शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog Page 575

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

येणाऱ्या महिला भगिनींना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या- अजित पवार

पुणे, दि. १५: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला येणाऱ्या महिला भगिनींना सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित महिलांच्या खात्यावरील येत्या दोन ते तीन दिवसात रक्कम जमा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा श्री. पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत घेतला. विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या कार्यक्रमासाठी लांबून महिला येणार असल्याने त्यांच्या येण्याजाण्याची, भोजन, पाणी आदी व्यवस्था चांगल्या प्रकारे करा. त्यांची आरोग्य तपासणी करावी. कार्यक्रमस्थळी वाहनतळ, पुरेशी बैठकव्यवस्था, मोबाईल टॉयलेट, परिसराची स्वच्छता आदी चोख व्यवस्था करावी. महिला भगिनींनी गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार तसेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभ प्रदानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केल्याचे सांगितले.

डॉ. दिवसे यांनी कार्यक्रमासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अमरावती, दि. 15 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोहळा अत्यंत उत्साहात झाला. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.  त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख, उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा सूचना अधिकारी मनीष फुलझले, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुमेध अलोने,  तहसीलदार विजय लोखंडे, तहसीलदार भाग्यश्री देशमुख, तहसीलदार निलेश खटके, जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, अधीक्षक प्रशांत पडघम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार

जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, अचलपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉ. संजय गरकल, तहसीलदार भाग्यश्री देशमुख, अधीक्षक निलेश खटके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, दर्यापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रवीण जमधाडे, धामणगाव तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून निलेश दडमल, मोर्शी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी समीर वडनेरकर, अमरावती तहसील कार्यालयाचे तलाठी पवन राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे महसूल सहायक पंकज राऊत, लघुलेखक अमित चेडे, नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाचे वाहन चालक बबन मोहोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे शिपाई गोविंद चव्हाण, चिखलदरा तहसील कार्यालयाचे पोलीस पाटील रमेश महल्ले, कोतवाल देवराव सुरतणे यांना  यावेळी सत्कार करण्यात आला.

*****

जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविणारे काम करण्यासाठी कटीबद्ध – महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

स्वातंत्र्यदिनानिमित्त अलिबाग येथे कु.तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

 रायगड (जिमाका) दि.15:- शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांसाठी राज्य सरकार अव्याहतपणे कार्य करीत आहे. हेच कार्य जोमाने पुढे घेऊन जाऊ आणि जनतेच्या जीवनात दृश्य परिवर्तन घडवू, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77  व्या वर्धापन दिनानिमित्ताने महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनिल तटकरे  यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उप वनसंरक्षक राहुल  पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता, सां.बा.अलिबाग जगदीश सुखदेवे, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कु.आदिती तटकरे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच  देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर, शहीद यांना वंदन केले.

महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.  राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात परिवर्तन घडविणे, आवश्यक त्या सर्व सेवा, सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

आज राज्यातील शेतकरी-कष्टकरी यांचा आर्थिक आधार बळकट करणे, आपत्तीच्या काळात या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे या बाबींना महत्व दिले जात आहे. विविध योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करुन मदतीचा हात वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर आमचा भर आहे. राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातूनही बाब ठळकपणे अधोरेखीत झाली आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्ष्‍िात बेरोजगारांना स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजनाआहे.

रायगड जिल्ह्यात 400 पेक्षा जास्त नवउद्योजकांना राज्य शासनाचे रु. 7.5 कोटी पेक्षा जास्त अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्राद्वारे रायगड जिल्ह्यातील लघु उद्योजकांच्या सर्वांगीण विकासाकरिता गणपतीमूर्ती क्लस्टर, हमरापुर पेण, इंजिनिअरींग क्लस्टर, तळोजा, पनवेल व बांबू कारागिरांकरिता बांबू क्लस्टर, मुरुड हे समुह औद्योगिक प्रकल्प (क्लस्टर) प्रस्तावित आहेत. महायुती सरकारनं महिला, मुली यांच्यासाठी ज्या योजना राबविल्या आहेत.

 कु.तटकरे पुढे म्हणाल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनाही राज्य शासनाची क्रांतिकारी योजना आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आली आहे. राज्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिशनमोडवर काम सुरु आहे. आज राज्यात 1 कोटी 35 लाख महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.  रायगड जिल्ह्यातील 3 लाख 38 हजार महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत.

ज्या बहिणींची अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही त्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यांनी अर्जाची पूर्तता केल्यानंतर पुढच्या महिन्यात त्यांना तीन महिन्यांचे एकत्र पैसे मिळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक विकास करण्यास शासन कटिबद्ध आहे. गेल्या वर्षभरात जनतेच्या हिताचे व जिव्हाळ्याचे निर्णय तात्काळ घेण्यास प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणि ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या सात योजनांची जिल्हा प्रशासनामार्फत अंमलबजावणी सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या, जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय जसे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे बळकटीकरण, दिवेआगार येथील विस्तारीत सुपारी संशोधन केंद्र, रातवड येथील मेगाक्लस्टर प्रकल्प, जिल्हा परिषद नवीन इमारत यांची पूर्तता करण्यावर भर आहे. आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज म्हसळा तालुक्यातील सावर या ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी 100 बेड्स व 100 विद्यार्थी क्षमता असणार आहे.

