मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
Home Blog Page 532

बालकांच्या कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व कौशल्य क्षेत्रात गुंतवणूक गरजेची – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन  

मुंबई, दि. ३ : भारतात सन २०५० पर्यंत लहान मुलांची संख्या जगात सर्वाधिक, म्हणजे अंदाजे ३५ कोटी असेल. यादृष्टीने राज्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण, नोकरीच्या समन्यायी संधी निर्माण करणे व तंत्रज्ञान उपलब्धतेतील तफावत कमी करणे गरजेचे असून या क्षेत्रात अधिक गुंतवणूकीवर भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट – २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले, महाराष्ट्रासह आसाम, ओडिशा, प. बंगाल व इतर काही राज्यांना पर्यावरण विषयक आव्हानांना सामोरे जावे लागेल. पर्यावरण बदल तसेच जैवविविधता व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची झळ विशेषतः लहान मुलांना बसेल, असे ‘युनिसेफ’च्या अहवालात म्हटले आहे.

पर्यावरण बदलांना तोंड देताना युवा पर्यावरण योद्धे व समाजातील विविध घटकांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून राज्यपालांनी महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ऍक्शन आणि ग्रीन क्लब या पर्यावरण उपक्रमांना तसेच पर्यावरण योद्ध्यांना त्यांच्या कामाबद्दल कौतुकाची थाप दिली. पर्यावरण विषयक अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये सुरु करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये पर्यावरण विषयक अभ्यासक्रम राबविण्याची विनंती केली.

महाविद्यालयीन पर्यावरण योद्धे गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

0000

Maharashtra Governor releases UNICEF

State of World’s Children Report

 

Mumbai, 3rd Dec : Maharashtra Governor  C. P. Radhakrishnan released the UNICEF ‘State of the World’s Children Report – 2024 : The Future of Childhood in a Changing World’ in presence of two young climate champions at Raj Bhavan Mumbai on Mon (2 Dec).

This year’s report presents a perspective on how three major factors – demographic changes, climate and environmental crises, and breakthrough technologies – are likely to impact children’s lives by 2050 and beyond.

Chief of UNICEF Maharashtra Sanjay Singh, UNICEF officers Yusuf Kabir and Swati Mahapatra and climate champions Gurpreet Kaur and Pooja Vishwakarma were present.

0000

 

‘नीरी’चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई, दि. २ : सीएसआयआर ‘नीरी’चे संचालक डॉ अतुल नारायण वैद्य यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी डॉ अतुल वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल त्या तारखेपर्यंत) करण्यात आली आहे.

डॉ अतुल वैद्य (जन्म ४ डिसेंबर १९६४) यांनी रसायन अभियांत्रिकी विषयात एलआयटी नागपूर येथून एम एस्सी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच डी प्राप्त केली आहे. सन १९९० पासून त्यांनी ‘नीरी’ येथे कनिष्ठ वैज्ञानिक पदापासून संचालक पदापर्यंत कार्य केले आहे. डॉ. वैद्य यांना संशोधन, अध्यापन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.

एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरु पदावर नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ आशिष लेले, ‘द इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी हैद्राबादचे माजी कुलगुरु प्रा. ई. सुरेश कुमार तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

0000

Director of NEERI Atul Vaidya appointed as Vice-Chancellor of LIT University

The Governor of Maharashtra and Chancellor of universities C P Radhakrishnan has appointed the Director of NEERI Nagpur Dr. Atul Narayan Vaidya as the Vice-Chancellor of the Laxminarayan Innovation Technological University, Nagpur.

Dr Atul Vaidya has been appointed as vice chancellor for a term of five years with effect from the date he assumes the charge of his office or till he attains the age of 65 years, whichever is earlier.

Dr. Atul Vaidya (b. 4 Dec. 1964) holds an MSc in Chemical Engineering from LIT Nagpur and obtained his PhD from the Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University.

Starting as Junior Scientist at NEERI in 1990, Dr Vaidya has been working as Scientist at various levels at NEERI. He has extensive experience of research, teaching and administration.

