सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1006

विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृश्य संवादाने काल्हेर ग्रामस्थ झाले प्रेरित

ठाणे, दि.9(जिमाका)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन हे सर्वसामान्यांकरिता काम करणारे शासन आहे.  विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक गरजू लाभार्थ्याचा शोध घेतला जात आहे. त्याला योजना समजावून सांगितली जात आहे आणि त्याचा प्रत्यक्ष लाभही दिला जात आहे. यामुळे लाभार्थ्यांना होणारा त्रास आता होत नाही. यातून एक बाब निश्चितपणे सिद्ध झाली आहे की, हे शासन केवळ घोषणा करणारे नसून थेट कामच करणारे शासन आहे, असे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत येथे आयोजित “विकसित भारत संकल्प यात्रा” व “मा.पंतप्रधान महोदयांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी थेट संवाद” या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री.कपिल पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, प्रकल्प संचालक डॉ.छायादेवी शिसोदे, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, दूरदर्शन संचालक सिद्धार्थ बोडके, तहसिलदार अधिक पाटील, जि.प.महिला व बाल विकास अधिकारी संजय बागूल, आरोग्य संचालनालयाचे सहायक संचालक डॉ.चाकूरकर, केंद्रीय संचार ब्युरो, पुणेचे प्रबंधक डॉ.जितेंद्र पानपाटील, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे,  स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले, देशातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ थेट पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “विकसित भारत संकल्प यात्रा” ही संकल्पना राबविण्याचा निश्चय केला आहे. त्यादृष्टीने देशभरात एक चैतन्याचे वातावरण बनले आहे. या संकल्पनेवर आधारित “शासन आपल्या दारी” ही संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहत राबविली जात आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी 75 लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात शासन यशस्वी झाले आहे.

पालकमंत्री श्री.देसाई यांनी या कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल व अन्य संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्याच्या कामातील स्पर्धा सुदृढ होण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला शुभेच्छा दिल्या व शेवटी सर्वांना आश्वस्त केले की, कोणत्याही शासकीय योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यकता असल्यास त्या योजनेच्या अटी, नियम, शर्तींमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासन स्तरावर नक्कीच प्रयत्न केले जातील.

विकसित भारत संकल्प यात्रा” सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारकेंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “विकसित भारत संकल्प यात्रे” चे आयोजन संपूर्ण भारतात करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्याचा शोध घेणे, त्याला योजनांची माहिती देणे, त्याला प्रत्यक्ष लाभ तात्काळ देणे, या प्रकारचे काम सुरू आहे. लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी शासन आणि शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्नशील आहे. जनतेने गेल्या साडेनऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य नागरिकांरिता ज्या पद्धतीने काम करून दाखविले आहे यातूनच त्यांची देशवासियांप्रति असलेली निष्ठा, तळमळ दिसून येते. हे शासन गरिबांसाठी, गरजूंसाठी समर्पित असून त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. यातून संपूर्ण भारतवासियांमध्ये “आपला भारत देश महासत्ता बनणारच” हा विश्वास जागृत झाला आहे. याचबरोबर श्री.पाटील यांनी यावेळी दि.1 जानेवारी 2024 पासून ठाणे जिल्ह्यातील 452 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची घोषणा केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी महोदयांनी मंत्री महोदयांना आश्वस्त केले की, जिल्हा प्रशासनातील प्रत्येक शासकीय विभाग “विकसित भारत संकल्प यात्रे”च्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्या लाभार्थ्यांना आवश्यक तो शासकीय योजनेचा लाभ देईल. या कामात ठाणे जिल्हा अग्रेसर राहील.

          या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.प्रमोद काळे यांनी विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवंडी पंचायत समितीचे विषय तज्ञ डॉ. विनायक पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धनके यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी विकसित भारत संकल्पनेबाबतची  सामूहिक शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमस्थळी  स्टेट बँक ऑफ इंडिया-अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, सही पोषण देश रोशन, आरोग्य विभाग-आयुष्यमान भारत योजना, क्रीडा-बॅडमिंटन प्रशिक्षण, प्रधानमंत्री आवास योजना, आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, ड्रोनद्वारे किटकनाशक फवारणी प्रात्यक्षिक या विषयांबाबतचे स्टॉल उभारण्यात आले होते. या ठिकाणी लाभार्थ्यांची नोंदणी देखील करण्यात येत होती.

विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दूरदृश्य संवादाने काल्हेर ग्रामस्थ झाले प्रेरित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या देशभरातील कनार्टक, गुजरात, चंदीगड, जम्मू-काश्मीर, बिहार, झारखंड अशा  विविध राज्यातील लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीव्दारे थेट संवाद साधला. श्री.मोदी यांनी या संवादातून शासनाच्या विविध योजना व योजनांचे लाभ याविषयी लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेतले. संपूर्ण देशातील नागरिक ‘विकसित भारत संकल्प यात्रे’शी जोडले गेले आहेत. ‘विकसित भारत’ हा संकल्प सत्यात आणण्यासाठी प्रत्येक भारतीय मनापासून प्रयत्न करताना दिसत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ वंचितांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. काल्हेर ग्रामस्थ प्रधानमंत्र्यांच्या या संवादामुळे प्रेरित झाल्याचे चित्र दिसत होते.

000000

 

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट

पुणे, दि.९: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत जखमी रुग्णांची ससून रुग्णालयात भेट घेऊन संवाद साधला. ‘घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’ अशा शब्दात त्यांनी रुग्णांना धीर दिला. ससून रुग्णालयात या सर्व रुग्णांवर आवश्यक उपचाराची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी घडलेल्या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तलयाच्या सहायक पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. विनायक काळे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

घटनेबद्दल माहिती घेऊन श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेत बाधित कुटुंबाला प्रधानमंत्री कार्यालय तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक ती मदत करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

‘रेड झोन’ मधील नागरिकांबाबत केंद्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय होण्याच्याअनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यसॊबत चर्चा करण्यात येईल. बाधित झालेल्या कुटुंबियांसाठी सामाजिक सुरक्षेची योजना राबविण्यात यावी. आपत्तीजनक परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देता यावा या अनुषंगाने पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन विभागाने मोहिम हाती घ्यावी. अशा घटना टाळण्यासाठी महानगरपालिका, उद्योग विभागाने मोहिम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

विकसित भारत संकल्प यात्रा संवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित

नागपूर, दि. 9 : विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संवाद कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

नागपुरात महा रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या हजारोच्या संख्येतील तरुणाईने हा संवाद विद्यापीठाच्या परिसरातील भव्य व्यासपीठावर बघितला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दटके, प्रसाद लाड, अभिमन्यू पवार, विकास कुंभारे, आशिष जायस्वाल, मोहन मते, कृष्णा खोपडे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, टेक महिंद्रा कंपनीचे सीईओ निखील अलुरकर यावेळी उपस्थित होते.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना आणि उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विविध राज्यांतील लाभार्थ्यांना संबोधित केले. योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी  चर्चा करून त्यांचा अनुभव जाणून घेतला.

000000

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दवाखाना आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ

नागपूर, दि. 9 : जिल्हा खनिज प्रतिष्टान निधीतून ‘दवाखाना आपल्या दारी’ या उक्रमाचा शुभारंभ आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य वाहिनी व फिरत्या वैद्यकीय चमुच्या सहाय्याने सर्वसमावेशक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

उद्गाटनप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशीष जायस्वाल, सुभाष देशमुख, प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, महानगरपालिका आयुक्त डॅा. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा.विपीन इटनकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले यांच्यासह जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांची एकत्रितपणे अंमलबजावणी एका छताखाली या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. आवश्यक औषधी व साधनसामुग्री तसेच आरोग्य चमूसह ‘आरोग्यवाहिनी’ सुसज्ज असणार आहे. एएनएम, डाटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य सहाय्यक यासह डॉक्टरांची चमू आरोग्यवाहिनी उपस्थित  असणार आहेत.

आरोग्य चमूचा दैनंदिन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. प्रत्येक गावात शिबिराच्या एक दिवस आधी विविध माध्यमांसह दवंडी देऊन जनतेला माहिती देण्यात येणार आहे. या पथकामार्फत आऱोग्य सेवांसोबतच आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजनेची नोंदणी करण्यात येईल. आवश्यक रक्त चाचण्या तसेच रुग्णांना पुढील सेवेसाठी संदर्भित करण्यात येणार आहे.

00000

नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा ‘नमो महारोजगार मेळावा’-  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.9 : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात होत असलेला आजचा नमो महारोजगार मेळावा जागतिक दर्जाचा आहे. हा मेळावा रोजगार देणारे आणि घेणारे यांचे संयुक्त व्यासपीठ असून बेरोजगारी मुक्त नवभारताची संकल्पना पूर्ण करणारा हा मेळावा असल्याचे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 9 व 10 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सकाळी 11 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दटके, प्रसाद लाड, अभिमन्यू पवार, विकास कुंभारे, आशिष जायस्वाल, मोहन मते, कृष्णा खोपडे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, टेक महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष निखील अलुरकर यावेळी उपस्थित होते.

