मुंबई दि. 21 :मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुपुत्र शिवाजी मेहता यांच्या समवेत पेडर रोडजवळील ॲक्टिव्हिटी हायस्कुलच्या केंद्रात जाऊन मतदान केले.मी मतदान केले आपणही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
मुंबई, दि. 21 : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावे असे आवाहन करीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
कुलाबा विधानसभा मतदार संघातील के सी महाविद्यालय या मतदान केंद्रावर जावुन त्यांनी मतदान केले.त्यांच्यासह शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, माहिती तंञज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास,सचिव श्रीमती कुंदन, सचिव पराग जैन, माजी पोलीस महासंचालक जावेद अहमद तसेच परिसरातील नव मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच लोकशाहीसाठी मतदान अवश्य करा, असे आवाहनही मतदारांना केले.
राज्यात शांततेत व सुरळीतपणे मतदान विधानसभेसाठी ६०.४६ टक्के मतदान – मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत 64.25 टक्के मतदान मुंबई, दि. 21 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, शिरीष मोहोड आदी उपस्थित होते. राज्यातील विधानसभा मतदानाची आकडेवारी सांगताना श्री. सिंह म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघासाठी मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदार यादीत नावे नसल्याची कोणतीही तक्रार आली नाही.
राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले.
जिल्हानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे
अहमदनगर 64.93 टक्के, अकोला 56.88 टक्के, अमरावती 59.33, औरंगाबाद 65.06, बीड 68.03, भंडारा 66.35, बुलढाणा 64.41, चंद्रपूर 63.42, धुळे 61.90, गडचिरोली 68.59, गोंदिया 64.06, हिंगोली 68.67, जळगाव 58.60, जालना 67.09, कोल्हापूर 73.62, लातूर 61.77, मुंबई शहर 48.63, मुंबई उपनगर 51.17, नागपूर 57.44, नांदेड 65.40, नंदुरबार 65.50, नाशिक 59.44, पालघर 59.32, परभणी 67.41, पुणे 57.74, रायगड 65.90, रत्नागिरी 58.59, सांगली 66.63, सातारा 66.60, सिंधुदुर्ग 64.57, सोलापूर 64.23, ठाणे 47.91, उस्मानाबाद 62.21, वर्धा 62.17, वाशिम 61.33 आणि यवतमाळ जिल्ह्यात 63.09 टक्के मतदान झाले.
इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी प्रत्यक्ष वापरात 1 लाख 12 हजार 328 बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी 96 हजार 661 इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव 24 हजार 625 बीयु, 21 हजार 277 सीयु आणि 28 हजार 992 व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी आज प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात 3 हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (522 बीयु, 949 सीयु आणि 1 हजार 974 व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यात 4 हजार 69 इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये 665 बीयु (0.59%), 596 सीयु (0.62%) आणि 3 हजार 437 व्हीव्हीपॅट (3.56%) नादुरुस्त झाल्या.
प्रारुप मतदानाच्या वेळी तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नादुरुस्त झालेली इव्हीएम व्हीव्हीपॅट त्वरीत दुरुस्त करण्यात / बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदानप्रक्रियेवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही.
इव्हीएम संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 152, शिवसेना 89 व इतर 120 अशा एकूण 361 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारी संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यवाहीसाठी त्वरीत पाठविण्यात आलेल्या आहेत.
मतदानाची वैशिष्ट्ये :-
महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-
⦁पुणे जिल्ह्यातील 215-कसबापेठ मतदारसंघामध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून प्रथमच ‘बार कोडींग’चा वापर करण्यात आला.
⦁दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी एकूण 5 हजार 435 इतकी मतदान केंद्रे वरच्या मजल्यावरुन तळ मजल्यावर स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.
⦁अतिवृष्टी झाल्यामुळे 259-कराड उत्तर मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 31 या केंद्राचे स्थलांतर मतदानाच्या आदल्यादिवशी करण्यात आले.
⦁काल दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दिवसा व रात्री महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस झाला. उस्मानाबाद, लातूर, जालना, परभणी आणि सातारा येथे मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पोलिंग पार्टीच्या दळणवळणामध्ये अडचण निर्माण झाली होती. मात्र पोलिंग पार्टी वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या आणि मतदान सुरळीतपणे पार पाडण्यात आले.