 रायगड जिल्हा हे नवे इंडस्ट्रियल हब म्हणून विकसित होत आहे.  रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी राज्य शासनाकडून मिळविण्यासाठी आम्ही सर्वजण विशेष  प्रयत्नशील आहोत.

 अटल सेतू, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, विरार-अलिबाग क़ॉरिडार, नवी मुंबई मेट्रोचं विस्तारणारं जाळं हे रायगड जिल्ह्याचा  कायापालट करून टाकणारे गेमचेंजर प्रकल्प ठरतील असा विश्वास आहे.

 जिल्ह्याच्या विकासाचं हे पर्व असंच सुरु राहावं यासाठी निरंतर प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध आहे. नवीन, समृद्ध व बलशाली असा महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे सर्व नागरिकांना या निमित्ताने आवाहन  मंत्री कु तटकरे यांनी यावेळी केले.

यावेळी मंत्री कु.तटकरे यांच्याहस्ते दामिनी (महिला सुरक्षा बीट) पथकास 20 दुचाकी वाहने तसेच संविधान प्रत वाटप करण्यात आले.

तसेच मंत्री कु.तटकरे यांच्याहस्ते जिल्ह्यातील विविध व्यक्ती अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

 महाराष्ट्रातील युद्धजन्य परिस्थतीत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युद्ध विधवा यांना ताम्रपटाचे वितरण श्रीम.निशा सुयोग कांबळे.

 नारंगी, ता.अलिबाग येथील सुपूत्र लांस हवालदार सुयोग अशोक कांबळे हे दि.29 एप्रिल 2005 पासून भारतीय सैन्यामध्ये अविरत सेवा बजावित असताना देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन स्नो लिओपार्ड मोहिमेत पूर्व सिक्कीम येथे कार्यरत असताना दि. 04 ऑक्टोबर 2023 रोजी अचानक आलेल्या महापुरात ते वाहून गेल्याने शहिद झाले आहेत.

 राष्ट्रपती पोलीस पदक 2024- श्री. शिवाजी ज्ञानदेव फडतरे, उविपोअ, पेण, श्री.विनीतकुमार जयवंत चौधरी, उविपोअ, अलिबाग, श्री.शिवाजी गोविंद जुंदरे, पोउनि, खालापूर पोलीस ठाणे.

 विशेष सेवा पदक-श्री. अभिजित अरविंद भुजबळ, सहा.पोलीस निरीक्षक, खालापूर पोलीस ठाणे (सन 2020 ते 2024 मध्ये आंतरराज्यीय न्यु बेस कॅम्प मुरकुटडोह, गोंदीया या जिल्यामध्ये नक्षलग्रस्त विभागात 4 वर्षे समानधानकारक सेवा पूर्ण केली.). राष्ट्रपती सुधार सेवा पदक व स्क्रॉल (प्रशस्तीपत्रक) प्रदान करणे श्री.अशोक दगडू चव्हाण, सुभेदार, तळोजा मध्यवर्ती कारागृह.

 महसूल अधिकारी यांना विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार- श्रीम. स्नेहा उबाळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी, (लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे कामकाज उत्तमरित्या पार पाडले).  श्री.विकास गारुडकर, तहसिलदार माणगाव, (शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माणगाव येथे राबविला, 861 आदिवासी बांधवाना सातबारा नावावर करुन जमीनी मिळवून दिल्या, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून काम केले, निवासस्थाने येथे 1 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन केले.

 नगरपरिषद आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आदेशाचे वितरण-श्री. शैलेश अशोक शेळके, रा.खोपोली, ता.खालापूर (श्रीवर्धन नगरपरिषदेवरील आस्थपनेवरील गट क संवर्गात नियुक्ती देण्यात आली आहे.)

 उत्कृष्ठ लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार 2023- प्रथम पुरस्कार विजेते – मे.सहारा रुफींग टेक्नो सोल्युशन, खोपोली ता. खालापूर (रोख रु. 15000/-, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ),  द्वितीय पुरस्कार विजेते मे. उपासना फॅशन, अलिबाग (रोख रु.10000/-, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ)

 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ग्रामीण विभाग- कु.हंस उमेश दोशी, एन.एम.जोशी विद्याभवन गोरेगाव, कु. वरुण अरुण फडतरे, सेंट झेविअर्स सेंकडरी इंग्लिश हायस्कूल महाड.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 शहरी विभाग- कु.आवंतिका सुनिल टकले, एम.इ.एस.आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल.

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ग्रामीण विभाग- कु.आयुष दत्तात्रेय शिंदे. डी. के.इ.टी. सी.के.व्ही.हायस्कूल इंग्लिश मिडीयम, चेंढरे.

 श्री.दत्तात्रेय कमलाकर कांबळे, अध्यक्ष, वक्रतुंड मित्रमंडळ, पेण, (रायगड जिल्हयातील कोरोना काळात व आपात्कालीन परिस्थतीमध्ये खारीचा वाटा उचलून समाजिक बांधिलकीतून सेवा केली आहे. तसेच सामाजिक बांधिलक जपून प्रशासनास वेळोवेळी मदत केली आहे.)

