सोमवार, मे 5, 2025
Home Blog Page 1211

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा

मुंबई, दि. २ : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनामधून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दरमहा वेळेत अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत रु.४८ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत रु. १०० कोटी असा एकूण रु. १४८ कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आज २ जून २०२३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला आहे.

मागील आठवड्यातच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेतील सर्वसाधारण व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रु.११९७ कोटी इतका निधी वाटपासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध करुन दिला आहे. उपलब्ध निधीमुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतू पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये १ हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्र्यरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.२१ हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा रु. १ हजार अर्थसहाय्य देण्यात येते.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरीत होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या असून निधीचा वितरणाचा आढावा घेऊन शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय महसूल आयुक्तांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिलेल्या आहेत.

००००

शैलजापाटील/विसंअ

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दहावी उत्तीर्णांना शुभेच्छा

मुंबई दि. 2 : दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्वांना त्यांच्या पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आज दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या निकालाबाबत मंत्री श्री.विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्या आयुष्याच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आपण पार केला आहे. आता पुढील जीवन कारकीर्द घडविण्यासाठी आपल्या आवडीच्या आणि योग्य क्षेत्राची निवड करावी, त्यासोबतच प्रामाणिकपणे परिश्रम घेऊन यशस्वी व्हावे. असा संदेश देत पुन्हा एकदा विद्यार्थी-विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांचे देखील अभिनंदन करीत असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी म्हटले आहे. पालकांनी आपल्या मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना आवडीचे क्षेत्र निवडताना सहकार्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे समजून या परीक्षेत अपयश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता, सातत्याने प्रयत्न करीत यशास गवसणी घालावी, असे आवाहन मंत्री श्री. विखे पाटील यांनी केले आहे.

०००००

वर्षा आंधळे/विसंअ

मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार मुंबईत स्वागत

मुंबई, दि. 2 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार ३ जून २०२३ रोजी सकाळी ११.०५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार दि. ३ जून २०२३ रोजी सायंकाळी ६.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे स्वागत करतील.

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी देशातील १९ वी आणि राज्यातील चौथी वंदे भारत रेल्वे असेल. ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे गाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल, यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.

उद्घाटन सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ५ जून २०२३ पासून नियमित धावणार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल, तर मडगाव येथे दुपारी १.१० वाजता पोहोचेल. त्यानंतर मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे रात्री १०.३० वाजता पोहोचेल.

चेन्नईस्थित इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती झाली आहे. देशभरात सध्या ७५ वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर मुंबईतून गांधीनगर (गुजरात), शिर्डी आणि सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या एक्स्प्रेसमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वंदेभारत एक्स्प्रेसची गेल्या महिन्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर मडगावहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वागत करतील, तसेच प्रवाशांशी संवाद साधतील.

 मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे खालीलप्रमाणे : 

मडगाव, थिवीम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई).

०००००

मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 2 : मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबिर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विभाग कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक दिन आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रहिवाशांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रहिवाशांना निश्चित न्याय मिळाला पाहिजे हेच शासनाचे धोरण असून या समस्या सोडविल्या जातात, अशी रहिवाशांची भावना निर्माण झाली पाहिजे, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, दिव्यांग आणि महिलांना शासन आणि महानगरपालिकेच्या योजनांमधून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामधून तयार होणारे उत्पादन विकले जाईल यासाठी त्याचे मार्केटिंग करण्यात यावे. या योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. आपला दवाखाना योजनेचा सर्वसामान्यांना मोठा लाभ होत असून आवश्यकतेनुसार त्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी सूचना करून अनधिकृत ड्रग्ज- दारूच्या व्यवसायाचे निर्मूलन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या सुसंवाद कार्यक्रमात विभागातील सुमारे 263 रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, गटारांची स्वच्छता, पाणी पुरवठा, रोजगार, शिधावाटप, कचरा निर्मूलन, फेरीवाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, पार्किंग आदी समस्यांचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

विशेष ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २ : बर्लिन येथे १७ ते २५ जून या कालावधीत होत असलेल्या बौद्धिक दिव्यांग खेळाडूंच्या ‘स्पेशल ऑलिम्पिक’ मध्ये महाराष्ट्रातून जात असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांना राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. २) राजभवन येथे निमंत्रित करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ‘स्पेशल ऑलिम्पिक्स भारत’ च्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा तसेच  विशेष ऑलिम्पिक महाराष्ट्रच्या अध्यक्ष डॉ. मेधा सोमैया उपस्थित होत्या.

