यातील कामाची रुपरेषा आखण्यात आली.

०००

वंदना थोरात/विसंअ/

उद्योग विभागातर्फे ७ नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन; उद्योजक, निर्यातदारांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन

मुंबई, दि. २ : उद्योग विभागातर्फे मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सानेगुरुजी विद्यालयात ( भिकोबा वामन पठारे मार्ग, दादर कॅटरिंग महाविद्यालयाजवळ, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई) सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत सीडबी (SIDBI), आयडीबीआय (IDBI) या संस्थांच्या सहकार्याने  एकदिवसीय इंडस्ट्री ॲण्ड गव्हर्न्मेन्ट नेटवर्किंग फॉर इनक्ल्युजीव्ह ट्रान्स्फॉर्मेशन ॲण्ड इनव्हायर्मेन्ट या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग उपसंचालक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादन वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभागांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येत आहेत. सर्व उद्योजकांना या योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने इंडस्ट्री ॲण्ड गव्हर्न्मेन्ट नेटवर्किंग फॉर इनक्ल्युजीव्ह ट्रान्स्फॉर्मेशन ॲण्ड इनव्हायर्मेन्ट (IGNITE MAHARASHTRA) याविषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा होईल. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर अध्यक्षस्थानी असतील.

या कार्यशाळेस उद्योजक, निर्यातदारांनी उपस्थित राहावे. उपस्थितीबाबत उद्योग सहसंचालक, मुंबई प्रादेशिक विभाग, चेंबूर, मुंबई किंवा मोबाईल क्रमांक ९५९४३८१२६६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

गोपाळ साळुंखे/ससं/

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. २ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत देण्यात आली होती. ३१ ऑक्टोबर पर्यंत सुमारे ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मंत्री श्री. मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

मंत्री श्री. मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री श्री. मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावाअसे आवाहनही केले आहे.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास

मुंबईदि. 2 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर येथील ‘पर्यटक निवास राज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येत आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचलिका श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि महाव्यवस्थापक  चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवासराज्यातील प्रथम पूर्णत: महिला संचालित पर्यटक निवास म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे. येथील सर्व कर्मचारी या महिला असून येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आणि आदरातिथ्याचा अनोखा अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज झाले आहे. पर्यटक निवासात आलेल्या बंगाली पर्यटक सुतापा चॅटर्जी यांच्या हस्ते आज मुंबई, छत्रपती संभाजी नगर, खारघर येथे महिला संचलित पर्यटक निवासाचा  शुभारंभ करण्यात आला.

महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग  हा महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेवृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण शासनाद्वारे राबविण्यात येत आहे.

राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित धोरण आखण्यात आले असून त्याच्या पंचसुत्रीनुसार हे धोरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व पर्यटन संचालनालय यांच्यामार्फंत सर्व विभागांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांनी तसेच पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर व अर्का उपहारगृहखारघर येथे मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात येणार असून त्याअनुषंगाने सर्व प्रादेशिक कार्यालये व पर्यटक निवासे येथे आई” महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे.

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना (होम स्टे, हॉटेल /रेस्टारंटटूर ॲण्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विविध प्रोत्साहने आणि सवलती देण्यात येणार आहेत. नोंदणीकृत पर्यटन व्यवसायामध्ये कार्यरत असलेल्या महिला सहल मार्गदर्शकमहिला वाहन चालकमहिला सहल संचालक (टूर ऑपरेटर) व इतर महिला कर्मचारी यांना केद्र आणि  राज्य शासनाच्या विमा योजनेमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फंत आयोजित पर्यटन सर्किंट / पॅकेजस मध्ये महिला पर्यटकांना विविध सवलती देण्यात येत असून महामंडळाच्या सर्व रिसॉर्टस/युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठराविक कालावधीत फक्त ऑनलाइन बुकिंगमध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणीमहिला बचत गटांना हस्तकलाकलाकृतीप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादीच्या विक्रीसाठी स्टॉल / जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टसमध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा जसे कीअपंग किंवा वृद्ध महिलांकरीता लिफ्ट जवळच्या खोल्या उपलब्ध करुन देण्यास प्राधान्यमहिलांसाठी विशेष खेळमनोरंजन कार्यक्रमांचे आयोजनमहिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस ज्येष्ठ महिला नागरिकांसाठी सहल. इ. बाबी प्रामुख्याने राबविण्यात येणार आहेत.

महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढविणे आणि सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्राधान्याने काम करीत असून त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटक निवासामध्ये 82 खोल्या त्यामध्ये लक्झीरियस सूटस पासून स्टॅडर्ड रूम अशी वगर्वारी आहे. हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. निवासामध्ये उपहारगृह असुन विविध स्थानिक पदार्थ आणि रुचकर जेवणाची मेजवानी सदरच्या उपहारगृहामध्ये उपलब्ध आहे. या पर्यटक निवासामध्ये प्रशस्त लॉन असुन मुलांसाठी विविध खेळणी आहेत. साधारणपणे 50 लोकक्षमतेचा कॉन्फरन्स हॉल उपलब्ध असून आगामी काळात या ठिकाणी जलतरण तलावबॅडमिंटन कोर्टमहिला व्यायामशाळा अशा सुविधा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहेछत्रपती संभाजीनगरवासियांनी आणि राज्याच्या पर्यटन राजधानीत येणाऱ्या पर्यटकांनी सदरच्या उपक्रमात यापुढेही सहभाग घेवुन भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा जपत पर्यटनाचाही आनंद द्विगुणित करावाअसे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक  दीपक हरणे यांनी केले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई, दि. 2 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि. 1) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढमध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी छत्तीसगड येथील चित्रोत्पला लोककला परिषद तसेच आंध्र प्रदेशातील तेलुगू कला समिती यांच्यावतीने तिन्ही राज्यांच्या लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. 

यावेळी बोलताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीआद्य शंकराचार्यांनी संपूर्ण देशाला समान संस्कृतीच्या धाग्याने जोडण्याच्या उद्देशाने देशाच्या वेगवेगळ्या दिशांना चार मठांची स्थापना केली. धर्माचे अधिष्ठान दिल्यास नागरिक एका भागातून दुसऱ्या भागात पर्यटनाला जातील व त्यातून नव्या संस्कृतीची ओळख होईलया उद्देशाने त्यांनी पीठांची स्थापना केलीअसे नमूद करुन एक भारत श्रेष्ठ भारत‘ या उपक्रमातून प्रत्येक राज्याने इतर राज्याची संस्कृती जाणून घ्यावीया हेतूने सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

देशभरातील सर्व राजभवनांमध्ये 1 नोव्हेंबरला या एकाच दिवशी 8 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिन साजरे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  महाराष्ट्र राजभवन येथे हरियाणाकर्नाटककेरळपंजाब व तामिळनाडू तसेच पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस देखील बुधवारी (दि. 1) दुपारी साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

छत्तीसगड राज्य स्थापनेसाठी आपण स्वतःआग्रही होतो. तत्कालिन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात काम करीत असतानाच त्यांनी छत्तीसगड राज्य स्थापनेची घोषणा केलीयाचे स्मरण देऊन महाराष्ट्राचा राज्यपाल या नात्याने राजभवनात छत्तीसगड स्थापना दिवस साजरा करणे आपल्यासाठी सुखद अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कलाकारांचे अभिनंदन करताना संगीत आणि नृत्य हे भाषाजात तसेच धर्माच्या सीमा ओलांडून थेट हृदयाला स्पर्श करतात, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपाल श्री.बैस यांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ तेलुगू अभिनेते सुमन तलवारचित्रोत्पला लोक कला परिषदेचे संचालक राकेश तिवारीतेलुगू कला समितीचे एम.के. रेड्डी आणि कुचीपुडी नृत्यांगना नादिया यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रनागपूर यांच्या माध्यमातून चित्रोत्पला लोककला परिषदेच्या वतीने छत्तीसगढ गीतजंवारा गीतकरमा नृत्यनाचा गीत नृत्यफाग गीत नृत्य व मध्य प्रदेशातील कलाकारांचे कबीर गायन (माळवा शैली) सादर करण्यात आले. तेलुगू कला समितीच्या माध्यमातून नृत्यांगना नादिया यांनी कुचीपुडी नृत्य सादर केले.  

