बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 513

निवडणूक आयोगाचे विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांच्याकडून जळगाव जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा

विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत केले समाधान व्यक्त

जळगाव दि. 15 ( मीडिया कक्ष ): केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आढावा घेतला. चांगले नियोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक तयारीचे सादरीकरण केले. यावेळी सर्वसाधारण निरीक्षक श्री. राजेशकुमार (आय.ए.एस),भुसावळ, जळगाव शहर,  सर्वसाधारण निरीक्षक श्री. रणजित कुमार सिन्हा (आय.ए.एस) जळगाव ग्रामीण, अमळनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वसाधारण निरीक्षक श्री अरुणकुमार(आय.ए.एस) चोपडा, रावेर,सर्वसाधारण निरीक्षक श्री. ब्रजेश कुमार (आय.ए.एस) एरंडोल,  चाळीसगाव,सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (आय.ए.एस) पाचोरा,जामनेर,मुक्ताईनगर, पोलीस निवडणूक निरीक्षक श्री. तौहिद परवेझ (आय.पी.एस) सर्व 11 मतदार संघ, खर्च निरीक्षक श्री. हरकेश मीना (आय. आर.ए.एस) चोपडा, रावेर, भुसावळ,जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, खर्च निरीक्षक श्री. रोहित इंदोरा (आय. आर.एस) (सी. अॅण्ड सी.ई)अमळनेर,एरंडोल,चाळीसगाव, पाचोरा,  जामनेर, मुक्ताईनगर हे उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी,नोडल अधिकारी, 11 विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मतदान केंद्रावर सर्व सुविधा असतील याबाबत खात्री करून घ्यावी, जिथे सुविधा कमी आहेत, तिथे सुविधा पुरवाव्यात. कायदा सुव्यवस्थेबाबत अधिक दक्ष राहावे असे सांगून मतदानाचा टक्का अधिक वाढेल यासाठी मतदान जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचना विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी केल्या.

यावेळी सर्व सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक यांनीही सर्व निवडणूक यंत्रणेवर आमचे लक्ष असल्याचे सांगून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे   निवडणूक प्रशासन काम करत असल्याचे सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व 11 विधानसभा मतदार संघतील पूर्व तयारीचे सादरीकरण  केले.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारी, आता पर्यंत केलेल्या सर्व कारवाईची माहिती दिली.

कोल्हापूर येथे निवडणूक दक्षता अधिकारी भासवून व्यावसायिकाला २५ लाख रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक

कोल्हापूर दि. १६ (जिमाका ) : तावडे हॉटेल, कोल्हापूर येथे निवडणूक दक्षता (व्हिजीलन्स) अधिकारी भासवून एका व्यावसायिकाला २५ लाख ५० हजार रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक करुन गांधीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४८०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४, ३१८ [४], ३१९ [२], ३१० [२], ३ [५] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ५.१५ वाजता तावडे हॉटेलच्या हायवे ब्रिजवर व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे, रा. बागल चौक, कोल्हापूर यांना ५ लोकांच्या टोळीने “निवडणूक व्हिजीलन्स अधिकारी आहोत, आचार संहिता सुरु असून तुम्ही रोख रक्कम जवळ ठेवू शकत नाही,” असे सांगुन फिर्यादीस गाडीमध्ये बसवून सरनोबतवाडी, ता. करवीर येथे घेवून जाऊन त्यांच्याकडील २५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट काढून घेतले होते.

सध्या विधानसभा निवडणूक २०२४ ची आचार संहिता लागू असून त्यामध्ये निवडणूक व्हिजीलन्स अधिकारी असल्याचा बनाव करुन रक्कम लुटल्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी तात्काळ तपासणी करण्याच्या सुचना तपासणी टीमला दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील ६ तपास पथके नेमून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. तसेच ते गुन्हा केल्यानंतर गोवा येथे गेले असल्याचे समजले. त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक जालींदर जाधव व त्यांचे पथक तात्काळ गोवा येथे रवाना झाले. तपासा दरम्यान नमुद आरोपी गोवा येथुन कोल्हापूरच्या दिशेने परत येत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. चेतन मसुटगे व पथकाने राधानगरी ते कोल्हापूर रोडवर पुईखडी या ठिकाणी १] संजय महावीर किरणगे, वय ४२ वर्षे, २] अभिषेक शशिकांत लगारे, वय २४ वर्षे, ३] विजय तुकाराम खांडेकर, वय २८ वर्षे, सर्व रा. कोल्हापूर यांना गुन्हा करतेवेळी वापरलेल्या टाटा हॅरियर व निसान गाडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात आणखी २ आरोपी असून त्यांची नावे स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव व हर्षद खरात असून ते सध्या कोठे आहेत याबाबत माहिती नसल्याचे सांगीतले.