The Governor constituted a selection committee under the chairmanship of former Director of CSIR Dr Raghunath Mashelkar to appoint the Vice Chancellor of LIT University. Dr Ashish Lele, Director of National Chemical Laboratory, Prof. E. Suresh Kumar, former Vice Chancellor of ‘The English and Foreign Languages University Hyderabad  and Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher and Technical Education were members of the Committee.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची उद्या मुलाखत

 

मुंबई. दि. २ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महापरिनिर्वाणदिना’निमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञशिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञतत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली, देशाला एक सर्वंकष संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार‘ असेही संबोधले जाते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवरही मुलाखत प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची ५ आणि ६ डिसेंबरला मुलाखत

मुंबई. दि. २ माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात महापरिनिर्वाणदिना’ निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञशिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. ५ आणि शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञतत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली आणि देशाला एक सर्वंकष संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार‘ असेही संबोधले जाते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा उद्या महाराष्ट्र दौरा 

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

नवी दिल्ली २ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड ३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार असूनमुंबई येथे विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

यावेळी उपराष्ट्रपती श्री. धनखड भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतचभारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी स्तंभाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही कापूस उत्पादन आणि तंत्रज्ञानातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. संस्थेच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेज्यामध्ये कृषी तज्ज्ञसंशोधकतसेच इतर मान्यवर उपस्थित राहतील.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 148दि.02.12.2024

महापरिनिर्वाणदिनी येणाऱ्या अनुयायांच्या सोयी-सुविधांचे नियोजन करावे – कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख     

पूर्वतयारी आढावा बैठक        

मुंबई, दि. २ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावेअसे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झाली.

या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादवकोकण विभागीय उपायुक्त विवेक गायकवाडडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेसमन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. देशमुख म्हणाले कीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त नियंत्रण कक्षरुग्णवाहिकाबेस्टएसटी यांची परिवहन व्यवस्थासीसीटीव्हीची व्यवस्थाआरोग्य सेवापिण्याच्या पाण्याची व्यवस्थाभोजन व्यवस्था  इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छतासाफ- सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी तसेच परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तसेच पोलीस बंदोबस्त याबाबत नियोजन करण्यात यावेअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील आपत्कालीन व्यवस्थेसहआरोग्य सुविधाचैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावटमहापरिनिर्वाण दिन मानवंदना शासकीय कार्यक्रम याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई.दि.1 आपल्या राज्य स्थापनेपासून नागालँड व आसाम या राज्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती व पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. दोन्ही राज्यांना निसर्ग संपदेचे वरदान लाभले आहे.  देशातील राज्ये समजून घेण्यासाठी त्या-त्या राज्यांना प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे व तेथील संस्कृती लोकांमध्ये राहून समजून घेतली पाहिजे. नागालँड व आसाम राज्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद वाढवल्यास राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. यास्तव नागरिकांनी उभय राज्यांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत नागालँड (१ डिसेंबर) व आसाम (२ डिसेंबर) राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राजभवनतर्फे एसएनडीटी महिला विद्यापीठ व ‘ईश्वरपूरम पुणे’ या उत्तर पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी  कार्य करणाऱ्या संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले.

राज्य स्थापना दिवस साजरे करताना आपल्याला विविधतेतून समान भारतीय मूल्ये दिसून येतात. त्या – त्या प्रदेशांचे गीत, नृत्य, लोककला व खाद्य संस्कृतीची माहिती होते.

आज देशातील केंद्र शासनातर्फे विविध राज्यांमधील युवकांना इतर राज्य जाणून घेण्याची संधी दिली जात आहे. अलीकडेच आपण ‘वतन को जानो’ व ‘युवा संगम’ कार्यक्रमांतर्गत जम्मू काश्मीर तसेच ओडिशा येथील युवकांना भेटलो असे सांगून केंद्र सरकारच्या या उपक्रमांमुळे युवकांना भारताची विविधता व संपन्नता पाहण्यास मिळते असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी ‘ईश्वरपूरम’ संस्थेतील नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू नृत्य सादर केले, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी संथाली नृत्य व आसामी लोकगीत सादर केले.