या मेळाव्यासाठी 60 हजार तरूणांनी नोंदणी केली होती. 798 आस्थापना या ठिकाणी मुलाखतीसाठी आल्या आहेत. 48 हजार 541 उपलब्ध जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी विद्यापीठ परिसरात तीन मोठी दालने उभारण्यात आली आहे. उद्यापर्यंत हजारो उमेदवारांना विविध आस्थापनामध्ये नियुक्ती दिली जाण्याची शक्यता आहे.

या मेळाव्याला ऐतिहासिक आणि विक्रमी संबोधतांना उपमुख्यमंत्र्यांनी विविध आस्थापनांमध्ये त्यांचे वेगळेपण आपल्या भाषणात मांडले. केवळ मुलाखती घेऊन हा मेळावा संपणार नसून नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक सुशिक्षीत बेरोजगारांच्या नोकरीबाबत पाठपुरावा करणारी यंत्रणा आम्ही उभारली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ दोन दिवसांचा नाहीतर पुढेही अनेक दिवस चालणार आहे. मेळावा संपल्यानंतरही प्रत्येकाला संधी मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आयोजनाचे कौतुक करतांना त्यांनी कौशल्य विकास विभागाने बदलत्या तंत्रज्ज्ञानाला अनुसरून नव्या स्वरूपातील अभ्यासक्रम सुरू करावेत. रोजगार व प्रशिक्षण देण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

रोजगार निर्मिती, प्रशिक्षण व मागणीप्रमाणे मनुष्यबळाची उपलब्धता या संदर्भातील सर्व घटकांबाबत सर्वंकष धोरण ठरविण्यासाठी जागतिक बँकेसोबत रोजगार निर्मिती संदर्भात चर्चा सुरू आहे. इन्फोसिससारखा प्रकल्प 2 हजार रोजगार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यात विक्रमी संख्येने रोजगार मिळतील. मात्र, आम्ही इथेच थांबलो नसून राज्य शासनामार्फत 1 लाख नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या आयोजनासाठी काम करणाऱ्या कौशल्य विकास विभागाच्या विविध अधिकाऱ्यांचे कौतुक करतांनाच स्थानिक स्तरावर पाठबळ उभे करणाऱ्या शिवाणी दाणी व त्यांच्या चमुचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. येणाऱ्या काळात मोठ्या प्रकल्पांमध्ये तरूणांना नोकऱ्यांची अधिक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मिहानसारख्या प्रकल्पात 2 लक्ष सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पायाभुत सुविधांच्या वृध्दीसोबतच नोकऱ्याची संधी देशभरात वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरी भागातील तरुणांप्रमाणे ग्रामीण भागही रोजगाराच्या प्रवाहात यावा, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. शेतामध्ये युरियाच्या फवारणीसाठी ड्रोनचे तंत्रज्ञान वापरणे, बांबुपासून तयार होणाऱ्या व्हाईट कोळशाची निर्मिती आदी प्रयोग महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी रोजगाराचे माध्यम ठरणार आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही उद्योजकता निर्माण करण्यासाठी, तेथील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. गडकरी यांनी केले. तरुणांना रोजगार कसा मिळेल, यासाठी एका तज्ज्ञ समितीकडून अध्ययन करून घेत सविस्तर धोरण तयार करावे, अशी अपेक्षा श्री. गडकरी यांनी राज्य सरकारकडे व्यक्त केली.

कार्यक्रमाची भुमिका विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पक्तेतून हा मेळावा नागपूर येथे साकारत आहे. बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपला विभाग धडपड करीत आहे. त्यासाठी  जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांना राज्यस्तरीय या मेळाव्यामध्ये पाचारण करण्यात आले आहे. उद्या भरती प्रक्रियेचा विक्रम होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुरूवातीला या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी प्रास्ताविक व्यक्त केले. आभार प्रदर्शन विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी केले. हजारोच्या संख्येने तरूणांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. विद्यापीठाचा परिसर तरूणाईने भरून गेला होता. जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्यांची उपलब्धता यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून उद्यापर्यंत बहुतेक आस्थापनांकडून नियुक्तीपत्र दिली जाणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता समारोह होणार आहे.

