शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 1604

मेळघाटातील दुर्गम आरोग्य केंद्रांमध्ये बसवणार १४ जलशुध्दीकरण यंत्रे – आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

अमरावती, दि. 29 : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 ग्रामीण रूग्णालय आणि एका उपजिल्हा रूग्णालयात सीएसआर (CSR) निधीतून 12 लाख रूपयांची एकूण 14 जलशुध्दीकरण यंत्रे बसवणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिली.

डिसेंबर महिन्यात 2 आणि 3 तारखेला आरोग्यमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम आदिवासी भागात असलेल्या आरोग्य केंद्रांचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर काही आरोग्य केंद्रामध्ये पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध व्हावे अशी निवेदने स्थानिक नागरीकांनी आरोग्यमंत्र्यांना सादर केली होती. त्याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी सीएसआर फंडातून तात्काळ 12 लाख रूपये निधी मंजूर करून हि जलशुध्दीकरण यंत्रे पुरवण्याचे आदेश दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर वर्कस यांच्या सीएसआर फंडातून ही 12 लाख रूपयांची भरीव मदत आरोग्य विभागाला करण्यात आली आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्याचे शुध्द़ पाणी उपलब्ध़ व्हावे यादृष्टीने आरोग्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. मेळघाट परिसरातील आरोग्य केंद्रांत जलशुध्दीकरण यंत्रे बसविल्याने जलमय आजारापासून रूग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे संरक्षण होईल. त्यामुळे आदिवासी बांधवांचे आरोग्य उत्त़म राहील, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली आहे.

चौकट

इथे बसवणार जलशुध्दीकरण यंत्रे

प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रूग्णालय उपजिल्हा रूग्णालय
1.      कळमखार      1. चुर्णी

2. चिखलदरा

    1. धारणी
2.      साद्रावाडी
3.      बिजुधावडी
4.    बैरागड
5.     हरिसाल
6.      धुळघाट रे.
7.     सलोना
8.     टेंबुरसोंडा
9.      सेमाडोह
10.  काटकुंभ
11.  हतरू

000

विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

नागपूरदि. २९ : विधान परिषद सभागृहातून येत्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजी  निवृत्त होणाऱ्या सर्वश्री विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ)डॉ.सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ)डॉ.रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ)नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ)बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ)  या पाच विधान परिषद सदस्यांना आज सभागृहात निरोप देण्यात आला.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही आपल्या भावना व्यक्त करून सभागृहाचे आभार मानले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा मंत्री गिरीष महाजन, विधानसभा विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपूर विधानभवनात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 ची माहिती

राज्यात क्रीडा संस्कृतीचे जतन करणे व क्रीडा वातावरण निर्माण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जात्मक खेळ पाहण्याची संधी नागरिक व नवोदित खेळाडू यांना उपलब्ध व्हावी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याचा नावलौकीक व अधिक पदके प्राप्त व्हावीत, यासाठी राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे व स्पर्धेच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.  यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहेत.

राज्यात 23 वर्षानंतर अशा स्पर्धांचे आयोजन होत आहे. राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. दिनांक 2 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत 9 जिल्ह्यात 39 क्रीडा प्रकारात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 3 हजार 857 पुरुष व 3 हजार 587 महिला खेळाडू असे एकूण 7 हजार 444 खेळाडू सहभागी होणार आहेत.    क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी  यांच्यासह एकूण 10 हजार 456 जणांचा सहभाग असणार आहे.

क्रीडा ज्योत

रायगड, नागपूर, बारामती- पुणे , लातूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर , अमरावती येथून दि.30 डिसेंबर 2022 रोजी पुणे येथे आणण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धेसाठी 19.08 कोटी रुपये व जिल्हा वार्षिक योजनेतून 11.51 कोटी रुपये असे एकूण 30.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हानिहाय होणाऱ्या स्पर्धा 

  1. पुणे-ॲथलेटिक्स,फूटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग,स्क्वॅश, बॉक्सींग, हॉलीबॉल, रोलर स्केटींग,गोल्फ, सॉप्ट टेनिस,
  2. नागपूर- बॅडमिंटन,नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा
  3. जळगांव – खो-खो,सॉप्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल
  4. नाशिक- रोईंग,योगासन
  5. मुंबई- याटींग, बास्केटबॉल
  6. बारामती- कबड्डी
  7. अमरावती- आर्चरी,
  8. औरंगाबाद – तलवारबाजी
  9. सांगली कनाईंग-कयाकिंग अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

000

राजू धोत्रे/विसंअ/

विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित मागास भागाचा राज्य शासन विकास करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत ग्वाही

नागपूरदि. २९ : विदर्भमराठवाड्यासह उर्वरित मागास भागाचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या भागातील उद्योगांचा अनुशेष दूर करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमण्यात येणार आहे. तसेच विशेष वीज पॅकेज आणि नवीन वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला चालना देण्यात येईल. या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर ते गोवा नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.

विधानपरिषदेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या  २९३ अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विदर्भातील 11 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यतासमतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समितीवैधानिक विकास महामंडळांचे पुनरूज्जीवनक्रांतीसिंह नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी अशा विविध घोषणा केल्या. यासोबतच कृषीजलसंपदाउद्योगवस्त्रोद्योगपर्यटन अशा विविध क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस यांनी जाहीर केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की1953 मध्ये नागपूर करार झाला आणि दरवर्षी नागपूरला एक अधिवेशन होईल असे ठरले. केवळ नागपूर शहराला नाही तर संपूर्ण विदर्भाला एक दिलासा मिळावायेथील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हावीत्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी हे अधिवेशन भरविण्याचे ठरले. विदर्भाला मुंबई जवळ करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरु करण्यात आला असून हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्यासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. या महामार्गामुळे पुढील चार वर्षात विदर्भाचा कायापालट झालेला दिसेल. हा इकॉनॉमिक कॉरिडॉर असून यामुळे विदर्भ व मराठवाड्याचा विकास होणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून  50 हजार कोटी रूपये उभे करण्याची रचना तयार केली आहे. राज्यातील सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी केवळ सहा महिन्यामध्ये 70 हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक राज्यात आली आहे. यापैकी 44 हजार कोटी हे विदर्भ आणि नक्षल भागात गुंतवणूक आली.

वैधानिक विकास महामंडळांचे पुनरूज्जीवन

राज्य सरकारने विदर्भ-मराठवाड्यासाठी सहा महिन्यात अनेक मोठे निर्णय घेतले. मागील काळात बंद केलेल्या विदर्भमराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र हे तीनही वैधानिक महामंडळे सुरू करून त्यांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यपालांकडे शिफारस केली आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. 

अमरावतीत नवीन एमआयडीसीपीएम-मित्र अंतर्गत वस्त्रोद्योग पार्क

अमरावतीमध्ये मागच्या काळात मोठे वस्त्रोद्योग उभे केले. वस्त्रोद्योग झोन केल्यामुळे विविध नामांकित कंपन्यांनी मिल सुरू केल्या आहेत. याठिकाणी जागा कमी पडत असल्याने नवीन एमआयडीसी तयार करीत आहोत. तसेच पीएम मित्र अंतर्गत नवीन वस्त्रोद्योग पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळणार आहे.

कापूस ते कापड’ या तत्वावर नवीन वस्त्रोद्योग धोरण

वस्त्रोद्योग वाढीसाठी कापूस ते कापड’ या तत्वावर राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण तयार करणार आहे. या धोरणांतर्गत वीज दरामुळे बंद पडलेल्या राज्यातील सूतगिरण्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी विशेष वीज पॅकेज देण्यात येणार आहे. या नव्या धोरणात रोजगार निर्मितीराज्यातील कापसावर राज्यातच प्रक्रिया हे तत्व अंमलात आणले जातील. तसेच वस्त्रोद्योगात सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येईल.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प गेम चेंजर ठरणार

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भमराठवाड्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. या प्रकल्पाला 83 हजार 468 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील तीन महिन्यात सर्व परवानग्या घेण्याचा प्रयत्न राज्य शासन करणार असून त्यानंतर निविदा काढणार आहे. हा नदीजोड प्रकल्पांतर्गत 469 किमीचा बोगदा तयार करून बुलढाणा-हिंगोलीपर्यंत पाणी पोहोचविणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

