शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 27

महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनोत्सवा निमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. विभागीय आयुक्तांनी यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, उपायुक्त (साप्रवि) अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त सुशील आग्रेकर, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्याम देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन                                                               

चंद्रपूरदि. 1 मे : प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेयांच्या हस्ते आज (दि.1) उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह कक्ष प्रमुख कथा वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर, समाजसेवा अधीक्षक भास्कर शेळके, वरिष्ठ लिपिक दीपक शेळके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. वुईकेम्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना या कक्षाची माहिती झाली पाहिजे. गरीब रुग्णांना मुंबईला यासाठी चकरा मारा लागू नये म्हणून, स्थानिक पातळीवरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर हा कक्ष उभारण्यात आला असून जनतेमध्ये याची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेयांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश : समाजातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय अंतर्गत उपचार मिळवून देणे, महात्मा ज्योतिबा फुले /आयुष्यमान भारत योजना तसेच इतर जनआरोग्य योजनांची माहिती रुग्णांना देणे व त्यांना संदर्भित करणे, आरोग्य संबंधित योजनेमध्ये समाविष्ट होऊ न शकणा-या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत करणे.

००००००

 

चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 

चंद्रपूरदि. 1 मे : संपूर्ण देशात महाराष्ट्र हे आर्थिक संपन्न आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणेच नैसर्गिक वनाच्छादन असलेला चंद्रपूर जिल्हा हा जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प, विविध उद्योग, उर्जानिर्मिती प्रकल्प, सैन्याकरीता लागणारी आयुधी निर्माणी आदीमुळे जागतिक पटलावर ओळखला जातो. जिल्ह्याची ही ओळख कायम राहावी, विकासाच्या मार्गावर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी शासन आणि प्रशासन सैदव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मुख्यालय येथे ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार

प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना सर्वप्रथम वंदन करून पालकमंत्री डॉ. वुईकेम्हणाले, स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेने वेग घेतला. याच अनुषंगाने 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यासाठी मोठा लढा उभा करावा लागला. हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्र राज्याने सुरवातीपासूनच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भरभक्कम सरकार सत्तेत आले आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत आहे. तसेच पहिल्या 100 दिवसात सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने देखील पाऊले टाकली आहेत. वैशिष्ट म्हणजे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सात कलमी कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदमार्फत एकाच वेळी जवळपास 35 हजाराच्यावर लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भुमिपूजन करण्यात आले आहे. औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन अंतर्गत जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या औद्योगिक परिषदेत 12 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून 17 हजार 431 कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्यात आली आहे. यातून 14 हजार थेट रोजगार निर्मिती होणार आहे, असे पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेयांनी सांगितले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान अंतर्गत चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, संदीप छिद्रावार, विजय बोरीकर, रविंद्र हजारे, शुभांगी सुर्यवंशी, अनिलकुमार घुले, अमुल भुते, युधिष्ठिर रैच यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे चांदा पब्लिक स्कुल, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांचा, आदर्श ग्राम महसूल अधिकारी प्रविण ठोंबरे यांना तसेच ‘पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ’ या ब्रीदवाक्य स्पर्धेतील हिमाशू संजय वडस्कर, समृध्दी गुप्ता, चांदणी बलराम झा यांचाही पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

००००००

 

वृत्त क्र.300

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु या, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक  अर्चना पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, केशव गड्डापोड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो.  1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेंव्हा पासूनच राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य-संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन ही साजरा करीत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्वाचा वाटा आहे.