बर्लिन हे भारतासाठी भाग्यवान शहर आहे. या ठिकाणी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांनी देशाला १९३६ साली सुवर्णपदक मिळवून दिले होते, याचे स्मरण करुन बौद्धिक दिव्यांग खेळाडू विशेष ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकांची लयलूट करतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.  देशभरात ‘विशेष ऑलिम्पिक भारत’ या संघटनेतर्फे दिव्यांग खेळाडूंसाठी ७५० क्रीडा केंद्र उभारले जाणार आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून पदके जिंकून मायदेशी परत आल्यावर खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

संसदीय समितीचे अध्यक्ष असताना दिव्यांग लोकांसाठी विधेयक तयार केले होते असे सांगून कायद्यामध्ये दिव्यांगांसाठी २ टक्के नोकऱ्या आरक्षित करण्याची तरतूद असून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांनी बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्यामुळे संपूर्ण चमूचे मनोबल उंचावेल असे सांगून ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा राज्य शासनातर्फे यथायोग्य सन्मान होईल, याचा पाठपुरावा करण्यात येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

शासनाने दिव्यांग खेळाडूंना रोजगार उपलब्ध करून द्यावा – डॉ. मल्लिका नड्डा

भारतातील बौद्धिक दिव्यांग खेळाडूंनी विशेष ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत १२०० पदके प्राप्त केली असून बर्लिन येथे होणाऱ्या विशेष ऑलिम्पिकमध्ये १९० देशातून ७ हजार खेळाडू सहभागी होत असल्याचे विशेष ऑलिम्पिक भारतच्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा यांनी यावेळी सांगितले. बर्लिन विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत देशभरातून १९८ खेळाडूंसह ३०० जण सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे याकरिता त्यांना राज्य शासनाने रोजगार देण्याचा प्रयत्न करावा तसेच केंद्र सरकारप्रमाणे राज्याने देखील पदक विजेत्या खेळाडूंना पुरस्काराची भरीव रक्कम जाहीर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संघाच्या व्यवस्थापिक हंसिनी राऊत, उपाध्यक्ष परवीन दासगुप्ता तसेच संस्थेचे पदाधिकारी व माजी खेळाडू उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना ट्रॅक सूट देण्यात आला.

विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातून १४ बौद्धिक दिव्यांग खेळाडू व ५ प्रशिक्षक जाणार असून त्यापैकी १६ महिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

शासनाचे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 2 : छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या संकल्पनांवर सध्या शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

मल्हारपेठ, ता. पाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, शिवदौलत बँकेचे अध्यक्ष मिलींद पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय पवार आदींसह नागरिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना आपले वाटावे असे स्वराज्य निर्माण केल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  त्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे. रयतेचे राज्य निर्माण केले. सर्वांना प्रेरणा देणारे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत. सर्वसामान्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व मंत्री जनतेपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे ग्रामपातळीवरील शासकीय कर्मचारीच नाही तर अनेक अधिकारीही शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी गावांपर्यंत जात आहेत. एकाच दिवसात 27 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ  देण्याचे कामही आपण केले आहे. त्यामध्ये अनेकांना कृषि अवजारे देण्यात आली. कामगारांना सुरक्षा किट पुरविण्यात आले. अनेक प्रकारचे दाखले नागरिकांना देण्यात आले. राज्यात उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यात आली आहे. दावोस येथे उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. याचे कारण सध्याच्या शासनावर उद्योजकांचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले की, लोकनेते श्री. देसाई यांनी महाराष्ट्रात समुद्र मार्गे येणाऱ्या प्रत्येकास प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन व्हावे या हेतूनेच गेट वे ऑफ इंडिया येथे त्यांचा पुतळा उभा केला. तसेच शिवाजी पार्क येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यासाठी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना केल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रपती पदक विजेते शाहीर बजरंग अंबी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