राज्यपालांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, प्र.कुलगुरु रुबी ओझा, ईश्वरपूरम संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संस्थापक सदस्य प्रशांत जोशी यांसह उपस्थित विद्यार्थी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Nagaland Day and Assam Day celebrated in Maharashtra 

Maharashtra Governor C P Radhakrishnan presided over the joint celebration of the Nagaland (1 Dec) and Assam (2 Dec) State Formation Days at Raj Bhavan in Mumbai on Sun (1 Dec).

The Nagaland and Assam State Formation Day was celebrated as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India.

Congratulating the people of Nagaland and Assam on their State Formation Days, Maharashtra Governor Radhakrishnan said Nagaland and Assam have made tremendous strides in education, employment, and tourism since their formation. He said both states are blessed with unparalleled natural beauty and resources, and their progress is a source of pride for the entire nation.

Stating that in order to understand and appreciate a state and its people, one must visit that State and experience its culture firsthand. The Governor called upon the people of the State to visit Nagaland and Assam and to live among the people. This according to him will foster the spirit of friendship and unity that is essential for national integration.

The State Formation Day was organised by Maharashtra Raj Bhavan in association with the SNDT Women’s University and ‘Ishwarpuram’ an organisation working for the education and empowerment of youths from the North Eastern States.

Students from Nagaland and Arunachal Pradesh performed the famous bamboo dance under the aegis of Ishwarpuram. The students of SNDT Women’s University performed the Santhali dance and sang the Assamese folk song on the occasion.

The Governor felicitated Prof. Ujwala Chakradeo, Vice Chancellor of SNDT Women’s University, Prof Ruby Ojha, Vineet Kuber, President of ‘Ishwarpuram’ Prashant Joshi, Founder Member ‘Ishwarpuram’ and students and artists.

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; कोची येथील गोलमेज परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

मुंबई :  दि. 1 सार्वजनिक मोहिमेच्या  अंमलबजावणी, नियोजन आणि मूल्यमापनात महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय मोहीम यशस्वी होऊ शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची आहे असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

कोची येथे राजकीय महिलांचे नेटवर्क गोलमेज परिषदचे  आयोजिन  करण्यात आली होते.  दि. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दोन दिवसीय परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ‘महिला सक्षमीकरणासाठी खासदार आणि आमदार महिलांचे राजकीय नेटवर्क तयार करण्याची भूमिका आणि पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन करुन गोलमेज परिषदेचा समारोप केला.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, 1) लैंगिक समानतेच्या दृष्टीकोनातून प्रतिसाद देणारे आणि जबाबदार नेतृत्व

2) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत जाळे विकसित करण्यासाठी, दर्जेदार वेळ आणि कामावर आधारित निर्णय घेण्यासाठी मापदंड.

3) भारतीय राजकारणातील विविध क्षेत्रांसाठी बहुलता (Plurality) आणि विविधतेसाठी जागा

4) कायदेशीर बाबी, धोरणात्मक निर्णय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी यावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक  ही महिला सक्षमीकरणासाठी आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची आहे. असे सांगून  डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, चार दशकांहून अधिक काळ एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी माझ्या सर्व कार्यात नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. “सरकारने सुरू केलेल्या विविध कृती, कल्याणकारी योजना, उपक्रम यांचे महत्त्व लक्षात घेता तळागाळात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज संस्थामध्ये तसेच भारतीय संसदेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. लोकसंख्येतील महिलांचे प्रमाण लक्षात घेता, हा संसदेतील महिलांच्या आरक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय एक स्वागतार्ह पाऊल आहे.

