सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 550

महाराष्ट्र शासनाचे ११, १६, २१ व २५ वर्षे मुदतींचे प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या अकरा वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटींच्या महाराष्ट्र शासनाचे रोखे (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेमधील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. 20 ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २० ऑगस्ट  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 21 ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ ऑगस्ट २०३५  रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दरशेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी २१ आणि ऑगस्ट २१ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

 महाराष्ट्र शासनाचे १६ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या 16 वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटींच्या महाराष्ट्र शासनाचे रोखे (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेमधील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. 20 ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २० ऑगस्ट  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 21 ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १६ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ ऑगस्ट २०४० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दरशेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी २१ आणि ऑगस्ट २१ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे २१ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या 21 वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटींच्या महाराष्ट्र शासनाचे रोखे (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेमधील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. 20 ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २० ऑगस्ट  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 21 ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी 21 वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ ऑगस्ट २०४५ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दरशेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी २१ आणि ऑगस्ट २१ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे २५ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या 26 वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटींच्या महाराष्ट्र शासनाचे रोखे (दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेमधील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या दहा टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. 20 ऑगस्ट  २०२४  रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् २० ऑगस्ट  २०२४ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 21 ऑगस्ट २०२४  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी 2६ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ ऑगस्ट २०५० रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दरशेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक फेब्रुवारी २१ आणि ऑगस्ट २१ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर शिक्षकांनी भर द्यावा – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

मुंबई, दि. 14 : शासनाने राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाढीव पदावरील 18 पात्र शिक्षकांच्या समायोजन आदेशाचे वाटप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा, असे सांगून श्री.केसरकर यांनी समायोजित शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यावेळी उपस्थित होते.

वाढीव पदावर कार्यरत पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतच्या शासनाच्या निर्णयानुसार यापूर्वी मुंबई विभागातील 21 शिक्षकांना मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते 10 जानेवारी 2024 रोजी समायोजनाचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, यापूर्वी समायोजन न झालेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश 7 मार्च 2024 रोजी प्राप्त झाल्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 16 वाढीव पदावरील कार्यरत शिक्षकांचे समायोजन केले. मात्र काही पात्र शिक्षकांना समायोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध नव्हते, अशा शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून रिक्त जागांचा आढावा घेऊन पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शासनास विनंती केली होती, त्यानुसार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र प्राथमिक‍ शिक्षण परिषदेच्या चर्नी रोड येथील राज्य प्रकल्प संचालक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते 18 शिक्षकांना हे वाटप आदेश देण्यात आले.

या कार्यक्रमास संबंधित शिक्षकांसह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्री आणि राज्य शासनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा!

मुंबई, दि. 14 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“देशाच्या अठ्ठ्यातराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा दिवस आपल्याला असंख्य स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि सामान्य नागरिकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतो.

महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्राने सामाजिक-आर्थिक विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आपले राज्य औद्योगिक विकास, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, शेती आणि संस्कृतीत आघाडीवर आहे. आज महाराष्ट्र हे केवळ भारतातील आघाडीचे राज्य नाही तर प्रगती आणि नवनिर्मितीचे प्रतिक आहे.

आगामी काळात समृद्ध आणि सर्वसमावेशक अशा विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र निर्णायक भूमिका बजावेल, असा मला विश्वास वाटतो. देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी आपण सर्वांनी नव्या जोमाने एकजूट होऊ या आणि स्वातंत्र्य, समता आणि न्यायाचे आदर्श पुढील पिढ्यांसाठी कायम ठेवूया”, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राज्यपालांचे झेंडावंदन पुणे येथे

अठ्ठ्यातराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन गुरुवारी (दि. 15) सकाळी 9 वाजता  पुणे येथील कौन्सिल हॉलच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना देणार आहेत.

००००

 

Maharashtra Governor greets people on Independence Day

 

Mumbai 14 : Maharashtra Governor C P Radhakrishnan has greeted the people of Maharashtra on the occasion of Independence Day. In a message the Governor wrote:

“On the auspicious occasion of the 78th Independence Day, I extend my heartiest greetings to all the citizens of Maharashtra. This day reminds us of the sacrifices made by countless freedom fighters, revolutionaries and ordinary citizens to secure the independence.

