मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 1652

महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी ८२८ जागांची भरती

राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे ७४ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे २९ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर ११७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड ५७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड ४३ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई २७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद १७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया ३८ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला १७६ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव २५० जागा

शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी http://bit.ly/34FzAcR

अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यात वन विभाग यशस्वी

मुंबई, दि. 2 : संपूर्ण कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून12 कि.मी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध असल्याने १२.११चौ.कि.मी च्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित झाला. हे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांचे माहेरघर असल्याने दिवसरात्र येथे पक्ष्यांचे संमलेन भरलेले दिसते. पक्षांसाठी जाहीर करण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात147 प्रजातीचे पक्षी आपण पाहू शकतो ज्यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. या अभयारण्यात विविध प्रकारच्या ६४२ वृक्षप्रजाती वेली, दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. मोठ्या वृक्षांबरोबर झुडूपवर्गीय वनस्पती ही येथे मोठ्या प्रमाणात आहेत.

पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला आहे. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षीनिरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्वात आहेत.

पक्षी अभयारण्यास दररोज आणि सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक भेट देत असतात. अभयारण्यात जाताना ते खाण्याचे पदार्थ, पाणी घेऊन जातात, त्यासोबत अभयारण्यात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकने वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत होता, शिवाय पर्यावरणाला नुकसान पोहोचत होते. यावर उपाययोजना करण्यासाठी उपवनसंरक्षक, वन्यजीव ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा आणि वन कर्मचाऱ्यांनी अभयारण्यालगतच्या गावातील समित्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा करून अभयारण्यात जाताना पर्यटकांच्या साहित्याची तपासणी करून त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकची नोंद घेतली जाऊ लागली.  प्लास्टिकचे सामान असल्यास त्याबदल्यात  त्यांच्याकडून  सुरुवातीला २००  रुपयांची अनामत रक्कम ठेवून घेतली जाऊ लागली. ते अभयारण्यातून परत येताना त्यांनी नेलेले सर्व प्लास्टिकचे सामान परत आणल्यास अनामत म्हणून ठेवलेली २०० रुपयांची रक्कम त्यांना परत केली जाऊ लागली परंतु एखाद दुसऱ्या पाण्याच्या बाटलीसाठी २०० रुपयांची अनामत रक्कम ठेवण्यास पर्यटक विरोध करीत त्यामुळे ही रक्कम १०० इतकी करण्यात आली. अभयारण्यातून परत येताना पर्यटकांनी नोंद केलेले प्लास्टिक परत न आणल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करून घेतली जाते. याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती कल्हे यांच्यामार्फत उपद्रवशुल्क प्रत्येकी .०५रुपये वसुल केले जाते. त्यातून या समितीकडून रोजंदारी मजूर लावून पर्यटकांकडून अनावधनाने राहिलेला कचरा दर सोमवारी उचलला जाऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. प्लास्टिकची पाण्याची बाटली आणि शीतपेयाच्या बाटल्याची अनामत रक्कम वसूल करण्यासाठी अभयारण्यातील तीन बचतगटांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त व्हावे म्हणून विविध महाविद्यालये, शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यांच्यामार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. रोटरी क्लबच्या विविध शाखांमधील पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य प्रत्येक रविवारी किल्ल्यावर उपस्थित राहून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात. या सर्वांच्या सहकार्याने आणि शिस्तीला “सवयी”ची जोड दिल्याने कर्नाळा अभयारण्य क्षेत्र स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यात यश आले आहे.

००००

डॉ. सुरेखा मुळे, वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)

करनाला विहार को प्लास्टिक मुक्त करने में वन विभाग सफल

मुंबई. दि.2 : संपूर्ण पक्षी विहार प्लास्टिक मुक्त है। रायगढ़ जिले में कर्नाला पक्षी विहार मुंबई-गोवा राजमार्ग पर पनवेल से 12 किमी दूर है। कर्नाला किला और आसपास का क्षेत्र पक्षी विविधता में समृद्ध होने से 12.11 वर्ग किमी के क्षेत्र को संरक्षित वन क्षेत्र घोषित किया गया था। चूंकि यह स्थानीय और प्रवासी पक्षियों का घर है, इसलिए यह दिन-रात पक्षियों से भरा हुआ लगता है। यह पक्षियों के लिए घोषित महाराष्ट्र का पहला विहार है। यहाँ हम 147 प्रजातियों के पक्षी देख सकते हैं, जिनमें से 37 प्रजातियाँ प्रवासी पक्षी हैं। इस विहार में 642 अलग-अलग प्रकार के पेड़, जंगली जड़ी बूटी और विभिन्न जड़ी-बूटियां हैं। बड़े पेड़ों वाली झाड़ियाँ यहाँ प्रचुर मात्रा में हैं।