सध्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला हिंगोली जिल्हा दिनांक 1 मे, 1999 रोजी निर्माण झाला. आज आपल्या जिल्ह्याच्या स्थापनेचा देखील वर्धापन दिन आहे. विकासाकडे झेपावणारा आपला हिंगोली जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा 65 वा वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, कामगार, विद्यार्थी, आणि पत्रकारांना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 7 कलमी कार्यक्रमाच्या ‘मिशन 100 दिवसा’च्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासकीय सुधारणा आणि गुंतवणूक प्रोत्साहन यावर भर दिला जात असल्याचे सांगून शासनाने ॲग्रीस्टॅक योजना सुरु केली असल्याचे सांगितले. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डाटा एकत्रित केला जाणार जात आहे. या डेटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 86 हजार 329 शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक तयार केले असून उर्वरित शेतकऱ्यांचे आयडी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे पालकमंत्री श्री.झिरवाळ यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने  लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015’ लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे. हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला असून जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रम राबवून हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने जिल्ह्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्तंगत दि. 19 एप्रिल रोजी रेल्वेने अयोध्या दर्शनाचा लाभ दिल्यामुळे त्यांची तीर्थदर्शनाची इच्छा पूर्ण झाली आहे, अशी माहितीही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी हिंगोली जिल्ह्यातील 148 गावांना शासनाने मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीमध्ये गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा लोकसहभागीय पध्दतीने तयार करण्याची सूक्ष्म नियोजन प्रक्रिया 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन संचासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे 4217 लाभार्थ्यांना 771 लाख 71  हजार रुपयाचे अनुदान अदा करण्यात आले आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 772 प्रकल्पांचे कर्ज मंजुरीचे प्रस्ताव विविध बँकाकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच 198 उद्योगांना 12 कोटी 45 लाख रुपये बँकाद्वारे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याचे सांगून हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे मा.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे काम चालू आहे. याचा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकरी, कंपन्या आणि हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तज्ञांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे वसमत हळद या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनांचा दर्जा प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात 8 ते 22 एप्रिल, 2025 या कालावधीत राष्ट्रीय पोषण पंधरवाडा राबविण्यात आला. या पंधरवाड्यांतर्गत माहे एप्रिल, 2025 अतंर्गत जन आंदोलन डॅश बोर्डवर ग्रामीण व शहरी भागातील 1197 अंगणवाडी केंद्र स्तरावर महिला व बाल कल्याण विभागाने आजपर्यंत 79 हजार 150 (प्रती अंगणवाडी केंद्र 66.12) उपक्रमांच्या ऑनलाईन नोंदी करुन राज्यात द्वितीय क्रमांक आला आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजना, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, आचार्य चाणक्य कौशल्य विकास कार्यक्रम अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 5 हजार 613 उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 2662 कार्य प्रशिक्षणार्थी घेत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून वैयक्तीक व्याज कर्ज परतावा योजनेचा 920 तर गट व्याज कर्ज परतावा योजनेचा 21 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील 15 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये 298 उमेदवारांना खाजगी आस्थापनेमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी दिली.

यावेळी शैक्षणिक कामासाठी सिंगापूर अभ्यास दौरा केलेले शिक्षक प्रदीप घोंगडे, एनआरसी डिजिटल आयुष्यमान भारत मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकीय अधिकारी गोपाळ कदम, अस्थिरोग तज्ञ डॉ.मनीष बगडिया, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी भाकरे, वैद्यकीय अधिकारी दंतरोग तज्ञ डॉ.फैसल खान यांचा पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेले पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, पोलीस गौसखान पठाण, माझी वसुंधरा अभियानात द्वितीय क्रमांक मिळाल्यामुळे मुख्याधिकारी अरविंद मुढे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अण्णाराव कांबळे, उप अभियंता कृषक तांबडे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तसेच यावेळी कंपोस्ट खड्डा भरु आपले गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करुन करण्यात आले. हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी हिंगोली पोलीस विभागासाठी प्राप्त 13 वाहनाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड पथक तसेच बँक पथकाने परेडचे शानदार संचालन केले. याप्रसंगी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुणगल, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.राजेंद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधान उद्देशिका कोनशिलेचे अनावरण

छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- ‘घर घर संविधान’ अभियानाचा उपक्रम म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेच्य कोनशिलेचे अनावरण आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर प्रवेशद्वारा जवळ ही उद्देशिकेची कोनशिला स्थापित करण्यात आली आहे. विधान परिषद सदस्य आ.संजय  केनेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी,  एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांची यावेळी उपस्थिती होती.