Maharashtra has had a rich legacy of Saints and social reformers who have guided our society on the path of righteousness, justice, and equality.

Since attaining independence, Maharashtra has made remarkable strides in socio-economic development. Our State has been at the forefront of industrial development, education, agriculture and culture. Today, Maharashtra is not just a leading State in India but a symbol of progress and innovation.

I am confident Maharashtra will play a pivotal role in achieving the dream of a Viksit Bharat. Let us all join hands to contribute to the nation’s progress and ensure that the ideals of freedom, equality, and justice are cherished.”

Governor to hoist National Flag in Pune

Governor C. P. Radhakrishnan will hoist the National flag on the occasion of the 78th Independence Day at Council Hall, Pune at 9 am on Thursday (15th Aug.)

000

सिन्नर ‘एमआयडीसी’तील समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला सविस्तर आढावा

मुसळगाव औद्योगिक वसाहतीत शंभर बेडचे कामगार हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. 14 : नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ‘इंडिया बुल्स’ प्रकल्पाकरिता संपादित जमिनीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीच्या सातबाऱ्यांवरील कर्जाचे बोजे दि.31 ऑगस्टपर्यंत हटवून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. त्याचबरोबर सिन्नर ‘एमआयडीसी’तील उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.

महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत (व्हिसीद्वारे), आमदार ॲङ माणिकराव कोकाटे, आमदार राजू कारेमोरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा, प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन शर्मा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे डॉ. अविनाश ढाकणे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (व्हिसीद्वारे) उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, उद्योगांना चालना देण्यासाठी माळेगाव व मुसळगाव लिंक रोड लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. हा रस्ता सिन्नर शहराच्या पूर्व व पश्चिमेस असलेल्या दोन औद्योगिक वसाहतींसह रतन इंडिया प्रकल्पाला जोडणार आहे. या रस्त्याकरिता नगरपालिकेने जागा संपादित करुन ती ‘एमआयडीसी’ला वर्ग करावी. या रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत पाच एकर क्षेत्रात शंभर बेडच्या हॉस्पिटलची उभारणी करण्यासाठी ‘ई.एस.आय.सी.’ला तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006’ या कायद्यात सुधारणा झाल्याने तसेच रेडी रेकनरच्या दरानुसार त्याची आकारणी करण्यात येत असल्याने फायर चार्जेसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हे दर उद्योजकांना परवडत नसल्याने फायर चार्जेस दर कमी करण्याबाबतचा प्रस्ताव ‘एमआयडीसी’ने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे, सिन्नर औद्योगिक क्षेत्रात बहुतांश अभियांत्रिकी व त्यासंलग्न उद्योग कार्यान्वित आहेत. या उद्योगामुळे रसायनयुक्त सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या क्षेत्रातील सर्व उद्योजकांनी एकत्रित येऊन सामाईक ईटीपी प्रकल्पाची उभारणी करावी. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

००००

संजय ओरके/विसंअ

इचलकरंजी शहरातील प्रलंबित योजनांची कामे तातडीने मार्गी लावून पाणी पुरवठा योजनेचे काम प्राधान्याने करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 14: इचलकरंजी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. इचलकरंजीकरांना दिलासा देण्यासाठी शहराकरिता प्रस्तावित करण्यात आलेल्या योजना तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहराची पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार आसिफ शेख रशीद शेख, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,  वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, विठ्ठलराव चोपडे, इचलकरंजी यंत्रमागधारक कृती समितीचे चंद्रकांत पाटील, प्रकाश गौडे, रफिक खानापुरे, सुभाष मालपाणी, इचलकरंजी रायझिंग को. ऑप सोसायटीचे पांडुरंग धोंडेपुडे, प्रल्हाद शिंदे, दिलीप ढोकळे, हर्षल पटनावर, तौफिक मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, इचलकरंजी शहरातील मिळकत धारकांचा शास्तीकर रद्द करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. पिंपरी-चिंचवड शहराच्या धर्तीवर शास्तीकर माफीचा निर्णय घेण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात याव्यात. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा. इचलकरंजी शहरात असलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन त्याच जागेवर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. त्यासोबतच इचलकरंजी शहरातील यंत्रमाग धारकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत. यंत्रमाग धारकांना कर्जावरील व्याजावर पूर्वीप्रमाणे रायझिंग (वॉर्पिंक) उद्योगांना देण्यात येणारी पाच टक्के व्याज सवलत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

