गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 321

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल- कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि. १७ : नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगर पालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या वेतनाबाबत कामगार मंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस माजी खासदार तथा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे, कामगार विभागाचे अधिकारी, विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत महापालिका आयुक्तांच्या स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल लवकर महानगर पालिकेकडे सादर केला जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल, असेही मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा विषय हा त्या त्या महानगर, नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असल्याने आयुक्तांनी कामगारांच्या वेतन प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. १७ : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधानपरिषद येथे मौजे खर्डा (ता. जामखेड) अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी वसाहतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, सहाय्यक संचालक विनोद लोंढे, खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, माजी सभापती रवींद्र सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महालिंग कोरे, महेश दिंडोरे व खर्डा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

सभापती प्रा. राम शिंदे  म्हणाले की, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियासाठी वसाहतीसाठी २०१८ ला निधीचे वितरण करण्यात आले. हे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा प्रकिया राबवून, स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन पूर्ण करावे.

मदारी वसाहतीचे काम हा राज्यातील पहिला  प्रकल्प आहे. त्यामुळे या वसाहतीचे काम उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण करावे. तसेच वसाहतीच्या ठिकाणी तेथील नागरिकांना आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही सभापती प्रा. शिंदे यांनी केली.

0000

मोहिनी राणे/ससं/

मराठी भाषा समृध्दीसाठी सोलापुरी साहित्यिकांचा आविष्कार

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून राज्य सरकारने या अनुषंगाने अनेक शासन निर्णय घेऊन मराठी राज्याचे भाषा धोरण जाहीर केले आहे. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी मराठी भाषा वृध्दिंगत व्हावी, मराठी भाषेचा आविष्कार घडावा यासाठी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला आगळा वेगळा साज चढविला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेबरोबरच पाली, पाकृत, असामी, बंगाली या भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या सर्व भाषा समृध्द होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयामुळे मराठी भाषेचा विकास आणि समृध्द होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणे, प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय करणे, महाराष्ट्रातील १२ हजार ग्रंथांना सशक्त करणे, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा सर्व घटकांना भरीव मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून या अनुषंगाने साहित्य चळवळीचा इतिहास चाळला जात आहे.

सोलापूर ही जशी हुतात्म्यांची नगरी म्हणून ओळखली जाते तशी साहित्य चळवळीचे केंद्रस्थान म्हणूनही या शहराकडे पाहिले जाते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी मराठी भाषेत वेगवेगळ्या माध्यमातून लेखन केले असून मराठी साहित्याला या लेखकांच्या माध्यमातून आगळावेगळा साज चढवला आहे. स्वातंत्र्य चळवळीपूर्वी सुरुवात झालेली मराठी साहित्याची चळवळ अजूनही सुरु आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोलापूरचे कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. याशिवाय स्वातंत्र्य शाहीर म्हणून कवी कुंजविहारी यांचेही नाव घेतले जाते. तसेच कवी संजीव, वि. म. कुलकर्णी, रा. ना. पवार इत्यादी बड्या साहित्यिकांनी मराठी साहित्यात सोलापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. जन्माने सोलापूर जिल्ह्यातील असलेले आणि महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे अनेक साहित्यिक आहेत. त्यामध्ये करकंबचे न्या. म. गो. रानडे, मोडनिंबचे न. चिं. केळकर, सोलापूरचे डॉ. य. दि. फडके, डॉ. जब्बार पटेल, बार्शीचे शाहीर अमर शेख, पंढरपूरचे द. मा. मिरासदार, माळशिरसचे ना. स. इनामदार, सोलापूरचे शरणकुमार लिंबाळे इत्यादी मान्यवर साहित्यिकांचा समावेश आहे. त्यानंतरच्या काळात डॉ. गो. मा. पवार, त्र्यं. वि. सरदेशमुख, सुरेखा शहा, विजया जहागिरदार, कवी दत्ता हलसगीकर, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रा. राजेंद्र दास, निर्मलकुमार फडकुले, कवी माधव पवार, डॉ. सुहास पुजारी, प्रा. विलास पाटील, डॉ. व. ना. इंगळे, डॉ. भगवानदास तिवारी, डॉ. इरेश स्वामी, डॉ. राजशेखर हिरेमठ, शशिकला मडकी, डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. वामन जाधव, डॉ. सूर्यकांत घुगरे, डॉ. महेंद्र कदम, योगिराज वाघमारे, मारुती कटकधोंड, पन्नालाल सुराणा, निशिकांत ठकार, डॉ. अर्जुन व्हटकर अशी अनेक साहित्यिकांची मांदियाळी सोलापूरच्या नगरीमध्ये दिसून येते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सोलापुरात २००६ साली करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्षपद मूळचे सोलापुरातील रहिवाशी असलेले मारुती चितमपल्ली यांना मिळाले. त्यांनी निसर्गाविषयी आणि प्राणीपक्ष्यांविषयी विपुल लेखन केले आहे. केंद्र सरकारने नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठी भाषा वृध्दिंगत व्हावी,  भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच ही भाषा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरणच जाहीर करण्यात आले आहे. पुढील २५ वर्षात मराठी भाषेचा विकास करणे शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये इत्यादींना मराठी भाषा विकासासाठी प्रोत्साहन देणे असे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. याशिवाय न्यायालयात आणि प्रशासकीय कामकाजात मराठी भाषा आवश्यक असल्याचे शासन निर्णय देखील घेण्यात आले आहेत. एकंदर केंद्र सरकारचे धोरण आणि राज्य सरकारचे धोरण यामुळे मराठी भाषा वृध्दिंगत होण्यास मदत होणार आहे.

-उज्ज्वलकुमार माने, सोलापूर

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त : अभिमानास्पद बाब

केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभुमीवर २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा मराठी भाषेचा जागर केवळ महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादीत न राहता जगाच्या कानाकोप-यात राहणा-या तमाम मराठी बांधवांसाठी एक अविस्मरणीय क्षण राहणार आहे.

जगातील प्रत्येक भाषेचा जन्म हा संवादाच्या गरजेतून झाला. मराठी भाषासुद्धा त्याला अपवाद नाही. जिचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर महाराज, “माझा मराठीचा बोलु कौतुके | परि अमृतातेही पैजा जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मेळविन ||” असे म्हणतात.  नुकताच, ह्या मायमराठीचा जागर करणारा व मराठी भाषेचा आदर करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायमचा कोरल्या जाईल असा सुवर्णक्षण आपण अनुभवला. तो म्हणजे, आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेला, मराठीला अभिजात भाषेचे स्थान लाभले आहे. हा बहुप्रतीक्षित व ऐतिहासिक निर्णय माय मराठीच्या गौरवात अविस्मरणीय भर घालणारा आहे.

मराठी भाषा ही ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्य झाली म्हणजे नेमके काय झाले? हा प्रश्न अद्यापही अनेकांच्या मनात घर करून बसलेला आहे. अभिजात या शब्दाचा शब्दश: अर्थ उत्तम, उत्कृष्ट किंवा श्रेष्ठ असा अर्थ होतो. ‘अभिजात’ हा शब्द भाषेशी जोडला जाताना आपण असे म्हणू शकतो की, भाषेला लागू असणारे उत्तमतेचे निकष पूर्ण करण्यासाठी जी भाषा दुसऱ्या भाषेवर अवलंबून नसते म्हणजेच स्वयंपूर्ण असते, ज्या भाषेला साधारणपणे दीड ते दोन हजार वर्षांचा इतिहास असतो, प्रत्येक काळात साहित्यनिर्मितीला प्रेरणा व चालना देऊ शकेल एवढी भाषासमृद्धी ज्या भाषेकडे असते, ज्या भाषेत मूलतः विविध प्रकारची उत्तम साहित्यनिर्मिती झालेली असते, ती भाषा म्हणजे अभिजात भाषा होय. या सर्व कसोट्यांवर मराठी भाषा उतरली आहे. एकूणच मराठी भाषेची विपुल साहित्यसमृद्धी लक्षात घेता, अभिजात भाषा म्हणून स्थान मिळणे हा मराठी भाषेचा यथोचित सन्मान आहे. तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा, उत्तमतेचा यामुळे गौरव झाला आहे. श्रेष्ठ मराठी कवी कुसुमाग्रज तर मराठी साहित्याविषयी सहजपणे लिहितात,

“रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी

चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी”

मुळात भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. ज्याप्रमाणे वाहती नदी जशी किनाऱ्यांना केवळ स्पर्श करत नाही तर किनाऱ्यावरील काहीतरी घेऊन पुढे जाते. त्याचप्रमाणे भाषासुद्धा स्थळकाळाला अनुसरून बदलत जाते. हीच भाषेच्या समृद्धीची प्रक्रिया आहे. परकीय आक्रमणांमुळे, व्यापारांमुळे, दळवळणामुळे मराठी भाषादेखील अशीच समृद्ध व संपन्न झाली आहे.