०००००

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातच तळ मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य आ.संजय  केनेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी,  एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतिपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांची उपस्थिती होती.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज होईल.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे  रुग्णांना वैद्यकीय उपचारकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या पैशाचा व वेळाचा अपव्यव टाळण्याकरिता हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, दहशवादी हल्ला, दंगल इ मध्ये मृत किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य मदत कक्षाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या कक्षाद्वारे रुग्णांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या इतर आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच वेळोवेळी आरोग्य शिबीरे घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गोरे, लिपिक सचिन दोडे, समाजसेवा अधीक्षक श्यामसुंदर वाकळे या तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

०००००

 

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा उत्साहात

छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- दहशतवादाचा सक्षमतेने मुकाबला करत असतांना देशांतर्गत शांतता व लोकशाही अबाधित राखून देश आणि राज्य प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करीत आहे. न्याय, समता, शांतता, बंधुता या मूलभूत तत्त्वांचा अंगीकार करत नागरिकांनी  सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेम अबाधित ठेवावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाचा सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदिपान  भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच प्रशासनातील अन्य अधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पहेलगाम येथे दहशतवादी ल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना पालकमंत्री शिरसाट यांनी श्रद्धांजली अर्पण केली.  त्यांच्या कुटुंबयांप्रति संवेदना व्यक्त करून  पालकमंत्री शिरसाट म्हणाले की,      भारत देश हा बलाढ्य आणि विकसनशील देश असून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्ह्याची विकासाकडे अग्रेसर असून उद्योग, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून त्यामुळे रोजगार निर्माण होणार आहे. जिल्ह्यात कामगारांना विविध योजनेत २६४ कोटी ४४ लक्ष ९३  हजार रुपयांचा लाभ देण्यात आला असून आरोग्य,आवास योजना, शिक्षण,ग्रामविकास, आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यासह लघुउद्योग आणि व्यवसायासाठी जिल्ह्यामध्ये भरीव निधीची तरतूद केली आहे. कायदा सुव्यवस्था आणि शांततेसाठीही पोलीस प्रशासनास अद्यावत वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून. या विकास प्रक्रियेत सर्व नागरिक, प्रशासकीय अधिकारी व सर्व घटकांनी सहभागी होऊन जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करू या, असे आवाहन श्री. शिरसाट यांनी केले.

त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विविध प्रशासकीय कामगिरी बद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यामध्ये १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळा

पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांची नावे याप्रमाणे-

१.      राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व उपविभागीय कार्यालय कन्नड.

२.      पोलीस पदके-  संदीप अनंतराव पाटोळे लाचरुत प्रतिबंधक विभाग स्वाती भोर अशोक भंडारे गीता बागवडे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक. पोलीस हवालदार यांचाही सन्मान करण्यात आला.

३.      आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, सजा बाजारात सावंगी तालुका खुलताबाद येथील नारायण पठ्ठे.

४.    संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार (सन २०२३-२४) प्रथम ग्रामपंचायत पुरस्कार सोयगाव तालुक्यातील जरंडी, द्वितीय पुरस्कार कन्नड तालुक्यातील नादरपुर ग्रामपंचायत, तृतीय पुरस्कार तालुका छत्रपती संभाजी नगर मधील दुधड ग्रामपंचायत, विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मध्ये छत्रपती संभाजी नगर मधील ग्रामपंचायत वाहेगाव वळदगाव व ग्रामपंचायत करोडी वितरित करण्यात आले.

५.     पोलीस अधीक्षक संदीप अनंतराव आटोळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

६.      पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती रामराव भोर, लोहमार्ग

