बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 741

ठाणे जिल्ह्यातील ६,६०४ केंद्रात होणार मतदान प्रक्रिया

ठाणे, दि. १९ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये 36 मतदान केंद्रे ही सोसायट्यांच्या क्लब हाऊसमध्ये असणार आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी विविध सुविधा निर्माण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सुलभ निवडणूक संकल्पनेनुसार ही सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, उन्ह लागू नये म्हणून सावलीची व्यवस्था, रॅम्प, व्हिलचेअर आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

सर्वाधिक मतदान केंद्रे मुरबाडमध्ये तर सर्वात कमी उल्हासनगरमध्ये

ठाणे जिल्ह्यात एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 2191 केंद्रे आहेत. यात 134 – भिवंडी ग्रामीण (अ.ज) – 345 मतदान केंद्रे, 135 – शहापूर (अ.ज.) – 326 मतदान केंद्रे, 136 – भिवंडी पश्चिम – 297 मतदान केंद्रे,  137 – भिवंडी पूर्व – 314 मतदान केंद्रे, 138 – कल्याण पश्चिम – 398 मतदान केंद्रे, 139- मुरबाड – 511 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 1960 मतदान केंद्रे असून यामध्ये 140 – अंबरनाथ (अ.जा.) – 319 मतदान केंद्रे,  141 – उल्हानगर- 251 मतदान केंद्रे, 142 – कल्याण पूर्व – 321 मतदान केंद्रे, 143 – डोंबिवली – 269 मतदान केंद्रे, 144 – कल्याण पश्चिम – 406 मतदान केंद्रे, 149- मुंब्रा कळवा – 394 मतदान केंद्रे एवढी संख्या आहे.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 2453 मतदार केंद्रांची संख्या आहे. यामध्ये 145 – मिरा भाईंदर – 451 मतदान केंद्रे, 146 – ओवळ माजिवाडा – 466 मतदान केंद्रे, 147-  कोपरी पाचपाखाडी –  366 मतदान केंद्रे, 148- ठाणे – 361 मतदान केंद्रे, 150- ऐरोली – 429 मतदान केंद्रे, 151- बेलापूर – 380 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यामधील सर्वाधिक 511 मतदान केंद्रे आहेत. तर सर्वात कमी मतदार केंद्रे उल्हासनगर विधानसभा मतदार संघात 251 मतदार केंद्रे आहेत.

मॉडेल मतदान केंद्रे

यामध्ये जिल्ह्यात एकूण 18 मतदान केंद्रे ही महिलांद्वारे चालविण्यात येणार आहेत. तसेच 18 मतदान केंद्रे ही दिव्यांग आणि 18 मतदान केंद्रे ही युवकांद्वारे चालविण्यात येणार आहेत.

३,३२५ मतदान केंद्राचे होणार वेबकास्टिंग

जिल्ह्यातील एकूण 6604 मतदान केंद्रांपैकी 3325 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 1107 मतदान केंद्रे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील 991 केंद्रे व ठाणे लोकसभा मतदारसंघातील 1227 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

०००

महिला, युवा, दिव्यांग नाविन्यपूर्ण मतदान केंद्र – जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि.१९ (जिमाका) :  २० मे २०२४ रोजी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मेहनत घेत असून महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्र एकसारखी असावीत यासाठी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी १ या प्रमाणे १८ केंद्रे सखी मतदान केंद्रे, 18 युवा मतदान केंद्रे, 17 दिव्यांग केंद्रे व काही मतदान केंद्रे हे आगरी –कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारी करण्यात येणार आहे.

महिला मतदान केंद्रावर संपूर्ण पथक हे महिलांचे असणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, शिपाई म्हणून महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी थीम गुलाबी रंग ठरविण्यात आली आहे. यामध्ये महिला मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व महिला कर्मचारी यांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील विविध क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत.

युवा मतदान केंद्रावर सर्व युवा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी पिवळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुध, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी पिवळया रंगाचे वस्त्र (टिशर्ट/शर्ट) परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या युवा यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, अभिनेता यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये १७ मतदान केंद्रांवर दिव्यांग कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या केंद्रासाठी फिकट निळा/आकाशी रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी फिक्कट निळा/आकाशी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्र, अभिनेता, लेखक यांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत.

भिवंडी ग्रामिण मतदार संघामधील सारंग या गावातील मतदान केंद्र क्र.३२१ हे विशेष (युनिक) मतदान केंद्र असणार आहे. हे मतदान केंद्र ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीने सजविण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, बोट, रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी हे पारंपारीक कोळी वेशभुषेत असतील.

दिनांक २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केले आहे.

०००

 

आपले मत मनात नको राहायला… विसरू नका मतदान करायला !