वर्तमानकाळातसुद्धा मराठी भाषेत विपुल साहित्यनिर्मिती होते आहे. अनेक लेखक, लेखिका, कवयित्री, कवी भरभरून व्यक्त होत आहेत. या साऱ्या साहित्यिकांसाठी साहित्यसंमेलन म्हणजे एक पर्वणीच असते. दरवर्षी नियमित भरणारे, वैभवशाली साहित्यपरंपरेचा वारसा जतन करणारे मराठी सारस्वतांचे संमेलन साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठच असते. यानिमित्त विविध साहित्यप्रवाह, साहित्यप्रकार अशा अनेक साहित्याशी निगडीत विषयांवर ऊहापोह होतो. विविध साहित्यिक चर्चासत्रे, कवीसंमेलने, गझल मुशायरा याप्रकारच्या विविध सत्रांमधून सहभागी होतात.

या सत्रांमुळे भाषेच्या समृद्धीला गती मिळते. यावर्षी भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली नगरीकडे या संमेलनाचे यजमानपद आहे. दिनांक २१, २२ व २३ फेब्रुवारी रोजी मा. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन भरणार आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेचा जागर मनामनातून होत राहो. हजारो वर्षांपासून जतन केलेल्या अभिजात मराठीच्या अमृतकुंभातील साहित्यअमृताच्या वर्षावात समस्त मराठी रसिक न्हाऊन निघतील याविषयी खात्री आहे.

भैरवी देशपांडे

साहित्यिक व लेखिका

दिल्‍लीचे संमेलन : मराठीची मुद्रा देशभरात उमटवणार

येत्‍या 21-22 व 23 फेब्रुवारी रोजी नवी दिल्‍लीतील तालकटोरा मैदानावर 98 वें अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होवू घातले आहे. संमेलनाचे उद्धाटन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते होणार असल्‍याने या संमेलनाला अनन्‍य साधारण महत्‍व प्राप्‍त झाले आहे. या निमित्त दिल्‍लीकर मराठी भाषकांमध्‍ये कमालीचा उत्‍साह दिसून येत आहे. दिल्‍लीतील साहित्‍य वर्तुळात आनंद तर वाढलेला आहेच शिवाय हे संमेलन अनेक वर्षानंतर देशाच्‍या राजधानीत होत असल्‍याने समस्‍त मराठी भाषक जनतेसाठी ही एक आनंदाची पर्वनी ठरणार आहे. गेल्‍या वर्षी 96 वें अखिल भारतीय मराठी संमेलन महात्‍मा गांधी आणि विनोबा यांच्‍या कर्मभूमित घेण्‍यात आले होते. या वर्षी हे संमेलन दिल्‍लीत होत असल्‍याने वर्धा ते दिल्‍ली असा संमेलनाचा प्रवास वर्धेकर जनतेसाठी आनंद द्विगुणीत करणारा आहे. वर्धा आणि दिल्‍लीचा तसा संबंध स्‍वातंत्र चळवळी पासून राहिलेला आहे.

या चळवळीच्‍या दरम्‍यान महात्‍मा गांधी वर्धेत वास्‍तव्‍यास आल्‍याने अधिक जवळचा ठरला आहे. या काळात वर्धा शहर स्‍वातंत्र चळवळीचे एक महत्‍वाचे केंद्र ठरले. गांधीजींनी शेगावचे नामकरण सेवाग्राम केले आणि सेवाग्राम हे भारताची अशासकीय(नॉन पॉलिटिकल) राजधानी म्‍हणून ओळखले जावू लागले.

थानावरतयायानिमित्ताने दिल्‍लीतील राजकीय पुढारी यांची उपस्थिती वर्धेकर जनतेसाठी ऐतिहासिक महत्‍व अंकित करणारी ठरली, सोबतच साहित्‍य विश्‍वातही वर्धेचा नावलौकिक वाढला. स्‍वातंत्र मिळाल्‍यानंतर 48वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन वर्धा येथे आयोजित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर तब्‍बल 76 वर्षानंतर हे संमेलन आयोजित करण्‍यात आले. दरम्‍यानच्‍या काळात साहित्‍य क्षेत्रात अनेक महत्‍वाच्‍या घटना घडल्‍या. वर्धेतील सत्‍यनारायण बजाज वाचनालय, राष्‍ट्रभाषा प्रचार समिती, आर्वी येथील लोकमान्‍य टिळक वाचनालय आणि वर्धेचे गांधी ज्ञान मंदिर साहित्‍य विश्‍वात प्रेरणा केंद्र राहिली. या केंद्रातून झालेले मंथन कवी व लेखक घडवण्‍यात कारणीभूत ठरले. नवकवी व नवलेखकांनी मराठी साहित्‍यात नाव कमावले व त्‍याची चर्चा दिल्‍लीत मानाने करण्‍यात आली. आता पर्यंत वर्धेत झालेले हे दुसरे संमेलन होते, तसेच राजधानीत होणाने यावर्षीचे संमेलन देखील दुसरे आहे. हा एक योगायोगच म्‍हणावा.

राज्‍याची उपराजधानी नागपूर येथे पहिले विश्‍व हिंदी संमेलन 10 ते 14 जानेवारी 1975 रोजी आयोजित करण्‍यात आले होते. यासाठी मराठी भाषक साहित्यिकांनीच पुढाकार घेतला होता. त्‍या‍तील एका ठरावातून वर्धा येथे महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्‍थापना झाली. एका अर्थाने संमेलनाचा किती प्रभाव असतो हेच यातून दिसते. वर्धा शहराची स्‍थापना तशी 1866 मध्‍ये झाली. ज्‍याचे नाव पालकवाडी असे होते व जिल्‍ह्याचे मुख्‍यालय पुलगाव जवळील कवठा या छोट्याशा गावात होते. त्‍यानंतर वरदायीनी वर्धा नदीच्‍या नावावर वर्धा असे नामकरण झाले.

वर्धा हे नाव ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ऊर्जेचे शहर म्हणून ओळखले जाते. तसा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये व वर्धा जिल्हा गॅझेटियरमध्ये सापडतो. भाषिक दृष्टिकोनातूनही वर्धा जिल्हा एक समृद्ध जिल्हा राहिला आहे. हे शहर संस्कृत, प्राकृत, गोंडी, मराठी आणि हिंदी भाषेचे शहर म्‍हणून लौकिक प्राप्‍त झालेले आहे. इतिहासाच्या ओघात येथे भाषांचा विकास होत राहिला आणि काही भाषा कमी-अधिक संख्येने बोलल्या जाऊ लागल्या. वर्धा जिल्ह्यात भिली वा भिलोडी, इंग्रजी, गोंडी, गोरखाली वा नेपाळी, हलबी, खानदेशी, कोलामी, कोकणी, कोरकू व कोया अशा दहा भाषा बोलल्या जात होत्या, ज्यामध्ये मराठी प्रथम स्थानी तर हिंदी दुसऱ्या स्थानी राहिली आहे.

मराठी भाषेला आताच भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्‍या प्राचीनत्‍वावर यामुळे मोहर उमटली आहे. मराठी भाषेचे चिरंतन साहित्‍य संत ज्ञानेश्‍वरापासून ते आजतागायत प्रवाहित होत आहे. चिरंतन साहित्‍याचे लक्षण संत ज्ञानेश्‍वरांनी सांगितले आहे. ‘वाचे बरवे कवित्‍व । कवित्वी बरवे रसिकत्‍व । रसिकत्‍वी परतत्‍व । स्‍पर्शु जैसा।। अर्थात भाषेमध्‍ये काव्‍य उत्तम. काव्‍याला रसामुळे बहर येतो आणि रसाला परतत्वाचा स्‍पर्श झाला म्‍हणजे मग त्‍याची गोडी काय वर्णावी. जीवनात क्रांती घडवून आणण्‍याची शक्ति फक्‍त आणि फक्‍त वाड्:मयात अशी महती आचार्य प्र. के. अत्रे यांनी वर्णीली आहे. समाज मनावर साहित्याचा परिणाम त्वरीत होत नाही. सतत सूक्ष्‍म संस्‍कार होत राहिल्‍याने समाजात बदल घडत असतो. साहित्‍य संमेलनातून असे बदल घडत असतात आणि हेच बदल देश आणि समाजात सकारात्‍मक परिणाम घडवत असतात. लिखान आणि वाचनातून माणसात जी प्रगल्‍भता येते ती निरंतर पुढच्‍या पिढीकडे प्रवाहित होत असते आणि त्‍याचा लाभ समाजाला होत असतो.