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड- नागरी संरक्षण दल उरण/आपदा मित्र, सहयाद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रोहा, आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली, आपदा मित्र महाड, म्हसळा, अलिबाग

00

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण संपन्न

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

सर्वसामान्यांसाठीच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील

कोल्हापूर, दि. १५ (जिमाका): शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन, ग्रामविकास आदी विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन करुन सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महाराणी ताराबाई सभागृह येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजक राजश्री मनोहर पाटील (प्रथम), रमेश शंकरलाल पारिक (व्दितीय) यांना जिल्हा पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस पाटील उदय भरमा पुजारी (भडगाव, ता.गडहिंग्लज) यांना विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्कार देण्यात आला.

 

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी सारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या स्वप्नीलने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ‘कांस्य’ पदक मिळवून ‘जगात भारी कोल्हापुरी’ ही म्हण पॅरीसमध्ये सार्थ ठरवली आहे. नेमबाजीत चमकदार कामगिरी करत जिल्ह्यासह देशाचं नाव उंचावणाऱ्या नेमबाज स्वप्निल कुसाळे याच्या यशामुळे खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात तब्बल ७२ वर्षांनंतर पदक मिळवून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. या यशाबद्दल स्वप्निल आणि त्याच्या आई वडीलांचे अभिनंदन… खेळाला आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यानिमित्तानं व्यक्त केला.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध होणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आणि सन्मान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी व नवीन आवश्यक इमारतींचे बांधकाम करण्यासाठी एकाच वर्षात जवळपास १२०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये राज्य योजनेअंतर्गत संस्थेचे अद्ययावतीकरण व यंत्रसामग्री करता २६७ कोटी, राज्य योजनेअंतर्गत बांधकामा करिता एकूण ७९९ कोटी, जिल्हा नियोजन समिती मधून २२.८६ कोटी रुपये निधी, कागल येथील १०० खाटांचे रुग्णालय, उत्तुर आजरा येथील ५० खाटांचे रुग्णालय, सांगाव कागल येथे १०० खाटांचे आरोग्य पथक यासह यंत्रसामुग्रीसाठी २३७.१४ कोटी देण्यात आले आहेत. कागलमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि त्याला संलग्न १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय आणि उत्तूर मध्ये योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जिल्ह्यातच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वय वर्ष ६५ पुर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत जुलै अखेर ५ हजार ६८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. ही योजना महत्वाकांक्षी असून गरजुंसाठी शासनाने सुरु केलेली अत्यंत चांगली योजना आहे.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करुन कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना १५०० रुपये प्रति महिना म्हणजेच १८ हजार रुपये प्रति वर्ष मिळणार आहेत. जिल्ह्यात ६ लाख ९२ हजार महिला नोंदणीनंतर पात्र झाल्या आहेत. अजूनही नोंदणी सुरु असून आत्तापर्यंत पात्र झालेल्या महिलांना दोन महिन्यांचे १५०० रुपयांप्रमाणे २०७.६० कोटींचे वितरण सुरु होईल.

कामगार विभागाच्या अधिपत्याखालील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे १ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली असून या बांधकाम कामगारांना सुरक्षासंच व अत्यावश्यक संच, गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यात येत आहेत. नोंदीत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनेमधून २०२३- २४ याकालावधीमध्ये सुमारे १०३ कोटी ९२ लाख आर्थिक लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा केली आहे.

जिल्ह्यात मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत १५ विविध प्रकारचे प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाले असून त्यांना सुमारे २ कोटी ५० लाख रुपये अनुदान स्वरुपात वितरीत झालेले आहेत. यामध्ये काजू, नाचणी, भात व गूळ या प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे. या योजनेमुळे छोट्या उद्योगांना हातभार लागला आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सन २०२३-२४ अंतर्गत हरीतगृह, शेडनेट, सामुहिक शेततळे, फलोत्पादन, यांत्रिकीकरण, मनुष्यबळ विकास कार्यशाळा प्राथमिक फळप्रक्रिया केंद्र या घटकांकरीता ११५ लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. फक्त १ रुपया भरुन विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी व खरीप ज्वारी ही पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. खरीप हंगामात ८६ हजार ६३८ शेतक-यांनी सहभाग घेतला असून २३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित केली आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत १२१ लाभार्थ्यांना जिल्हास्तरावरुन २४० लाख रुपये निधीचे वितरण अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांच्या खात्यावर जमा केले आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ४ लाख ७० हजार लाभार्थ्यांना लाभ दिला जात असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत मार्च २०२४ अखेर ४ लाख ७० हजार लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आला आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५६३ वस्त्यांमधील कामांसाठी ३८ कोटी ९ लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन देण्याच्या योजनेअंतर्गत सन २०१९-२० ते २०२३- २४ अखेर एकूण ५०० कलावंतांची निवड करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानातून दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या महत्वाच्या धोरणांतंर्गत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत एकूण ३५ हजार ५१३ घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी २७ हजार ९५१ (७९ %)घरकुले पूर्ण झाली आहेत तसेच 7 ७ हजार ५६२ घरकुले प्रगतीपथावर आहेत.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (एमआरडीपी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.  ३ हजार २०० कोटींच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँक २ हजार ३३८ कोटी रुपयांचे वित्तसहाय्य करणार आहे. राज्य शासन ८६२ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दिनांक १२ ऑगस्ट २०२४ अखेर जिल्ह्यामध्ये शासकीय व खासगी अशा एकूण १४० आस्थापनांनी नोंदणी केली असून ४ हजार ६१० पदे ऑनलाईन अधिसूचित केली आहेत, त्यापैकी २२९ उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. तर ५४ उमेदवार आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत.