मुंबई उपनगर, दि. 18: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार आज (शनिवारी) समाप्त झाला. या निवडणूकीसाठी  येत्या 20 मे रोजी (सोमवारी) मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निवडणूक यंत्रणेने मतदारांना ‘आपले मत मनात नको राहायला.. विसरु नका मतदान करायला’ असे आवाहन केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्य आणि राष्ट्रीय मतदान सरासरीच्या कमी असलेली मतदान टक्केवारी यावेळी मुंबईकर मतदार निश्चितपणे मागे टाकतील, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून या लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. स्वीपच्या माध्यमातून चारही मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविले. कधी सेलीब्रिटींचे मतदानासाठी आवाहन, गृहनिर्माण सोसायटी मध्ये जाणीव जागृती तर कधी आशा आणि अंगणवाडी कार्यकर्तींच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदानाचे महत्व पटवून दिले. कधी पथनाट्याच्या माध्यमातून तर कधी विविध मेळाव्यांतून शासकीय यंत्रणा मतदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने या लोकसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेत अधिकाधिक मतदारांनी त्यांचा मतदारांचा हक्क बजावावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.

व्होटर्स स्लिपचे वाटप, मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर देण्यात येणाऱ्या सुविधा यामुळे मतदारांना सुलभ मतदान करता येईल. असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे, यासाठी व्होटर्स हेल्पलाईन ॲप सुरु केले आहे. या ॲपद्वारे मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधता येणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील तब्बल 74 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांना मतदानासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी शेड, दिव्यांग आणि वृद्ध मतदारांसाठी व्हील चेअर आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांची उभारणी आणि त्याठिकाणची व्यवस्था कऱण्यात आली आहे.

000

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस; जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बस सेवेचे उद्घाटन

मुंबई उपनगर दि. 18: ‘एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी 20 मे 2024 रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांशी जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी संवाद साधला.

आज वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य बस सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, जिल्हा दिव्यांग समन्वय अधिकारी प्रसाद खैरनार  उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने  विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर 613 ठिकाणी बेस्ट मार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता यावे यासाठी 1106 व्हिलचेअर देखील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इझी टु मुव्ह या संकल्पने अंतर्गत ज्या विधानसभा मतदारसंघात लोकोमोटर म्हणजेच अस्थिव्यंग मतदारांची संख्या तुलनेने अधिक आहे. अशा 9 विधानसभा मतदारसंघात व्हिलचेअर ॲक्सेसीबल टॅक्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय 25 लोफ्लोअर ईलेक्ट्रीक व्हिलचेअर ॲक्सेसीबल बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

००००

ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना २० मे रोजी मतदानासाठी विनामुल्य वाहन व्यवस्था उपलब्ध

मुंबई उपनगर, दि. 18: मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना 20 मे 2024 रोजी आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने दिव्यांग मतदारांना मतदार संघनिहाय विनामूल्य वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून  संपर्क साधण्यासाठी http://tiny.cc/s7b5yz या लिंकवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा दिव्यांग समन्वयक अधिकारी  प्रसाद खैरनार सांगितले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात एकुण 16 हजार 116 दिव्यांग मतदार आहे. या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा काही अडचण असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 1 हजार 106 दिव्यांग मित्रांचीही नेमणूक करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 25 रींगरुट व शटल रूटवर दिव्यांग फ्रेंडली लो-फ्लोअर बस धावणार आहेत. या बसमधून ‘हात दाखवा”बस थांबवा’ या धर्तीवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदार या वाहतूक सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

बस सेवा

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/05/बस-सेवा-उपलब्ध.pdf” title=”बस सेवा उपलब्ध”]

संपर्क क्रमांक

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/05/अधिकारी-यांचे-संपर्क-क्रमांक.pdf” title=”अधिकारी यांचे संपर्क क्रमांक”]

0000

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात तयारी पूर्ण – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती

मुंबई उपनगर, दि. 18 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही  मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 7 हजार 353 एवढी मतदार केंद्रे असून रविवार 19 मे 2024 रोजी सर्व मतदान पथके मतदान यंत्रासह रवाना होतील. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्ग क्षीरसागर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले की,लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम. 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 26 एप्रिल ते 6 मे 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. एकूण चार लोकसभा मतदारसंघात 87 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यात 26- मुंबई उत्तरमध्ये 19, 27- मुंबई उत्तर पश्चिम 21, 28- मुंबई उत्तर पूर्वमध्ये 20, तर 29- मुंबई उत्तरमध्ये 27 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

लोकसभेच्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांत विधानसभेच्या 26 मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या 74 लाख 48 हजार 383 मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 एवढी आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या 815 एवढी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 16 हजार 116, तर 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 98 हजार 263 आहे. या चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे 1 हजार 83 असून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 353 एवढी आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावली, पाणी, एअर कुलर/पंखे, व्हीलचेअरसह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 4 जून 2024 रोजी नेस्को, गोरेगाव व उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे मतमोजणी होईल.