देशाच्‍या राजधानीत होणारे संमेलन अनेकार्थाने विशेष ठरणारे आहे. येथे अनेक लहान-मोठया संस्‍था मराठीची पताका फडकवित असतात. महाराष्‍ट्र सदन असो की बृहंमहाराष्‍ट्र मंडळ असो येथे साहित्यिक व सांस्‍कृतिक मेळावे, कार्यक्रम व शिबिरे सतत चालू असतात.  यातून दिल्‍लीकरांना मराठी भाषा, साहित्‍य व संस्‍कृ‍तीची मेजवाणीच मिळत असते. येथे मोठ्या संख्‍येने मराठी भाषा बोलणारे असल्‍याने त्‍यांना अशा कार्यक्रमांची सतत ओढ लागलेली असते. दिल्‍लीत मराठी, हिंदी व इतर भारतीय भाषा एक समूह म्‍हणून किंवा सवंगडी म्‍हणून वावरत असतात. येथे असणारे मराठी भाषी नागरिक नोकरी व व्‍यवसायासाठी आलेले असतात परंतु त्‍यांनाही साहित्‍याची भूक असते ती ते साहित्यिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांच्‍या आयोजनातून भागवत असतात.

दिल्‍लीतल्‍या प्रत्‍येक मराठी भाषकांसाठी हे संमेलन आपले वाटणारे यामुळेच ठरणार आहे व त्‍याचे पडसाद देशभरात उमटणार आहे. संमेलनाचा वर्धा ते दिल्‍ली हा एका वर्षाचा प्रवास साहित्‍याच्‍या क्षेत्रातील अनेक प्रकारांना मार्ग तर मोकळा करणारच आहे, तो अधिक प्रशस्‍तही करणारा ठरणार आहे.  हे संमेलन राराची ाचा प्रवास सन 1878 पासुन मराठी भाषा व साहित्‍याला एक नवी झळाळी तसेच नव्‍या वाटा देणारे ठरो हिच रास्‍त अपेक्षा. या संमेलनातून दिल्‍लीत मराठीची मुद्रा नक्‍कीच देशपातळीवर उमटणार हेही तितकेच खरे.

  • बी.एस. मिरगे

जनसंपर्क अधिकारी

महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धा

9960562305

माय मराठीची अभिजातता…

दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटनही याला अधिक महत्त्व प्राप्त करून देईल. अशा या विशेष संमेलनानिमित्त ‘मराठी भाषेची अभिजातता’ अधोरेखित करणारा हा लेख…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, हे ऐकून आनंद झाला. सुमारे १४ कोटी लोकांची मराठी भाषा, मराठी अस्मिता ही आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. मराठीची श्रीमंती आपल्याला कळायला खूप वेळ लागला. आता ही श्रीमंती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवी, ते आपले कर्तव्यच आहे.

मराठीचे प्राचीनत्व शोधायला लागल्यावर आपल्याला असे दिसते की, कोणत्याही भाषेची जन्मतिथी किंवा जन्मस्थळ सांगणे अशक्य असते. कारण भाषानिर्मिती ही घटना नसून प्रक्रिया आहे. म्हणूनच भाषेच्या विकासावर प्रकाश टाकावा लागतो. “गंगातीर आणि वऱ्हाड मिळून तिचे माहेर होय”असे शं.गो. तुळपुळे यांना वाटते. (यादवकालीन मराठी भाषा पृष्ठ क्रमांक-२५) यादवकालीन मराठी साहित्यात मराठवाडी आणि वऱ्हाडी मंडळी यांची भाषा कानावर येते. तर डॉ. ना.गो. नांदापूरकर यांच्या मते गोदावरीच्या दक्षिणोत्तर असलेल्या पैठणच्या आसपासचा प्रदेश हा मराठीच्या अभ्यासाचा मध्य किंवा प्रारंभबिंदू असावा. (मराठी भाषा, मराठी विश्वकोश खंड बारावा पृष्ठ क्रमांक-११९७) भाषा अभ्यासक सुधाकर देशमुख  ‘अश्मक’ प्रदेशाला मराठीचे उगमस्थान मानतात. त्यामुळे ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आले. त्याप्रसंगी जी स्मरणिका तयार केली त्या स्मरणिकेला ‘अश्मक’ हे नाव दिले होते.

मराठीचे उगमस्थान कुंतल असावे, हे सांगून म.रा. जोशी लिहितात की, “कुंतल प्रदेशात ते सोलापूर, उस्मानाबाद, बिदर व गुलबर्गा जिल्हे होते. आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र या देशश्रेष्ठ जोडणारा दुवा म्हणजे कुंतल देश अशीही व्याख्या करतात. “इ.स.५०० ते इ. स. १००० या कालखंडाला वाङ्मयाच्या इतिहासात अपभ्रंशाचा कालखंड असे संबोधले जाते. याच काळात अपभ्रंशाच्यापोटी मायमराठीचा जन्म झाला असावा. निश्चित असे स्थळकाळ सांगता येत नाही तरीसुद्धा गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली कोरलेल्या

“श्री चावून्डराजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले” या  ओळी म्हणजेच मराठीतील लिखित आद्य वाक्य होय. हा काळ इ.स. ९८३ चा असावा. परंतु अभ्यासकात मतभिन्नता जाणवते.

मराठीचे प्राचीन उल्लेख इतरत्र कुठे आले याचा शोध घेऊ-

१) ताम्रपट :  शके ६०२ (इ. स.६८०) मधल्या विक्रमादित्य सत्याश्रेयाच्या ताम्रपटातील पन्नास, प्रिथवी हे दोन शब्द मराठी शब्द म्हणून सांगितले आहेत.

२) मानसोल्लास : सोमेश्वर नावाच्या राजाने ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ हा संस्कृत ग्रंथ शके १०५८ (इ.स.११३६) साली लिहिला. हा ग्रंथ  ‘मानसोल्लास’ या नावाने ओळखल्या जातो. महाराष्ट्र सारस्वतकार वि.ल.भावे म्हणतात की,  “या ग्रंथात ठिकठिकाणी मराठी रूपं व मराठी शब्द आले आहेत.”

३) पंडित आराध्य चरित्र: पालकुरीकी सोमनाथ नावाच्या तेलगू कवीने पंडित आराध्य चरित्र हे काव्य लिहिले असून त्यात मराठी भाषेतील काही शब्दांचा उल्लेख आला आहे.

४) गाथा सप्तशती : महाराष्ट्रात लिहिल्या गेलेला आद्यग्रंथ होय. ‘गाथा सप्तशती’ मधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण असून त्यात मानवी भावना, व्यवहार आणि प्रकृतीचे सुंदर चित्रण केलेले आहे. सातवाहन राजा हाल यांनी जनतेकडून मोठ्या प्रमाणात गीते गोळा करून त्या सातशे गाथांचा संग्रह संपादित केला. (काळ इ.स. पूर्व २०० ते इ.स.२०० उदा.गाथा क्रमांक ११६)

“जेणे विणाण जिवीज्ज अणुणिज्जइ सो कआवराहो

पत्ते विण अरदाहे भण कस्सण वल्ल हो अग्गी ॥ “

अर्थ: “ज्याच्या वाचून जीवन जगताच येत नाही त्याने अपराध केला तरी उलट त्याचीच मनधरणी करावी लागते. आगीमुळे गाव जळून खाक झाल्यास कधी कुणाला अप्रिय होईल काय?”

५) प्राकृत प्रकाश: वररुचिने इसवी सन पूर्व २५० च्या सुमारास  ‘प्राकृत प्रकाश’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात चार मुख्य प्राकृत भाषेचे वर्णन आहे- १) महाराष्ट्र, २) शौरसेनी, ३) मागधी, ४) पैशाची.