तसेच हर्षद खरात व स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव यांना सदर व्यावसायिक हा कर्नाटक येथुन परत कोल्हापूर येथे रक्कम घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा कट रचल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या ३ आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५ लाख रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या टाटा हॅरियर गाडी क्र. KA-३३-Z-५५५० किंमत २० लाख रुपये व निसान मॅग्नेट गाडी क्र. MH-०९-GA-६२५९ किंमत १० लाख रुपये असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. २ आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल गांधीनगर पोलीस ठाण्यास जमा केला असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव करीत आहेत.

मतदार जनजागृतीसाठी मतदारांशी विविध माध्यमातून संवाद; निवडणूक यंत्रणामार्फत राज्यभरात जनजागृतीवर भर

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी प्रशासन सज्ज झाले आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक यंत्रणा सर्वांना आवाहन करत आहे. विधानसभा निवडणुकीत राज्याचं मतदानाचं प्रमाण वाढावं असं उद्दिष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समोर ठेवलंय आणि त्यासाठी राज्यभर मतदार जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली. या निवडणुकांत राज्याची मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. यावेळी नंदूरबार जिल्ह्यात ७२.९४ टक्के, कोल्हापूर मध्ये ७१.७८ टक्के  गडचिरोली मध्ये ७०.५५ टक्के मतदान झाले तर मुंबई शहर राज्यात सर्वात कमी मतदान झालेला जिल्हा असून या जिल्ह्यात ५१ टक्के इतके कमी मतदान झाले होते. राज्यातील मुंबई शहर जिल्ह्यातील कुलाबा मतदारसंघ, मुंबई उपनगर जिल्ह्यातील कलिना मतदारसंघ, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, पुणे येथील पुणे  छावणी (कंटोनमेंट) येथे सर्वात कमी मतदान झाले होते. मतदान कमी असलेल्या जिल्ह्यात मतदान वाढविण्यासाठी प्रशासन विविध जनजागृतीवर भर देत आहे.

स्वीप उपक्रमामुळे मतदानात वाढ

‘स्वीप’ या उपक्रमामुळे तृतीय पंथीय मतदारांची २०१९ मध्ये २५९३ इतक्या संख्येवरून ते ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ५९४४ इतकी नोंद झाली आहे. त्याचबरोबर युवा मतदारांची निवडणूक प्रक्रियेत अधिक सक्रिय होण्यासाठी निवडणूक प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे त्यामुळे युवा मतदारांचीही मोठ्या संख्येने वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यात विविध स्वीपच्या उपक्रमांमुळे  २०१९ च्या विधानसभा निवडणुकात ६०.३६ टक्के, सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत ६३.५८ टक्के इतके मतदान झाले. नाशिक जिल्ह्यात देखील मतदान जनजागृतीमुळे ६१.७४ टक्केवरून गेल्या लोकसभेत ६४.२१ टक्के इतके मतदान झाले आहे.