⦁रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये रुग्णालयातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
⦁विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीजनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले.
⦁शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही, मतदानाचे प्रमाण चांगले राहिले आहे.
आदर्श आचारसंहिता (एमसीसी) :-
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर संनियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एफएसटी(1567), एसएसटी (1660), व्हीएसटी (1092) इतकी पथके नेमण्यात आली होती. या व्यतिरिक्त दक्ष नागरिकांना आचारसंहिता भंगाची प्रकरणे नोंदविण्यासाठी आयोगाने सी- व्हिजिल हे अँड्रॉईड ॲप उपलब्ध करुन दिले होते.
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) :-
राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टिफिकेशन अँण्ड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती समोर ऑडीओ, व्हिडीओ व पोस्टरसाठी आतापर्यंत पुढीलप्रमाणे विविध राजकीय पक्षाकडून विनंती प्राप्त झाली आहे.
राजकीय पक्ष |
मंजूर |
एकूण |
आक्षेप |
एकूण |
||||||
ऑडीओ |
व्हिडीओ |
पोस्टर |
पथनाट्य |
ऑडीओ |
व्हिडीओ |
पोस्टर |
पथनाट्य |
|||
शिवसेना |
37 |
39 |
230 |
– |
306 |
15 |
8 |
30 |
– |
53 |
भारतीय जनता पक्ष |
20 |
72 |
200 |
8 |
300 |
9 |
17 |
29 |
5 |
60 |
वंचित बहूजन आघाडी |
9 |
3 |
11 |
– |
23 |
– |
8 |
1 |
– |
9 |
काँग्रेस |
5 |
15 |
7 |
– |
27 |
5 |
6 |
– |
– |
11 |
राष्ट्रवादी कॉंग्रेस |
7 |
9 |
2 |
– |
18 |
1 |
– |
– |
1 |
|
महाराष्ट्र नवनिर्माण सेना |
8 |
– |
– |
– |
8 |
1 |
– |
– |
1 |
|
एकूण |
86 |
138 |
450 |
8 |
682 |
31 |
39 |
60 |
5 |
135 |
वरील दोन्ही समितीच्या निर्णयाविरुद्ध अपिल करण्याकरिता मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती समोर आजच एक पेड न्यूज संदर्भातील अपील दाखल झाले आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. एकच अपील प्राप्त झाले आहे हे पाहता वरील दोन्ही समित्यांनी त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत, असे स्पष्ट होत आहे.
सोशल मिडिया मॉनिटरिंग
पोलीस विभागाच्या सायबर शाखेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत सोशल मिडियाचे निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने मॉनिटरिंग करण्यात आले.
जप्तीची प्रकरणे (सीझर्स) :-
आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये सदुसष्ट कोटी बावन्न लाख (67.52) इतकी रोख रक्कम, रुपये चौप्पन्न कोटी पन्नास लाख (54.50) रकमेचे सोने, रुपये तेवीस कोटी एकवीस लाख (23.21) रकमेचे मद्य व रुपये वीस कोटी पंच्याहत्तर लाख (20.75) मादक पदार्थ, याप्रमाणे एकूण रुपये एकशे पासष्ट कोटी नव्यान्नव लाख (165.99) इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. आचार संहितेच्या उलंघनाबाबत 2124 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच याव्यतिरिक्त Prohibition Act, Food & Drugs Act या कायद्याखाली 11506 इतके गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मतदार यादी :-
सन 2019 या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, 2018 पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता ‘स्वीप’अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा खुप चांगला परिणाम झाला. व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 (8,85,65,547) च्या तुलनेत विधानसभा निवडणूक – 2019 मध्ये मतदारांची संख्या 8,98,39,600 इतकी झाली. म्हणजेच मतदारांची संख्या 2,74,053 ने वाढली.