६) समरादित्याची कथा : इ.स. ८०० च्या सुमारास हरिभद्र यांनी समरादित्याची कथा हा मौल्यवान ग्रंथ लिहिला. यात जादुई वास्तववाद हे निवेदनतंत्र वापरण्यात आले होते.

७) कुवलयमाला : उद्योत्तनसुरी यांनी इ.स. ७८० च्या सुमारास कुवलयमाला हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात अनेक भाषांचा उल्लेख असून त्यात मरहट्ट असे वर्णन आले आहे.

“दडमडह समलंगे सहीरे अहिमान कलहसीलेय।

दिण्णले गहिल्ले उल्लवीरे तथ मरहठ्ठे॥”

अर्थ: बळकट, ठेंगण्या, धटमूट, काळ्यासावळ्या रंगाच्या काटक अभिमाने भांडखोर सहनशील, कलहशील दिण्णले (दिले) गहिल्ले (घेतले) असे बोलणाऱ्या मरहठ्यास त्याने पाहिले हे वर्णन मराठी माणसाचे आहे.

८) गुणाढ्याची बृहतकथा : ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ इसवी सनच्या पहिल्या शतकात लिहिण्यात आला. सातवाहन घराण्यातील हाल सातवाहन राजाच्या कारकिर्दीमध्ये या ग्रंथाची निर्मिती झाली.या ग्रंथात श्रेष्ठ दर्जाचे मराठी काव्य आहे. गाथा सप्तशती हा ग्रंथ प्राकृतातील आद्यग्रंथ असून त्यात ७०० गाथांचे संकलन आहे. या ग्रंथाचे  कर्ते अनेक स्त्री-पुरुष आहेत. (पन्नास पुरुष व सात स्त्रिया)’महाराष्ट्र प्राकृत अपभ्रंशाच्या माध्यमाने मराठी भाषा परिणत झालेली असल्याने मराठीच्या उद्‌गम विकासात या गाथेचे अपूर्व महत्त्व आहे. ग्रंथात मराठी ठसा व मुद्रेचे अनेक शब्द आहेत’ (देवीसिंग चौहान-उद्धृत -वसंत आबाजी डहाके- मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती- पॉप्युलर प्रकाशन मुंबई २००५ पृष्ठ क्रमांक २९)

९) अरे मराठी : डॉ.श्री.रं. कुलकर्णी यांनी तेलंगणातील ‘अरे मराठी समाज -भाषा आणि संस्कृती’ ह्या ग्रंथात वरंगल आणि करीमनगर या भागात राहणाऱ्या अरे मराठी समाजाची वसाहत ही मराठी स्थलांतरित लोकांची वसाहत आहे, असे संशोधन मांडले होते. या संशोधनातील दोन निष्कर्ष पुढील प्रमाणे आहेत- अरे बोली अपभ्रंश भाषेची उत्तरकालीन अवस्था दर्शवते तर यादवकालीन वाङ्मयीन मराठी ही अपभ्रंशाची उत्क्रांत अवस्था आहे. अरे बोली ही महाराष्ट्र अपभ्रंशाची बोली मानली तरी ते अशास्त्रीय ठरणार नाही.

१०) ओवी, अभंग आणि धवळे: सोमेश्वराने लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ हा ग्रंथ शके १०५१ (इ.स. ११२९) मध्ये लिहिला. त्यात त्याने महाराष्ट्रीय स्त्रिया कांडत असताना ओव्या म्हणतात असा उल्लेख केला.ओवी हा एक छंद आहे आणि त्याचे नाते अपभ्रंशातील षटपदीशी जुळते. देशीभाषेतील ध्येय असलेला छंद त्याकाळी लोकप्रिय असावा असा कयास करता येतो. पुढे संत ज्ञानेश्वरांनी ओवी हा छंद आपल्या निरूपणासाठी निवडला. यादव काळातील अनेक कवींनी ओवी हा छंद प्रकार आपल्या लेखनासाठी निवडलेला दिसतो.

‘धवळे’हा सुद्धा ओवी सदृश्य वाङ्मयप्रकार आहे. महात्मा चक्रधर स्वामींची शिष्य महादंबाने वर विषयक गीते म्हणजेच धवळ्यांची रचना केलेली दिसते.

अभंग हाही ओवीचाच एक प्रकार आहे. यादवकालीन अभंग हा ओवीसारखाच होता. अभंगात ताल महत्त्वाचा असतो त्यानंतर अभंगकर्त्याची नाममुद्रा असा अभंगाचा प्रवास आपल्याला सांगता येतो.

११) गोंधळ आणि लावणी :

देवीच्या उपासनेत गोंधळाला खूप महत्त्व असते. या लोकवाङ्मयप्रकाराचे उगमस्थान कल्याण असावे असे रामचंद्र चिंतामण ढेरे यांना वाटते. कल्याणीचा राजा सोमेश्वर याने आपल्या राजधानीत भूतमातृमहोत्सवाच्या निमित्ताने गोंडली नृत्य करविले’ हेच आज महाराष्ट्रात गोंधळाच्या रूपाने पहावयास मिळते.

मराठी भाषेचे वैभव मध्ययुगीन काळातील या समृद्ध वाङ्मयात पाहावयास मिळते. आपल्या भाषेची अभिजातता समजून घ्यायची असेल तर या ग्रंथांचा आपल्याला परिचय झाला पाहिजे या ग्रंथातील ज्ञानाची समृद्धता जाणून घेतली पाहिजे.

……………. पूर्ण………………..

चौकट

अभिजात भाषेचे निकष कोणते?

संबंधित भाषा प्राचीन असावी आणि त्यातील साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे लागते ,त्या भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे लागते, प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असला पाहिजे.

– डॉ. दीपक चिद्दरवार,

मराठी विभागप्रमुख,

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,

उदगीर जिल्हा लातूर.

भ्रमणध्वनी : ७७०९४२७७०७

झाडी बोली : नवे संदर्भ

महाराष्ट्राच्या अतिपूर्व भागाला असलेल्या परिसरास ‘झाडीपट्टी’ असे संबोधले जाते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यांचा झाडीपट्टीत समावेश होतो. या भागात जी बोली बोलली जाते, ती ‘झाडी बोली’ या नावाने ओळखली जाते. उपरोक्त चार जिल्ह्यांशिवाय नागपूर व मध्यप्रदेशातील रायपूर आणि छत्तीसगडमधील दुर्ग व आंध्रातील सीमावर्ती भागांचा ‘झाडी बोलीचा प्रदेश’ म्हणून समावेश करता येतो. झाडी बोलीतील शब्दांचा आढळ मुकुंदराजविरचित मराठीतील आद्य पद्यग्रंथ ‘विवेकसिंधू’ आणि म्हाइंभटसंपादित मराठीतील आद्य गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ या बाराव्या शतकातील ग्रंथांमध्ये होतो.