कार्यक्रमाला राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेनाराज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल व परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच छत्तीसगढमध्यप्रदेश व आंध्रप्रदेश येथील कलाकार व निमंत्रित उपस्थित होते.   

०००

State Formation Day of Chhattisgarh, MP and Andhra Pradesh celebrated in

Maha Raj Bhavan

Mumbai 2 : The State Formation day of Chhattisgarh, Madhya Pradesh and Andhra Pradesh was celebrated in Maharashtra Raj Bhavan in the presence of State Governor Ramesh Bais on Wed (1 Nov).

 A cultural programme comprising folk songs and dance from Chhattisgarh, Madhya Pradesh and Andhra Pradesh was presented to mark the event.

Speaking on the occasion, Governor Ramesh Bais said the States of India formed a beautiful bouquet decorated with flowers of different colours. The Governor said Adi Guru Shankaracharya established four Mathas in different corners of the country with a view to weaving the country in a thread of common culture.  He said the idea behind setting up the peethas was to encourage people to travel to different parts of the country and learn more about the region’s customs and traditions.

He said thanks to the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative, Raj Bhavans across the country were celebrating the State Formation Day of 8 States and 5 union territories on a single day of 1st November. He informed that Maharashtra Raj Bhavan had celebrated the State Formation Day of Haryana, Karnataka, Kerala, Punjab and Tamil Nadu alongwith that of 5 Union Territories earlier in the day on 1 Nov.

The Governor said music and dance transcend the borders of language, caste or religion and touch the core of one’s heart. In this connection he applauded all the performing artists for their excellent presentation.

The Governor felicitated Telugu film star Suman Talwar, Director of Chitrotpala Lok Kala Parishad Chhattisgarh Rakesh Tiwari, M K Reddy of Telugu Kala Samiti and Kuchipudi dancer Nadiya.

The cultural programme comprising of Chhattisgarh Geet, Janwara Geet, Karma Dance, Nacha Geet Dance, Fag Geet was presented by members of the Chitrotpala Lok Kala Parishad, while and artists from Madhya Pradesh presented the Kabir Gayan (Malwa style). The Kuchipudi Dance was performed by Nadiya on behalf of Telugu Kala Samiti.

The programme was organised by Maharashtra Raj Bhavan in association with the South Central Zone Cultural Centre, Nagpur, Chitrotpala Lok Kala Parishad Chhattisgarh and Telugu Kala Samiti.

Special Secretary to the Governor Vipin Kumar Saxena, Secretary to the Governor (In Charge) Shweta Singhal, Comptroller of the Governor’s Households Arun Anandkar, artists and invitees from Chhattisgarh, Madhya Pradesh and Andhra Pradesh were present.

000

कलेचे रूपांतर झाले केशकर्तनालयात

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सावर्णे या गावचा राजेश अनंत भला हा आदिवासी ठाकूर सुशिक्षित बेरोजगार राजेश अनंत भला या तरुणाने रोजगाराची भटकंती सोडून केशकर्तनालयाचा छंद आणि कलेचे रूपांतर आदिवासी विकास प्रकल्पाच्या आर्थिक सहाय्यातून आत्याधुनिक केशकर्तनालयाच्या व्यवसायात केले. राजेशची आता आर्थिक उन्नतीकडे आत्मविश्वासाने वाटचाल सुरू झाली आहे, राजेशची ही यशोगाथा आदिवासी बेरोजगारांना स्फूर्ती देणारी ठरावी.