दिव्यांग मतदार :-
भारत निवडणूक आयोगाने यावेळी दिव्यांग मतदारांसाठी’सुलभ निवडणूका‘ (Accessible Elections) हे घोषवाक्य जाहीर केले होते. याअंतर्गत दिव्यांग मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना मतदान करणे सुलभ व्हावे याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. त्याचे चांगले फलित म्हणून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये 3,09,233 इतके दिव्यांग मतदार होते परंतू यावेळी सुमारे तीन लाख शहाण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर (3,96,673) इतक्या दिव्यांग व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे 90 हजार नवीन दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
मतदान केंद्र :
यावेळी एकूण शहाण्णव हजार सहाशे ऐकसष्ठ (96,661) इतक्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सन 2014 च्या तुलनेत यावेळी मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये एकूण आठ हजार एकशे एकसष्ठ (8,161) इतकी वाढ झाली आहे. तसेच आताच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदान केंद्रांमध्ये सखी मतदान केंद्र-352, आदर्श मतदान केंद्र-288 दिव्यांग मतदान केंद्र-106 व वेब कास्टिंग-10013 याही मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
निवडणूक कर्मचारी :-
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे सात लाख पन्नास हजार (7,49,374) इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे एक लाख चार हजार (1,04,000) इतक्या पोलीसांची नियुक्ती करण्यात आली होती. याप्रमाणे सुमारे साडे आठ लाख (8,50,000) इतके कर्मचारी या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये 69-अहेरी या मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेले एक पोलीस अधिकारी श्री. बापू पांडू गावडे (वय 45 वर्षे ) यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने चंद्रपूर येथील शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पंरतु उपचारादरम्यान दुपारी 1-30 वाजता मृत्यू झाला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेले शिक्षक श्री. सर्जेराव भोसले यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
तसेच ठाणे येथील नुतन शाळा, रामबाग या ठिकाणी बंदोबस्तावर नेमण्यात आलेल्या श्री. जयराम तरे (बक्कल नंबर 5352) वय 48 वर्षे यांना ह्रदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांना वेळीच इस्पितळामध्ये दाखल करण्यत आले. आता त्यांच्या जीवावरील धोका टळलेला आहे.
०००००
निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या १० हजार ५०० बसेस आरक्षित
मुंबई, दि. 20 : विधानसभेच्या उद्या दिनांक21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)10 हजार 500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. त्यामुळे उद्या एसटीच्या राज्यभरातील विविध मार्गावरील सुमारे18 हजार दैनंदिन फेऱ्या पैकी5 हजार फेऱ्या अंशत: अथवा पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या संभाव्य गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
एसटीच्या फेऱ्या कमी होणार असल्या तरी दि.21 तारखेला मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील सुट्टी असल्याने त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होणार नाही. दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने प्रवाशांची गैरसोय होऊ नये या दृष्टीकोनातून आवश्यक त्या मार्गावर बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ज्या मार्गावर दिवसभरात जास्त फेऱ्या आहेत अशा मार्गावरील फेऱ्या कमी करून, एखाद दुसरी फेरी असणाऱ्या मार्गावर सोडण्यात याव्यात. तसेच कोणत्याही मार्गावरील अत्यावश्यक फेऱ्या बंद न करण्याचे निर्देशही एसटी प्रशासनाकडून दिले आहेत. तरीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी बसेस निवडणूक कामकाजासाठी गेल्यामुळे दैनंदिन वाहतुकीवर अंशत: परिणाम होऊ शकतो, असेही महामंडळाने कळविले आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
राज्यपालांच्या हस्ते‘परमार्थ रत्न 2019′ पुरस्कार अमला रुईया यांना प्रदान
मुंबई, दि. 20 : पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने त्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
परमार्थ सेवा समितीद्वारे दिला जाणारा’परमार्थ रत्न 2019′ पुरस्कार श्रीमती अमला रुईया यांना राज्यपालांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. समितीद्वारे हॉटेल सहारा स्टार येथे दीपावली स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रामप्रकाश बुबना उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, भारतीय संस्कृती तिच्या मूल्यांमुळे जगात सर्वश्रेष्ठ ठरते. 100 हातांनी जमा केले असेल, तर हजार हातांनी त्याचे दान करावे असे आपली संस्कृती सांगते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण हाच मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. श्वसनासाठी आपण जो प्राणवायू वापरतो, त्याच्या कितीतरी पट अधिक प्राणवायू निर्माण होण्यासाठी झाडे लावली पाहिजेत.