झाडी बोली ही प्रमाण मराठीचीच बोली असून तिची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या बोलीत अनेक वर्ण आढळत नाहीत. येथे ‘ण्’ या व्यंजनाचा उच्चार ‘न्’ केला जातो. तसेच ‘छ्’, ‘श्’ आणि ‘ष्’ या तिघांचे कार्य एकटा ‘स्’ पार पाडतो. शिवाय ‘ज्’ आणि ‘झ्’ यांचा केवळ एकच उच्चार येथे प्रचलित आहे. ‘ड्’ या व्यंजनाचा उच्चार हिंदीप्रमाणे होतो.
या बोलीत नपुंसकलिंग आढळत नाही. केवळ पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन लिंगावरच तिचे कार्य चालते. त्यामुळे तिने स्वतःची वेगळी लिंगव्यवस्था स्वीकारली आहे. नामाच्या लिंगपरिवर्तनाच्या बाबतीत ‘उली’ हा लघुत्वदर्शक प्रत्यय लक्षवेधी ठरतो. उदा. कोटा-कोटुली, गाडा-गाडुली, ढिरा-ढिरुली, मारा-मारुली इत्यादी. विशेषांच्या बाबतीत ‘केवळ’ या अर्थी ‘टन’ हा परप्रत्यय वेगळा वाटतो. उदा. ‘पाच टन’, ‘दाहा टन’ असे ऐकायला मिळते.
क्रियापदांच्या अनेक वेगळ्या रचना झाडी बोलीत प्रचलित आहेत. ‘मारमूर करून’, ‘जाताजावालं’, असे अभ्यस्त प्रयोग या बोलीत आढळतात. तसेच ‘मी जावासीन ना मा मरावासीन’ असा प्रमाण मराठीत न आढळणारा ‘अर्थ’प्रकार झाडी बोलीत बोलला जातो. अभ्यस्त शब्दांच्या बाबतीत हा प्रयोग अधिक ऐकायला मिळतो. ‘खोलच खोल’, ‘जाताच जावाचा’, ‘मानसाच मानसा’ असे शब्दांच्या सर्व जातींमध्ये बोलले जाते.
प्रमाण मराठीत ‘सर’ या शब्दावरून ‘सर्रकन’ व ‘सरसर’ ही अन्य दोन क्रियाविशेष रूपे निर्माण होतात. झाडी बोलीतही ही प्रचलित असली तरी तेवढ्यांवर तिचे समाधान होत नाही. त्याशिवाय ‘सरना’, ‘सरनारी’ आणि ‘सरोसरो’ असे अन्य तीन पर्यायांचा उपयोग ती करते. तसेच ‘म्हणून’ या उभयान्वयी अव्ययाकरिता ‘मुहून’ हे रूप ती स्वीकारतेच, शिवाय ‘ मुहूनस्यान, ‘मुहूनस्यानी’ व ‘मुहूनस्यारी’ हे अन्य तीन पर्याय येथे उपयोगात आहेत. अशाप्रकारे झाडी बोली आपली शब्दसंख्या वृद्धिंगत करताना दिसते. याशिवाय नाम, विशेषण, क्रियापद आदींचे वेगळे प्रतिशब्द या बोलीने सिद्ध करून आपली शब्दश्रीमंती वाढविली आहे.

झाडी बोलीसंदर्भात अधिक माहितीकरिता डॉ. हरिश्चंद्र बोरकर लिखित पुढील ग्रंथ कृपया अवलोकन करावेत. १. ‘झाडी बोली : भाषा आणि अभ्यास’ (१९९८)
२. ‘झाडी बोली मराठी शब्दकोश’ (२०००)
३. ‘भाषिक भ्रमंती’ (२००८)
४. ‘अर्थपंचमी’ (२०१३)

डॉ. हरिश्चंद्र बोरकर
अध्यक्ष, झाडीबोली साहित्य मंडळ, साकोली
सदस्य, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य
संपर्क : ९४२२८९०९३७

मराठी साहित्यविश्वामधील कोल्हापूरचे योगदान

  • ३ अ.भा.मराठी साहित्य संमलेनांच्या आयोजनासह ८ अध्यक्ष पदांचा मान,
  • मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही योगदान
  • ८ साहित्य अकादमी पुरस्कार

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम  येथे संपन्न होत आहे. दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर असून  त्या मराठी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या अभ्यासिका असून त्यांनी स्त्री-जाणिवांना प्रखर प्रकाशात आणण्याचेही अमूल्य कार्य केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाच्या भूमिकेत असणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मराठी साहित्य आणि संमेलनातील योगदानासाठी असलेलं अतुट नातं विसरून चालणार नाही.

यापुर्वी  ३ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन

कोल्हापूरच्या साहित्यविश्वाचा आढावा घेतला तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते ग्रामीण साहित्य चळवळीच्या वाटचालीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोल्हापूरचे योगदान नजरेत भरते. ग्रामीण भागात साहित्य संमेलनांचे आयोजन, वाचक घडविण्याच्या प्रक्रियेत आणि लेखकांच्या जडणघडणीतही कोल्हापूरचा वाटा मोठा आहे. आत्तापर्यंत तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहेत. यातील 18 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1932 साली सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यानंतर 1974 साली 50 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी येथे पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.  त्यानंतर 1992 सालचे 65 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथेच रमेश मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाले. विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून मराठी साहित्यात स्वतःचे स्थान निर्माण करणारे रमेश मंत्री यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. एम.ए. करीत असतानाच त्यांनी पत्रकारितेत ‘सहसंपादक’ या नात्याने प्रवेश केला. रमेश मंत्री यांच्या नावावर १३० हून अधिक पुस्तके आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि. स. खांडेकर, प्रख्यात लेखक ना. सी. फडके, ‘रातवा’कार चंद्रकुमार नलगे, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, विनोदी लेखक शंकर पाटील, प्रा. रमेश मंत्री, आनंद यादव, शंकरराव खरात, सखा कलाल, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, राजन गवस अशा दिग्गजांनी मराठी साहित्याला समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. कोल्हापुरात ज्यांचे साहित्यविश्व फुलले, अशा आठ लेखकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे.

कोल्हापूर मधील मराठी साहित्यिक

कोल्हापूर जिल्ह्यातील वि. स. खांडेकर, ना.धों. महानोर यांच्यापासून ते अलीकडील काळातील कृष्णात खोत यांच्यापर्यंतचा प्रवास मराठी साहित्याला सुवर्ण झळाळी देणारा आहे. साहित्यातले तब्बल आठ मानाचे साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यकांनी पटकाविले आहेत. वि. स. खांडेकरांनी मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला होता. नवनाथ गोरे हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत. नामदेव धोंडी महानोर हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते रानकवी होते. त्यांच्या कविता आणि गाण्यांनी मराठी काव्य साहित्यावर विशेष ठसा निर्माण केला आहे. अगदी आजच्या काळातील ग्रामीण भाषेवर आधारीत रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साहित्यिक यामध्ये कथाकार आप्पासाहेब खोत, बाबा परीट, कवी विनोद कांबळे, नीलेश शेळके, अनुवादक सुप्रिया वकील, सोनाली नवांगुळ यांचे योगदान चांगले आहे.

कोल्हापूर मधील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक

१९६० साली वि. स. खांडेकर यांना ययाती साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९६४ मध्ये रणजित देसाई यांना स्वामी साठी तर १९९० सालचा पुरस्कार आनंद यादव यांना झोंबी या लेखनासाठी मिळाला. १९९२ मध्ये विश्वास पाटील यांच्या झाडाझडतीला, २००१चा राजन गवस यांना तणकट साठी, २००७ चा गो. मा. पवार यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र) साठी, २०२१ चा किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थंतराची डायरीसाठी तर अलीकडेच २०२३ मध्ये कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

कोल्हापूर मधील मराठी साहित्य विश्वातील दिग्गज

वसंत गोवारीकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार केले असून १९९४ ते २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे या संस्थेची होती. त्यानंतर कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे जयंत नारळीकर हे अध्यक्ष होते. जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांच्या ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असून त्यांनी अनेक विज्ञानकथा पुस्तकांचे लेखन केले आहे. झोंबी कार म्हणून ओळखले जाणारे आनंद यादव यांच्या ‘झोंबी’ या आत्मचरित्रपर कादंबरीमुळे त्यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. ‘झोंबी’ला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, नटरंग, झाडवाटा, उगवती मने यासह त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. ‘नटरंग’ या त्यांच्या कादंबरीवर काही वर्षांपूर्वी त्याच नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ग्रामीण साहित्य, ग्रामसंस्कृती हे त्यांच्या आवडीचे विषय होते. ग्रामीण साहित्याला ओळख निर्माण करून देण्यात डॉ. यादव यांचा महत्त्वाचा वाटा होता.

मृत्युंजयकार शिवाजी सावंत ख्यातनाम मराठी कादंबरीकार आपणाला परिचित आहेतच. त्यांचे संपूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यालाच झाले. प्रथम वर्ष बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन पुढे वाणिज्य शाखेतून पदविका घेतली. त्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत त्यांनी अध्यापन केले. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणखात्याच्या लोकशिक्षण ह्या मासिकाचे संपादक म्हणून केले. ‘राजाराम प्रशाले’त अध्यापन करीत असतानाच त्यांनी मृत्युंजय (१९६७) ही पहिली कादंबरी लिहिली. सावंत यांना अनेक साहित्यपुरस्कार आणि सन्मान मिळाले. मृत्युंजयला महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२), भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९५), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८). छावालाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला (१९८०) आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

विजय तेंडुलकर एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथा लेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे झाले. त्यांच्या एकांकिका यात अजगर आणि गंधर्व, थीफ : पोलिस, रात्र आणि इतर एकांकिका समग्र एकांकिका (भाग १ ते ३) प्रसिद्ध आहेत. त्यांनी काचपात्रे, गाणे, तेंडुलकरांच्या निवडक कथा, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे कथांचे लेखनही केले आहे. तेंडुलकरांनी पाटलाच्या पोरीचे लगीन , चिमणा बांधतो बंगला , चांभारचौकशीचे नाटक, मुलांसाठी तीन नाटिका इत्यादींसारखी काही बालनाट्येही लिहिली आहेत. तसेच अनुवादापर नाट्यलेखनही केलेले आहे.