मल्टिमिडीयाचा वापर

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांशी विविध माध्यमांतून संवाद साधला जात आहे. यात मल्टिमीडियाचा प्रभावी वापर आणि थेट जनसंपर्क अशा दोन्ही पद्धतींचा समावेश आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी अठरावं वरीस मोक्याचं, इथे सगळी बोटे सारखी आहेत, मधाच्या बोटाला बळी पडू नका, निर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा, अशा आकर्षक संदेशांचा वापर केला जातोय. हे संदेश शासकीय आणि नागरी सेवांच्या सहकार्यानं राज्यभर पोहोचवले जात आहेत. राज्यातली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाची ८०० होर्डिंग, वाहतूक कार्यालयाच्या राज्यभरातील शाखांमधील होर्डिंग, राज्यभरातील महानगरपालिकांचे ३ हजारांपेक्षा जास्त डिजिटल डिस्प्ले, सार्वजनिक बस सेवा पुरवणाऱ्या १००० पेक्षा जास्त बस आणि १५०० पेक्षा जास्त इतर वाहने, ११०० पेक्षा जास्त बस स्थानकं, सुमारे ५ हजार स्वच्छता वाहनांवरून होत असलेल्या घोषणा, मध्य आणि पश्चिम रेल्वे तसंच मेट्रो रेल्वे सेवेद्वारा रेल्वेगाड्यांमधल्या घोषणा – फलाटांवरील जाहिरातींचे डिस्प्ले इतकी याची व्याप्ती मोठी आहे. इतकंच नाही तर महानगर – टाटा पॉवर – बेस्ट वीज सेवा यांच्याद्वारे २० लाखांपेक्षा जास्त देयकांवर तसंच राज्य भरातील महानगर पालिकांनी पाठवलेल्या ८ लाख मालमत्ता करांच्या देयकांवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरात स्वरुप संदेशांमधून, राज्यभरातील लाखो कुटुंब म्हणजे कोट्यवधी मतदारांपर्यंत मतदान करण्याचं आवाहन थेट पोहोचत आहे.

राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रम                                

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं भारत निवडणूक आयोगाच्या ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय मतदारजागृती उपक्रमांचा प्रारंभही झाला. मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाचं सादरीकरण, निवडणूक गीताचं सादरीकरण – त्यावरचं नृत्य, टपाल विभागाकडून विशेष पाकीट – शिक्क्याचं अनावरण, मतदारांना प्रतिज्ञा, असे उपक्रम राबवले. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छादूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छादूत निलेश सिंगीत, राज्याच्या निवडणूक गीताचे संगितकार गायक मिलिंद इंगळे, गायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर,  दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंग, हर्ष लिंबाचिया, अभिनेते मनोज जोशी, अभिनेता बजाज आनंद, अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेता अली असगर यांच्यासह सामाजिक आणि कला क्षेत्रातल्या अनेक नामांकित व्यक्तिमत्वांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदारांना आपला मताधिकार बजावण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमातच, केंद्रीय संचार ब्यूरोच्या प्रादेशिक कार्यालयाच्या फिरत्या मतदार जनजागृती वाहनालाही हिरवा झेंडा दाखवला गेला. हे फिरतं वाहन राज्यातील मतदानाचं अल्प प्रमाण असलेल्या १५ जिल्हे आणि १३३ मतदारसंघांमध्ये जनजागृती करत आहे. या फिरत्या वाहनाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राचं ठिकाण समजून घेणं, आदर्श आचारसंहिता, आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी, उमेदवारांविषयी जाणून घेणं याविषयी मतदार जागृती केली जातेय.

जिल्हास्तरीय निवडणूक यंत्रणाकडूनही मतदार जनजागृतीसाठी उपक्रम

राज्यात प्रत्येक जिल्ह्याची निवडणूक यंत्रणाही स्वीप कार्यक्रमाअंतर्गत स्वतंत्रपणे मतदार जनजागृतीचे उपक्रम राबवते आहे. घरोघरी भेटी, रांगोळ्या, मानवी साखळ्या, प्रभात फेऱ्या, पथनाट्य, सायकल – बाईक रॅली, मॅरेथॉन, मतदारांना शपथ, संकल्पपत्र, विविध स्पर्धा, सण साजरे करण्याच्या निमित्तानं मतदारजागृतीपर उपक्रम सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मतदारांना मतदान प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमार्फत अभिरुप मतदान केंद्रांची तालीम आयोजित करण्यात आली. यामुळे लोकांना प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेचा अनुभव मिळाला.