एकत्रित महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत गोल्डन कार्ड (PM-JAY) आरोग्य विमा योजना आहे. या योजने अंतर्गत ५ लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. या योजनेंतंर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १२ लाख ३८ हजार लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या वतीने गौरी गणपती सणादरम्यान आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यात १०० रु. मध्ये पामतेल, रवा, चणाडाळ, साखर इ. जिन्नस असतील. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य लाभार्थी योजना या शिधापत्रिकाधारकांना जानेवारी २०२३ पासून मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत ५ लाख ८६ हजार १२५ इतक्या कार्डावर २४ लाख ७९ हजार ९३४ इतक्या सदस्यांना दरमहा ७ हजार मे. टन तांदूळ व ५ हजार मे. टन गहू वितरीत केला जात आहे.

कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाला अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे. या देशाची एकता, स्वातंत्र्य आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिवीरांच्या बलिदानातून प्राप्त झालेले हे भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, असे सांगून त्यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या व अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमानंतर सर्व नागरिकांनी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

***

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिल्ह्याच्या सर्वांगिण  विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री शंभूराज देसाई*
सातारा दि.15 (जिमाका) :  सातारा जिल्ह्याला फार मोठी गौरवी परंपरा आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन शासन आणि प्रशासन अहोरात्र झटत आहे. अनेक विकासाभिमूख योजना, उपक्रम प्रामाणिकपणे राबविण्यात येत आहेत. सातारा जिल्हा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यांच्या गुणवत्ता वृद्धीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरूण नाईक, जयंत शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक जंयत करपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोयना धरण ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रही भुमिका घेतली. त्यांच्या निर्देशानुसार आम्ही कोयना जलपर्यटननाचा आराखडा तयार केला आहे.त्याला मजुंरी मिळाली. पहिल्या टप्प्यात मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्सचे काम सुरु करण्यात आले आहे. जागतिक दर्जाचे स्कुबा ड्रायव्हिंग, वॉटरस्पोर्टस, जंगल ट्रेकिंग , जंगल सफारीची मुनावळे ते कोयना धरणाच्या भिंतीपासुन सात कि.मी ची मर्यादा पाळून कामे सुरु करण्यात आली आहेत.
सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरातील खाजगी शाळांच्या दर्जाप्रमाणे ग्रामिण, डोंगरी–दुर्गम भागातील  जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी  मॉडेल स्कुल म्हणजेच माझी शाळा – आदर्श शाळा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यासाठी २२३ शाळा निवडण्यात आल्या आहेत. अनेक शाळांचे कामही सुरू आहे.
सर्वसामान्य जनतेला मल्टीस्पेशालिटी प्रमाणे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्मार्ट प्रथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना आपण राबवित आहोत. पहिल्या टप्प्यात या उपक्रमात ९० टक्के पीएचसींचा सामावेश करण्यात आला आहे.सातारा जिल्हा हा वेगवेगळ्या, वैशिष्टयपुर्ण विकासकामांचे राज्यासाठी मॉडेल असला पाहिजे हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, यापुढे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे  या दिवशी राष्ट्रीय ध्वाजारोहणाच्या कार्यक्रमापुर्वी शहिद जवानांच्या स्मारकाला
(वॉर मेमोरियला) अभिवादन करण्याची प्रथा आपण सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना शासनाने तयार केली आहे. प्रत्येक बहिणीला दरमहा १५०० रु. देण्याचा निर्णय शासणाने घेतला आहे. या योजनेचा पहिला टप्पा जमा होण्यास सुरुवातही झाली आहे. शासन महाराष्ट्राच्या विकासासाठी वचनबध्द, कटिबध्द आहे.
जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन क्रियाशील, प्रयत्नशिल आहे. त्यासाठी सर्व जिल्हावासियांचे माध्यम प्रतिनिधींचे सहकार्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि वॅार मेमोरियलला अभिवादनाची प्रथा सुरू
मुख्य शासकीय ध्वाजारोहणापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवई नाका येथील पुतळा आणि वॉर मेमोरियला अभिवादन करण्याची प्रथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आजपासुन सुरु केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर वॉर मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करुन त्यांनी शहीद जवानांना अभिवादन केले. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सना त्यांनी भेटी दिल्या.
 पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.
वीरपत्नी श्रीमती प्रणाली वैभव भोईटे , वीरमाता व वीरपिता रा. राजाळे ता. फलटण यानां वैभव भोईटे हे कर्त्यव्य बजावत असताना शहीद झाल्यामुळे  ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकरित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले. पोलिस अधीक्षक समीर शेख व इतर १६ पोलिस उपनिरीक्षक तसेच श्री. दिपक सदाशिव गिरीगोसावी पेालिस पाटील अनवडी, ता. वाई.यानां राज्यपाल यांच्यावतीने गौरवण्यात आले. सातारा जिल्हा कारगृह विभागामध्ये प्रशंसनिय कामगिरीबाबत शामकांत चंद्रकांत शेडगे यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिले जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयास आय.एस.ओ मांनाकन मिळाल्याबद्दल भाग्यश्री फरांदे जिल्हा कृषिअधीक्षक, सातारा व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विदयार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सातारा जिल्ह्यात १४ वर्षात १२०५ अपघात मोहिमा तसेच  ११० जीव वाचविणाऱ्या शिवेंद्रराजे रेस्क्यू टिमला विशेष गौरविण्यात आले. महाबळेश्वर ट्रेकर्स, महाबळेश्वर, सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर, शिरवळ रेस्क्यू टिम शिरवळ, खंडाळा रेस्क्यू टिम खंडाळा, जिल्हा समादेशक होमगार्ड विभाग सातारा,  इन्सपेक्टर (एन डि आर एफ) पुणे (कराड येथे पुर्वस्थित टिम) यानां पालकमत्र्यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
महसुल दिनानिमित्त उत्कृष्ठ अधिकारी , कर्मचारी यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी १०८ या आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेबद्दल माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण

नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री

पुणे, दि. १५: केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून  शहरातील रस्ते, उड्डाणपुलांची कामे करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता प्रयत्नशील आहे, याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले,  अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., मुख्य अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्य सरकारच्यावतीने केंद्र शासनाकडून राज्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे काम करण्यात येत आहे. राज्यात रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता उपमुख्यमंत्री कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विकास कामे करताना पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ, पुणे महानगर विकास प्राधिकरण, कॅम्प आदी यंत्रणेत समन्वय साधून  कामे करावी लागतात. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विविध भागात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.

यापूर्वीदेखील चांदणी चौकातील पूल उभारुन वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले आहे. बाह्यवळण मार्गाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंहगड रोडवरील नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून येत्या वर्षभरात ते पूर्ण करण्यात येईल, याकरिता ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुण्याच्या लोकसंख्येत वाढ होत असून पाणी, वाहतूक अशा विविध पायाभूत समस्या निर्माण होऊन नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन ते इच्छितस्थळी वेळेत पोहोचले पाहिजे, याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे  नागरिकांना  वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात वाहतूक कोडींचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आढावा बैठक घेण्यात येईल.

खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सिंहगड रोडवरील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होते. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता या भागात कायमस्वरुपी मार्ग काढण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने एकतानगर येथील सामूहिक विकास क्षेत्राविषयी (कलस्टर डेव्हल्पमेंट) सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी कामे करतांना राडारोडा नदीपात्रात टाकू नये. नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे बांधकाम करु नये, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी एक आगळेवेगळी भेट

राज्याची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी असलेल्या पुणे शहराच्या पायाभूत विकासात भर पडत असून आज सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी एक आगळेवेगळी भेट देण्याचा प्रयत्न आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे श्री.पवार म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजपर्यंत ३५ लाख  माता-भगिनींना लाभ

महिला सबलीकरणाकरिता राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास ३५ लाख माता-भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात ५० लाख महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे महिलांच्या मनात समाधानाची भावना दिसून येत आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथे या योजनेचा राज्यस्तरीय लाभ हस्तांरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्रीमती मिसाळ म्हणाल्या, नागरिकांची गैरसोय टाळून त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील  पुलाचे काम करण्यात येत आहे. आगामी  काळात या ठिकाणाहून जाणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या पिलरचे कामही करण्यात आले आहे. यापुढेही  लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून शहरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही श्रीमती मिसाळ म्हणाल्या.

डॉ. भोसले  म्हणाले, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहादरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येत असून त्यापैकी आज राजाराम पुलाजवळ ५२० मी. लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले  आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी सुटणार असून नागरिकांचे इंधन व वेळेची बचत होणार आहे. उर्वरित पुलाचे कामही लवकरात पूर्ण करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोसले म्हणाले.

लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

  • लातूर येथे भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
  • शेतकरीमहिलायुवा वर्गाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय

लातूरदि. 15 (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकरी, महिला, युवा वर्गासाठी शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामाध्यमातून सर्व समाज घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रारंभी ना. बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, भारत कदम, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जावेद शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

नारी शक्तीच्या सन्मानासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक पात्र महिलेला दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 85 हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले ससून पात्र महिलांच्या बँक खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र महिलांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या 3 हजार 720 मुलींचे जवळपास 18 कोटी 47 लाख रुपयांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ होणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षित युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल. सहा महिन्यांच्या प्रशिक्षण काळात राज्य शासन दरमहा 6 ते 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. तसेच अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदत केली जात आहे. 2023-24 मध्ये इयत्ता दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या 11 हजार 935 विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतून 43 कोटी 16 लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून 5 हजार 665 विद्यार्थ्यांना 22 कोटी 65 लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मातंग समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाने अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘आर्टी’ची स्थापना केली आहे. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी जळकोट आणि रेणापूर येथे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहे सुरु केली आहेत. त्यामुळे या मुलांचे शिक्षण अखंडितपणे सुरु राहण्यास मदत होणार असल्याचे ना. बनसोडे म्हणाले.