रमेश मंत्री यांची बरीचशी प्रवासवर्णने व विनोदी पुस्तके आहेत. ‘थंडीचे दिवस’, ‘सुखाचे दिवस’, ‘नवरंग’ ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रवासवर्णने आहेत. प्रांजळ, प्रसन्न, दिलखुलास लेखणीतून उतरलेली त्यांची प्रवासवर्णने वाचकांना त्या स्थळांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देतात. त्या वेळी अध्यक्षपदावरून सोडलेल्या संकल्पाच्या पूर्तीसाठी त्यांनी गावोगावी पुस्तकांची प्रदर्शने भरवली. त्यांनी लेखकांच्या भाषणांचे ९५ कार्यक्रम वर्षभरात घडवून आणले. ‘वाचन-संस्कृती’ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे हे काम महत्त्वाचे होते.

कृष्णात खोत यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात. कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खोत यांनी मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलत्या खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही योगदान

ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी व मराठी भाषेतील लेखक आहेत. मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे  यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने एक समिती गठीत केली होती. त्यांचे माती, पंख आणि आकाश हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. शेतकरी परंपरा असलेल्या कुटुंबात अब्दुल लाट ता. शिरोळ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अब्दुल लाट, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात झाले. मूळचे कवी असलेल्या मुळे यांचे जोनाकी, दूर राहिला गाव, रस्ताच वेगळा धरला, स्वतःतील अवकाश हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. माणूस आणि मुक्काम, रशिया – नव्या दिशांचे आमंत्रण, ग्यानबाची मेख, नोकरशाईचे रंग ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मुळे यांनी हिंदीमध्येही काव्यलेखन केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

संकलन – सचिन अडसूळ,

जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

अभिजात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ!

जैसी हरळांमाजी रत्नकिळा।

कि रत्नांमाजि हिरा निळा

तैसी भाषांमाजी चोखळा।

भाषा मराठी।।

अशा शब्दात सार्थ अभिमानाने गौरवण्यात आलेल्या मराठी भाषेला दोन हजारांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असल्याचे विविध पुराव्यांवरून निर्विवादपणे सिद्ध झाले आणि अभिजात भाषा म्हणून तिच्या दर्जावर अखेर गेल्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राजमान्यतेची मोहर उमटली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने मराठी भाषा ही प्राचीन, समृद्ध व श्रेष्ठ असल्याचे योग्य ते दाखले, साहित्य परंपरेची माहिती व इतर दस्तावेज केंद्र सरकारला सादर केले. त्यांची वस्तुनिष्ठता सिद्ध झाल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली दहा वर्षे सुरू असलेल्या लढ्याला यश आले आणि आपल्या मराठीच्या मुकुटात अभिजात भाषा म्हणून श्रेष्ठत्वाचे एक सुंदर मोरपीस खोवले गेले. मराठीवर प्रेम करणाऱ्या साऱ्यांना अभिमान वाटावा असा हा क्षण. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त केल्यामुळे मराठीचा गौरवशाली समृद्ध इतिहास व तिचे सांस्कृतिक वैभव आता जगभर पोहोचेल, असा विश्वास मराठीजनांच्या हृदयात निर्माण झाला आहे.

मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होणे हा गौरव तर आहेच पण त्यासोबतच ती संवर्धित  व वृद्धिंगत करण्याची मोठी जबाबदारीही सर्व घटकांची आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग संबंधित विद्यापीठांच्या स्थापनेपासूनच आहेत. परंतू स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ मात्र राज्यात अस्तित्वात आले नव्हते. इतर राज्यांचा विचार केला तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अशी विद्यापीठे फार पूर्वीच स्थापन केली गेली आहेत. प्रादेशिक अस्मिता जपण्यासह भाषेचा निरंतर विकास व ती वृद्धिंगत व्हावी यासाठी १९८१  ते २०१२ या कालावधीत तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषा विद्यापीठांची स्थापना झाली व त्या माध्यमातून सर्व शाखांचे शिक्षण त्या राज्याच्या भाषेत तेथे देण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र विद्यापीठ नसल्याची खंत भाषाप्रेमींना जाणवत होती. त्यातून मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही लोकभावना प्रबळ होऊ लागली. महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठाची मागणी तशी जुनीच. १९३३ मध्ये नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात यावर प्रथमच चर्चा करण्यात आली व त्यानंतर १९३९  च्या साहित्य संमेलनात साहित्यिक व भाषेचे अभ्यासक मराठी भाषा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आग्रही असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मराठी ही केवळ लोकव्यवहार व साहित्यनिर्मितीची भाषा म्हणून मर्यादित न ठेवता ती ज्ञानभाषा व आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा म्हणून विकसित करण्याची गरज प्रतिपादित होत असताना त्या दृष्टीने या भाषेसाठी समर्पित स्वतंत्र विद्यापीठ गरजेचे होते.

महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता व मुळात अभिजातच असलेली  मराठी जपायची तर तिचा इथून पुढला प्रवास मराठीसाठी समर्पित विद्यापीठातून व्हावा यावर सर्व साहित्यिक व मराठीप्रेमींचे एकमत होते. या लोकभावनेची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीचे बीजारोपण केले. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने जुलै २०२३ मध्ये सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येऊन या प्रयत्नांना गती देण्यात आली. या समितीने अवघ्या दोन महिन्यात सर्वसमावेशक तपशील व अहवाल राज्य शासनास सादर केला. त्या आधारावर मराठी भाषा विद्यापीठ अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी भाषा विद्यापीठ कुठे स्थापन करावे असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यासाठी वऱ्हाडातील रिद्धपूरशिवाय अधिक योग्य अशी दुसरी जागा कोणती असणार? रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखली जाते. अकराव्या शतकापासून नवे पंथ व भक्तिमार्ग उदयास येत होते. श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकात महानुभाव पंथाची स्थापना केली. जातिनिरपेक्षता आणि अहिंसा हे या पंथाचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात महानुभाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पंथाचा उत्तरेकडे दिल्ली व पंजाबपर्यंत प्रसार झाल्याचे अभ्यासक सांगतात.

श्री गोविंद प्रभू महानुभाव पंथाचे आद्यपुरुष व श्री चक्रधर स्वामींचे गुरु. त्यांचे वास्तव्य रिद्धपूर येथे होते. ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जातात. महानुभाव पंथाच्या प्रारंभिक अनुयांपैकी एक व मूळचे मराठवाड्यातील रहिवासी असलेले म्हाइंभट श्री चक्रधरांच्या पहिल्या भेटीतच प्रभावित झाले. स्वामींच्या विचारांनी प्रेरित होऊन म्हाइंभट्ट कायमचे रिद्धपूर येथे स्थायिक झाले. त्यांनी चक्रधर स्वामींचे विचार व शिकवणुकीचे आयुष्यभर अनुसरण केले.