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सावर्णे गाव माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले आदिवासी समाजबहुल गाव ठाणे शहरापासून 115 किलोमीटर अंतरावर आहे. सावर्णे गावची लोकसंख्या सुमारे 500 असून राजेश अनंत भला या गावचा रहिवासी आहे. बारावी पर्यंत शिक्षण घेतलेला सुशिक्षित बेरोजगार तरुण. राजेशचे वडील तुटपुंजी शेती करतात, त्यांच्या शेती कामाला तो मदत करीत असे. शेतीनंतर रोजगारासाठी आजूबाजूच्या गावात भटकंती हा या कुटुंबाचा दिनक्रम.

या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी राजेशने मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील पोष्ट बेसिक आश्रमशाळेत बारावी पर्यंत शिक्षण घेतले. बारावी नंतर तो आठ महिने बेरोजगार होता. आता या बेरोजगारीतून बाहेर पडायचे तर काहीतरी करायचेच असा चंग त्याने मनाशी बांधला. पण कमी भांडवलामुळे व्यवसाय करण्याचे धाडस त्याला होईना. त्याला केशकर्तनाच्या कामाची आवड होती. त्याने ही कला छंद म्हणून जोपासण्याचा निर्णय घेतला. त्याने सावर्णे  या आपल्या गावच्या घरातच कमी भांडवलातील केशकर्तनालयाचा व्यवसाय करण्यासाठी एक छोटा आरसा, कैची, वस्तरा, दाढीचे सामान खरेदी करून घरच्या घरी केस कापणे आणि दाढीचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या या प्रामाणिक व्यवसायाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने त्याची आर्थिक कमाई वाढू लागली. राजेश आता स्वत:च्या पायावर उभा राहिला.

राजेशने केशकर्तनालयाचा व्यवसाय मोठ्या गावात किंवा शहरात जाऊन अत्याधुनिक स्वरूपात करण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज होती. राजेशचे जिवलग छायाचित्रकार मित्र श्री.जयराम मेंगाळ यांनी त्याला आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या अर्थसहाय्य योजनेची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार राजेश भला याने शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील न्यूक्लिअस  बजेट योजनेसंबंधी काम करणारे लिपिक श्री.अनिकेत दत्तात्रय पष्टे यांनी त्याच्या नियोजित व्यवसाय आणि अनुभवाची माहिती घेऊन अनुदान मागणीच्या अर्जाचा नमूना दिला आणि सोबत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.

राजेशने लागलीच कागदपत्रांची पूर्तता करून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी श्री. राजेंद्रकुमार हिवाळे यांच्याकडे विहित नमुन्यात अनुदान मागणीचा अर्ज सादर केला. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सुचने नुसार त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक श्री. सखाराम गोपाळ भोये यांनी राजेशच्या केशकर्तनालयाच्या अनुभवाची खात्री करून तो जय ठिकाणी सदरचा व्यवसाय सुरू करणार आहे त्या गाळ्याची पहाणी करून तांत्रिक बाबींची पूर्तता करून घेतली आणि राजेशचा अनुदान मागणीचा प्रस्ताव प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मंजुरी साठी सादर केला. प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी तो अग्रक्रमाने मंजूरही केला.

त्यानंतर राजेशने बँक ऑफ महाराष्ट्र न्याहाडी शाखेत बचत खाते उघडून नियमानुसार लाभार्थीचा आर्थिक सहभाग म्हणून रु. 6 हजार 750 मात्र बँकेत जमा केले. त्यानंतर त्याला सन 2021-2022 या आर्थिक वर्षात शासनाकडून मंजूर झालेल्या 39 हजार 250 रुपयांची अनुदानाची रक्कम मिळून त्याच्या खात्यावर 45 हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली.