राज्यपाल म्हणाले, जलसंधारणाच्या क्षेत्रात श्रीमती रुईया यांचे कार्य मोठे आहे. इतरांसाठी केलेले छोटे कामही मोठे असते. म्हणून आपण सर्वांनी श्रीमती रुईया यांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे. त्यांचे कार्य समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन श्री.कोश्यारी यांनी उपस्थितांना केले.
सत्काराला उत्तर देताना अमला रुईया म्हणाल्या, या पुरस्कारामुळे जलसंधारणाच्या क्षेत्रात आणखी जोमाने काम करण्यासाठी मला नवी ऊर्जा मिळाली आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी आशीर्वाद आहे असे मी समजते.
प्रास्ताविक परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियानी यांनी केले. आभार सचिव रवि लालपुरीया यांनी मानले. यावेळी मंचावर समितीचे प्रेसिडेंट गोपाल बियानी, विश्वस्त रामविलास हुरकट, मनमोहन गोयंका आदी उपस्थित होते.
‘आपलं मंत्रालय’चा निवडणूक विशेषांक प्रकाशित
मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह अंकाचे अतिथी संपादक
मुंबई, दि. 19 : ‘आपलं मंत्रालय’च्या सप्टेंबरच्या ‘विधानसभा निवडणूक 2019’च्या विशेषांकाचे प्रकाशन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या हस्ते आज येथे झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/माहिती) सुरेश वांदिले, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या विशेषांकात निवडणूकविषयक विविध माहितीपूर्ण लेखांचा समावेश आहे. आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता काळात घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये, निवडणुकीतील सोशल मीडिया, सी-व्हिजील अॅप, निवडणूक चिन्ह, निवडणुकीत वापरली जाणारी शाई, घ्यावयाची खबरदारी, जनजागृती मोहीम, निवडणूक प्रक्रिया याबाबतच्या माहितीपूर्ण लेखांचा यात समावेश आहे.
निवडणुकीत १ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा होणार वापर
मुंबई, दि.19 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक-व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) 288 मतदारसंघात पाठविण्यात आले आहेत.
या निवडणुकीसाठी288 मतदारसंघातील 96 हजार 661 मतदान केंद्रावर 1 लाख 80 हजार मतदान यंत्र (ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन), 1 लाख 27 हजार नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक) आणि राखीव यंत्रेही पाठविण्यात आली आहेत.
निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्त्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून सर्वप्रथम2019च्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता.
मतदार ओळखपत्र नसल्यास ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य
मुंबई, दि. 19 : येत्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी11 पुरावे : पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार,आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.
प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही उद्या ऐका ‘विशेष निवडणूक वार्तापत्र
मुंबई, दि. 18 : प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर‘ या ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘विशेष निवडणूक वार्तापत्र‘ दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७. ४५या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आकाशवाणीवरील’दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘विशेष निवडणूक वार्तापत्र‘ शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४५या वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर, अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या २२आकाशवाणी केंद्रावरून हे प्रसारित केले जाईल.
कंपन्या, खासगी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा सवलत
मुंबई, दि. 18 : खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत.
राज्य शासनाने याविषयी दिनांक25 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे मतदानादिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलतीस पात्र असतील. मतदारसंघातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत असल्यास त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे आवश्यक राहील. अशी सवलत मिळत नसल्यास तसेच मतदानासाठी सुट्टी दिल्यानंतर त्या दिवशीचे वेतन कपात केल्यास जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता येईल.
मुंबईमधील खासगी आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा वेळेची सवलत मिळत नसल्यास त्यांना स्वत:चे नाव, मतदान क्षेत्राचा तपशील, आस्थापनेचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनी, आस्थापना मालकाचे किंवा व्यवस्थापकाचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी, दूरध्वनी या तपशीलासह तक्रार करता येईल.