श्री चक्रधर स्वामींच्या आदेशाने  म्हाइंभट्टानी इसवी सन १२७८ मध्ये ‘लीळाचरित्र’ हा मराठी भाषेतील पहिला पद्यग्रंथ रिद्धपूरच्या पावनभुमीत लिहिला. (या ग्रंथ लेखनाच्या कालनिश्चितीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.) विशेष म्हणजे या पंथाने मराठी भाषेला त्यांच्या साहित्यात प्रथम व मोलाचे स्थान दिले. महानुभावांच्या सांकेतिक लीपींबाबतही अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. स्वामींच्या उत्तरागमनानंतर महाराष्ट्रभरातील त्यांचे सर्व शिष्य रिद्धपूरला आलेत. श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र व कार्याच्या स्मरणार्थ तसेच त्यांचे शिष्य व महानुभाव पंथियांना त्यांचे मार्गदर्शन व सहवास लाभत राहावा यासाठी म्हाइंभट्ट यांनी लीळाचरित्राची निर्मिती केली. त्याच काळात श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभू, श्री नागदेवाचार्य, केशिराज, म्हाळसा यांच्या प्रतिभेला अंकुर फुटलेत. स्मृतिस्थळ, गोविंद प्रभू चरित्र, दृष्टांत पाठ इत्यादी ग्रंथ येथे निर्माण झालेत. आद्य प्राचीन कवयित्री महदईसा यांनी या भूमित धवळे रचले. ज्याला ‘महदंबेचे धवळे’ म्हणतात. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी कथा व काव्य निर्मिती केली. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, शास्त्रीय ग्रंथ, व्याकरण, भाषा विज्ञान, लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाङ्मय निर्मिती रिद्धपूर येथे झाली. त्या काळी मराठी भाषेतून तत्त्वज्ञानाची शास्त्रशुद्ध मांडणी करणारा महानुभाव पंथ अधिक नावारूपास आला व त्यातूनच ‘मराठी वाङ्मयाचीही काशी’ अशी रिद्धपूरची ओळख निर्माण झाली. खऱ्या अर्थाने मराठी वाङ्मयीन साहित्याची क्रांती येथे घडून आली. या साहित्यातून अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक पट उलगडला व समाजाला नवी दिशा देण्याचे महान कार्य रिद्धपूर येथून सुरू झाले व मराठी भाषेची नाळ रिद्धपूरशी जोडल्या गेली. मराठी भाषेच्या समृद्ध होण्यात महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे आणि त्यास रिद्धपूर साक्षी राहिले आहे.

मराठीचा अधिक सखोल अभ्यास, संशोधन व भाषेच्या संवर्धनासाठी या विद्यापीठाची मोलाची भूमिका असणार आहे. विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ.अविनाश आवलगावकर यांची  नियुक्ती झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात ते प्राध्यापक होते. मराठी व इंग्रजी विभागाचे प्रमुख व अधिष्ठाताही ते होते. साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक असलेले डॉ. आवलगावकर यांचे मध्ययुगीन साहित्य, लोकसाहित्य व समीक्षा या विषयांवर प्रभुत्व आहे. मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये त्यांचा समावेश होता. शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अनेक वर्षांचा त्यांना अनुभव असून, त्यांची अनेक पुस्तके आणि काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. डॉ. आवलगावकरांचे व्यापक अनुभव व शैक्षणिक नेतृत्व विद्यापीठाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल यात शंका नाही

मराठी भाषा विद्यापीठात वैविध्यपूर्ण व बहुभाषिक शिक्षण कसे मिळेल व येथील विद्यार्थी त्याच्या आयुष्यात रोजगारासाठी कसा सक्षम होईल याकडे प्रामुख्याने विद्यापीठाने काटेकोर नियोजन केले आहे. अभिजात मराठी भाषा व साहित्यात येथे स्वतंत्र पदवी व पदविका घेता येणार आहे. मराठीचे लेखन व संवाद कौशल्याधारित अल्पावधीचे अभ्यासक्रम येथे असणार आहेत. शासन दरबारी इंग्रजीचा सर्रास वापर होतो, त्या ऐवजी मराठीला प्राधान्य देत मराठीचा वापर वाढावा यासाठी विशेष अभ्यासक्रमासह मराठी साहित्याचे अध्ययन व अध्यापन यावर विद्यापीठाचा भर असणार आहे. यासाठी इतर राज्यातील विद्यापीठांची कार्यपद्धती, अभ्यासक्रम व त्याचे उपयोजन आदींची सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. परदेशातील साहित्याचे अनुवाद मराठीत व येथील मराठी साहित्य जगभरात अनुवादित स्वरूपात उपलब्ध करता यावे यासाठी अनुवादावर आधारित शिक्षण, इतर भाषेतील साहित्य व मराठी साहित्याचा तौलानिक अभ्यास या विषयांवर येथे अभ्यासक्रम असणार आहे.

आपल्या देशात लिपी स्वरूपातील महत्वपूर्ण दस्तावेज खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून अनेकांचा अद्याप अर्थबोध झालेला नाही. अशा लिपींचा अभ्यास व संशोधन करून देशाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक दस्तावेज जतन करण्याच्या उद्देशाने लिपी आधारित अभ्यासक्रम येथे असणार आहे. मराठीचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहे. उपयोजित कले अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा व सर्व क्षेत्रांना साहित्याशी जोडणाऱ्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे.

रिद्धपूर येथील विद्यापीठासाठी सुमारे ६० एकर जागा संपादन करण्याबाबत शासनाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. येत्या  शैक्षणिक वर्षापसून येथे काही अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत व्यवस्थापकीय परिषदेने मंजूरी दिली असून शासनाकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या उभारणीसाठी शासनाने ४  कोटी २५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला असून त्यातील अंदाजे १ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, कार्यालय व सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. उर्वरित प्रस्तावित निधीतून विद्यापीठासाठी आवश्यक त्या सर्व बाबी म्हणजे ग्रंथालय, संदर्भ ग्रंथ कक्ष, अभ्यासिका आदींची निर्मिती करण्यात येणार आहे.

अभिजात मराठीच्या संवर्धनासह तिचे भाषिक सौष्ठव जपून ती अधिकाधिक समृद्ध व्हावी यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून एक नवे पर्व सुरू झाले आहे. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, ‘जगातील सर्व प्रगल्भ भाषांना जे साधलं ते मराठीलाही साधता येईल. फक्त आपला विश्वास हवा, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायभाषेच्या क्षमतेवर.

अभिजात मराठीचा अभ्यास, संशोधन व विकास करता यावा यासाठी उभारण्यात आलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर असंख्य हृदयात हा विश्वास दृढ झाला आहे!

श्रीमती पल्लवी धारव

सहायक संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर

साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती

मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. या लिपीबद्ध संसाधनांमुळे भाषेच्या इतिहासाचा नेमका शोध घेता आला. या तुलनेत साहित्य संमेलनाचा इतिहास हा केवळ दीडशे वर्ष जुना आहे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्याकडे लेखक-कवी ही व्यक्तिमत्वे स्वतंत्रपणे अस्तित्वात आली. समूहापेक्षा आपण निराळे आहोत, आणि वेगळा विचार करत आहोत, ही जाणीव या व्यक्तींकडे होती. (मध्ययुगात ही जाणीव असली तरी लेखक-कवी व्यापक लोकसमूहाचा भाग होते.)

साहित्य संमेलनाचा प्रारंभ

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि १८७८ मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले.

साधारणतः तेव्हापासून साहित्य संमेलनांना सुरुवात झाली असे म्हणता येते.

साहित्य संमेलनाचे बदलते स्वरूप

गेल्या दीडशे वर्षात साहित्य संमेलनांचे स्वरूप बदलले. कथा, कविता, कादंबरी व अन्य वाङ्मय प्रकार यांना केंद्रस्थानी ठेवून स्वतंत्रपणे कथा संमेलन, कविता संमेलन, कादंबरी संमेलन, अनुवादकांचे संमेलन,बालकुमार साहित्य संमेलन, गझल संमेलन यांचे आयोजन होऊ लागले.

वाङ्मयीन प्रवाहांची समृद्धी

दरम्यानच्या काळात उदयास आलेल्या विविध वाङ्मयीन प्रवाहांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी साहित्य संमेलनाचा मार्ग स्वीकारला. त्यातून ग्रामीण साहित्य संमेलन, सत्यशोधकी साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, विज्ञान साहित्य संमेलन,  विचारवेध साहित्य संमेलन, भटके विमुक्त साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन अशा संमेलनाची सुरुवात झाली.

प्रादेशिक साहित्य संमेलन

मराठी प्रांतातील विविध भौगोलिक प्रदेशांनी स्वतःची स्वतंत्र ओळख जपणारी साहित्य संमेलने पुढील काळात सुरू केली. यातून मराठवाडा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, गोमंतकीय साहित्य संमेलन, बृहनमहाराष्ट्र साहित्य संमेलन, कोंकण मराठी साहित्य संमेलन अशी संमेलने प्रादेशिक विभागानुसार जिल्हा वा तालुका पातळीवरही त्या त्या भूगोलाप्रमाणे आयोजित करण्यात येऊ लागली.