पक्षी देखने के अलावा, इस विहार का मुख्य आकर्षण कर्नाला किला है। किला ट्रेकर्स और पर्वतारोहियों के लिए एक बड़ा आकर्षण है क्योंकि किले की ओर जाने वाला प्रकृति का रास्ता कठिन और पथरीला है। हरियाली और मोरकट, जो राष्ट्रीय राजमार्ग के पूर्वी भाग में स्थित हैं, पक्षी निरिक्षण की दृष्टि से महत्वपूर्ण हैं। विहार के राष्ट्रीय राजमार्ग से पश्चिम की तरफ, एक और प्रकृति के रास्ते में विभिन्न प्रकार की प्राकृतिक वनस्पतियाँ हैं।

हजारों पर्यटक प्रतिदिन और छुट्टियों में पक्षी विहार आते हैं। विहार में वे भोजन, पानी ले जाते हैं, और विहार में ले जाया जा रहा प्लास्टिक वन्यजीवों के अस्तित्व को खतरे में डाल रहा है और पर्यावरण को भी नुकसान पहुंचा रहा है। इसके उपाय के लिए, वन्यजीव, ठाणे के उप-संरक्षक के मार्गदर्शन में वन क्षेत्र अधिकारियों, करनाला और वन कर्मचारियों ने विहार के आसपास में बसे ग्राम समितियों की एक बैठक बुलाई। उनके साथ चर्चा करने के बाद, विहार में जाने वाले पर्यटकों की सामग्रियों की जांच की गई और उनके द्वारा रखे गए प्लास्टिक को रिकॉर्ड किया जाने लगा। प्लास्टिक के सामान के बदले में, उनसे शुरू में 200 रुपये का जमा कराया जाने लगा। जब वे विहार से लौटे, तो उनके द्वारा वापस लाई गई सभी प्लास्टिक की वस्तुओं के बदले जमा किए गए 200 रुपए वापस किया जाने लगा

लेकिन दूसरी पानी की बोतल के लिए200 रुपये जमा करने का विरोध पर्यटकों द्वारा किया गया, इसलिए यह राशि 100 रुपए कर दी गई।

विहार से लौटते समय,  पर्यटकों द्वारा पंजीकृत प्लास्टिक  वापस नहीं लाने पर जमा की गई राशि को जब्त कर लिया जाती है। इसे पर्यटकों का अच्छा प्रतिसाद मिल रहा है। ग्राम विकास समिति के माध्यम से उपखंड शुल्क प्रत्येक से 5 रुपये का लिया जाता है। इससे समिति द्वारा दैनिक मजदूर को लगा पर्यटकों द्वारा छोड़े गए कचरे को हर सोमवार को उठाया जाता है और उसका निपटान किया जाता है।

विहार में प्लास्टिक की पानी की बोतल और ठंडे पानी की बोतल की जमा राशि वसूल करने के लिए  तीन बचत समूहों को सूचना दी गई है।

कर्नाला पक्षी विहार को प्लास्टिक मुक्त बनाने के लिए विभिन्न कॉलेजों और स्कूलों के छात्रों में जागरूकता बढ़ाई जा रही है। उनके द्वारा स्वच्छता अभियान चलाया जा रहा है। इसमें रोटरी क्लब की विभिन्न शाखाओं के पदाधिकारी भी शामिल हैं। सह्याद्री प्रतिष्ठान के सदस्य हर रविवार को किले में उपस्थित होते हैं और आसपास के क्षेत्र की सफाई करते हैं। इन सभी के सहयोग और अनुशासन के लिए “आदतों” के लगाव के साथ, कर्नाला विहार क्षेत्र को स्वच्छ, सुंदर और प्लास्टिक से मुक्त बनाने में सफल रहा है।

००००


Forest Department successfully makes

Karnala sanctuary plastic-free

Mumbai, date.2: The whole bird sanctuary has become plastic-free. Karnala bird sanctuary is situated near Mumbai-Goa highway and 12 k.m. away from Panvel in Raigad district.  12.11 square k.m.  area of Karnala fort and surroundings has been declared as reserved forest as it has rich bird diversity.  Birds gather here 24/7 as it is a home place for both local and emigrated birds.  This is the first bird sanctuary in Maharashtra. Here one can watch birds from 147 species. 37 species are emigrated or tourist birds. There are 642 climber species and rare medicinal trees in this Karnala. Bush category trees are also there in this sanctuary.