रायगड येथे ‘शिवसृष्टी’ उभारण्यासाठी ५० कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 2 :  किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे,  अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या संदेशातून केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले तसेच इतर लोकप्रतिनिधी, मान्यवर तसेच  नागरीक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य गोरगरीब रयतेचे राज्य होते. त्यांनी जातिभेद केला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना पुढे येण्याची संधी दिली. महाराज त्यांच्या राज्यकारभाराच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होते, जनतेची काळजी घेणारा हा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. राज्य  सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकारनेदेखील ‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरु केली आहे. सिंचन वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले असून जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली आहे. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्र निर्माणाचे व्हिजन दिले. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. आजही जलदुर्ग अढळपणे टिकून आहेत. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्व अद्भुत होते त्यांनी स्वराज्य ही स्थापन केले आणि सुराज्य ही स्थापन केले. त्यांनी राष्ट्र उभारणीचा व्यापक दृष्टिकोन मांडला. आपल्या सर्वांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा”, या शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.

नवी दिल्ली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “शिवराज्याभिषेक सोहळा आपण अनुभवत आहोत, हे आपले भाग्य आहे. महाराष्ट्र निर्मितीची सुरुवात स्वराज्य स्थापनेपासून झाली. राज्य कसे करावे, हे  शिवरायांनी जगाला शिकविले. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. दिल्लीतही शिवरायांचा भव्य पुतळा उभारला पाहिजे, अशी मागणी राज्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केलेली कामे आजही आम्हाला आदर्शवत आहेत. त्यांच्या राज्याभिषेकाने नवी नाणी तयार करण्यात आली, गडकिल्ल्यांना नवे अस्तित्व मिळाले. छत्रपतींची राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर आणली आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी नवी दिल्ली येथे झाले पाहिजे, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्या वतीने करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचविण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मनामनात पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे. यापुढील काळात किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य शासन खंबीरपणे शिवराज्याभिषेक समितीच्या पाठीशी राहिल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जगदंब तलवार देशात आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. महाराजांच्या जीवनावरील गॅझेटीयर सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. याशिवाय, तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी पाच कोटी रुपये दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचा आदर्श जगभरातील लोकशाही मानणाऱ्या देशांनी घेतला आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त राज्यभर वर्षभरात विविध कार्यक्रम होणार असून त्याचा प्रारंभ 1 जूनपासून करण्यात आला आहे.

शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस व इतर सर्व मान्यवर यांनी जगदीश्वर मंदिर येथे जाऊन जगदीश्वराचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथे उपस्थित राहून त्यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, ढोलपथकांचे सादरीकरण पाहिले.

तिथीप्रमाणे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षाच्या दिवशी आज सकाळी ध्वज पूजन, पालखी प्रस्थान त्याचबरोबर ध्वजारोहण तत्पूर्वी झाले.

सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते सप्तसिंधू जलाभिषेक, सिंहासनारोहन मुद्राभिषेक हे विधी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामूहिक राज्यगीत म्हटले गेले. त्यानंतर शासकीय पोलिस मानवंदनाही देण्यात आली.

००००

 

छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

रायगढ़ में शिवसृष्टि के निर्माण के लिए 50 करोड़ रुपये निधि दिया जाएगा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगढ़ पर 350 वां शिवराज्याभिषेक वर्ष समारोह बड़े धूमधाम से मनाया गया

मुंबई, दि. 2 :  किले रायगढ़ के तलहरी में 45 एकड़ में शिवसृष्टि के निर्माण के लिए राज्य सरकार की ओर से 50 करोड़ रुपये निधि दिया जाएगा, यह घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रायगढ़ पर हुए 350 वें  शिवराज्याभिषेक वर्ष समारोह में की. छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया है, इन शब्दो में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रमों एवं कार्य का गौरव अपने  संदेश में किया.