नवे खनिज धोरण आणणार

विदर्भासाठी नवीन खनिज धोरण आणणार असून यामधील खनिज प्रकल्पांना वीज सवलत देण्यात येणार आहे. या माध्यमातून खनिज उद्योगांना चालना मिळेल. राज्यातील 70 टक्के खनिज संपत्ती विदर्भात आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये देशातील सर्वोत्तम लोह खनिजाचा साठा मुबलक प्रमाणात आहे. सुरजागड लोह प्रकल्पासोबत 18 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. जूनमध्ये पहिला लोह उद्योग सुरू होईल. यामध्ये स्थानिकांना रोजगार देण्यात येणार असून याबाबतचा सामंजस्य करार लवकरच करणार आहे. पाच जिल्ह्यामध्ये मोठी अर्थ व्यवस्था निर्माण होणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा पहिला टप्पा यशस्वी ठरला. त्यासाठी जागतिक बँकेने चार हजार कोटी रूपये दिले असून आता दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. त्यासाठी जागतिक बँक सहा हजार कोटी रूपये देणार आहे. या योजनेंतर्गत 5220 गावात ही योजना राबविली जाणार आहे.

सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी केंद्राकडून 25 हजार कोटींची मदत

 विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत राज्याला 25 हजार कोटी रूपयांची मदत मिळत आहे. बळीराजा कृषी संजीवनी योजनेंतर्गत राज्यातील 91 सिंचन प्रकल्पांसाठी 100 टक्के अनुदान मिळणार आहे. यातून 40502 हेक्टर जमिनीची सिंचन क्षमता वाढणार आहे. हे  प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येतीलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मिहानमध्ये नवीन विमानतळ लवकरच

मिहानमध्ये 75 कंपन्यांना जमीन देण्यात आली. यामध्ये 25 कंपन्यांचे काम सुरू आहे. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 80 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. समृद्धी महामार्गामुळे मिहान प्रकल्पाला चालना मिळेल. मिहान विमानतळाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. मिहानमध्ये लवकरच दोन लेनचे कार्गो नवीन विमानतळ सुरू होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :

सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 755 कोटी रुपये निधी वितरित

अमरावतीनागपूर पुणे विभागातील १४ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरित.

सोयाबीनवर शंखी गोगलगाईमुळे ५ जिल्ह्यात ७३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित. ९८.५८ कोटी इतका निधी.

भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी ३३६ कोटी २२ लाख सुधारित खर्चास मान्यता.

बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यतायामुळे सुमारे 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.

लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.

राज्यातील जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येणार विदर्भाचं म्हणून एक वेगळेपण आहे. खनिजउर्जापाणीवनशेती ही विदर्भाची बलस्थानं आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली आपण पाहालआणि याची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून झाली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कापूस आणि सोयाबीन यांच्या व्हॅल्यु चेन्स (मुल्य साखळी) विकसित करण्यात येतील.

कापूस आणि सोयाबीन व्हॅल्यु चेन्स विकसित करण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांपर्यंत भरीव अशी वाढीव तरतूद करण्यात येईल. ही योजना 2025 पर्यंत राबवण्यात येईल. 

अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्हयात 72 हजार 469 हेक्टर संत्र्यांचे नुकसान झाले असूननुकसान भरपाई म्हणून 562 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संत्र्यावरील कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी कृषी विभाग जनजागृती करत आहे.

प्रधानमंत्री पिक विम्याच्या बाबतीत 2 हजार 352 कोटी नुकसान भरपाई निश्चित झाली असूनत्यापैकी 2 हजार 25 कोटी रुपयांची रक्कम 45 लाख 83 हजार 883 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

निती आयोगाच्या धर्तीवर आपण राज्यात 1 जानेवारी 2023 पासून मित्र – महाराष्ट्र इन्स्ट्यिट्यूशन फॅार ट्रान्सफार्मेशन या संस्थेचे काम सूरू करणार. ही एक थिंक टॅंक आहेआणि 2047 पर्यंत राज्याचे विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी समन्वय साधेल.

राज्याचा समतोल आणि सर्वंसमावेशक विकास होण्यासाठी मित्र संस्थेचा मोठा उपयोग होणार आहे. अर्थातच याचा फायदा देखील विदर्भातील विकासासाठी होणार आहे.

त्याचप्रमाणे राज्याची आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात येईल. ही परिषद राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रीलीयन डॅालर ची बनविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल.