शेतकऱ्यांना वीज सवलत; कापूस व सोयाबीन उत्पादकांना अनुदान

शेतकरी बांधवांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषीपंपाला मोफत वीज पुरविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल. जिल्ह्यात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी विद्युत वितरण व्यवस्था बळकट केली जात आहे. नादुरुस्त विद्युत रोहित्र तातडीने बदलून मिळावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 200 रोहित्र खरेदीसाठी निधी देण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील 6 लाख 8 हजार शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, असे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून 70 तलावातील सुमारे 37 लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. यामुळे पाणी साठ्यात 376 कोटी लिटरची वाढ झाली. हा गाळ 9 हजार 500 एकरावर पसरण्यात आला आहे. त्यामुळे शेती सुपीक बनण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

वयोवृद्ध नागरिकांना सहाय्य साधने खरेदीसाठी मदत; तीर्थ दर्शनही घडविणार

वाढत्या वयामुळे वृद्धांना अशक्तपणा, दिव्यांगत्वाला सामोरे जावे लागते. यावर उपाययोजना करण्याकरिता 65 वर्षांवरील अशा नागरिकांना व्हीलचेअर, श्रवणयंत्र यासारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र यात्रा घडविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली असल्याची माहिती ना. बनसोडे यांनी दिली.

अंगणवाडीतील ‘वन स्टॉप सेंटर’ ठरतेय बालकांसाठी फायदेशीर

जिल्हा परिषदेने अंगणवाडीमध्ये ‘वन स्टॉप सेंटर’ सुरु करण्यात आली असून आरोग्य तपासणी, लसीकरण, समुपदेशन, बाळंतविडा वाटप या सारख्या सेवा देण्यात येत आहेत. त्यामुळे बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. तसेच 177 बालकांना असलेल्या दुर्मिळ आजारांचे वेळेत निदान होवून त्यांना संदर्भ सेवा देण्यात आली असल्याचे ना. बनसोडे म्हणाले. तसेच जिल्ह्यातील 13 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 8 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्तेचे मानांकन मिळाले आहे. आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळालेला लातूर हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी नमूद केले.

परिवहन विभागामार्फत उदगीर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले आहे. एमएच 55 क्रमांक असलेल्या या कार्यालयाद्वारे पाच तालुक्यांतील नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. उदगीर येथे विविध समाजासाठी भवन, सभागृह उभारण्यात येत आहेत. तसेच उदगीर येथे नगरपालिकेने भव्य बुद्ध विहार उभारले आहे. या बुद्ध विहाराचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न

जिल्ह्यातील क्रीडा सुविधांच्या बळकटीकरणासाठी 164 कोटी 13 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातून लातूर विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल आणि 6 तालुका क्रीडा संकुलांचा विकास केला जाणार आहे. तसेच मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 101 शाळांमध्ये क्रीडांगण विकास करण्यात येत असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

यावर्षी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवडा अभियानाद्वारे राज्य शासनाच्या योजनांचा प्रसार आणि प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख बनण्यास मदत झाली असल्याचे ना. बनसोडे म्हणाले. लातूर जिल्ह्यात वन क्षेत्र कमी असल्याने वृक्ष लागवडीसाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान सुरु केले आहे. जून महिन्यापासून या अभियानामध्ये जवळपास 30 लाख वृक्ष लागवड झाली असल्याचे नमूद करून प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी झाड लावून लातूर जिल्हा हरित बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ना. बनसोडे यांनी यावेळी केले.

ध्वजारोहणानंतर राखीव पोलीस उपनिरीक्षक डी. डी. माने यांच्या पथकाने मानवंदना दिली. या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल यावेळी त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच विविध योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कारप्राप्त खेळाडू, विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ

 लोककल्याणकारी योजना राबविण्यावर भर; जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू

सिंधुरत्न समृद्ध योजना जिल्ह्यासाठी  वरदान

सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जि.मा.का) : सर्वसामांन्याच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने आणि राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा अनेक महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास प्राधान्य देणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालय, पोलिस परेड ग्राऊंड येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले आदी उपस्थित होते. यावेळी अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली.

श्री. केसरकर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. या लढ्याच्या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा अनेकांच्या त्यागातून, प्राणार्पणातून आपल्याला स्वराज्य मिळाले आहे असे सांगून ते म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्याबरोबरच विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जर्मनीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी महाराष्ट्र आणि जर्मनीच्या बाडेन-वर्टेम्बर्ग राज्य यांच्यात फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या कराराचा पाठपुरावा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम मोफत वर्ग सुरू करण्यात आले आहेत आणि लवकरच ते सर्वत्र सुरू होतील. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. आता प्राथमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांना १६ हजार, माध्यमिकसाठी १८ हजार तर उच्च माध्यमिकसाठी २० हजार रूपये इतके करण्यात आले आहे. खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या तीन वर्षांसाठी ग्रंथपालांना १४ हजार रूपये, प्रयोगशाळा सहायकांना १२ हजार रूपये, कनिष्ठ लिपिकांना १० हजार रूपये तर केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आठ हजार रूपये मानधन देण्यात येत आहे. पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश योजनेचा लाभ देण्यात येत आहे. याचबरोबर एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देखील दिले जात आहेत. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी ‘पहिले पाऊल’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील विकासाविषयी बोलताना ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टल अंतर्गत ७५२ शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. माझी ई शाळा डिजिटल साक्षरता मिशन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या २०२ शाळांमध्ये राबविला जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत १४ कोटी रुपये खर्चुन वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी दरवर्षी 50 कोटींचा निधी उपलब्ध होणार असून  107 कोटींच्या कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी  57 कोटी इतका निधी वितरीत झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण  करुन अनेक सुख सुविधा निर्माण केल्या आहेत. या तिन्ही स्थानकांचे लोकार्पण नुकतेच पार पडले. जिल्ह्यात तीन दिवस जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या अनेक समस्यांचे निराकरण झाले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०२१ साली तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हेाते. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानासाठी शासन स्तरावरुन निधी कमी पडल्याने पाठपुरावा केल्यानंतर ३ कोटी ४६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून त्यापैकी २ कोटी ५९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे असेही ते म्हणाले.