राजेश भला याने नजीकच्या कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मोरोशी नाका येथे भाडे तत्वावर एक गाळा घेऊन मिळालेल्या अनुदानातून केशकर्तनालयासाठी लागणारे साहित्य जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून खरेदी केले. त्यातून गोल फिरणाऱ्या खुर्च्या, आरसे, लहान मोठे कंगवे, वस्तारा, ट्रिमर मशीन, ब्लेड, केस रंगविण्यासाठी विविध रंगांचे कलफ, ब्रश, दाढीचे शेव्हींग क्रीम, स्प्रे, दाढीचे ब्रश, कापडी अप्रॉन, कैची, आफ्टर शेव्हींग लोशन, इत्यादि आवश्यक सामान खरेदी केले.

आवडीचा व्यवसाय करायला मिळाल्यामुळे लवकरच राजेश व्यवसायात चांगला स्थिर झाला आणि त्याचे कामही चांगले असल्यामुळे ग्राहकांची संख्याही वाढू लागली. मिळालेल्या नफ्यातून त्याने दुकानाच्या अंतर्गत सजावटीसह आधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई, पंखे, प्रतिक्षेत असणाऱ्या गिऱ्हाईकांना लाकडी बाकडा असे इतर साहित्य खरेदी केले. राजेशचे आर्थिक उत्पन्न वाढू लागले, परंतु सामाजिक बांधिलकीतून गावच्या गरजू बांधवांच्या बारसे, मुंज, उत्तरकार्यासाठी मुंडण अशी कामे नाममात्र मानधनात करण्याचे कर्तव्यही निभावत आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे केंद्रवर्ती अर्थसंकल्प  म्हणजेच न्यूक्लिअस बजेट अंतर्गत अनुदानातून आदिवासी आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगारातून आर्थिक उन्नतीकडे नेणारी योजना आहे. राजेश भला या आदिवासी ठाकूर जमातीच्या तरुणाला स्वयंरोजगारासाठी आर्थिक अनुदान मिळाल्याने त्याचा भाग्योदय झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील अशा अनेक आदिवासी बांधवांसाठी ही योजना वरदानच ठरली आहे, असे प्रकल्प अधिकारी श्री. राजेंद्रकुमार हिवाळे यांनी सांगून राजेशच्या पुढील वाटचालीचे मनापासून कौतुक केले आहे.

00000

लेखक :-

धनंजय प्र. कासार

सहाय्यक छायाचित्रकार

जिल्हा माहिती कार्यालय

ठाणे

 

 

महाराष्ट्र इंटरनॅशनल रोजगार सुविधा केंद्राला सहकार्यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची अमेरिकन शिष्टमंडळाशी चर्चा

मुंबई, दि. 1 : अमेरिकेत रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राला सहकार्य मिळण्याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अमेरिकन शिष्टमंडळाशी आज चर्चा केली.

सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या  ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या  आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राबाबत अमेरिका आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने परदेशातील रोजगाराच्या संधीसाठी भविष्यातील सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी  अमेरिकन शिष्टमंडळ उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, विभागाच्या माध्यमातून किमान 900 आयटीआय मध्ये 90 पेक्षा अधिक विविध अभ्यासक्रम (ट्रेड) शिकवले जातात. दरवर्षी दीड लाख युवकांना या माध्यमातून कौशल्य विकास केले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल, रिस्क‍िल आणि अपस्किल या संकल्पनांना प्रोत्साहन दिलेले आहे. महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रामार्फत परदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या  राज्यातील  उमेदवारांची नोंदणी, माहिती संकलन तयार करणे, प्रशिक्षण देणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अमेरिकेमध्ये विविध क्षेत्रात लागणारे कुशल मनुष्यबळ करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आणि त्यासाठी लागणारे सहकार्य याची यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर, राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे, अमेरिकेच्या विविध प्रांताचे प्रतिनिधी इलरीच, कंट्री कौन्सिलचे प्रतिनिधी इव्हन ग्लास, काउंटी कौन्सिलचे अध्यक्ष टॉम किन्स, सदस्य अमिताभ वर्षाने, अश शेट्टी, जुडी कॉस्ट‍िल्यू, महेश कळवा, अंजू अग्रवाल, सागर सावंत, मोझेस हेन्री, डॅनियल निडकी, कौंबा ग्रवेस, पवन बेझवाडा यासह अमेरिकेच्या विविध प्रांतातील उद्योगपती, विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिकारी, प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र  शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, वैद्यकीय आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; मानधन वाढीसह मिळणार दिवाळी भेट – सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. 1 : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, 3 हजार 664  गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधन वाढ, आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका, संघटनांचे  प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी  उपस्थित होते.  राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 हजारावर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी  आशा सेविकांना 5 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी मानधनात 7 हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावरूनही  3 हजार रुपये मानधन दिले जाते.  त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15 हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