युवकांनी भेट देण्याचे आवाहन

9 व 10 दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्याला तरुणांनी भेट देण्याचे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. तिसऱ्या दालनात 68 स्टार्ट अप कंपन्या या ठिकाणी आपले अनुभव सांगण्यासाठी उपलब्ध आहेत. विविध विषयांवरचे मार्गदर्शन सध्या दिवसभर सुरु आहे. याशिवाय टाटा, रिलायन्स, हिंदुस्थान लिव्हर, महिंद्र ॲन्ड महिंद्र  यासारख्या मोठ्या आस्थापनाकडून मुलाखती घेतल्या जात आहेत. हे प्रत्यक्ष युवक-युवतींनी बघावे, असे आवाहनही त्यांनी केले.

000000

 

भारताचे  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि 9:- भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथे आज दुपारी आगमन झाले. यावेळी आमदार आशिष   शेलार, आमदार सुनील राणे व माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.

यावेळी राजशिष्टाचार व पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

महिलांच्या सक्षम नेतृत्वातूनच विकसित भारत घडेल -राज्यपाल रमेश बैस

अमरावती, दि. 9 : गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत. याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असून आज सन्मानित झालेल्या महिला आगामी काळात बदलाचे प्रतीक मानल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनव्दारा आयोजित ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ सोहळ्यात राज्यातील पाच कर्तृत्वान महिलांचा राज्यपाल यांच्या हस्ते ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, प्रसिद्ध गायिका वैशाली माडे, उद्योजिका स्नेहल लोंढे, बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर, प्रगतीशिल महिला शेतकरी ज्योती देशमुख आदींचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. घोंगडी, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण पोटे, महिला आयोगाच्या सदस्या इंदूबाई शिंदे, राजमाता अहिल्या देवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे, श्रीमती सुरेखा ठाकरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभाराच्या काळापासून भारताने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मोठे बदल पाहिले आहेत. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा द्रष्ट्यांना जन्म देण्याचे भाग्य महाराष्ट्राला लाभले, ज्यांनी महिला सक्षमीकरणाचा भक्कम पाया रचला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. अहिल्यादेवींनी भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि विविध ठिकाणी मंदिरे बांधलीत. लोकांच्या सुविधेसाठी रस्ते, घाट, विहिरी आणि पायऱ्या बांधल्यात. काशी विश्वनाथमध्ये शिवलिंगाची स्थापना केली. भुकेल्यांसाठी भोजन सत्र व तहानलेल्यांसाठी आसन व्यवस्था सुध्दा त्यांनी केली. चार धाममधील पवित्र बद्रीधामचाही त्यांनी जीर्णोद्धार केला. अडीचशे वर्षांपूर्वी त्यांनी महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कायदा करून विधवा स्त्रियांना पतीच्या मालमत्तेत वाटा मिळण्याची तरतूद केली. ज्या महिलांनी कुठल्याही अडचणींना न जुमानता स्वत:चे एक स्थान निर्माण केले आणि उत्कृष्ट कार्य केले, अशा महिलांना अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.

भारतातील स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये 50 टक्के महिला सदस्य असताना, भारताच्या संसदेने अलीकडेच महिला आरक्षण विधेयक लागू केले आहे जे कायदे आणि निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे वचन देते. यावर्षीच्या भारतीय नागरी सेवा परीक्षेत 10 टॉपर्सपैकी सहा महिला आहेत. प्रशासनात तसेच वरिष्ठ पोलीस पदांवर पूर्वीपेक्षा जास्त महिला आहेत. येत्या 10 वर्षात महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यांचा कारभार महिलांकडे राहील, असेही राज्यपालांनी सांगितले.

समाजातील सर्व मुली आणि मुलांसाठी आनंदी आणि सुरक्षित बालपण सुनिश्चित करण्यासाठी खूप कार्य करावे लागणार असून स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडाबळी, महिलांवरील गुन्हे यासारख्या सामाजिक दुष्कृत्ये अस्तित्वात आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सुरक्षित राष्ट्राची ओळख तेथील महिला सुरक्षेच्या कार्यातून केली जाते, असेही राज्यपाल म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्तृत्वान महिलांचा पुरस्कार देवून सत्कार करण्याच्या फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला. आपल्या भाषणात ते म्हणाले, कर्तृत्व दाखविण्याची संधी प्रत्येकाला मिळते. परंतू त्या संधीचे सोने करण्याची गरज असते. विविध क्षेत्रातल्या महिलांनी संधीचे सोने केल्याचे आज या पुरस्कार सोहळ्यात दिसून येत आहे. अनेक वर्षापासून अशा महिलांना पुरस्कार देवून गौरवल्यामुळे त्याद्वारे समाजातील इतर महिलांना प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.

