मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 739

नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी – विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड

छत्रपती संभाजीनगर, दि. २० (विमाका) : यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून यापूर्वीची काही भागातील अतिवृष्टी व पुरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभाग मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत, लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून  दूरदृश्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कर्नल ऋषिकेश सुर्यवंशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त जगदिश मिनीयार, नयना बोंदार्डे, सुरेश वेदमुथा, ॲलीस पोरे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले की, पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने नागरिकांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रीबाबत नियोजनपुर्वक व्यवस्था करावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने तत्परतेने नियोजन करावे. जिल्हा व तालुकास्तरावर असलेला नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावा. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत, तसेच हे क्रमांक नेहमी सक्रीय असतील याची दक्षता घ्यावी. एसडीआरएफ तसेच एनडीआरएफची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घेण्यासोबतच जिल्हानिहाय या यंत्रणेत प्रत्येक वर्षी 100 ने वाढ करावी. महानगरात असलेले मोठे नाले, नदी यावर ये-जा करण्यासाठी असलेला लोखंडी मार्ग चांगला आहे किंवा कसे याबाबत तपासणी करावी, आवश्यकता असेल तिथे तातडीने बदल करावा. महानगरातील नाल्यांची सफाई कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण इमारती, पूलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबतही तत्परतेने तपासणी करावी. महानगरातील ज्या भागात पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्यासाठी तेथील नागरिकांचे स्थलांतर कुठे करावे याबाबत पूर्वतयारी करावी. अशा सूचनाही विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी दिल्या.

घाटकोपर, मुंबई येथे जाहिरात फलक कोसळण्याची घटना घडली आहे. मान्सून पूर्व कालावधीत व अन्य कालावधीत होणाऱ्या दुर्घटनामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी शहरी भागातील व महामार्गावरील लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांची रचनात्मक तपासणी करण्यात यावी. तपासणीअंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलकाबाबत संबधितावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आपल्या अधिनस्त क्षेत्रात जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांची मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारीबाबत जिल्हानिहाय जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी बैठकीत माहिती दिली.

यावेळी आपत्ती विभागाशी सबंधित विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

०००

१३ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ४८.६६ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे-  48.81 टक्के

नाशिक – 51.16 टक्के

दिंडोरी- 57.06 टक्के

ठाणे – 45.38 टक्के

कल्याण – 41.70 टक्के

पालघर- 54.32 टक्के

भिवंडी- 48.89 टक्के

मुंबई उत्तर – 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के

मुंबई दक्षिण – 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

०००

 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान

मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे-  39.97 टक्के

दिंडोरी- 45.95 टक्के

नाशिक – 39.41 टक्के

पालघर- 42.48 टक्के

भिवंडी- 37.06 टक्के

कल्याण – 32.43 टक्के

ठाणे – 36.07 टक्के

मुंबई उत्तर – 39.33 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 37.66 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 39.15 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 टक्के

मुंबई दक्षिण – 36.64 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के

0000

राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे दक्षिण मुंबईत मतदान

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत मलबार हिल येथे मतदानाचा हक्क बजावला. राजभवन येथील भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनीही मतदान केले.

००००

Lok Sabha Elections 2024: Governor Ramesh Bais casts vote in South Mumbai

Mumbai Dated 20 : Maharashtra Governor Ramesh Bais cast his vote for the Lok Sabha election at the Raj Bhavan Club polling both at Malabar Hill coming under South Mumbai Lok Sabha constituency. Wife of the Governor, Rambai Bais also cast her vote at the polling booth.

0000

१३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २७.७८ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७ वा.पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २७.७८ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक – २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण – २२.५२ टक्के
ठाणे – २६.०५ टक्के
मुंबई उत्तर – २६.७८ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के

०००

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १५.९३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक – १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण – ११.४६ टक्के
ठाणे – १४.८६ टक्के
मुंबई उत्तर – १४.७१ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

मुंबई, दि.२० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक – ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
कल्याण – ५.३९ टक्के
ठाणे – ५.६७ टक्के
मुंबई उत्तर – ६.१९ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के

ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पुरेशा प्रमाणात विविध सोयी सुविधा उपलब्ध – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. २० (जिमाका) – ठाणे जिल्ह्यातील २३ भिंवडी, २४ कल्याण, २५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघाच्या विविध मतदान केंद्रांवर २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदारांना आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.

जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात मिळून 6604 मतदान केंद्रे आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना सोईचे व्हावे, यासाठी सर्वच मतदान केंद्रे तळमजल्यावर आणली आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, फर्निचर व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक, मतदान केंद्रावर सावली, पाळणाघर, मार्गदर्शक फलक, मतदान सहाय्यता केंद्र, प्रथमोपचार पेटी, रांगेचे व्यवस्थापन आदी व्यवस्था जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे.

मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी १:१२ उतार असलेला रॅम्प उभारण्यात आले आहे, जेणेकरुन जेष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे होईल. मतदान केंद्रावर नळाचे शुध्द पाणी उपलब्ध होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 100 लिटर थंड पिण्याचे पाणी व पाणी पिण्यास पर्यावरण पूरक ग्लास ठेवण्यात येणार असून यासाठी एका स्वयंसेवकाची नेमणूक केली आहे.

मतदान केंद्रावर महिला मतदार व पुरुष मतदार यांच्यासाठी स्वतंत्र, पक्के, स्वच्छ व पुरेशा  पाण्याची सोय असलेले स्वच्छतागृह उपलब्ध असणार आहेत. जेथे पक्क्या स्वरुपाचे स्वच्छतागृह उपलब्ध नसेल तेथे मोबाईल टॉयलेट व्हॅन संबंधित महानगरपालिका / नगरपालिका /नगरपरिषद यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी मतदानाच्या दिवशी स्वच्छता कर्मचारी याठिकाणी उपस्थित असणार आहेत.

उमेदवार प्रतिनिधींसाठी त्याचबरोबर निवडणुकीचे कामकाज करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी पुरेशा प्रमाणात टेबल, खुर्च्या व रांगेतील उभा असणाऱ्या मतदारांना बसण्यासाठी मतदान केंद्रावर पुरेसे खुर्च्या / बाक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सर्व ठिकाणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर पुरेशी प्रकाश व्यवस्था व पंखे उपलब्ध केले जाणार आहे तसेच मतदान केंद्रावरील वीज कनेक्शन सुरु असल्याबाबत खात्री करण्यात आली आहे.

मतदारांना मतदान केंद्र सापडावे, यासाठी किमान 4 दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. हे दिशादर्शक फलक संबंधित मतदान केंद्रात नोंदणी असलेल्या मतदार राहत असलेल्या ठिकाणी प्रमुख चौकात लावण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या ठिकाणाचा ले आऊट व सुविधा जसे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, मतदान सहाय्यता केंद्र असे फलक लावण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर रांगेतील उभ्या मतदारांना ऊन लागू नये यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणी पाळणाघर असावे या उद्देशाने मतदान केंद्रावर मुलांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदारांच्या माहितीसाठी मतदार सहाय्यता केंद्र

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचा यादीतील नाव, भाग क्रमांक, अनुक्रमांक तसेच कोणते मतदान केंद्र आहे हे कळावे यासाठी बीएलओ व त्याची टिम मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. मतदार सहाय्यता केंद्रातही पुरेशा प्रमाणात सुविधा देण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रावर पुरेश्या औषध साठ्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सध्या उष्णतेची लाट असल्याने पुरेसे ओआरएस (ORS) व ग्लुकोज (Glucose) पावडर याठिकाणी उपलब्ध असणार आहे. तसेच हिट स्ट्रोक (Heat stroke) टाळण्यासाठी काय करावे, याचे माहितीपत्रक सर्व निवडणूक विषयक कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. सेक्टर ऑफिसर सोबतही एक आरोग्य कर्मचारी, प्रथमोपचार पेटी (Medical Kit) सह उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात प्रत्येक एक तासांनी प्रत्येक मतदार केंद्रावर पोहचेल, अश्या पध्दतीने एक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

मतदारांना सोबत डोक्यावर ओला रुमाल, कपडा आणण्यासाठी व शक्यतो लहान मुलांना सोबत घेऊन येऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

 

 

 

‍25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

ठाणे,दि. १९ (जिमाका) :  ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त  नागरिकांनी मतदान करावे असे  आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत

सखी मतदान केंद्रे : 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 436 (रॉयल कॉलेज), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 439 (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. 2 तळमजला), 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 199 (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन 1 रोड नं. 22 वागळे इस्टेट, ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 265 (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 152 (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर 5, ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 124 (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत.