छत्रपति शिवाजी महाराज के 350 वे राज्याभिषेक वर्ष के औचित्य पर राज्य सरकार की ओर से  रायगढ़ पर आयोजित भव्य वर्ष समारोह में मुख्यमंत्री बोल रहे थे. इस समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का प्रसारण किया गया.

समारोह में उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत,  उच्च व तकनीक शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षा मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरगाह व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सांसद छत्रपति उदयनराजे भोसले, सांसद सुनील तटकरे, सांसद सदाशिव लोखंडे, सांसद डॉ.श्रीकांत शिंदे, विधायक भरत गोगावले, लोकप्रतिनिधि,  मान्यवर एवं नागरिक बडी संख्या में उपस्थित थे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज का राज्य गरीब-वंचित जनता का राज्य था. उन्होंने जातिभेद नहीं किया. शिवाजी महाराज ने महिलाओं को आगे आने के लिए अवसर दिए. महाराज उनके राज्यकारभार की पद्धति से लोकप्रिय थे. वे जनता का ध्यान रखनेवाले राजे थे. छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शो को पर हम कामकाज कर रहे है और इस बात का हमे गर्व है. राज्य  सरकार ने किसानो को 1 रुपए में पीक बीमा देने की योजना की है. केंद्र सरकार की योजना की तरह राज्य सरकार ने भी ‘नमो शेतकरी सन्मान निधि’ योजना शुरू की है. सिंचन वृद्धि के लिए सरकार ने अनेक निर्णय लिए है और जलयुक्त शिवार योजना फिर से शुरू की है. प्रतापगढ के संवर्धन के लिए सांसद उदयनराजे भोसले की अध्यक्षता में राज्य सरकार प्राधिकरण निर्माण करेगी. मुंबई के कोस्टल रोड को छत्रपति संभाजी महाराज का नाम दिए जाने की बात भी मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस अवसर पर कही.

छत्रपती शिवाजी महाराज ने स्वराज्य का विजन दिया  – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

“छत्रपति शिवाजी महाराज ने सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याण की राह दिखाई.  महाराज ने स्वराज्य का सपना पूरा किया. कठीण समय में जनता में आत्मविश्वास  पैदा किया. सैन्य नेतृत्व के गुण उन्होंने दिए. राष्ट्र निर्माण का विजन दिया.  महाराज के जीवन के अनेक पहलू है. उन्होंने समुद्री नौदल (आरमार) के महत्त्व को भी समझा. उन्होंने जलदुर्ग का निर्माण किया. आज भी उनके जलदुर्ग डटकर खडे है.  महाराज ने एकता और अखंडता को प्राथमिकता दी. आज शिवाजी महाराज के विचारों का प्रतिबिंब ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’  इस संकल्पना में दिखाई देता है. छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक दिनने नई चेतना, नई ऊर्जा दी है.  महाराज का राज्याभिषेक यह उस समय का एक अद्भुत और विशेष अध्याय है. महाराज ने आक्रमकों के खिलाफ ही लडाई नहीं लढी, स्वराज्य का निर्माण संभव है, यह विश्वास जनता के मन में पैदा किया. उनका व्यक्तिमत्व अद्भुत था.  उन्होंने स्वराज्य का के साथ-साथ सुराज्य का भी निर्माण किया. उन्होंने राष्ट्र के निर्माण में व्यापक दृष्टिकोन रखा.  हम सभी के समक्ष आदर्श निर्माण करनेवाले छत्रपति शिवाजी महाराज को ‘मानाचा मुजरा” इन शब्दों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने वीडियो संदेश से छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रमों को याद किया.