महिलांच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने पाऊलं उचलले असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले की, शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योजना राबवित असते. त्याचा लाभ तळागळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याची मुख्य जबाबदारी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी करीत असतात. सर्वांच्या सहयोगातून आपण यापुढेही काम करीत राहू असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

यावेळी कार्यक्रमात सन्मानार्थी पाचही महिलांच्या संघर्षाची व कार्यकर्तृत्वाची चित्रफीत दाखविण्यात आली. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, गायिका वैशाली माडे यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. माजी खासदार डॉ. विकास महात्मे व संतोष महात्मे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भुमिका विशद केली.

0000

महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध – प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी

मुंबई, दि. 9 : भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या फायद्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू,अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आज  देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दि.15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले आहे.

बृहन्मुंबईतील 227 प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे दि. 28 नोव्हेंबर 2023 ते दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागातील माधव बाग, कावसजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर येथे नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राम कदम, माजी आमदार अतुल शहा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, चंदीगढ, जम्मू काश्मिर, बिहार आणि गुजरात येथील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी यावेळी प्रातिनिधीक संवाद साधला.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’बाबत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, देशभरातील कानाकोपऱ्यात यात्रा पोहोचत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, आधुनिक अवजारे, वीज-पाणी, रुग्णांना वेळेवर उपचार-औषधे, बेरोजगारांना व्यवसायासाठी भांडवल,  युवकांना रोजगार यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील दहा कोटी महिला विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येत्या काळात याच योजनांच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लक्षाधीश बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी हे यावेळी म्हणाले.

विकसित भारत संकल्प यात्रा  अभियानाच्या माध्यमातून योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

प्रत्येक नागरिकाला केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, त्याचा लाभ वंचित घटकाला मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,विकासाच्या प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थीपर्यंत पोहचण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी या सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी हा प्रयत्न असणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्याचा आढावा घेऊन सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत  सुचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील विकास कामांसाठी केंद्र शासन पाठीशी आहे. राज्यात वेगाने विकास कामे सुरू असून विदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य एक नंबरवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात राज्य अव्वल ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणी, उज्ज्वला योजना, विविध क्रीडा योजना, आधारकार्डशी संबंधीत कामकाज आदींचे दालन उभारण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी, उप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नियोजन विभागाच्या संचालिका डॉ.  प्राची जांभेकर, सी विभागाचे सहायक आयुक्त श्री. उद्धव चंदनशिवे, नगर परिषद प्रशसनाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते.

***

संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी

मुंबई, दि 9:-  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी, मुंबईच्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची  कौतुकाची थाप सफाई कर्मचा-यांना देत  त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि.3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी  समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, स्वच्छ्ता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे  परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते. स्वच्छता अभियान ही आता एक लोकसहभाग लाभलेली लोकप्रिय चळवळ झाली आहे. लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. धारावी सारख्या  झोपडपट्टीतील भागातही ही स्वच्छतेची कामे प्रभावीपणे होत आहेत. यामध्ये रस्ते,नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे.बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

इस्कॉन मंदिरात मुख्यमंत्र्यांचा भाविकांशी संवाद

इस्कॉन मंदीर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांची ग्रंथतुला करुन सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले महाराष्ट्रात इस्कॉनचे 39 तर मुंबईमध्ये जवळपास चार सेंटर असून 897 मंदिराचे व्यवस्थापन तसेच सामाजिक उपक्रम इस्कॉनद्वारे राबवले जातात. शाळा व रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थी व रुग्णांना मदत करण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाय योजना,  समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवेची  प्रेरणादायी ऊर्जा देण्याचे काम इस्कॉन करीत आहे. मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27 हजार  विद्यार्थ्यांना तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23 हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याचं कामही केले जाते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशाला एका उंचीवर नेण्याचे काम केले. महासत्तेकडे नेण्याचं काम केले. ख-या अर्थाने देशाचा मान जगभरामध्ये वाढवला. म्हणूनच  या देशाची,राज्याची  आणि या जगाची सेवा करण्यात आपले योगदान अपेक्षित आहे.