प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (दूरध्वनी क्र. 022-24311751) व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयामध्ये तक्रार नोंदविता येईल. तसेच राज्याचे कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-20, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई (दूरध्वनी क्र. 26573733, 26573844) येथे तक्रार नोंदविता येईल, असेही कळविण्यात आले आहे.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.18.10.2019 0000
कंपनियां, निजी कारखाने के कर्मचारियों को
मतदान के लिए पगार सहित अवकाश तथा रियायत
मुंबई, दि. 18 : निजी कार्यालय, आस्थापना, दुकान, कारखाना और अन्य जगहों पर काम करनेवाले अधिकारी, कर्मचारी एवं कामगारों को विधानसभा चुनाव में मतदान कर सके, इसके लिए दि. 21 अक्तूबर 2019 को पगार सहित अवकाश तथा रियायत दी जाए, यह निर्देश राज्य के कामगार आयुक्त ने दिए है।
राज्य सरकार ने इस संदर्भ में दिनांक25 सितंबर को परिपत्रक जारी किया है। उसके अनुसार सभी दुकान, निजी कार्यालय, आस्थापना, सूचना प्रोद्योगिकी कंपनियां, कारखाना, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृह आदि जगहों पर काम कर रहे कर्मचारी मतदान के दिन पगार सहित अवकाश तथा रियायत के लिए पात्र रहेंगे। निर्वाचन क्षेत्र के मतदार रहे अधिकारी, कर्मचारी काम के सिलसिले में निर्वाचन क्षेत्र के बाहर कार्यरत होने पर उन्हें मतदान का अधिकार निभाने के लिए पगार सहित अवकाश दिया जाए।
अपवादात्मक परिस्थिति में पूरा दिन अवकाश देना संभव नहीं होने पर संबंधित जिलाधिकारी की अनुमति से मतदान क्षेत्र के कामगारों को अवकाश के अलावा दो या तीन घंटे की पगार सहित सहूलियत देना आवश्यक होगा। इस तरह की सहूलियत नहीं मिलने पर एवं मतदान के लिए अवकाश देने के बाद उस दिन का वेतन में कपात करने पर जिला कामगार अधिकारी की ओर शिकायत दर्ज कर सकते है।
मुंबई के निजी आस्थापन के अधिकारी, कर्मचारी एवं कामगारों को मतदान के लिए पगार सहित अवकाश तथा समय की सहूलियत नहीं मिलने पर उन्हें स्वयं का नाम, मतदान क्षेत्र का विवरण, आस्थापना का नाम, पता, भ्रमणध्वनी तथा दूरध्वनी, आस्थापना मालिक का तथा व्यवस्थापक का नाम और उनका भ्रमणध्वनी, दूरध्वनी इस विवरण के साथ शिकायत की जा सकती है।
सूचित किया गया है कि प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (दूरध्वनी क्र. 022-24311751) और उनके अधिपत्य में महानगरपालिका के प्रभागनिहाय कार्यालय में शिकायत दर्ज की जा सकती है। राज्य के कामगार आयुक्त का कार्यालय, कामगार भवन, सी-20, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई (दूरध्वनी क्र. 26573733, 26573844) में शिकायत दर्ज की जा सकती है।
००००
Employees of private companies and factories
should be given full pay leave or facility for voting
Mumbai, October 18:- The officers, employees and workers working with private offices, establishments, shops, factories, firms and other places should be given full pay leave or facility of 3 hours on 21st October 2019 so that they can exercise their franchise for the Assembly elections in the state. The directions were given by the State Labour Commissioner.
The state government has published a notification to this effect on 25th September 2019. According to that, all the officers and employees of shops, private offices, establishments, IT companies, factories and industries, malls, business complexes, residential hotels, theatre and other places are liable to get full pay leave on the polling day. If the officers and employees, who are voters of the constituency, are working in other places, they should be given full pay leave for casting their votes.
In exceptional cases, if it is not possible to give full day leave, facility of two to three hours can be given to them with prior permission of the district magistrate , so as to enable them for voting. If such sort of facility is not given and if the salary of the election day holiday is deducted, complaint can be filed with the district labour officer. If the private establishment officers, workers and employees in Mumbai are not given the benefit of full pay leave, they can type the name of the constituency, name of establishment, itd address, the phone number or mobile numbers, name of the owner of establishment, or that of manager, their phone number or mobile number and file the complaint with the chief facilitator, Greater Mumbai Municipal Corporation, (phone number 022 24311751) The complaint can also be filed with the zone offices under the Municipal Corporation. Similarly, the complaint can be given to the office of state Labour Commissioner, Kamgar Bhavan, C-20‘ E- Block’ Bandra Kurla Complex’ Bandra East, Mumbai. Telephone number 26 573733 or 26573844.