0000

निलेश तायडे/विसंअ

शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाच्या जागेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. 14 (जि.मा.का.) :  सातारा तालुक्यातील आरे गाव येथे शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानासाठी जागेचा प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. यासंदर्भात त्यांच्या मातोश्री कालिंदी महाडिक व चुलत बंधू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली.

आरे गाव येथे शहीद कर्नल  संतोष महाडिक यांच्या स्मृती उद्यानासाठी 37 गुंठे जमीन देण्यात येणार आहे. या ठिकाणी महसूल विभागाने त्वरित भेट देऊन जमीन मोजणी करुन द्यावी व सरकारी आदेश काढावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री स्वत: इतके वर्ष याविषयी पाठपुरावा करीत आहेत. यंत्रणेने हा विषयक प्रधान्याने व  संवेदनशीलपणे मार्गी लावावा, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले. यावेळी त्यांनी श्रीमती कालिंदी महाडिक यांना अत्यंत आदराने बोलावून घेत त्यांचा विषय ऐकून घेतला आणि महसूल विभागाला तत्काळ स्थळ पाहणीच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर येणाऱ्या 15 ऑगस्टपासून वॉर मेमोरियलला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे या दिवशी अभिवादन करण्याची प्रथा जिल्ह्यात सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मेळावा यंत्रणांनी समन्वयाने यशस्वी करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. 14 (जि.मा.का.) :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय काम केले आहे. या योजनेचा मेळावा रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या मेळाव्यास सुमारे 50 हजार महिला येणार असून यंत्रणांनी समन्वयाने काम करुन मेळावा यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील रविवारी होणाऱ्या मेळाव्याविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण  यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्याच्या विविध भागातून सुमारे 50 हजार महिला या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असून त्या दृष्टीने वाहन व्यवस्था, वाहतूक, ट्राफिक, वाहनतळ, व्यासपिठ नियोजन, पाणी व स्वच्छतेची व आसन व्यवस्था आदी सर्व व्यवस्थांबाबत करण्यात आलेल्या नियोजनांचा सखोल आढावा घेतला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 5 लाख 21 हजार 83 एवढे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5 लाख 13 हजार 418 इतक्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.  मेळाव्यात प्रातिनिधीक स्वरुपात लाडक्या बहिणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना राखीही बांधणार आहेत, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पूर्णाकृती पुतळा त्वरित बसवावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर बाजार पेठेच्या चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार  छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसविण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

महाबळेश्वर येथील आराम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या अनुषंगाने पुतळा समितीसोबत पालकमंत्री यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक वर्षभर येत असतात. अशा पर्यटनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत देखणा व दिमाखदार पुतळा असणे आवश्यक आहे.  येथील आराम चौकात पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा होता. त्या ठिकाणी जागा निश्चित करुन पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेने तत्काळ बैठक घ्यावी. दोन दिवसाच्या आत चौक सुशोभीकरण व पुतळा तयार करण्यासाठी वास्तुशिल्पकारांकडून डिझाईन तयार करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार त्वरित पूर्णाकृती पुतळा बसवावा, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई यांनी पुढील आठ दिवसाच्या आत महाबळेश्वर नगरपालिकेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्याधिकारी यांना दिल्या.