स्वच्छतेसाठी मुंबई महापालिका कर्मचारी किंवा अधिकारी एवढ्यापुरती ही चळवळ आपण मर्यादित ठेवायची नाही. स्वच्छतेची चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशा प्रकारचे काम आपल्याला लक्ष देऊन करायचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रमाई नगरात लोटला जनसागर 

संपूर्ण स्वच्छता मोहीमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरमधील रमाई नगर येथे स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केल्यानंतर परिसरातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्ता क्र. 1 ची स्वच्छता करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याचे

कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.  मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण  वापरत नाही, तर  रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते,  गटार,  नाल्या सार्वजनिक शौचालये  स्वच्छ होत आहेत. झोपडपट्टी सुधार योजनेचा  देखील यात समावेश केला असल्याचे श्री शिंदे यावेळी म्हणाले.

शहाजी राजे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे कौतुक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत विलेपार्ले (पूर्व) येथील नेहरू मार्गाच्या स्वच्छतेची पाहणी करुन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन  शहाजी राजे विद्यालयातील  विद्यार्थ्याँशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल सोसायटीमध्ये आयोजित स्वच्छता जनजागृती रॅलीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूलाची पाहणी

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पाहणी केली.  या पूलाचा पहिला गर्डर नुकताच टाकण्यात आला आहे. या पुलाची पहिली मार्गिका सुरु करण्याच्या दृष्टीने ठरलेल्या वेळेत सगळी कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिले.

०००००

‘क्रेडाई अमरावती ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो’ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

अमरावती, दि. 9 (जिमाका) :  क्रेडाई अमरावतीमार्फत जिल्ह्यात ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ चे आयोजन करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्सपोला आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी भेट दिली. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी प्रलंबित असलेली कामे नागपूर अधिवेशन कालावधीत मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.

सायन्स स्कोर मैदान येथे ‘ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पो 2023’ ला सुरुवात झाली असून ते दि. 11 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.  आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष निलेश ठाकरे, उपाध्यक्ष कपिल आडे, सचिव रवींद्र गोरटे आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्यात अनेक प्रकल्प सुरु असून गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन स्वस्त व चांगल्या दर्जाच्या सुविधायुक्त घरे  ग्राहकांना  उपलब्ध करुन द्यावीत. बांधकाम व्यावसायिकांसाठी शासनामार्फत अनेक योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.  जिल्ह्यात अनेक प्रलंबित समस्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेवून अधिवेशन संपण्यापूर्वी ते मार्गी लावू. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली ‘गटार योजना’ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देवू. तसेच जिल्ह्यातील डिपीआर संदर्भातील समस्या, घर व भाडे इमारतीवरील वाढीव दराने लावलेले कर या संदर्भात आढावा घेवून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आश्वस्त केले.

अमरावतीचा विस्तार वेगाने होत असल्याने या ठिकाणी मुलभूत सुविधेसोबतच विमान सेवा असणे आवश्यक आहे. बेलोरा विमानतळ सुरु होण्यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावून नाईट लँडींग व इतर सुविधा तयार करुन विमानसेवा लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही ते यावेळी म्हणाले. रेरा संदर्भातील येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेवून त्यावर मार्ग काढण्यात येईल.  जिल्ह्यातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेवून अधिवेशन कालावधीत बैठक घेण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही  श्री. पवार यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये लावण्यात आलेल्या स्टॉल्सला श्री. पवार यांनी भेटी देऊन  ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींविषयी जाणून घेतले. ग्राहकांच्या स्वप्नातील घर तयार करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

आमदार प्रविण पोटे पाटील व आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्यातील गटार योजना, डिपीआर, बेलोरा विमानतळ, घर व इमारतीवरील कर अशा विविध समस्याबाबत माहिती देऊन त्या मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना केली.

ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्स्पोचा शुभारंभ दि. 8 डिसेंबर रोजी झाला. हा एक्सपो 11 डिसेंबरपर्यंत चालणार असून सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या एक्सपामध्ये 60 पेक्षा अधिक स्टॅाल्स ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यामध्ये प्लॉटपासून ते बांधकाम साहित्य, बंगला, रो-हाऊस, फ्लॅट, दुकाने व गृह कर्ज देणाऱ्या बँक यांचा समावेश आहे. या एक्सपोच्या माध्यमातून बांधकाम संदर्भातील नवीन तंत्रज्ञान व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

00000

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...