 नई दिल्ली में छत्रपति के राष्ट्रीय स्मारक के निर्माण की मांग

प्रतापगड के संवर्धन के लिए प्रधिकरण का निर्माण राज्य शासन की ओर से किया जाएगा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस अवसर पर कहा कि यह हमारा सौभाग्य है की, हम शिवराज्याभिषेक समारोह का अनुभव ले रहे है.  महाराष्ट्र के निर्माण की शुरुआत स्वराज्य के निर्माण से ही हुई. राज्य कैसे करना चाहिए, यह शिवराय ने विश्व को बताया है. शिवराय न्यायप्रिय राजे के रूप में अजरामर है.  दिल्ली में छत्रपती शिवाजी महाराज का भव्य स्मारक का निर्माण होना चाहिए,  यह मांग राज्य की ओर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर किए जाने की बात उन्होंने कही. छत्रपति शिवाजी महाराज ने साढेतीनसौ साल पहले किया हुआ कार्य आज भी हमारे लिए आदर्शवत है.  उनके राज्याभिषेक से नए सिक्के तैयार किए गये है. गढकिलो को नया अस्तित्व मिला है.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस ने बताया कि छत्रपति की राजमुद्रा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नौदल के ध्वज पर लायी है. अब  छत्रपति शिवाजी महाराज का राष्ट्रीय स्मारक राजधानी नई दिल्ली में होना चाहिए, और इसकी मांग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की ओर राज्य की ओर से की जाएगी.

छत्रपती शिवाजी महाराज के विचार सर्वदूर पहुंचाने का संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

इस अवसर पर मंत्री श्री. मुनगंटीवार ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज के विचार घरघर में पहुंचाने का संकल्प हमने किया है. भविष्य में किले रायगढ पर मनाये जानेवाले शिवराज्याभिषेक समारोह के लिए राज्य सरकार खंबीरता से शिवराज्याभिषेक समिती के साथ रहेगी.  छत्रपति शिवाजी महाराज के समय की ‘जगदंब तलवार’ देश में लाने का प्रयास भी हम कर रहे है. महाराज के जीवन पर गॅजेटीयर आज सांस्कृतिक कार्य विभाग की ओर से प्रकाशित हो रहा है. इसके अलावा तंजावर में छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक बनाने के लिए भी प्रयास जारी है.  नई दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय में छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पर अध्ययन के लिए पांच करोड  रुपए दिये जाने की जानकारी भी उन्होंने इस दौरान दी.

इस अवसर पर सांसद छत्रपति उदयनराजे भोसले ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज ने जनता के राज्य का निर्माण किया. उनका आदर्श विश्वभर के लोकशाही माननेवाले देशो ने लिया है.

शिवराज्याभिषेक दिन के 350 वें वर्ष समारोह के औचित्य पर सालभर समुचे राज्य में विविध कार्यक्रम होंगे और इसकी शुरुआत 1 जून से की गई है.

००००

 

Chatrapati Shivaji Maharaj gave the vision of Swarajya – Prime Minister Narendra Modi

Rupees 50 crore for construction of ‘ShivSrushti’ at Raigad – Chief Minister Eknath Shinde

Grand ceremony for celebration of 350th year ShivRajyabhishek at Raigad

Mumbai, June 2:- Funds of rupees 50 crores will be given for the construction of ‘Shiva Srushti’ at the foothills of Raigad and Board will be formed for the conservation of Pratapgad This was announced by chief minister Mr Eknath Shinde while celebrating the 350th Shivrajya Abhishek ceremony at Raigad. In his audio visual message, Prime Minister Mr Narendra Modi glorified the work of Chhatrapati Shivaji Maharaj by saying that Maharaj gave the vision of Swarajya -the Self- rule.

Chief Minister Shinde, while speaking at the grand ceremony organized at the Raigad Fort to celebrate 350th year of the Coronation (Rajyahishek) of Chhatrapati Shivaji Maharaj. The audio- visual message by Prime Minister Mr Modi was also broadcast on this occasion.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Cultural Affair Minister Sudhir Mungantiwar, Guardian Minister Uday Samant, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil, School Education minister Deepak Kesarkar, Rural Development Minister Girish Mahajan, Sports and Mining Minister Dadaji Bhuse, Member of Parliament Chhatrapati UdayanRaje Bhosale, MP Sunil Tatkare, Sadashiv Lokhande, Dr Shrikant Shinde, MLA Bharat Gogavale, public representatives and other dignitaries also graced the occasion in presence of large number of People.