Besides the bird watching, Karnala fort is another centre of attraction in this sanctuary. This fort holds a special place of interest for trekkers as the natural path going to fort is very tough to cross. Nature trails Hariyal and Mortaka that’s on the East of national highway are important for bird watching. Other nature trails Garmal lies to the west of the national highway. Many diverse trees exist on this path.

Thousands of tourists visit the bird sanctuary daily as well as on holidays. They carry food and water in the sanctuary. Again, plastic carried to the sanctuary was being lethal for the wildlife and environment. Forest guard officers of Karnala and forest guards held a meeting of nearby villages’ committees under the guidance of Forest Conservator, Wildlife Thane to come with a solution.  As per the decision taken in the meeting, bags of tourists visiting the sanctuary were checked and the plastic they carried was noted. In the beginning, tourists had to pay Rs. 200 as deposit while entering the sanctuary. Tourists would get back deposits if they returned with the exact plastic material carried. But tourists opposed to pay Rs. 200 as a deposit for a single plastic water bottle hence the amount was marked down to Rs. 100. If a tourist fails to return with the same plastic material, his deposit is confiscated, Tourist gave a positive response to this initiative. Rural Development Committee Kalhe charges per head Rs. 5 as annoyance fee. The committee deploys daily wagers every Monday to clean garbage. Their wages are paid from the collected annoyance fee. Three Self- Help groups in the sanctuary are instructed to collect deposit amount for drinking water bottle and cold-drink bottles.

Awareness drive is conducted in various schools-colleges to make Karnala sanctuary plastic-free. A cleanliness drive is being implemented. Officer-bearers of various Rotary club branches have participated in this. Members of Sahyadri Pratishthan visit the fort every Sunday and clean the area. Karnala sanctuary area has become clean, beautiful, and plastic-free with everyone’s cooperation and discipline.

0000

जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई, दि. 2 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दि. 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत झालेल्या निवडणुकीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपीलमध्ये निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना जातवैधता प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरीता जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई या कार्यालयाकडे जातीच्या दाव्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र समिती मुंबई उपनगर यांनी केले आहे.

महापरिनिर्वाणदिनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण

मुंबई, दि. 2 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाणदिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर यांच्या समाज जीवनावर प्रकाश टाकणारा’डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ‘ (Dr.Babasaheb Ambedkar -The Untold Truth) या चित्रपटाचे प्रसारण दूरदर्शन केंद्रातर्फे सह्याद्री वाहिनीवर करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण ६ डिसेंबर रोजी दुपारी १.३०वाजता करण्यात येणार असल्याची माहिती दूरदर्शनचे सहायक संचालक संदीप सूद यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी ८ डिसेंबरपर्यंत विशेष सप्ताहाचे आयोजन

मुंबई, दि. 2 : माता व बालमृत्यू दरात घट होण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ राज्यातील 11 लाख 6 हजार 400 लाभार्थ्यांनी घेतला असून त्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरीता दि. 8 डिसेंबरपर्यंत विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

        

अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी जावे लागते. प्रसुतीनंतरही त्यांना मजुरी करावी लागते. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेता दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील गर्भवती महिलांसाठी  प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु आहे. या योजनेंतर्गत शासनाने अधिसूचित केलेल्या आरोग्य संस्थेत नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेला तीन टप्प्यांमध्ये एकूण5 हजार रुपयांची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा केली जाते.

राज्यात आतापर्यंत12 लाख 87 हजार 84 एवढे लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून 11 लाख 6 हजार 400 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरिता आजपासून ते दि. 8 डिसेंबर 2019 पर्यंत विशेष सप्ताह आयोजित केला असून आरोग्यदायी राष्ट्र उभारण्याच्या दिशेने सुरक्षित जननी, विकसित धारिणीहे  ब्रीद वाक्य घेऊन लाभार्थ्यांची नोंदणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका यांच्याकडे आवश्यक ते कागदपत्र देऊन नोंदणी करायची आहे, असे आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी सांगितले.

