शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 767

खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर न केल्यामुळे दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च)  सुनील यादव (आयआरएस) हे तीन वेळेस 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदींची तपासणी करणार आहेत. मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची प्रथम तपासणी 9 मे 2024 रोजी करण्यात आली. या तपासणीत नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील हे उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांना सूचना देऊनही ते दुसऱ्या वेळेस उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 171 (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून सुनील यादव (आयआरएस) यांची नियुक्ती केली आहे.  केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. यादव  यांनी दि. ९ मे, २०२४ रोजी उमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदवह्यांची प्रथम तपासणी केली. त्यावेळी २८ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक खर्च प्रतिनिधी यांनी निवडणूक खर्च लेखा तपासणीस खर्च नोंदवहीसह उपस्थित राहणे अपेक्षित होते.

तथापि, सदर तपासणीस नॅशनल पीपल्स पार्टीचे  संजय बंडू पाटील  आणि  संजय निवृत्ती पाटील, अपक्ष हे उमेदवार उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांच्या प्रतिनिधीनेही निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही.

तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सर्व उमेदवारांना लेखी कळविण्यात आले होते. मात्र हे दोन उमेदवार  9 मे रोजी उपस्थित न राहिल्याने,  दि. ११ मे, २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पुनश्च उपस्थित राहण्याची एक संधी देण्यात आली होती. तथापि, नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय बंडू पाटील,  आणि अपक्ष उमेदवार संजय निवृत्ती पाटील यांनी  स्वतः किंवा आपल्या खर्च प्रतिनिधीमार्फत निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर केली नाही.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील कलम ७७ (१) अन्वये निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने स्वतः किंवा त्याच्या खर्च प्रतिनिधीने, निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याच्या दिनांकापासून ते निकाल जाहीर झाल्याचा दिनांक हे दोन्ही दिवस धरून, होणाऱ्या कालावधीच्या दरम्यान उमेदवाराने किंवा त्याच्या खर्च प्रतिनिधीने स्वतः केलेल्या किंवा त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार झालेल्या निवडणूक खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा विहित नमुन्यात ठेवणे बंधनकारक आहे.

तरी या दोन्ही उमेदवारांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ मधील कलम ७७ (१) मधील तरतूदीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम १७१ (आय) मधील तरतुदीनुसार या दोन्ही उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी कळविले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

➡️ नंदुरबार –  ६०.६० टक्के

➡️ जळगाव –  ५१.९८ टक्के

➡️ रावेर – ५५.३६ टक्के

➡️ जालना – ५८.८५ टक्के

➡️ औरंगाबाद  – ५४.०२  टक्के

➡️ मावळ – ४६.०३ टक्के

➡️ पुणे – ४४.९० टक्के

➡️ शिरूर –  ४३.८९ टक्के

➡️ अहमदनगर-  ५३.२७ टक्के

➡️ शिर्डी – ५२.२७ टक्के

➡️ बीड –  ५८.२१ टक्के

०००

पाळणाघरांचा उपक्रम ठरला उपयुक्त…

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका): लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले. त्यात लक्षणीय आणि अभिनव उपक्रम ठरला तो मतदान केंद्रांवर पाळणाघरे स्थापित करण्याचा. हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. अनेक मातांनी आपलं कडेवरचं बाळ पाळणाघरात सांभाळायला देऊन आपले लोकशाहीप्रति कर्तव्य बजावले.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’, ही मातेची महती. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मातांनी आपली बालके प्रशासनाने उभारलेल्या पाळणाघरात सोपवून आपला मतदानाचा हक्क बजावला, आणि ही मतदार माऊली लोकशाहीची उद्धारकर्ती झाली.

महिला मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम राबविले. त्यात हा उपक्रम सर्वात उपयुक्त आणि लक्षणीय ठरला. मतदान केंद्रांवर पाळणाघरे स्थापित करण्याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला निर्देश दिले. त्यानुसार महिला बालकल्याण विभागामार्फत कार्यवाही करुन अंमलबजावणी करण्यात आली. एखादी माता मतदानासाठी आली असता तितकावेळ तिच्या कडेवरील बाळाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ होणे अपेक्षित आहे. किंवा मतदार लहान मुलासह मतदानाला आल्यास त्या मतदाराला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ त्या बाळाला सांभाळण्यासाठी पाळणा घर सुविधा देण्यामागचा विचार होता.