महिला खासदार, आमदार, याबाबत  धोरण बनवण्याच्या टप्प्यावर, त्याच्या योग्य अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि शाश्वत विकासासाठी पुरेसा निधीची  विशेष तरतूद करण्यात यावी.  विधिमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंच देखील या दिशेने अधिक योगदान देऊ शकतो. तसेच जागतिक महिला आयोगाचे ६९ सत्र आणि बीजिंग + 30 थीमसाठी निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आणि त्यांच्या मतदारसंघांमध्ये अधिक जागरूकता होणे आवश्यक आहे.

जागतिक ते स्थानिक पातळीवर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात महिला आघाडीवर आहेत. महिला गटांचे डिजिटलायझेशन आणि क्षमता निर्माण कार्यक्रमाची गरज आहे. संसद आणि विधान मंडळांनी सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणविषयक समस्यांवर प्रत्येक सत्रात आपापल्या सभागृहात अर्थपूर्ण आणि परिणामाभिमुख चर्चा केली पाहिजे.”

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या महिला सबलीकरणाचा राष्ट्रीय आढावा आरोग्य, शिक्षण, महिला आणि मुलींची सुरक्षा यावर विशेष लक्ष केंद्रित करून महिला आमदारांची राष्ट्रीय गोलमेज परिषद आयोजित केली जावी. महिलांचा आर्थिक विकास आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्टे एकत्रित करण्याची गरज आहे.

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले गेले आणि त्यामुळे अनेक मतदारसंघात विजय मिळवला गेला. या सर्व महिला मतदार निश्चितपणे शाश्वत विकासाच्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या पुरस्कर्त्या बनल्या आहेत . असे ही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महिला लोकप्रतिनिधींच्या नेटवर्क संदर्भात निर्णय घेण्यात आला.

एड्स प्रतिबंधामध्ये युवकांची मोलाची भूमिका

०१ डिसेंबर जागतिक एड्स दिन. या जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या सप्ताहामध्ये एड्स जनजागृती सप्ताह अभियानामध्ये जिल्हा रूग्णालयाकडून विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊ या… सामाजिक ऋण तसेच राष्ट्रीय कार्यास हातभार लाऊया… या दिनान‍िमित्त हा विशेष लेख.

“भला जन्म हा तुला लाभला खुलास – हृदयी बुधा धरिसी तरी हरिचा सेवक सुधा”

सुप्रसिद्ध लावणीकार, कवी राम जोशी मानवी नरदेहाबाबत वर्णन करताना ही लावणी गायलेली आहे. चौऱ्यांशी दशलक्षकोट्या योन्या फिरल्यानंतर मानवाला दुर्लभ असा नरदेह प्राप्त होतो. त्यामुळे त्याने या देहाचा उपयोग विधायक कार्यासाठी करणे आवश्यक आहे. परंतु आज वाढती व्यसनाधिनता नैतिक मुल्याचा ऱ्हास, तसेच सहजीवनाचा वाईट परिणाम देशातील लोकांवर मुख्यत्वे करुन युवकांवर पडत असलेला पहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम देशाची भावी आधारस्तंभ असणारी तरुण पिढी ही एचआयव्ही संक्रमणाला बळी पडत असलेली पहावयास मिळते. मानवी भावना या नैसर्गिक असतात. परंतु या भावनांचा उद्रेक म्हणजेच विनाशास निमंत्रण असते. त्यामुळे त्यामध्ये सुवर्णमध्य साधणे आवश्यक असते.

तारुण्याचे तीन ‘त’कार”

तेजस्वीतता, तपस्वीतता, तत्परता हे तारुण्याचे तीन ‘त’ कार आहेत. हे प्रत्यक तरुण-तरुणीमध्ये असले पाहिजेत. परंतु खरोखरच हे तिन्ही गुण आपल्या स्वतः मध्ये आहेत का ? या प्रश्नाचे आत्म संशोधन करण्याची आज वेळ आली आहे. कारण नैतिक शिक्षण आवश्यक झालेले आहे. त्यामुळे व्यक्तीला गतिमानता प्राप्त होण्यास मदत होईल. आजचा युवक व्यसनरूपी चक्रव्युव्हामध्ये अडकत आहे. ज्याचे पर्यावसन १५ ते ४९ या वयोगटातील लोकच आज जास्तीत जास्त व्यसनाधीन, एचआयव्ही बाधित पहावयास मिळताहेत.