‘नवीन चंद्रपूर’मुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

‘बालेवाडी’च्या धर्तीवर चंद्रपुरात साकारणार अद्ययावत स्टेडियम

चंद्रपूर, दि. 14 : चंद्रपूर जिल्ह्याचा झपाट्याने होत असलेला विकास आणि शहराची वाढती लोकसंख्या बघता यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी इरई नदीच्या बाजूस होत असलेले ‘नवीन चंद्रपूर’ नक्कीच जिल्ह्याच्या वैभवात भर टाकेल. म्हाडाने यासाठी पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमच्या धर्तीवर अद्ययावत  क्रीडा संकुल चंद्रपुरात करण्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल उज्ज्वल भविष्याची नांदी आहे, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नवीन चंद्रपूरच्या निर्मितीसाठी ‘म्हाडा’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाल्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुरू आहे; त्यांच्याच संकल्पनेतून विकासकांची, विविध संस्थाचालकांची, उद्योग व्यवसायातील गुंतवणूकदरांची एक दिवसीय बैठक नागपुरातील वनामती सभागृहात मंगळवारी पार पडली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वैविध्यपूर्णतेने संपन्न चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा गेल्या काही वर्षात वन अकादमी, सैनिकी शाळा, बोटेनीकल गार्डन, कॅन्सर हॉस्पिटल, एसएनडीटी महाविद्यालय यासारख्या वैशिष्टपूर्ण संस्था आणि पायाभूत सुविधांमुळे  देशाच्याच नव्हे तर  जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हा विकास होत असताना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या चंद्रपूर शहरात वाढते नागरिकीकरण लक्षात घेता परिसरातील जंगल क्षेत्राचा विचार करता शहराच्या विकासाला मर्यादा आहेत; म्हणूनच कमी दरात घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 10 हजार घरांची योजना महाप्रीत सोबत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यापैकी 3600 घरे करण्याबाबतची बैठक नुकतीच झाली असल्याचे सांगत इतर सर्व पायाभूत सोयी सुविधा, शासकीय कार्यालये, इमारती यासाठी आग्रह करत असताना या भागात 100 एकर मध्ये पुण्याच्या बालेवाडी स्टेडीयम प्रमाणेच अद्ययावत स्टेडीयम करण्याचा माझा संकल्प होता, तो म्हाडाने जागा उपलब्ध करून पूर्ण केला याचे विशेष समाधान आहे. नवीन चंद्रपूरचा प्रकल्प या “इन्व्हेस्टर समिट” मुळे वेगाने मार्गी लागेल. म्हाडाने यासाठी नव्याने आराखडा तयार केला असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली असल्याने गती प्राप्त होईल, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

काय आहे नवीन चंद्रपूर ची संकल्पना? : साधारणत: 90 च्या दशकानंतर वाढती लोकसंख्या सामावून घेण्यासाठी चंद्रपूर शहराच्या आसपास जागाच नसल्याने व आसपासचा परिसर जंगलांनी व्यापल्याने सुविधांवर ताण पडू लागला. त्यामुळे 1998 साली नवीन चंद्रपूर वसविण्याचा निर्णय घेण्यात आला व सूत्रे म्हाडाकडे देण्यात आली. त्यासाठी 139.71  हेक्टर क्षेत्र आरक्षितही केले. शाळा, रुग्णालये, महाविद्यालये, क्रीडांगण, निवासी-अनिवासी संकुले अशा अनेक सुविधांसाठी भूखंड आरक्षित करून 7 लाख 13 कोटी निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र मात्र मधल्या काळात हा विषय प्रलंबित राहिला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यासाठी आग्रही असल्याने त्यांचे प्रयत्न मात्र सुरूच होते. अखेर  ‘म्हाडा’ ने  आराखडासाठी सल्लागाराची नियुक्ती करून कामाला गती दिली.