शासन राबवित असलेल्या महत्वाकांक्षी योजनांविषयी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५२७ पात्र लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनअंतर्गत ३२४ उमेदवारांची शिकाऊ प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात आली आहे. यापैकी ५५ उमेदवार संबंधित आस्थापनांवर रुजू झालेले आहेत.  लेक लाडकी योजनेअंतर्गत ०१ एप्रिल २०२३ नंतर ज़न्मलेल्या २९२ मुलींना ५ हजार रुपये या प्रमाणे १४ लाख ६० हजार एवढी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात १३७ प्रकल्पांना ८ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज मंजुर करण्यात आलेले असून  २ कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान अर्थ साहाय्य स्वरुपात देण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत गट लाभार्थी मंजुरी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम ठरलेला आहे

पोलिस प्रशासनाने ‘ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग जनजागृती अभियान’, ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती अभियान, सायबर सिक्युरीटी व जनरल अवेरनेस उपक्रम राबविण्यात आला असेही ते म्हणाले.

विशेष गौरव 

विशेष कामगिरी आणि उत्कृष्ट काम केल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर यांच्याकडून गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग पोलिस दलातील राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर यांना राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.  विशेष कामगिरी केलेल्या तसेच पोलिस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त पोलिस अधिकारी आणि धाडसी कामगिरी केलेल्या मुलांचा यावेळी गौरव करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक पध्दतीने बनविली जाणारी हस्तकला ‘सावंतवाडी गंजिफा पेंटीग’ करीता भौगोलिक मानांकनाचे देशस्तरावरचे अधिकारी प्राप्त करुन दिल्याबद्दल ॲङ समीक्षा राजेंद्र दाभाडे यांना गौरविण्यात आले.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्ष इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रुद्र पिकुळकर, संचिता संभाजी पाटील, वेदा प्रविण राऊळ, संस्कार चोपडे, चिन्मयी खानोलकर, ईशान नागवेकर यांचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार-

श्रध्दा सतिश पाटकर, विवेक तिरोडकर, ऐश्वर्य मांजरेकर, निलम राणे,

संस्था- देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारिवडे, प्रितगंध फाउंडेशन, मुंबई, साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल,

जिल्हा क्रीडा पुरस्कार-

पूर्वा संदिप गावडे हिला जलतरण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. भारतीय स्विमिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या 49 व्या ज्युनिअर नॅशनल ॲक्वॅटिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभागी झालेली आहे. पूर्वा गावडे हिने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे.

आयुष पाटणकर याचा रायफल शुटींग एअर पिस्टर स्पर्धेत गुणवंत खेळाडू  म्हणून सन्मान करण्यात आला.

सोमनाथ गोंधळी यांचा सॉफ्टबॉल, थ्रोबॉल आणि बेसबॉल मार्गदर्शक म्हणून सन्मान करण्यात आला.

उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार-

प्रथम पुरस्कार-  हर्षवर्धन किरण बोरवडेकर

व्दितीय पुरस्कार – स्वप्नाली समीर शिरवडकर

 

००००००००

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापनदिनाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शुभेच्छा संदेश

 नांदेड दि. 15 ऑगस्ट:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी अभिजीत यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी 9.05 वाजता हर्षोल्हासात त्यांनी ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हावासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठी अनेकांना पुरस्कार बहाल केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज धुळे येथे ध्वजवंदन केले. तथापि, स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नांदेड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना त्यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मधील या सोहळ्याला आज ध्वजवंदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचे 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या समारंभास विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

ध्वजवंदनानंतर सलामी देण्यात आली.  परेड कमांडर पोलीस निरीक्षक अविनाश धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी उपस्थित मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार बी.आर. देशमुख, माजी आमदार गंगाधर पटणे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदीची उपस्थिती होती.

विशेष कामगिरीचा गौरव

हैद्राबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम 1954 मधील तरतुदी व शासन राजपत्रानुसार गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीचे सदस्य म्हणून अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी काम केले. याबाबत अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, साऊथ आफ्रिका येथील मॅरेथान स्पर्धेत सहभाग नोंदवून विहित वेळेत अंतर पूर्ण केल्याबाबत उपजिल्हाधिकारी रोहयोचे ललीतकुमार वऱ्हाडे यांचा गौरव करण्यात आला. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विहित कालमर्यादेत काम करणाऱ्या अर्धापूरचे नायब तहसिलदार शिवाजी बाळाजी जोगदंड यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कर्तव्य बजावलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना विशेष सेवा पदक जाहिर केले. याबाबत पोलीस उप निरीक्षक सागर सुभाषराव झाडे, वैशाली निवृत्ती कांबळे, नारायण मारोती शिंदे, प्रियंका पवार, राजेश मारोती नंद, निजाम मुसा सय्यद, नरेश केशव वाडेवाले, सचिन मुकुंदराव आरमळ, उमेश किसनराव कदम, पोलीस नायक आशिष प्रभु माने यांना पुरस्कार प्रदान केले.

जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण

यावेळी जिल्हा युवा पुरस्कार 2020-21 मध्ये युवक गटात खान इमरान मुजीब पाशा रा. बिलोली जि. नांदेड यांना  10 हजार रुपयांचा धनादेश व जिल्हा युवा पुरस्कार 2021-22 युवक यामध्ये अमोल उध्दवराव सरोदे यांचा रोख रक्कम 10 हजार रुपयांचा धनादेश व शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून सत्कार केला. संस्था या गटात अल इम्रान प्रतिष्ठान, बिलोली, जि. नांदेड यांना रोख रक्कम 50 हजार रुपये आणि जिल्हा युवा पुरस्कार 2022-23 युवक या गटात अमरदीप दिगंबर गोधने हाडको नवीन नांदेड यांना रोख रक्कम 10 हजार रुपयांचा धनादेश व शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह, सन्मानपत्र देवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2023 सीबीएसई विभाग इयत्ता पाचवीतील 5 विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. यात शाश्वत संतोष केसराळे, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा, पार्थ लिंगेश्वर सोनटक्के, नारायणा ई-टेक्नो स्कूल वाडी, बु नांदेड, सोहम उत्तम मोरे, ग्यानमाता विद्या विहार कामठा रोड, नरसतपूर, प्रज्वल सुंदर धवन, पोदार इंटरनॅशनल स्कूल, पूर्णा रोड नांदेड, सान्वी बाबाराव दारकू, ग्यानमाता विद्या विहार कामठा रोड, नरसतपूर यांचा समावेश आहे. याशिवाय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन 2023 मध्ये ग्रामीणमध्ये शाकुंतल फॉर एक्सलंसचा मारोती शिवराज कुरुंदकर, ज्ञानभारती विद्या मंदिर पुयनीचा अद्वैत नरहरी भोसले, समृध्दी नागनाथ भुरे, कल्याण पद्यनजय कोनाळे यांना तर माध्यमिक शहरी विभागातून राजर्षी शाहू विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, वसंत नगर, नांदेडचा दयासागर गंगाधर चिंचणे, केंब्रिज माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर, नांदेडचा श्रीयश रावसाहेब झांबरे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सीबीएसई विभाग आठवीचे ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड येथील प्राची पंढरीनाथ जाधव, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा येथील विघ्नेश बालाजी राजे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड ओमसाई धर्मवीर ठाकूर, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा मयुरेश उमाकांत वाग्शेट्टे, अभिजीत संतोष मोरे, दिव्या राम अनकाडे, शाकुंतल फॉर एक्सलंस अथर्व संग्राम झुपडे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड स्नेहा देविदास जमदाडे, श्रेयस प्रभू दुगाळे पाटील, पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल काकांडी तर्फे पासदगाव सोहम निलेश कोटगिरे, शाकुंतल फॉर एक्सलन्स रोहन गोविंद कौसल्ये, पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल काकांडी तर्फे पासदगाव श्रुतिका गोविंद येळगे, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा श्रीकर विक्रम महुरकर, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड सोहम गंगाधर मंत्रे, श्रीकांत शिवाजी मिरासे, पोदार इंटरनॅशनल स्कूल पूर्णा रोड तनिष्क दिनेशकुमार धुत यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यानंतर नांदेड येथील अवयवदान केलेल्या ढोके यांच्या परिवाराचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी व अक्षय रोडे यांनी केले.

000

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. १५- देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान आणि राज्यगीत गायले गेले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री श्री.लोढा यांनी देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान असून राज्य शासनामार्फत विविध लोकोपयोगी योजना सुरू असल्याचे सांगितले. राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक, शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री.लोढा यांनी स्वातंत्र्य सैनिक, उपस्थित विद्यार्थी, नागरिक, अधिकारी यांच्याशी संवाद साधून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिष्यवृत्ती परीक्षांमधील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रमाणपत्र योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे महसूल पंधरवड्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.

00000

बी.सी. झंवर/वि.स.अ

 

ताज्या बातम्या

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान – केंद्रीय मंत्री अमित शाह

0
मुंबई, दि. २०: देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना व्यापार व उद्योगांचे...

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात विचारवंत दिले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २० : पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात थोर विचारवंत व क्रांतिकारक दिले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल - बाल - पाल या त्रयींसह...

महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – केंद्रीय बंदरे...

0
मुंबई, दि. २०: महाराष्ट्रातील बंदर विभागाचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य शासनाचे विभाग यांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना केंद्रीय बंदरे मंत्री...

५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांना नियमित करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी – मंत्री मंगल...

0
मुंबई, दि. २०: ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे, असे...

‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’त पाच आरजे घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

0
मुंबई, दि. २०: जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिला ‘सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ व ‘महाराष्ट्र...