या परिषदेतर्फे विविध क्षेत्रातील महत्वाचे पॅरामीटर्स निश्चित केले जातील व धोरणही ठरवण्यात येईल. या परिषदेचे अध्यक्ष टाटा सन्सचे चेअरमन श्री. एन. चंद्रशेखरन असतील व उद्योगऊर्जाबँकिंगसामाजिक क्षेत्रनियोजनअभियांत्रिकीशिक्षणकृषीवस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या समितीत राहतील.

            राज्यामध्ये विविध प्रदेशातील असंतुलन शोधणे आणि समतोल प्रादेशिक विकासासाठी  नव्याने समिती गठीत करण्यात येईल.

0000

धोंडिराम अर्जुन, पवन राठोड/ससं/

 

सोयाबीन, कापूस उत्पादकांना योग्य हमीभाव द्या !

नागपूर, दि.29 :  राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. योग्य हमीभाव देऊन आणि निर्यात धोरणात योग्य तो बदल करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागण्यांचे पत्र केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठविले आहे.

हमीभाव वाढवण्याची गरज

राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी येते. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला 8 हजार 700 आणि कापसाला 12 हजार 300 रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी कृषिमंत्री सत्तार यांनी पत्रात केली आहे .

पत्रात या केल्या मागण्या

या पत्रात प्रामुख्याने योग्य हमीभावासह सोयाबीन ढेपीच्या निर्याती संदर्भात धोरणात बदल करावा, निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासह सोयाबीनच्या वायदे बाजारावरील बंदी उठवावी, सोयाबीन वरील 5 टक्के जीएसटी रद्द करावा, खाद्य तेलावरील आयात शुल्क 30 टक्के करावा, कापसाचे आयात शुल्क 11 टक्के करावे, कृषी कर्जासाठी सिबिलची अट रद्द करावी या मागण्यांचाही पत्रात उल्लेख आहे.