लाभार्थीचे तसेच तिच्या पतीचे आधारकार्ड, आधार संलग्न बँक अथवा टपाल कार्यालयातील खात्याचा तपशील, माता बालसंगोपन कार्ड आणि बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

००००

अजय जाधव/वि.सं.अ./2.12.19

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७ डिसेंबरला मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई, दि. 2 : पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या आठ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 डिसेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 11 डिसेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री. मदान यांनी सांगितले, या निवडणुकांकरिता 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 7 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 11 डिसेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 16 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यादेखील त्याच दिवशी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

०-०-०

(Jagdish More, SEC)

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘फास्टॅग’ या विषयावर एम. के. वाठोरे यांची मुलाखत

दिलखुलास कार्यक्रमात बुधवारी, गुरुवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमात  डिजिटल व्यवहारांना चालना देणारी फास्टॅग पद्धतीया विषयावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक एम. के. वाठोरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ३डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी७.३०वाजता प्रक्षेपित होईल. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.४ आणि गुरुवार दि. ५डिसेंबर 2019 रोजी सकाळी७.२५ ते ७.४०या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्रात रस्ते विकासासाठी प्राधिकरणाचे सुरू असलेले प्रकल्प, रस्ते बांधणीमध्ये पीपीपी मॉडेल, केंद्र सरकारचे वन नेशन वन टॅग धोरण, पंधरा डिसेंबरपासून  टोल फास्टॅग द्वारे स्वीकारला जाणार असून, फास्टॅग नेमके काय, फास्टॅगची कार्यपद्धती, फास्टॅग कोठे मिळेल आणि काय कागदपत्रे लागतील, फास्टॅग चे नेमके फायदे, फास्टॅग रिचार्ज कसे करायचे आदी विषयांची माहिती श्री. वाठोरे यांनी जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

साडेतीन वर्षात महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

             

    

नवी दिल्ली,2 :  महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात295कोटी13लाख2हजार500रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील18राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण1हजार221कोटी65लाख89हजार500रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना295कोटी13लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष2016-17ते2018-19या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण258कोटी3लाख47हजार500रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत(21नोव्हेंबर2019) 37कोटी  9लाख55हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष2016-17ते2018-19या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील18राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण1हजार10कोटी42लाख  8  हजार400रुपयांचा निधी वितरित करण्यात आला.तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत(21नोव्हेंबर2019) 211कोटी23लाख81  हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२५९/  दिनांक2/12/2019    

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भोगवे’ समुद्र किनाऱ्याला मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’

नवी दिल्ली, दि.2 :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’दिले आहे.यामुळे  महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने‘पर्यावरण अभ्यास संस्था,डेन्मार्क’या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला.एकूण4उत्कृष्ट मानकांच्या33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट13समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो.लांबच्या लांब पसरलेली पांढ-या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील  निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते.याच समुद्र किनाऱ्याची‘पर्यावरण अभ्यास संस्था,डेन्मार्क’ने एकूण4उत्कृष्ट मानकांच्या  33  घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली.

पर्यावरण शिक्षण आणि माहिती,आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता,पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  ही  माहिती दिली.

000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२६०/  दिनांक2/12/2019    

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना

मुंबई, दि. : देशविदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देशविदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

शहरातील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी शहरात सी वर्ल्ड, टुरिझम स्ट्रीट, फ्लेमिंगो टुरिझम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी आदी सुरु करता येईल का याबाबतही यावेळी चर्चा झाली. शहराला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. तसेच राज्यात एखादे योग्य ठिकाण शोधून तिथे आताच्या युगातील लेणी विकसित करता येतील यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरु करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करुन थीम बेस्डसंग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सिंधुदुर्गमधील सबमरिन पर्यटन प्रकल्पाचाही त्यांनी आढावा घेतला. सिंधुदुर्ग विमानतळ आणि या प्रकल्पाला दर्जेदार रस्त्यांची जोड देण्यात यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करुन त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

रायगडाचा सर्वांगीण विकास

रायगड किल्ला जतन व संवर्धन तसेच परिसर विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या ६०६ कोटी रुपये रकमेच्या रायगड विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून रायगड आणि परिसरात काय काय केले जाणार आहे याचे सादरीकरण करण्यात यावे. या निधीतून रायगड किल्ला आणि परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल. यातून देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करुन त्यांना शिवरायांचा इतिहास दाखविण्याबरोबरच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

०००००

इर्शाद बागवान/विसंअ/दि.०२.१२.२०१९

ताज्या बातम्या

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके

0
नवी दिल्ली, दि. १३ :  खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये मुंबईच्या परिना राहुल मदान पोटरा हिने 3 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावून आपली क्षमता...