मराठी बोलीचे भरणपोषण

मराठी ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. तिची नानाविध रूपे एकाच वेळी अस्तित्वात आहेत. तिच्या असंख्य प्रादेशिक, क्षेत्रीय बोली आहेत. बोलींमुळे मराठी भाषेला चैतन्य प्राप्त झाले आहे. कधीकाळी बोलींना दुय्यम समजण्याची मानसिकता समाजात होती, तथापि अलिकडच्या काळात बोलींविषयीचा अभिमान जाणीवपूर्वक व्यक्त होऊ लागला आहे. यातून त्या-त्या बोलीत लिहिणाऱ्या लेखकांनी बोली विषयक भान निर्माण करणारी साहित्य संमेलने आयोजित करण्यास सुरुवात केली. यातून बोली विषयक साहित्याचे भरण पोषण झाले.  झाडीबोली साहित्य संमेलन, वऱ्हाडी साहित्य संमेलन, अहिराणी साहित्य संमेलन, मराठवाडी बोलींचे साहित्य संमेलन, कोंकणी साहित्य संमेलन अशा भाषाभान जागृत करणाऱ्या संमेलनाची निर्मिती याचाच परिपाक आहे.

विचारधारांचा प्रचार प्रसार

विशिष्ट विचारधारा लक्षात घेऊन, विशिष्ट व्यक्तिमत्व व ऊर्जाकेंद्र लक्षात घेऊन फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, गुणिजन साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन अशा संमेलनांचे आयोजन होऊ लागले. अस्मितादर्श या नियतकालिकाने अनेक वर्ष लेखक मेळावे आयोजित केले, त्यांचे स्वरूप साहित्य संमेलनाचेच होते. विशिष्ट व्यवसाय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींनी वैद्यकीय साहित्य संमेलन, शासकीय अधिकारी साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन, विद्यार्थी साहित्य संमेलन, उद्योजक साहित्य संमेलन, कामगार साहित्य संमेलन यांच्या आयोजनात सुरुवात केली. यातील कामगार साहित्य संमेलनांस शासकीय पातळीवरून भरीव अर्थसहाय्य मिळते.

प्रतिभा संगम : विद्यार्थी साहित्यिकांचे व्यासपीठ

प्रतिभा संगम हे विद्यार्थी साहित्य संमेलन विद्यार्थी चळवळीच्या वतीने आयोजित केले जाणारे अभिनव साहित्य संमेलन आहे. लेखक कवींना ज्या विशिष्ट टप्प्यावर मार्गदर्शनाची गरज असते आणि व्यासपीठांची आवश्यकता असते, अशा टप्प्यावर ‘प्रतिभा संगम’ साहित्य संमेलन त्यांना अभिव्यक्तीसाठी मंच उपलब्ध करून देते. तीन दशकांची परंपरा असणाऱ्या प्रतिभा संगमने महाराष्ट्राला अनेक नामवंत साहित्यिक दिले आहेत.

साहित्य संस्कृती मंडळाचे भरीव अर्थसहाय्य

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग अंतर्गत असणाऱ्या साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध साहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य देण्यास सुरुवात केली, त्यातून साहित्य संमेलनांना मोठे बळ मिळाले व गावोगावी साहित्य संमेलने आयोजित होऊ लागली. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गावांमध्ये तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात खेड्यापाड्यात साहित्य संमेलने होतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात गावकरी सहभागी होऊन साहित्यविषयक चर्चांची व समकालीन प्रश्नांची चर्चा करतात असे दिसते.

विश्व मराठी साहित्य संमेलनाचा जागर

राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षात विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात येत आहे. हे संमेलन साहित्यकेंद्री नसले तरी यात होणारी भाषाविषयक चर्चा  महाराष्ट्री समाजाच्या हिताची असते.

मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने दरम्यानच्या काळात विश्व मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती. याशिवाय विविध साहित्य संस्थांची विश्व संमेलने मागील काळात संयुक्त अरब अमिरात, मॉरिशियस, थायलंड, श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशात आयोजित करण्यात आली आहेत. ‘मुक्तसृजन’ साहित्य पत्रिकेच्या वतीनेही  विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे, डॉ. विश्वनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुबई येथे डिसेंबर महिन्यात हे संमेलन आयोजित करण्यात आले. गेल्या अनेक दशकांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक मराठी संमेलनांचेही वेगळेपण अधोरेखित करण्यासारखे आहे. विश्व साहित्य संमेलनाच्या या जागरामुळे मराठी भाषेचा विस्तार सर्वदूर होताना दिसतो.

मराठवाड्यातील साहित्य संमेलने

मराठवाडा ही मराठी भाषेची जन्मभूमी आहे. निजामी राजवटीत हा प्रदेश भाषिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या दडपशाही खाली होता. तथापि विसाव्या शतकात येथील लेखक कवींनी एकत्र येऊन जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवून साहित्य परिषदेची स्थापना केली व मराठवाडा साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. ही संमेलने भाषा विकासासाठी व राजकीय आत्मभानासाठी अत्यंत महत्त्वाची होती. मराठवाड्याला निजामाच्या जोखडाखालून मुक्त करण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, त्यात मराठवाडा साहित्य संमेलनांचा उल्लेख अपरिहार्य आहे.

आजही मराठवाड्याच्या बहुतेक जिल्ह्यात वेळोवेळी साहित्य संमेलने होत असतात. अगदी या दोन महिन्यांची नोंद घ्यायची झाली तरी एकट्या नांदेड जिल्ह्यात आठ ते दहा साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले. भोकर या ठिकाणी लोकसंवाद साहित्य संमेलन, सावरगाव या ठिकाणी बालकुमार साहित्य संमेलन, सगरोळी या गावात साहित्य संस्कृती मंडळाच्या साह्याने राज्यस्तरीय साहित्य संमेलन, तसेच सोनखेड व मुदखेड या ठिकाणीही साहित्य संमेलने आयोजित केली गेली. नजिकच्या काळात जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने जिल्हा ग्रंथोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अनुवादित मराठी साहित्याचे संमेलन आयोजित केले जाणार आहे. नांदेडच्या आजूबाजूला शिरूर अनंतपाळ, धर्मापुरी या ठिकाणी संमेलने झाली. माजलगाव, अंबाजोगाई, जालना, वाळूज छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी या दोन महिन्यात साहित्य संमेलने आयोजित केली गेली. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे एप्रिल महिन्यात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच नांदेड येथे समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलने भाषा समृद्धीसाठी आवश्यक

साहित्य संमेलनाची ही रेलचेल भाषिक आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आहे. साहित्य हा एकूण भाषा व्यवहाराचा अत्यंत छोटा भाग आहे, तरी साहित्यामुळे भाषासंस्कृती आणि समाजसंस्कृती प्रवाहित होत असते. विचारांची आदान प्रदान करण्यासाठी व प्रचार प्रसार करण्यासाठी साहित्याइतका दुसरा उत्तम मार्ग नाही समाजातील सर्वच घटकांनी साहित्य संमेलनांचे महत्त्व ओळखले आहे.

अलिकडच्या काळात जेव्हा मराठी भाषेवर आक्रमणे वाढली आहेत. इंग्रजीचा अतिरिक्त वापर सभोवताली होऊ लागला आहे. अनेक इंग्रजी शब्दांचे बस्तान आमच्या दैनंदिन जीवनातही बसले आहे, अशावेळी साहित्य संमेलनातून केल्या जाणाऱ्या भाषाविषयक चर्चा समाजाच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणाऱ्या आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर बहुतेक साहित्य संमेलनातून अभिजात मराठीच्या संदर्भात चर्चासत्रे आयोजित केली गेली, भाषेचा अभिमान मनामनापर्यंत पोहोचवणारी घटना आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी समाजाचा अभिमानबिंदू आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व दिवाळी अंक हे मराठी भाषक समाजाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशा घटना अन्य भाषिक प्रांतामध्ये होत नाहीत.

मराठी भाषेच्या संवर्धनामध्ये प्रत्येक व्यक्तीचे व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. मागच्या दीडशे वर्षात भाषा संस्कृतीच्या संवर्धनामध्ये साहित्य संमेलनाचे योगदान लक्षात घेण्याजोगते आहे, असे म्हणता येईल.

प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर

मराठी विभाग प्रमुख

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

संपर्क – ९४२३२७४५६५

 

(डॉ .पृथ्वीराज तौर हे प्राध्यापक असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषा विभागप्रमुख व ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...