लातूर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अभंग, गवळणी, भारुड, गोंधळगीत, पोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जातोय. तिथे १२१ शाळांच्या विद्यार्थ्यांमार्फत १ लाख ३ हजारापेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहोचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलंय. सांगलीत शासकीय रुग्णालयांच्या ओपीडी दस्तऐवजांवर, बँकांच्या व्यवहार पावत्यांवर मदानाच्या तारखेचं स्मरण करून देणारा शिक्का वापरून मतदार जनजागृती केली जातेय. जळगाव जिल्ह्यात, एकाच वेळी तब्बल १३३३ ग्रामपंचायतींमध्ये मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सव्वा लाखापेक्षा अधिक मतदारांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली तर दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांनी संकल्पपत्र भरले.

 

एक जिल्हा – एक व्हाट्सअप नंबर

अहिल्यानगर जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक जिल्हा – एक व्हाट्सअप नंबर हा अभिनव उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमासोबतच, जिल्ह्यातील मतदारांसाठी ई-शपथविधीचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये मतदारांना शपथ घेतल्यानंतर क्यू आर कोडच्या माध्यमातून ई-प्रमाणपत्रही दिलं जातंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मध्ये आमची स्वीपची टीम थेट शेतमजुरांपर्यंत पोहोचली, सर्व शेतमजुरांनी काम तर बारा महिने चालतं, पण मतदानाच्या दिवशी आम्ही नक्की मतदान करणार असा संकल्प व्यक्त केला आहे. या अशा प्रयत्नांसोबतच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सर्व जिल्ह्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरूनही मतदार जागृती केली जाते, मतदार जागृतीच्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली जातेय. समाजमाध्यमांवरून सेलिब्रिटी, समाजातील प्रभावी व्यक्तिमत्वांची आवाहनं प्रसिद्ध केली जात आहेत.

सर्व सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र

मतदान प्रक्रियेला मतदारांना आकर्षित करणारी असावी यासाठीही राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्र उभारली जात आहेत. यात वन्यजैवविविधता, सांस्कृतिक – सामाजिक वारशाचं दर्शन, स्तनदा – गर्भवती महिलांसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा – दिव्यांग – महिला संचलित विशेष मतदान केंद्र उभारली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सहकार्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था, मतदारांसाठी शेड – पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध असतील हे पाहिलं जातंय. अभिनव पद्धतीनं मतदारांचं स्वागत करून त्यांचा मतदानाचा अनुभव संस्मरणीय करण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी केला जातोय.

अशा या विविधांगी प्रयत्नांच्या माध्यमातून ९ कोटी ७० लाखापेक्षा जास्त मतदारांपर्यंत ज्यात, २ कोटी पेक्षा जास्त युवा म्हणजे १८ ते २९ वयोगटातलेही मतदार आहेत आणि वयाची शंभरी पूर्ण केलेले ४७ हजारापेक्षा जास्त मतदार आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचून सजग, जाणकार, आणि शिक्षित मतदार घडवण्याचा आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा निवडणूक यंत्रणेचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा मतदानाच्या दिवसासाठी सज्ज झाली असून आता प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे आपला मतदानाचा हक्क बजावण्याची.

संध्या गरवारे

विभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

*****

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १९ नोव्हेंबर तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १८, १९ आणि २० नोव्हेंबरला मुलाखत

मुंबई, दि. 16 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोरपणे तयारी करण्यात आली असून यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला अधिक बळकट करावे, असे आवाहन अतिरिक्त निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता ‘राज्य निवडणूक आयोगाची तयारी’ याविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 18, मंगळवार दि. 19 आणि बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000

आचारसंहिता भंगाच्या ७,७८४ तक्रारी निकाली; ५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. १६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ७ हजार ८२० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ७८४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

0000

नंदुरबार जिल्ह्यात गृह मतदानाला उत्साहात सुरूवात

नंदुरबार, दि. १४ (जिमाका वृत्त): निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या चार विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आज (14 नोव्हेंबर) गृह मतदानाला उत्साहात सुरूवात झाली.  उल्लेखनीय बाब म्हणजे आज नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील रजाळे येथील 101 वर्षे वयाच्या आजी श्रीमती उमताबाई  गिरासे यांनी अतिशय उत्साहात आपल्या घरून मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री अनय नावंदर (अक्कलकुवा),  सुभाष दळवी (शहादा), श्रीमती अंजली शर्मा (नंदुरबार), महेंद्र चौधरी (नवापूर) यांच्या यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त 48 पथकांमार्फत हे मतदान सलग चार दिवस दोन फेरीत रविवार 17 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.