एचआयव्ही संक्रमणाला बळी पडण्याचे महत्त्वाचे कारण हे या रोगाबद्दल असलेले अपुरे ज्ञान. तारुण्य अवस्थेतील जल्लोष आहे. त्यामुळे आजच्या युवांनी या आजाराबाबत प्रशिक्षित समुपदेशक, सल्लागार यांच्या मार्फत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे. आयसीटीसी केंद्र यामध्ये (दिशा केंद्रामध्ये) येणाऱ्या सर्व व्यक्तींना एचआयव्ही, एड्स बाबत संपूर्ण शास्त्रीय माहिती दिली जाते. तसेच त्यांच्या संमतीनेच त्यांची एचआयव्ही चाचणी केली जाते. चाचणीपूर्व तपासणीमध्ये चाचणी नंतरच्या निष्कर्षाबाबत समोरील व्यक्तीला कल्पना दिली जाते. तपासणीबाबत पूर्णपणे गोपनीयता ठेवली जाते. चाचणी पश्चात समुपदेशनामध्ये समोरच्या व्यक्तीच्या मानसशास्त्रीय मुल्याचा अभ्यास करुन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन केले जाते.

“गळणाऱ्या पानांकडे नसते झाडाचे कधी लक्ष – नव्या पालवीलाच असते गोंजारण्यात ते दक्ष”

तात्पर्य, परिवर्तन हा काळाचा नियम आहे. या चराचर सृष्टीची निर्मिती ज्या निर्मिकाने उदात्त धोरणाने केली,  तो उद्देश सफल करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. संस्कृतीचा वारसा आपण जोपासला पाहिजे. परंतु नवीन इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप च्या संस्कृतीमध्ये आपण आपली जुनी संस्कृती, नितीमुल्य पायदळी तुडवता कामा नये. वाढती फॅशन, अंगप्रदर्शन तसेच संयमहीन जीवन यामुळे आपण आपले अस्तित्वच विसरत चाललो आहोत. खऱ्या अर्थाने युवकांनी एड्समुक्त महाराष्ट्र, भारत… स्वप्न नव्हे… ध्येय, हे वाक्य खरे ठरवायचे असेल तर वरील सर्व बाबींचा सारासार विचार करायला हवा.

“एकटे नाहीत तुम्ही – साथ आहोत आम्ही”

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. या कक्षांतर्गत विविध आयसीटीसी मार्फत युवकांसाठी एचआयव्ही, एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन, शिबिरे, चर्चासत्रे, परिसंवाद, पोस्टर प्रदर्शन इत्यादी उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन वेगवेगळया लक्ष्यगटांमध्ये केले जाते.

यावर्षीचे जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य आहे “Take The Rights Path” मार्ग हक्काचा, सन्मानाचा ! हे आहे. म्हणजेच एचआयव्ही संसर्गित लाभार्थ्यांना पण सर्व सामान्य नागरिकांसारखे हक्क आहेत, ते वेगळे नाहीत. त्यांना समाजामध्ये सन्मानाची व आदराची वागणूक दिली पाहिजे. सर्व कौटुंबिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक आहे, नव्हे तो त्यांचा हक्क आहे. यासाठी भारत सरकारने हक्काची जोपासणा करण्यासाठी एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७ अंमलात आणला आहे. ज्या कायद्याद्वारे एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक प्रदान करण्यात आली आहे. जर कोणी कलंकित करत असेल किंवा भेदभाव करत असेल, तर कायद्याने त्यांना शिक्षा देण्यात आली आहे. यावर्षीच्या घोषवाक्यानुसार एकटे नाहीत तुम्ही साथ आहोत आम्ही ही आम्हीपणाची भावना एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये विविध जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढीस लावणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