७.     पोलीस निरीक्षक अशोक रामलू भंडारे, पोलीस आयुक्तालय

८.     पोलीस निरीक्षक श्रीमती गीता मोतीचंद बागवडे, पोलीस आयुक्तालय

९.      पोलीस निरीक्षक शरद बाबुराव जोगदंड, लोहमार्ग,पोलीस आयुक्तालय

१०.   पोलीस उपनिरीक्षक इसाक उस्मानखान पठाण, पोलीस आयुक्तालय

११.   पोलीस उपनिरीक्षक दिपक परदेशी, पोलीस आयुक्तालय

१२.  पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुरुड, पोलीस आयुक्तालय

१३.   पोलीस उपनिरीक्षक शेख हबीब खान मोहमद, पोलीस आयुक्तालय

१४. पोलीस उपनिरीक्षक संजय जानुजी जोगदंड, पोलीस आयुक्तालय

१५.  सहा.पो.उपनिरीक्षक विष्णु लक्ष्मणराव उगले,पोलीस आयुक्तालय

१६.  पोलीस हवालदार मुश्ताक गफूर शेख, पोलीस आयुक्तालय

१७.  पोलीस हवालदार मच्छीन्द्रंनाथ रंगानाथ जाधव, पोलीस आयुक्तालय

१८.  पोलीस हवालदार विठ्ठल विनायकराव मानकापे, पोलीस आयुक्तालय

१९.   पोलीस हवालदार संतोष लोंढे, पोलीस आयुक्तालय

२०.  पोलीस हवालदार शिवाजी राजाराम कचरे, पोलीस आयुक्तालय

२१.  पोलीस हवालदार प्रभाकर साहेबराव राऊत, पोलीस आयुक्तालय

२२. पोलीस हवालदार कैलास तेजराव गाडेकर, पोलीस आयुक्तालय

२३.  पोलीस हवालदार राजेंन्द्र देविदास चौधरी, पोलीस आयुक्तालय

२४.पोलीस हवालदार मो.इरफान मो.इसाकखान, पोलीस आयुक्तालय

२५. पोलीस हवालदार लक्ष्मण दशरथ किर्तीकर, पोलीस आयुक्तालय

२६. पोलीस हवालदार सुनिल सुरेश बेलकर, पोलीस आयुक्तालय

२७. पोलीस उपनिरीक्षक शाकिल अहेमद शेख रहीम शेख, ग्रामीण

२८. पोलीस उपनिरीक्षक गफारखान सरोवरखान पठाण, ग्रामीण

२९.  सहा. पो.उप.निरीक्षक खालेद हबीब शेख, ग्रामीण

३०.  पोलीस हवालदार अफसर खाजा शेख, ग्रामीण

३१.   पोलीस हवालदार राजु बबनराव खरात, ग्रामीण

३२.  पोलीस हवालदार विश्वास प्रल्हाद नागरे, रा.रा. पो. बल गट क्र.14 छत्रपती संभाजीनगर

३३.  पोलीस अंमलदार अशोक परशुराम पवार, रा. पो. बल गट क्र.14 छत्रपती संभाजीनगर

३४. पोलीस अंमलदार दिनेश शामराव ढगे, रा.रा. पो. बल गट क्र.14 छत्रपती संभाजीनगर

 

पोलीस दलाच्या ताफ्यात ३३ वाहने

ध्वजारोहण समारंभ नंतर पोलीस विभागासाठी अद्यावत ३३ वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात चारचाकी वाहने, बसेस, दुचाकी वाहने यांचा समावेश असुन गतिमान तपास यंत्रणा व कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये या वाहनांचा उपयोग होईल असा विश्वास पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केला. पोलीस दलातील विविध पथकांचे मानवंदना स्वीकारून नंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी मान्यवरांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

००००००

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर, दि.01 (विमाका):- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर आयुक्त बाबासाहेब बेलदार, विजयसिंह देशमुख, डॉ.अनंत गव्हाणे, खुशालसिंह परदेशी, नगर रचनाकार हर्षल बाविसकर, नगर रचना विभागाचे उपसंचालक रवींद्र जायभाये, नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे,  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००००

 

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी सदैव तत्पर –  पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक 1 मे 2025 (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचे जीवनमान सुकर होण्यासाठी सदैव तत्पर राहीन, अशी ठाम ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापनादिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, सीमा अहिरे, संजय बागडे, महादेव खेडकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, तहसिलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, अपर तहसिलदार वैशाली हिंगे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला संत, महापुरुषांच्या विचारांचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले या ऐतिहासिक ठेव्याची साक्ष देतात, संत-महंतांच्या विचारांचा, आणि कवी गोविंदाग्रज ऊर्फ राम गणेश गडकरी यांच्या कवितांचा उल्लेख करत त्यांनी राज्याचा सांस्कृतिक ठेवा अधोरेखित केला. मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत त्यांनी हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन केले. याशिवाय, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले की,

शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव योजना

भारतीय शेती ही सर्वस्वी मोसमी पावसावर अवलंबून आहे. यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. ही आपल्यासाठी दिलासादायक आणि समाधानाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे. खरीप पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 लाख 61 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करुन शेतकरी आयडी प्राप्त केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीचा 1 लाख 62 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत 73 शेतकऱ्यांना 1 कोटी 42 लाख अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय कृषि विकास योजनेत 8 हजार 318 शेतकऱ्यांना 5426.51 लाख रुपयांचे अनुदान दिले. कृषि यांत्रिकीकरण उपअभियानात 271 शेतकऱ्यांना 260.11 लाख रक्कमेची कृषि औजारे दिली. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत 91 हजार 298 शेतकऱ्यांना 165.93 कोटी रुपयांची वीज बिल सवलत दिली आहे. जिल्ह्यात 21 वी पशूगणना पूर्ण झाली आहे. दुध दरावरील सबसिडी 5 रुपयांवरुन 7 रुपये करण्यात आली असून त्याचा लाभ 54 लाख लाभार्थ्यांना झाला आहे.

जिल्हास्तरासह मंडळस्तरावरही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन

राज्य शासनामार्फत नागरीकांना अधिक सेवा मिळण्यासाठी जिल्हास्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येते. यापुढे हे अभियान प्रत्येक मंडळस्तरावर राबविण्यात येणार असून याकरीता 25 हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर जिवंत सातबारा मोहिम सुरु केली असून या मोहिमेत जिल्ह्यात 8 हजार पेक्षा अधिक मयत खातेदारांच्या नोंदी अद्यावतीकरणाचे काम सुरु आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी त्यांना नवीन वाहने उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शासनाच्या पणन विभागामार्फत 3 हजार 588 शेतकऱ्यांना 14 कोटी 63 लाख कांदा अनुदानाची रक्कम दिली आहे. यावर्षी शासनाने सोयाबीन व तुरीची विक्रमी खरेदी केली आहे. अटल अर्थसहाय्य योजनेतंर्गत 30 सहकारी संस्थांना मंजुरी दिली असून पैकी 16 संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी 1 कोटी 5 लाखाचे कर्ज व अनुदान मंजुर केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा आघाडीवर

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत 60 हजार घरकुले पूर्ण झाली आहे. पीएमआवास योजना ग्रामीण टप्पा 2 अतंर्गत 90 हजार घरकुलांना मंजुरी दिली. त्यातील 81 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत केला. शबरी आवास योजनेत 11 हजार 706, रमाई आवास योजनेत 8 हजार घरकुले पूर्ण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 48 हजार 733 कुटूंबाचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले असून सर्व्हेक्षणाच्या कामात आपला धुळे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महिलांचे सशक्तीकरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात 5 लाख 25 हजारापेक्षा अधिक अर्ज पात्र ठरले. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयेप्रमाणे रक्कम खात्यावर जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत जिल्ह्यातील 800 पेक्षा अधिक लाभार्थी नुकतेच अयोध्येत जाऊन प्रभु श्रीरामाचे दर्शन घेऊन आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत जिल्ह्यात 14 हजार 600 महिला बचतगटांच्या माध्यमातून 1 लाख 50 हजार कुटूंबे जोडली गेली. या बचतगटांना आतापर्यंत बॅकांमार्फत 535 कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. या मदतीच्या माध्यमातून 8 हजार महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दिदी या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील 67 हजार महिलांनी एक लाखाहून अधिक उत्पन्न घेतले आहे. गावपातळीवर महिलांना मार्गदर्शन आणि सेवा पुरविण्यासाठी कृषी सखी, पशू सखी, बॅक सखी, महिला सखी गावोगावी महिलांना शेती, पशुपालन, उद्योग, बॅकींग व्यवहाराबाबत माहिती देत आहे.

औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मिती

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला अधिक गती यावी याकरीता धुळे शहरात नुकतीच गुंतवणूक परिषद पार पडली. या गुंतवणूक परिषदेत विविध राज्यातील अनेक क्षेत्रातील 144 कंपन्यांनी 8 हजार 828 कोटी रुपयांचे गुंतवणूक सामंजस्य करार केले. यामुळे जिल्ह्यात 13 हजार 378 जणांना रोजगार निर्मिती होणार आहे.

शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम आणि अधिकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम सुरु आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली या आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यात ई-ग्राम संवाद साधुन गावातील मुलभूत समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या शंभर दिवसांच्या आराखड्यातंर्गत राबविलेल्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे. दहावी व बारावी परिक्षेचे ऑनलाईन लिंकद्वारे सनियंत्रण करुन धुळे जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविले आहे. बाल संरक्षण क्षेत्रात आपल्या जिल्ह्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपल्या जिल्ह्यास चार बालस्नेही पुरस्कार प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास कार्यालय तसेच उत्कृष्ट बाल कल्याण समिती, धुळे यांना तर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत ग्रामपंचायत गटात आपल्या धुळे जिल्ह्यातील बोराडी, ता. शिरपूर ग्रामपंचायतीस राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच सन 2022-2023 या वर्षांसाठी ग्रामपंचायत कर्ले, ता. शिंदखेडा, सन 2023-2024 साठी ग्रामपंचायत चौगांव, ता. धुळे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच आपल्या जिल्ह्याची दिव्यांग खेळाडू कु. वैष्णवी मोरे हीला आंतरराष्ट्रीय ज्यूदोपटू 2023-2024 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धुळ्यातील मोहिनी सुर्यवंशी, श्रीतेश पटेल यांची निवड झाल्याने त्यांचे जिल्हावासीयांच्यावतीने अभिनंदन केले.

जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2025-2026 या वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 348 कोटी, आदिवासी उपयोजना 153 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत 32 कोटी असे एकूण 543 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात भविष्यात अधिक विकासात्मक कामे उभी राहून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यांचा झाला सन्मान….

यावेळी आदर्श तलाठी पुरस्कार राकेश भोई, धुळे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे, सुधीर सोनवणे, पोलीस हवालदार ललीत पाटील, कांतिलाल अहिरे, विशाल मोहने, महिला पोलीस उप निरिक्षक लक्ष्मी करंकार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे सहायक पोलीस उपनिरिक्षक विशाल पाटील यांना पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे  द्वारा  सन 2023-2024 व सन 2024-2025 या वर्षांसाठी  खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा गुणवंत खेळाडु (महिला) पुरस्कार पुर्वा दिलीप निकम, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून राजेंद्र बळीराम शिंदे, जिल्हा गुणवंत खेळाडू (पुरुष) पुरस्कार प्रथमेश अमरीश देवरे, जिल्हा गुणवंत खेळाडू (महिला) पुरस्कार कु. अनुराधा दिलीप चौधरी, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू राहुल ईश्वर बैसाणे, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुकदेव गोरख भिल यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन 2023-2024 व सन 2024-2025  या वर्षांसाठी  खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

तसेच सन 2022-2023, 2023-24, 2024-2025 वर्षासाठी युवक, युवती व संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाला यात जिल्हा युवा पुरस्कार (युवती) ॲड. शितल जावरे, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) सागर राजेंद्र पटेल, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) कु.सुवर्णा भालचंद्र देसले, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) प्रकाश शरद पाटील, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) कु.वृदावना भीमराव पाटील तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) इंदीरा महिला मंडळ वलवाडी ता.जि.धुळे अध्यक्षा प्रभा परदेशी यांना पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक 6, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल (पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड (पुरुष व महिला), धुळे पोलीस व एसआरपीएफ संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक (सॅम) मोबाईल फॉरेन्सिक इन्हेुळस्टीगेशन व्हॅन, पोलीस विभागाचे चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक, अग्निशामक दल आदी संचलनात सहभागी झाले. संचलनाचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सागर देशमुख यांनी केले. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजविले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

प्रांरभी मान्यवरांच्या हस्ते धुळे पोलिस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण तसेच धुळे महानगरपालिकेच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातंर्गत पोलीस मुख्यालय, धुळे येथे बांधण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे भूमिपूजन, पोलीस दल व एबी फाऊंडेशनच्यावतीने पोलीस कुटूंबियांसाठी राबविलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन, तसेच धुळे येथे शासकीय गुलमोहर विश्रामगृह परिसरात अतिमहत्वाचे व्यक्तींकरीता नवीन व्ही.आय.पी. विश्रामगृहाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न

रायगड,(जिमाका)दि.1:- महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग-अलिबागतर्फे आयोजित “वन कट्टा” या अनोख्या उपक्रमाचे  उद्घाटन महिला व बालविकास मंत्री  आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते संपन्न  झाले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उप वनसंरक्षक राहुल पाटील यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे, व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

०००००

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...