प्रत्येक पाळणाघर एका अंगणवाडी ताईंकडे सोपविण्यात आले. या ठिकाणी येणाऱ्या बालकाला तिथं अनेक खेळणी, झोपाळ्यात असलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे, प्यायचे पाणी, बेबी फुड आदींची सज्जता होती. जिल्ह्यात शहरी भागात १८० तर ग्रामिण भागात  १६५० पाळणाघरे सज्ज होते. ज्या इमारतीत अनेक मतदान केंद्र असतील तेथे त्या इमारतीत एक पाळणा घर याप्रमाणे नियोजन होते. पाळणाघराचा लाभ हा स्तनदा माता, लहान बालके असणाऱ्या मातांना खूप झाला.  त्यांनी आपली बालके पाळणाघरात सोपविली. तेथली खेळणी व आकर्षकता पाहून बालकेही तिथे रमली. बागडली. त्यांच्या किलबिलाटाने पाळणाघर गजबजले. लोकशाहीसाठी आपले मतदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या मातांना ही एक चांगली सुविधा होती. त्यामुळे महिलांचा मतदानातील सहभाग होतांना दिसत होता.

०००

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असणार महिला, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र

मुंबई, दि. १३ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी संचलित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्र उभारणीची सर्व तयारी आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 26 मतदारसंघ आहेत. 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, तर चेंबूर आणि अणुशक्तीनगर या दोन मतदारसंघांचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लोकसभा मतदारसंघात आहे. या चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 7,384 एवढ्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर मतदारांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एका मतदान केंद्रांचे संचलन महिला, तरुण आणि दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करणार असून त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात महिला अधिकारी व कर्मचारी संचलित एकूण 26, तरुण अधिकारी व कर्मचारी संचलित 26, तर दिव्यांग अधिकारी व कर्मचारी (सक्षम केंद्र) संचलित एकूण 26 मतदान केंद्र असतील, असेही जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

०००

११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान

मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.

        चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार –  ४९.९१ टक्के

जळगाव –   ४२.१५ टक्के

रावेर –  ४५.२६ टक्के

जालना – ४७.५१  टक्के

औरंगाबाद  – ४३.७६  टक्के

मावळ – ३६.५४ टक्के

पुणे – ३५.६१ टक्के

शिरूर –   ३६.४३ टक्के

अहमदनगर-  ४१.३५ टक्के

शिर्डी – ४४.८७ टक्के

बीड –  ४६.४९ टक्के

***

संजय ओरके/विसंअ/

 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – ३७.३३ टक्के
जळगाव- ३१.७० टक्के
रावेर – ३२.०२ टक्के
जालना – ३४.४२ टक्के
औरंगाबाद – ३२.३७ टक्के
मावळ -२७.१४ टक्के
पुणे – २६.४८ टक्के
शिरूर- २६.६२ टक्के
अहमदनगर- २९.४५ टक्के
शिर्डी -३०.४९ टक्के
बीड – ३३.६५ टक्के

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर – १९.०३ टक्के
जालना – २१.३५ टक्के
औरंगाबाद – १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे – १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड – १६.६२ टक्के

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान            

 मुंबईदि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.

 एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

नंदुरबार  – ८.४३ टक्के

जळगाव  – ६.१४ टक्के

रावेर    – ७.१४ टक्के

जालना   – ६.८८ टक्के

औरंगाबाद  -७.५२ टक्के

मावळ  – ५.३८ टक्के

पुणे  – ६.६१ टक्के

शिरूर – ४.९७ टक्के

अहमदनगर -५.१३ टक्के

शिर्डी  – ६.८३  टक्के

बीड  – ६.७२ टक्के

 

0000

संध्या गरवारे/ वि.सं.अ

गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी २१ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले मतदान

मालेगाव, दि. १२ (उमाका) : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत 115-मालेगाव बाह्य मतदारसंघात आज गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी एकूण 21 मतदारांनी घरुन आपला मतदानाचा हक्क बजावला. अशी माहिती 115-मालेगाव बाहय विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदार संघ निवडणूकीत प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 115-मालेगाव बाहय विधानसभा मतदार संघात पंधरा (15) 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तर सहा (6) दिव्यांग असे एकूण 21 मतदारांनी घरुन मतदानासाठी नोंदणी केली आहे. त्यानुसार धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली 115-मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात आज (12 मे) रोजी गृहभेटीद्वारे टपाली मतदान करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी संपूर्ण मतदार संघासाठी 2 टीमची नियुक्ती केली होती. प्रत्येक टीममध्ये चार अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असून या टीमने मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेतले आहेत.