दिव्यांग मतदान केंद्रे-  145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 191 (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 326 (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे ) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 306 (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं 2 गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 283 (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 141 (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 205 (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर 11 प्लॉट नं. 9 नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत.

युवा मतदान केंद्रे  – 145 मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 196 (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं 1), 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 332 (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 170 (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 353 (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं 3, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 169 (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर 7 दिवा गांव ऐरोली), 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 28 (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत.

000

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना बजावता येणार मतदानाचा हक्क

ठाणे, दि. १९ (जिमाका)   ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66 लाख 78 हजार 476 मतदारांना येत्या 20 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. आज या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात येत आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे –

  • 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघ – एकूण मतदार – 2087604 (पुरुष मतदार-1129714, महिला मतदार-957191, तृतीय पंथी मतदार-339, सेवा मतदार-360).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

  • 134-भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68).

  • 135-शहापूर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39).

  • 136-भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16)

  • 137-भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14)

  • 138-कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140).

  • 139-मुरबाड विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83).

24-कल्याण लोकसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

  • 140 – अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).

  • 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 257477 (पुरुष मतदार-139848, महिला मतदार-117422, तृतीय पंथी मतदार- 97, सेवा मतदार-110).

  • 142-कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 299518 (पुरुष मतदार-159289, महिला मतदार-139684, तृतीय पंथी मतदार- 407, सेवा मतदार-138).

  • 143-डोंबीवली विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 275172 (पुरुष मतदार-143196, महिला मतदार-131914, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-62).

  • 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 453221 (पुरुष मतदार-248124, महिला मतदार-204902, तृतीय पंथी मतदार- 123, सेवा मतदार-72)

  • 149-मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 443751 (पुरुष मतदार-237113, महिला मतदार-206445, तृतीय पंथी मतदार- 103, सेवा मतदार-90).

25 – ठाणे लोकसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 2508072 (पुरुष मतदार-1348163, महिला मतदार-1159002, तृतीय पंथी मतदार-207, सेवा मतदार-700).

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या

  • 145- मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार  – 457391 (पुरुष मतदार-242966, महिला मतदार-214389, तृतीय पंथी मतदार- 4, सेवा मतदार-32)

  • 146-ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 509346  (पुरुष मतदार-273272, महिला मतदार-235928, तृतीय पंथी मतदार- 27, सेवा मतदार-119).

  • 147-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 328185 (पुरुष मतदार-175561, महिला मतदार-152472, तृतीय पंथी मतदार- 21, सेवा मतदार-131)

  • 148-ठाणे विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 357684 (पुरुष मतदार-185857, महिला मतदार-171681, तृतीय पंथी मतदार- 7, सेवा मतदार-139).

  • 150-ऐरोली विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 457611 (पुरुष मतदार-257611, महिला मतदार-199715, तृतीय पंथी मतदार- 130, सेवा मतदार-155).

  • 151- बेलापूर विधानसभा मतदारसंघ

एकूण मतदार – 397855 (पुरुष मतदार-212896, महिला मतदार-184817, तृतीय पंथी मतदार- 18, सेवा मतदार-124).

 

००००००

ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

0
मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या...

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ : विद्यार्थी हितासाठी निर्णय

0
मुंबई, दि. 8 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि...

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई, दि. ८ : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या...

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0
मुंबई, दि. ८ : फनेल झोनमध्ये उड्डाण मर्यादा आणि विविध तांत्रिक कारणांमुळे या भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. मुंबईतील विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या आणि...