Chief minister Mr Shinde further said that the reign of Shivaji Maharaj was the rule of poor and downtrodden people. He never supported any casteism. He always gave priority for bringing women on the forefront. Mr Shinde Said that Chhatrapati Shivaji Maharaj was popular because of the system he adopted for ruling the state. He was the emperor who cared a lot of his people. He also said that he is happy that the governance of the state in his tenure is marching ahead as per the teachings of Chhatrapati Shivaji Maharaj. He said that he is proud of it.

Mr Shinde said that his government has started the scheme for giving crop insurance to the farmers for just 1 rupee. He said that on the lines of the union government, the state government has also started Namo Shetkari Samman Nidhi scheme. He said that the government has taken various decisions for bringing maximum land under irrigation, adding that the Jalyukt Shivar scheme had also being restarted. He further said that the Authority is going to be formed under the chairmanship of Member of Parliament Udayan Raje Bhosale for conservation of Pratapgarh. He also said that the Coastal Road in Mumbai will be named after Chhatrapati Sambhaji Maharaj.

Chhatrapati Shivaji Maharaj gave the vision of Swarajya Self Governons Prime Minister  Modi said “Chhatrapati Shivaji Maharaj showed us the path of good governance, welfare of the nation and welfare of the people. Shivaji Maharaj fulfilled the dream of Swarajya. He created confidence among the people in the hard times. He taught the qualities of leading the Army and gave the vision of nation building. There are many facets to the life of the Maharaj and he was multi- dimensional personality. He recognized the importance of Naval armour. He also created various sea forts. Maharaj gave paramount importance in upholding unity and integration, with priority. Today the reflections of Shivaji Maharaj’s thoughts are seen in the concept of “Ek Bharat- Shreshth Bharat” The Coronation Day celebrations of Chhatrapati Shivaji Maharaj has given a new energy, encouragement and a new insight. The coronation of Maharaj was a special and wonderful chapter in that era. Maharaj not only replied to the aggressors with skills, but also created a confidence in the minds of his disciples and kingdom that the self- rule is possible. His personality was enthralling and he established the Self -Rule or ‘Swarajya’ along with good governance ‘Su-Rajya.’ He had a good vision of nation building and I pay my deep respect to Chhatrapati Shivaji Maharaj who has been inspiration for all.” With these words Prime Minister Mr Narendra Modi lauded the life of Chhatrapati Shivaji Maharaj in his audio visual message.

Will demand National memorial of Chhatrapati in New Delhi- DCM Mr Fadnavis

Speaking on the occasion, Deputy Chief Minister Devendra Fadnavis said that we are lucky enough to experience the Shivrajya Abhishek ceremony. He said that the beginning of formation of Maharashtra started with the establishment of Self- rule or Swarajya. He also said Shivraya showed the entire world how to rule. He said that Shivraya has become immortal as ‘Justice Loving Emperor’. He said that he will demand Prime Minister Mr Narendra Modi to construct a huge statue of Shivraya in Delhi, adding that the work and the rule by Chhatrapati Shivaji Maharaj, that was 350 years back is even a model today. He said that the Rajmudra of Chhatrapati had been embossed on the flag of Navy. Now it is the time that National Memorial of Chhatrapati Shivaji Maharaj be constructed in the National capital of the Nation- New Delhi. He said that he will be making this demand with Prime Minister Narendra Modi.

Thoughts of Shivaji Maharaj to be widely spread- Sudhir Mungantiwar

In his address, the Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar said that the government had pledged to take the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj to each and every person. He said that hereafter, the State government will be standing firm with the Shivrajyabhishek committee for celebrating the Coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj at Raigad Fort. He said that efforts are on to ensure that the Jagdamba sword of Chhatrapati Shivaji Maharaj is brought in the nation. He said that a Gazetteer based on the life of Shivaji Maharaj is published by the cultural affairs department. Similarly, memorial of Chhatrapati Shivaji Maharaj will be constructed at Tanjavar and efforts have been initiated in this regard. Mungantiwar also informed that the funds of rupees 5 crores has been allocated for starting the course related to the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj at the Jawaharlal Nehru University of New Delhi.

Member of Parliament Chhatrapati Udayan Raje Bhosale said that Chhatrapati Shivaji Maharaj had established the rule of common people and all the nations that believe in democracy, had taken inspiration from it. Notably, various programs will be organized across the state for the entire year on the occasion of celebration of 350thyear of the ShivRajya Abhishek and it had started from 1 of June, 2023.