नवीन चंद्रपूर प्रकल्पासाठी मंगळवारी नागपुरात झालेल्या बैठकीत  ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधला व चर्चा केली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर, चंद्रपुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्थांचे प्रतिनिधी, काही नागरिक बैठकीला उपस्थित होते. यावेळी रस्ते, वीज, पाणी यासह अन्य सुविधा कशा विकसित करायच्या, नवीन चंद्रपुरात स्थानिकांना काय हवे आहे, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी गतीने करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा

अमरावती, दि. 14 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी केली जात आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांनी  मतदार साक्षरता व मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी योग्य समन्वय साधून अनुषंगिक कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन अमरावती विभाग मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. छायाचित्रासहित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (अर्हता दिनांक 1 जुलै 2024 वर आधारित) च्या अनुषंगाने आयोजित प्रथम भेट अंतर्गत या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, सर्व विधासनभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदार नोंदणीबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण मतदाराची संख्या, केंद्रनिहाय सुरु असलेली मतदार नोंदणीची सद्यस्थिती, जिल्ह्यात नव्याने तयार झालेले मतदार केंद्र, प्रस्तावित विलीन होणारी मतदान केंद्र तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान बैठका आदींबाबत त्यांनी माहिती दिली.

डॉ. पाण्डेय यांनी मतदार नोंदणीच्या कामामध्ये राजकीय पक्षांना येत असलेल्या अडचणीं जाणून घेतल्या व त्या दूर करण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला आदेश दिले. राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी सहाय्यकाची नेमणूक करणे व प्रशासनाच्या समन्वयाने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदार संघांमध्ये कमी मतदान झाले आहे. तिथे मतदार नोंदणी व मतदान जनजागृती व्यापक प्रमाणात करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले. अशा क्षेत्रात ‘स्वीप’ मोहिम प्रभावीपणे राबविण्यात यावी. युवा मतदारांची मतदार म्हणून अधिकाधिक नोंदणी करावी. यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात यावे, असेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंदवावयाचा शिल्लक राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुधारित कार्यक्रमानुसार 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करता येणार आहे. प्राप्त दावे व हरकतींचे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे.

अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

 मुंबईदि. १४ : अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मंगळवारी (दि. 13 ऑगस्ट) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आर्थिक व राजकीय सहकार्य, व्यापार व गुंतवणूक, राज्यातील विद्यापीठांचे अमेरिकन विद्यापीठांशी सहकार्य तसेच कौशल्य विकास या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.

माईक हँकी यांनी राज्यपालांशी संभाषणाची सुरुवात तामिळ भाषेत करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांना सुखद धक्का दिला. विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 30 वर्षांपूर्वी आपण एक वर्ष तामिळनाडू येथे शिक्षण घेतले व तेथे आपण तामिळ भाषा शिकल्याचे माईक हँकी यांनी राज्यपालांना सांगितले.

अमेरिकेचा मुंबईतील वाणिज्य दूतावास हा आपल्या देशाचा जगातील सर्वात मोठ्या दूतावासांपैकी असून गेल्या वर्षी मुंबईने सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी कुलगुरू व अमेरिकेतील विद्यापीठांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते असे सांगून हे शैक्षणिक सहकार्य अधिक वाढावे या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास क्षेत्रात देखील अमेरिका राज्यातील आयटीआय व राज्य कौशल्य विद्यापीठासोबत कार्य करीत असल्याचे माईक हँकी यांनी सांगितले. यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अमेरिका भारतात महिला उद्यमशीलता, कृषी व अन्नप्रक्रिया, आरोग्य सेवा, स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणूक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या वाणिज्यदूतांचे स्वागत करताना राज्यातील विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमधील सहकार्य वाढविताना विद्यार्थी आदानप्रदान तसेच तज्ज्ञ व अध्यापक आदानप्रदान वाढविले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. अमेरिकेने भारताशी सौर ऊर्जा, औषध निर्माण व  वस्त्रोद्योग या क्षेत्रात देखील गुंतवणूक वाढवावी,अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी अमेरिकन वाणिज्य दूतावासातील राजकीय आर्थिक प्रमुख रिचा भला, राजकीय अधिकारी रायन म्यूलन व राजकीय सल्लागार प्रियंका विसरिया – नायक हे देखील उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...