लोकसभेच्या चारही मतदारसंघात मतदानासाठी 40 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. रविवार 19 मे 2024 रोजी शेवटचे प्रशिक्षण पूर्ण होऊन मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर आवश्यक साहित्यासह रवाना होतील. निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 22 हजार 44 मतदारांनी आपल्या टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे, तर दोन हजार 513 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी घरातूनच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 54 लाख मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी पोहोचविण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया रविवार 19 मे 2024 पर्यंत पूर्ण होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय आहे. मतदान केंद्रावरील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मतदारांच्या गोपनीयतेसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनीही मतदानासाठी येताना मोबाईल आणू नयेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.

मतदान हा भारतीय संविधानाने दिलेला मौलिक हक्क आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करून या मौलिक अधिकाराचा वापर करीत भारतीय लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. – राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा

00000

त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे प्रधानमंत्री डॉ. रॉली यांचे मुंबईहून प्रयाण

मुंबई, दि. १८ : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे प्रधानमंत्री डॉ. किथ रॉली यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून दु .१.०५ वाजता प्रयाण झाले.

त्यांना निरोप देण्यासाठी मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विदेश मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव जी. व्ही. श्रीनिवास, अतिरिक्त पोलिस महासंचालक कैसर खालिद, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वास मोटे यांच्यासह राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

शिकाऊ व पक्क्या परवाना चाचणीकरिता २० मे रोजी ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या तारखेत बदल

मुंबई, दि.१८ : परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in द्वारे अनुज्ञप्ती (Licence) संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना वाहनचालक चाचणी देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने २० मे २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयात शिकाऊ परवाना चाचणी  व पक्का परवाना वाहनचालक चाचणीकरीता घेतलेल्या अपॉइंटमेंटच्या तारखेत लोकसभा निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे बदल करण्यात आला आहे. आता ही चाचणी २२ मे २०२४ रोजी होणार आहे.

ज्या उमेदवारांची पक्क्या परवाण्याकरिता वाहनचालक चाचणी २० मे २०२४ रोजी होती, ती दि.२१ ते २४ मे २०२४ दरम्यानच्या कालावधीमध्ये बदलण्यात (Re-schedule) करण्यात आली आहे. तसेच त्याबाबत प्रणालीमध्ये नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रणालीकडून संदेश (SMS) देखील पाठविण्यात आले आहेत.

तरी कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवार, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी यांनी २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास, त्या सर्वांनी चाचणीसाठी कार्यालयास या दिवशी भेट न देता  बदल केलेल्या (Re-scheduled) दिनांकांस भेट द्यावी. संबंधित कागदपत्रांसह बदल केलेल्या दिनांकास उमेदवारांनी कार्यालयात चाचणीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा हवामान खात्याकडून प्राप्त इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवा

 अमरावती, दि. 17 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी आज येथे दिले.

मान्सून पूर्व तयारीबाबत अमरावती विभाग आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून  दूरदृष्य  प्रणालीव्दारे उपस्थित होते. तर उपायुक्त  संजय पवार, गजेंद्र बावणे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांच्यासह दूरसंचार विभाग, भूजल सर्वक्षण यंत्रणा, महावितरण, जलसंपदा या विभागाचे प्रादेशिक प्रमुख, प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी व पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. पाऊस वादळ प्रसंगी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. आपात परिस्थितीसाठी सर्व विभागाने समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश दिले.

त्या पुढे म्हणाल्या की, नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या इमारती, पूलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे, तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत. आवश्यक तिथे निवारा कक्ष उभारावेत. धरणातील पाणी सोडताना पोलीस, कंट्रोलरूम व संबंधिताना 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित  करुन हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

                                                                         00000

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची दुकाने १८ ते २० मे २०२४ पर्यंत बंद राहणार – निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव

मुंबई दि. 17 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 18 मे  रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते 20 मे 2024 रोजी मतदानसंपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी दिले आहेत.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील कार्यालयात आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामकाज आढावा बैठक झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मतदारसंघात 55 गुन्हे, 6 लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण 55 गुन्हे दाखल करण्यात आले असुन 56 आरोपीनां अटक करण्यात आले आहेत. दोन लाख 23 हजार 925 रूपयांची 647.29 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. चार लाख 50 हजाराचे एक वाहन जप्त करण्यात आले आहे, असे एकूण सहा लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरोधात  प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून नऊ लाख 40 हजार इतक्या रकमेचे बंधपत्र घेण्यात आले आहे. गोडाऊन, वाईन शॉप, परमिट रुम, देशी दारूचे गोडाऊन, देशी बार अशा एकूण 348 मद्याच्या अनुज्ञप्तीवर सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी दिली.

अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी 18002339999 टोल फ्री क्रमांक

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात सहा गस्ती पथक कार्यरत असून, त्या पथकांच्याकडून अवैध मद्यविक्री, अवैध वाहतुक व अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर बंद करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दैनंदिन तसेच रात्री गस्त घालण्यात येते. विभागाकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कामकाजाची माहिती ईएसएमएस ॲपवर अद्ययावत करण्यात येते. अवैध मद्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांकावर अथवा 8422001133 हा व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सत्यवान गवस तथा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ संपर्क अधिकारी यांनी सांगितले.

000

 

 

ताज्या बातम्या

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...