राज्यात 3 हजार 664 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. यापूर्वी गट प्रवर्तकांना 6 हजार 200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी आज 6 हजार 200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे.  गट प्रवर्तकांना केंद्रशासनस्तरावरूनही 8 हजार 775 रुपये मानधन मिळत असून,  त्यांना आता 21 हजार 175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. या बैठकीत  आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपये दिवाळी भेटही देणार असल्याची  घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली आहे. आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ व दिवाळी भेट देऊन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड केली आहे. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : – ‘संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे प्रतीक आहेत. त्यांचा पुतळा उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरेल,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

विख्यात क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या भव्य पुतळ्याचे आज वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने  तेंडुलकर यांचा हा २२ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. ढोल ताशांच्या गजरात या पुतळ्याचे दिमाखात अनावरण झाले.

या सोहळ्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआयचे खजिनदार आमदार ॲड. आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अजिंक्य नाईक, सहसचिव दीपक पाटील, खजिनदार अरमान मलिक, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आदी तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक ‘मास्टर ब्लास्टर’ क्षण आहे. आज या मैदानावर दोन – दोन ‘मास्टर ब्लास्टर’ आहेत. एक मूर्तिमंत..आणि एक मूर्तीबद्ध. सचिन हा क्रिकेटचा देव आहे. सचिनने आपलं करिअर याच मैदानातून सुरु केले आणि याच मैदानात कारकीर्दीमधील अखेरच्या बॉलचा सामना केला. भारत विश्र्वचषकाचा विजेता बनावा हे सचिनचे स्वप्न याच स्टेडियमवर पूर्ण झाले आहे. क्रिकेट विश्वात दुसरा सचिन होणे नाही. पण, मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी तो चमत्कार करून दाखवला आहे. सचिन तेंडुलकर या नावात स्फूर्ती आहे. संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे सचिन प्रतीक आहेत. हा पुतळा तरुणांना आपले ध्येय गाठण्यासाठी मोठी ऊर्जा देणारा आणि क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल. सचिन हा भारताने जगाला बहाल केलेला चमत्कार आहे. इतर देशांकडे क्रीडा क्षेत्रातील आश्चर्य, विक्रम असतील. पण सचिन हेच एक मूर्तिमंत आश्चर्य आपल्याकडे आहे. तो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. याचाही सार्थ अभिमान आपल्याला आहे. त्यांचा हा पुतळा वानखेडे स्टेडियमच्या वैभवात, गौरवात भर घालणारा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सचिन यांचे चौकार, षटकार अनुभवले की आपली दिवसभराची मरगळ झटकली जाते. मन प्रसन्न होतं. लता दिदींच्या स्वरांनीही आपलं मन असंच प्रसन्न होतं. लता दिदींनीही सचिन यांच्या बॅटींगवर भरभरून प्रेम केलं. लता दिदींचे स्वर आणि सचिनच्या बॅटमधून निघणाऱ्या धावांचा वर्षाव या दोन्ही गोष्टी अजरामर आहेत. जगाच्या अंतापर्यंत राहणाऱ्या आहेत. जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींचे विश्व समृद्ध केल्याबद्दल भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे आभारच मानायला हवेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मास्टर ब्लास्टर सचिन यांनी, ‘वानखेडे स्टेडियम येथील हा पुतळा माझा बहुमान असल्याचे आणि हा बहुमान आपल्यासोबत क्रिकेटमध्ये सहकारी राहिलेल्यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. सदैव मी माझ्या देशासाठी क्रिकेट खेळलो. या मैदानाने मला खूप काही दिले आहे. इथे आल्यावर माझ्या मनात अनेक आठवणींची गर्दी उसळते. माझ्या आवडत्या मैदानावर माझा पुतळ्याच्या रुपात बहुमान होत आहे. तो मी विनम्रपणे स्वीकारत आहे. यावेळी सचिन यांनी आपल्या कारकीर्दीतील वेगवेगळ्या टप्प्यांचा उल्लेख केला. अनेक किस्सेदेखील सांगितले.