गृह मतदानाची पहिल्या फेरीची भेट 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. पहिल्या फेरीत मतदार न भेटल्यास द्वितीय भेटीची फेरी 16 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.  त्यासाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 12 डी फॉर्म भरून घेतला आहे. या फॉर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 164 मतदार गृहमतदानासाठी पात्र ठरले आहेत. 85 वर्षावरील  ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांमध्ये अक्कलकुवा-221, शहादा-257, नंदुरबार-383, नवापूर-285 असे एकूण 1 हजार 164  ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत.

गृहमतदानासाठी विधानसभाक्षेत्रात नियुक्त  48 पथके गृह मतदानाची नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेत आहेत. गृहमतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे. मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येईल. मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार आहे. गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहता येणार आहे.

०००

मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका): १०८-औरंगाबाद (पश्चिम) मध्ये मतदार जनजागृतीसाठी  मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः या रॅलीत सहभागी झाले.

१०८-औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी सकाळी ८ वा. क्रांती चौकातून मॅरेथॉन दौड सुरु झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दौडची सुरुवात करण्यात आली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, उपायुक्त मनपा अंकुश पांढरे, उपसंचालक आपत्ती व्यवस्थापन स्वप्नील सरदार, सहसंचालक तंत्रशिक्षण अक्षय जोशी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर व गटशिक्षणाधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी दीपाली थावरे यांची यावेळी उपस्थिती होती.

सहभागी धावपटू व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी व सर्व उपस्थित मान्यवरांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन धावण्यास सुरवात केली. ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’, ‘माझे मत माझा अभिमान’, ‘आपले अमूल्य मत-करेल लोकशाही मजबूत’ अशा घोषणा देत मतदान जनजागृती करत मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीमध्ये एमआयटी, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, हायटेक महाविद्यालय,छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालय आदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या आयोजनासाठी देवगिरी महाविद्यालयातील एनसीसी व रासेयो  विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रविण लोहाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक नोडल अधिकारी मनोज बिरुडे, गोविंद उगले, साहेबराव धनराज,अनंत कणगारे,परसराम बाचेवाड, तुकाराम वांढरे आदींनी परिश्रम घेतले. देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात या दौडचा समारोप झाला.

०००

शकुंतला आजींचे गृह मतदान नोंदविण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जातात तेव्हा…

छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका): श्रीमती शकुंतला मारुती अनवडे (वय ८६ वर्षे) कन्नड शहरातील शांतीनगर येथील रहिवासी. त्यांनी आज आपल्या राहत्या घरीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात गृह मतदान नोंदविण्याचे काम सुरु आहे. मात्र शकुंतला आजींचे  मतदान विशेष ठरले कारण त्यांचे मतदान नोंदविण्यासाठी स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी त्यांच्या घरी गेले होते.

भारत निवडणूक आयोगाने वय वर्षे ८५ व त्यापेक्षा अधिक वय असणारे वृद्ध व्यक्ति तसेच दिव्यांग व्यक्ति ज्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघांत गृहमतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.

गृह मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेतील गृह मतदानासाठी नियुक्त चमू मतदाराच्या घरी जाऊन मतदाराचे मतदान नोंदवून घेतात. त्यासाठी आवश्यक ती गोपनियता पाळली जाते.  मतदाराला त्याचे मतदान नोंदविण्यासाठी त्यांच्या घरात पुरेशी गोपनीयता उपलब्ध करुन दिली जाते.