००००

अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 2 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिण मुंबई स्थित ‘ए’ आणि ‘बी वॉर्ड’ मध्ये अनेक ऐतिहासिक आणि वारसा इमारती आहेत. या परिसरात अधिकृत फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करून अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिक, पर्यटकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

नागरिकांच्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध वॉर्डमध्ये पालकमंत्री म्हणून आपण स्वतः रहिवाशांची भेट घेत असून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. गुरूवारी सायंकाळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ आणि ‘बी’ वॉर्ड मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ‘ए’ व ‘बी’ वॉर्ड यांचा संयुक्त कार्यक्रम एशियाटिक लायब्ररीजवळील रेडक्रॉस सोसायटी येथे आयोजित करण्यात आला. यावेळी एकूण ११० तक्रारींचे निराकरण करण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींसह महानगरपालिकेच्या उपायुक्त (परि-१) डॉ. संगीता हसनाळे, सहाय्यक आयुक्त सर्वश्री शिवदास गुरव, अजितकुमार अंबी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस तसेच विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अन्नधान्य वितरणासाठी वाहनाची व्यवस्था

मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून श्री. केसरकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दुकानावरून अन्नधान्य आणणे शक्य होत नाही. याकरिता अन्न धान्य वाटप करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

दक्षिण मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, गुन्हेगारी रोखणे, पदपथावर राहणाऱ्यांना निवारा उपलब्ध करून देणे आदी समस्या पालकमंत्र्यांसमोर प्रामुख्याने मांडण्यात आल्या. गुन्हेगारी रोखण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – दीपक केसरकर

मुंबई दि. 2 : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे, तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ होऊन यश संपादन करावे, असे आवाहन केले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या

दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 096 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 93.83 अशी आहे, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 60.90 अशी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय

नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 8,397 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,312 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले. त्यातील 7,688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.49 अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.

मुलींची आघाडी

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.87 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.05 इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.82 टक्क्यांनी जास्त आहे.

दहावीच्या एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर 23 हजार 013 शाळांपैकी 6,844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, तर 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.11 टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92.05 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 95.64, औरंगाबाद विभागात 93.23, मुंबई विभागात 93.66, कोल्हापूर विभागात 96.73, अमरावती विभागात 93.22, नाशिक विभागात 92.22 आणि लातूर विभागात 92.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

दहावी परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि‌. 2 :- ‘दहावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर निवडीसाठी विविध मार्ग दिसू लागतात. या मार्गावरून पुढे जाण्यासाठी, आवडते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, शालेय जीवनात दहावीची परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. हा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल, यशवंत, गुणवंतांचे मनापासून अभिनंदन. आपल्या या यशासाठी मार्गदर्शन करणारे गुरूजन, पाठबळ देणारे कुटुंबीय या सर्वांचेही अभिनंदन. या परीक्षेतील यशानंतर आपल्याला करिअरचे वेगवेगळे मार्ग खूणावू लागतात. हे मार्ग चोखंदळपणे, डोळसपणे निवडल्यास पुढे यश तुमचेच असेल. असे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी, त्यात यश मिळावे यासाठी देखील मनापासून शुभेच्छा !

काहीजणांना या परीक्षेतील यशाने हुलकावणी दिली असेल. तर त्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी. त्यासाठी फेर परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

0000

ताज्या बातम्या

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये वेव्हज् संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व

0
मुंबई, दि. ४  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व...

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

0
अहिल्यानगर, दि. ०३:  माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वन केले. जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार संग्राम जगताप,...

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. ०४: राजूर येथे कावीळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार

0
मुंबई, दि. ०४ : भारत निवडणूक आयोग नागरिक, निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष अशा संबंधित घटकांसाठी एक नवीन, वापरकर्ता अनुकूल डिजिटल इंटरफेस विकसित करत आहे....

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सातारा दि. ०४ : पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव - सोहळ्यांचा समावेश करावा....