धुळे लोकसभा मतदार संघात गृह मतदानासाठी 432 ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी विधानसभा मतदार संघनिहाय पहिल्या फेरीत आजपर्यंत झालेले गृह मतदान धुळे शहर (49), धुळे ग्रामीण (86), शिंदखेडा (105), बागलाण (98) मालेगाव मध्य (24), मालेगाव बाह्य (21) असे एकूण 383 मतदान नोंदविण्यात आले आहे. उर्वरित मतदारांचे गृह मतदार दुसऱ्या फेरीत घेण्यात येणार आहे.

०००

साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

धुळे, दि. १२ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे विधानसभा मतदार संघ लोकसभा निवडणूकीकरीता 01-नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतात. या मतदार संघासाठी आज दि.13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही विधानसभा मतदार संघात मतदान साहित्य, ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. 12 रोजी करण्यात आले. दुपार नंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना झाले. आज सोमवार दि. 13 रोजी सकाळी 7 वाजेपासून जिल्ह्यातील दोन्ही विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात 703 मतदान केंद्र

 धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात 370 तर शिरपूर विधानसभा मतदारसंघात 333 असे दोन्ही मिळून 703 मतदार केंद्र आहेत. दोन्ही मतदार संघात प्रत्येकी एक मतदान केंद्र क्रिटीकल आहे. त्याठिकाणी आवश्यक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच साक्री विधानसभा मतदार संघात 6 तर शिरपूर विधानसभा मतदार संघात 10 मतदान केंद्र शॅडो मतदान केंद्र आहेत. याठिकाणी वॉकीटॉकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दोन्ही मतदारसंघात 6 लक्ष 90 हजार 773 मतदार

धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर या दोन्ही विधानसभा मतदार संघात एकूण 6 लक्ष 90 हजार 773 मतदार आहेत. त्यात साक्री विधानसभा मतदार संघात 1 लाख 83 हजार 833 पुरुष मतदार तर 1 लाख 73 हजार 146 महिला मतदार व 6 तृतीयपंथी तसेच 341 सर्व्हिस व्होटर आहेत. तर शिरपूर विधानसभा मतदार संघात 1 लाख 70 हजार 267 पुरुष मतदार तर 1 लाख 63 हजार 512 महिला मतदार व 9 तृतीयपंथी तसेच 233 सर्व्हिस व्होटर मतदार आहेत. साक्री तालुक्यात 1 हजार 952 दिव्यांग मतदार असून शिरपूर तालुक्यात 2 हजार 166 दिव्यांग मतदार आहेत. या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था उपलब्ध आहे.

मतदान केंद्रांवर मोबाईलला बंदी

साक्री आणि शिरपूर या दोन्ही मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कार्डलेस फोन, वायरलेस सेटसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास, बाळगण्यास निर्बंध आहेत. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळे समूहाने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेऊन जावे लागणार आहे. किंवा एकमेकांजवळ सांभाळायला द्यावे लागणार आहे.

सर्व सोयींनी परिपूर्ण असणार मतदान केंद्र

जिल्ह्यातील या दोन्ही विधानसभा मतदार संघात उभारण्यात आलेल्या 703 मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रावर परिपूर्ण सोयी करण्यात आल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, उन्हाळयातील वाढते तापमान लक्षात घेऊन प्रथमोपचार पेट्या, आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी ओआरएसचे पाकिटे तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे

01-नंदूरबार लोकसभा मतदार संघातील साक्री व शिरपूर विधानसभा मतदार संघात आज दि. 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे. प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच जिल्ह्यात निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

०००

 

ताज्या बातम्या

विधानपरिषद कामकाज

0
परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार - उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम  मुंबई, दि. १८ : देशातील टेस्लाचे पहिले शोरुम मुंबईमध्ये...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. १८ : कराडजवळील कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी...

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

0
मुंबई, दि. 18 : केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल, अशी ग्वाही...

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. 18 : शासन निधी देवून नवनवीन लोकाभिमुख उपक्रम राबविते. इस्कॉनसारख्या मूल्याधारित संस्थांनी शासनासोबत भागीदारी केल्यास शासनाचे कौशल्य विकास उपक्रम फक्त तांत्रिक शिक्षणापुरते न राहता, व्यक्तिमत्व घडविणारे...

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...