ज्येष्ठ नेते खासदार श्री. पवार म्हणाले की, ज्या मैदानावर खेळाच्या माध्यमातून कर्तृत्व गाजवले, त्याच ठिकाणी पुतळा उभारला जावा, असा बहुमान फार क्वचित व्यक्तिमत्वांना मिळतो. या पुतळ्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, कारण त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आहेत. त्यांनी सन्मान डोक्यात शिरू दिला नाही.’ यावेळी श्री.पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशने क्रिकेटचे म्युझियम निर्माण करावे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी स्वतंत्र दालन असावे अशी सूचनादेखील केली.

बीसीसीआयचे सचिव श्री. शाह म्हणाले की, सचिन यांनी देशाच्या क्रिकेटला कुटुंबापेक्षा अधिक प्राधान्य दिले. त्यांचे क्रिकेटसाठीचे योगदान उत्तुंग असे आहे. यावेळी श्री. शाह यांनी सचिन यांच्या फलंदाजीतील धावसंख्या आणि त्यातील योगायोग यांचा आवर्जून उल्लेख केला.

यावेळी पुतळ्याचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष श्री. शुक्ला यांचे समयोचित भाषण झाले.

दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासाठी इच्छुक संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 1 : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यास इच्छुक अशा नामांकित नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था/ अशासकीय  संस्थांनी बातमी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

संस्थांनी पुढील अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे.

अटी व शर्ती

1)स्वयंसेवी संस्था ही संस्था नोंदणी अधिनियम, 1860 अंतर्गत आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950अंतर्गत नोंदणीकृत असावी.

2) संस्थेकडे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 कायद्यातील कलम 50 व 51 नुसार दिव्यांग क्षेत्रात पुनर्वसन विषयक काम करण्यासाठी आवश्यक असलेले नोंदणी (अनुज्ञाप्ती) (वैध)प्रमाणणपत्र असावे. (मा. आयुक्त,

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांचेकडील)

3) संस्थेच्या कार्यकारणीमध्ये कोणताही वाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात नसावा.

4) जिल्ह्यातील रेड क्रोस सोसायटी /निमशासकीय संस्था यांना प्राधान्य देण्यात येईल.

5) संस्थेच्या ध्येय आणि उद्दिष्टामध्ये संस्था दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात कार्य करण्याबाबत उल्लेख असावा.

6)धर्मादाय आयुक्त यांचेकडील संस्थेच्या कार्यकारिणीस मान्यता देण्यात देण्यात आलेले शेड्यूल-1 व सध्या कार्यरत असलेल्या कार्यकारिणीची यादी

7) संस्थेने यापूर्वी दिव्यांग कल्याणविषयक कार्यक्रम, कॅम्प आयोजित केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. (कार्यक्रम आयोजित केल्याचे पुरावे जसे, फोटो, पेपर कात्रणे, व्हिडिओ लिंक व लाभार्थी यादी  इत्यादी सोबत जोडावे.

8) दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यास संस्थेकडे किमान 400 चौ.मी जागा असणे आवश्यक आहे.

9) संस्थेने मागील ३ वर्षांचे वार्षिक कार्य अहवाल (Annual Reports) सादर करावा ज्यामध्ये दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात  कार्य केल्याचा उल्लेख असावा.

10) संस्थेचा कार्य अहवाल ( वार्षिक अहवाल) आणि वार्षिक उलाढालीचा लेखापरीक्षण अहवाल ऑडिट रिपोर्ट जोडावा.

11) संस्थेच्या बँकेचा तपशील व खात्यामधील जमा रक्कम तसेच विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ठेवीची माहिती.

12) संस्थेच्या अर्जासोबत खालील गोष्टीचा समावेश असावा:

(a) संस्था नोंदणी तथा संस्थेचे दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात कार्य करण्याचे प्रमाणपत्र.

  1. b) संस्थेच्या वतीने अटी व शर्तीची स्वीकृती / संमतीचे अधिकृत स्वाक्षरीसह प्रमाणपत्र (संस्थेच्या लेटर हेड वर)

(c) कोणत्याही सरकारी एजन्सीने फर्म / कंपनीच्या काळ्या यादीमध्ये ठेवलेले नाही, असे हमीपत्र (रु. 100/- च्या स्टम्प   पेपरवर).

(d) अर्जात नमूद केलेले सर्व नियम व शर्ती त्यांनी वाचल्या आहेत आणि समजून घेतल्या आहेत आणि अशा अटी व  शर्तीनुसार केंद्र चालविण्यास इच्छुक असल्याचे प्रमाणपत्र.

  1. e) अर्ज सादर करतांना संस्थेचे आयकर प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड, व्हॅट / जी.एस.टी. प्रमाणपत्र याची छायांकित प्रत सोबत जोडावी
  2. f) या अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्र खरी असल्याबाबतचे हमीपत्र / प्रतिज्ञापत्र.

13) या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकरिता आवश्यक असलेला निधी/ अनुदान हा टप्प्या-टप्प्याने कार्यांची समाधानकारक स्थिती आणि कामगिरी बघून दिव्यांग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांकडून देण्यात येतो, त्यामुळे संस्था शासनाच्या अनुदानाशिवाय स्वबळावर चालविण्यास समर्थ असल्याचे लेखी  हमीपत्र (रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर) सादर करावे.

14) ज्या संस्थेची या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासाठी निवडीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर व त्यास सक्षम अधिका-याची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर संस्थेने कार्यादेश निर्गमित केल्याच्या 21 दिवसाच्या आत सदर केंद्राला सुरुवात करावी लागेल.

16) अर्जातील कोणत्याही स्वरुपातील त्रुटी आणि अपूर्ण अर्ज पूर्णपणे नाकारण्याचा अधिकार  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर  यांना आहेत.

17) हे केंद्र स्थापने संबंधित कोणत्याही कलमाबाबत व अन्य कोणत्याही नियमांबाबत विवाद निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर  यांचा निर्णय अंतिम राहील, त्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार / सूचनेची दखल घेतली जाणार नाही.

18 ) संस्थांनी बातमीच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत अर्ज या कार्यालयास सादर करावा.

****

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन

0
मुंबई, दि. 22 : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे एअर इंडियाच्या विमानाने रात्री ११ वाजता आगमन झाले. यावेळी ...

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २२: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण करायचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही काळामध्ये...

मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील एसटीपी प्रकल्प तात्काळ मार्गी लावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, ता. २२ :- नागनदीतील प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी नागपूर महानगराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे. यासाठी...

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

0
मुंबई, दि. २२ : भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित...

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
नागपूर, दिनांक २२ : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याला भाविकांची होणारी अलोट गर्दी व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात लागणाऱ्या रस्त्यांच्या सुविधा, आवश्यक रस्त्यांची निर्मिती ही केंद्रीय...