१०५-कन्नड मतदार संघात गृहभेटीद्वारे मतदानासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः चमूत सहभागी झाले. त्यांनी श्रीमती शकुंतला मारुती अनवडे वय ८६ वर्षे  यांचे मतदान  नोंदविण्यासाठी आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, १०५ कन्नडचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, गृह मतदान नोंदणी पथक क्रमांक १ चे अधिकारी संदीप महाजन, संदीप पाटील, श्रीमती अनिता जालनापुरकर, पोलीस कर्मचारी श्रीमती गिरी , सूक्ष्म निरीक्षक संजय देशपांडे यांच्यासह टपाली मतदान कक्षाचे योगेश मुळे व दिलीप मगर उपस्थित होते.

०००

टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई, दि. १५ : पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे  यांनी २३१-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मत नोंदविल्यानंतर, त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल  केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल  केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती १८५ मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

मलबार हिल मतदार संघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड मुंबई  येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटर मधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सदर घटना घडली आहे. सर्व मतदारांना मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी वापरण्यास पुर्णपणे बंदी असल्याबाबत तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद अवस्थेत केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते, अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली.

पोलीस शिपाई  गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

००००

निवडणूक आयोगाचे विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांच्याकडून जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा

जळगाव दि. 15 ( मीडिया कक्ष ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आढावा घेतला. चांगले नियोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक तयारीचे सादरीकरण केले. यावेळी सर्वसाधारण निरीक्षक राजेशकुमार (आय.ए.एस),भुसावळ, जळगाव शहर, सर्वसाधारण निरीक्षक रणजित कुमार सिन्हा (आय.ए.एस) जळगाव ग्रामीण, अमळनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वसाधारण निरीक्षक अरुणकुमार (आय.ए.एस) चोपडा, रावेर, सर्वसाधारण निरीक्षक ब्रजेश कुमार (आय.ए.एस) एरंडोल, चाळीसगाव, सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (आय.ए.एस) पाचोरा,जामनेर,
मुक्ताईनगर, पोलीस निवडणूक निरीक्षक तौहिद परवेझ (आय.पी.एस) सर्व 11 मतदार संघ, खर्च निरीक्षक हरकेश मीना (आय. आर.ए.एस) चोपडा, रावेर, भुसावळ,जळगाव शहर, जळगाव ग्रामीण,  खर्च निरीक्षक रोहित इंदोरा (आय. आर.एस) (सी. अॅण्ड सी.ई)अमळनेर,एरंडोल,चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर हे उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी,नोडल अधिकारी, 11 विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मतदान केंद्रावर सर्व सुविधा असतील याबाबत खात्री करून घ्यावी, जिथे सुविधा कमी आहेत, तिथे सुविधा पुरवाव्यात. कायदा सुव्यवस्थेबाबत अधिक दक्ष राहावे असे सांगून मतदानाचा टक्का अधिक वाढेल यासाठी मतदान जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचना विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी केल्या.

यावेळी सर्व सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक यांनीही सर्व निवडणूक यंत्रणेवर आमचे लक्ष असल्याचे सांगून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे निवडणूक प्रशासन काम करत असल्याचे सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व 11 विधानसभा मतदार संघतील पूर्व तयारीचे सादरीकरण केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारी, आता पर्यंत केलेल्या सर्व कारवाईची माहिती दिली.

00000

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई ; रु. ९.१९ कोटींच्या बनावट इनपूट...

0
मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत बोगस बिलिंग प्रकरणी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. अ‍ॅक्युरेट एंटरप्रायजेस (GSTIN: 27AAZFA6898H2ZE) या...

महाराष्ट्र राज्य कर विभागामार्फत बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २०.२० कोटी रुपयांची करचोरी उघड

0
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागामार्फत मेसर्स सूर्या एंटरप्रायजेस या व्यापार संस्थेविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने एकूण २०.२० कोटी...

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

0
मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज बुधवार, दिनांक २३ जुलै, २०२५ रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र...

बिहारच्या मतदार यादीत १८ लाख मृत, २६ लाख स्थलांतरित व ७ लाख दुहेरी नोंदणी...

0
मुंबई दि. २३ : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision - SIR) आतापर्यंत सुमारे १८.६६ लाख मतदार मृत...

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात 25-26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज

0
मुंबई, दि. 23 : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा 27 जुलैपर्यंत मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. यामुळे...