चला तर मग ०१ डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२४ या सप्ताहामध्ये एड्स जनजागृती सप्ताह अभियानामध्ये आपण सारेजन सहभागी होऊ या… सामाजिक ऋण तसेच राष्ट्रीय कार्यास हातभार लाऊया… एचआयव्हीबद्दल अधिक विस्तृत माहितीसाठी १०९७ टोल फ्री क्रमांकावर आपण माहिती विचारु शकता किंवा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीड येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

सुहास मनोहरराव कुलकर्णी

(जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक)

 जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीड

  मो.नं. ९४२००१७५३९

‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 30 : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. महाराष्ट्र एनसीसी संचालनालय व एचएसएनसी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे चर्चासत्राचे आयोजन केले होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एनसीसी’च्या विस्ताराबाबत सूचित केले आहे. यादृष्टीने जास्तीत जास्त युवक-युवतींनी ‘एनसीसी’मध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे असे सांगून ‘एनसीसी’मुळे शिस्तपालनाचे महत्त्व कळते व देशभक्तीची भावना जोपासली जाते असे राज्यपालांनी सांगितले.

शिस्त नसली तर यश मिळत नाही त्यामुळे युवकांनी ‘शिस्त’अंगी बाणवली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. युवक-युवतींनी दिवसातील किमान 15 मिनिटे योग व ध्यानधारणेसाठी दिल्यास त्यांची एकाग्रता शक्ती वाढेल असे सांगताना युवकांनी मोबाईलवरील वेळ नियंत्रित ठेवला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

चर्चासत्राला ‘एनसीसी’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंह, एचएसएनसी विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ.निरंजन हिरानंदानी, सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन, महासंचालक सशस्त्र सैन्य दल वैद्यकीय महाविद्यालय, दिप्ती चावला, अतिरिक्त सचिव, संरक्षण मंत्रालय, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.हेमलता बागला, एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग तसेच सैन्य दलातील अधिकारी, जवान व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor inaugurates seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’

Mumbai – The Governor of Maharashtra and Chancellor of state universities C P Radhakrishnan today inaugurated a Seminar on ‘Empowering Girl Cadets through NCC’ at KC College Auditorium in Mumbai.

The Seminar was organized by NCC Directorate Maharashtra in association with HSNC University.

Director General of NCC Lt Gen Gurbir Pal Singh, Provost of HSNC University Dr Niranjan Hiranandani, Surgeon Vice Admiral Aarti Sarin DG Armed Forces Medical College, Dipti Mohil Chawla, Additional Secretary, Ministry of Defense, Vice Chancellor of HSNC University Prof Hemlata Bagla, Additional DG, NCC Maharashtra Maj Gen Yogender Singh, officers of Armed forces and NCC cadets were present.

0000

ताज्या बातम्या

हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी –  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0
हिंगोली, दि. ४ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी पुरवठा करत असून, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी...

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासली जाईल – जलसंपदा मंत्री...

0
नवी दिल्ली, दि. ४ : कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण  आणि  हिप्परगी बंधाऱ्यामधील बांधकामबाबतची अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून (National Dam Safety Authority) तपासली जाईल, अशी माहिती...

अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गाव भेट दौरा करावा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर, दि. 4 :  जिल्ह्यातील गावागावातील पांदण रस्ते, पाण्याचे प्रश्न समस्या सोडविण्यास प्राधान्य आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी गावात गावभेट देण्याची...

जिल्हा वार्षिक योजनेतून साकारल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची कल्पना स्थानिक लोकप्रतिनिधींना द्यावी –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर,दि.04 : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत विविध विभागांना उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून विविध योजना साकारल्या जातात. यातून नाविन्यपूर्ण योजना आकारास येतात.  या कामांमधून  विविध ठिकाणी...

महसूल विभाग म्हणजे ‘लोकसेवा’ – पालकमंत्री डॉ. वुईके

0
चंद्रपूर, दि. 4 : सामान्य नागरिकांसाठी सरकार म्हणजे महसूल विभाग. कोतवाल ते जिल्हाधिकारी हे सामान्य नागरिकांकरिता शासनाचे प्रतिनिधी म्हणून समर्पित भावनेने कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकता, जलद गती आणि...