0000

विदर्भ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २९ : विदर्भ विकासाला गती देणाऱ्या योजना पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा प्रयत्न असून या अधिवेशनाच्या माध्यमातून ते साध्य झाले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात येईल आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत सांगितले. विधान सभेत 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.  विरोधी पक्ष नेते तसेच सत्ताधारी पक्षाकडून सदस्यांनी मांडलेल्या विविध मुद्यांवर त्यांनी सविस्तर उत्तर दिले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेला गोसीखुर्द प्रकल्पासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन 2013-14 पर्यंत 8400 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली होते. आता एक लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. अपूर्ण योजनांना चालना देऊन त्या पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंचनाच्या संदर्भात विदर्भात चांगले काम केले आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये विदर्भात 40 हजार हेक्टर क्षमतेचे काम पूर्ण झाले आहे. मराठवाड्यामध्ये 11 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार, तर उर्वरित महाराष्ट्रात एक लाख 28 हजार 256 हेक्टर सिंचन क्षमता निर्मित झाली आहे. याशिवाय, विदर्भातील सहा मोठ्या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून इतर पाच प्रकल्पांची मान्यता अंतिम टप्प्यात असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्क मध्ये आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. या पार्कला विस्तारासाठी नवीन ठिकाणी जागा देण्यात येईल. नवीन एकात्मिक टेक्सटाईल पार्क आणणार.
  • दूध व्यवसायाला चालना दिली. मदर डेअरी प्रकल्प सुरू केला. त्यामुळे दूध संकलनात वाढ. तीन वर्षात दोन लाख 10 हजार लीटर संकलन. शेतकऱ्यांना दुधाला 48 रुपयांचा भाव.
  • मराठवाडा – विदर्भात मोठ्या प्रमाणात वीज सवलत दिली. नवीन धोरण तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. महावितरण वीज बील थकबाकी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. गेल्या सहा महिन्यात 49 हजार कोटी पर्यंत वसुली केली आहे.
  • भूमीधारी शेतकऱ्यांना भूमीस्वामी करण्याचा निर्णय घेतला. नजराणा न घेता वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक केल्या. 8588 गावातील क्षेत्राला त्याचा लाभ झाला.
  • अनुशेष टाळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. सेवाग्राम विकास आराखडा तयार करत आहोत. त्या माध्यमातून विकासाला वेग मिळेल.
  • पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थसंकल्पाची पद्धत बदलली. आता मूळ अर्थसंकल्पाच्या तुलनेत पुरवणी मागण्यांचे प्रमाण केवळ 14 टक्के एवढे आहे.यात आपण कृषी उद्योग,यंत्रमाग यांना अनुदान, नैसर्गिक आपत्ती, रस्ते विकास यासह वेतन आणि पेन्शन वरील निधीसाठीची तरतूद करत आहोत.
  • भांडवली गुंतवणूक वाढवत आहोत.
  • विदर्भातील जिल्हा बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न.
  • शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबील लागू नाही. तसे कोणी केले तर कारवाई केली जाईल.
  • गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक भांडवली खर्च आपण करू.
  • ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच तरी वसतिगृहे सुरू व्हावीत यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू. केंद्र सरकारच्या विविध योजना राबविणार.
  • ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येईल. ज्यांना वसतिगृह मिळाले नाही त्यांच्यासाठी ही योजना असेल. निवास,भोजनासाठी त्यांना हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • महा ज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 35 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारची सवलत उपलब्ध करून देणार.
  • उच्च शिक्षणासाठी निश्चित मदत केली जाईल.
  • केंद्र शासनानेRRDSयोजनेच्या 49602 कोटी रुपयांच्या संपूर्ण योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे वीज वाहिनी पृथ्थकरण, फिडर आणि इतर बाबींचा समावेश आहे.
  • विदर्भासाठी 9842 कोटींची कामे प्रस्तावित. त्याचा लाभ येत्या काळात होईल. महापारेषनच्या माध्यमातून 4405 कोटी रुपये निधी देऊन 25 नवीन उपकेंद्रे आणि उच्च दाब वाहिन्यांची निर्मिती. 1980 मेगावॉटचे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 15625 रुपयांची गुंतवणूक याठिकाणी होईल.
  • सौर कृषी वाहिनी योजनेत कृषी फिडर सोलरवर आणणार.चार वर्षात सगळे फिडर सोलरवर आणण्याचा प्रयत्न करणार. ज्याठिकाणी सरकारी जागा नसेल तिथे खाजगी जमिनी भाडेतत्त्वावर घेऊन अशी कार्यवाही करणार.
  • विविध प्रकल्पांना गतिशीलता देण्याचा प्रयत्न. त्यातील महत्वाचा तापी मेगा रिचार्ज प्रकल्प हा विदर्भ आणि खानदेश साठी महत्वाचा आहे. हा आंतरराज्य प्रकल्प असल्याने केंद्र सरकारची मदत घेणार.
  • मिहानच्या माध्यमातून अनेक मोठे उद्योग येथे आले आहेत. त्यात 35 हजार थेट आणि 49 हजाराहून अधिक रोजगार अप्रत्यक्षपणे निर्माण झाला आहे.
  • राज्यातील गड किल्ले,ऐतिहासिक स्मारक,संरक्षित स्मारक यांच्या विकासासाठी सन 2023-24 पासून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन टक्के निधी देण्याचा निर्णय.
  • छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर आणि वढू येथील स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.

 

दीपक चव्हाण/विसंअ/

000

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र  विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी  ही निवडणूक ३० जानेवारी २०२३ राेजी होणार आहे. आजपासून या निवडणुकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

गुरुवार दि. ५ जानेवारी  २०२३ रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार  दि. १३ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, सोमवार दि. १६ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होईल.

सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

000

गेट वे ऑफ इंडिया येथून उद्या सकाळी क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ

 मुंबई, दि. २९ :  महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. उद्या ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

            ३९ क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या या स्पर्धा राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील स्पर्धा आयोजनाचा आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

            या बैठकीत मुंबईत होणाऱ्या स्पर्धांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून खेळाडूंना उत्तम मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे, आरोग्य सुविधा, तसेच स्पर्धा कालावधी दरम्यान मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेचे संबंधित यंत्रणांमार्फत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

            मुंबई शहरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले क्रीडा नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत अधिकाधिक संधी प्राप्त व्हावी, स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी, उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्याचा वार्षिक क्रीडा आराखडा तयार करुन नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

            मुंबई शहरात दि. ४ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडियन जिमखाना, डॉन बॉस्को स्कूल किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबॉल स्पर्धा होईल. दि.१० ते १४ जानेवारी या कालावधीत गिरगांव चौपाटी येथे याटिंग क्रीडास्पर्धा होईल.

            उद्या ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ७.३० वा. क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार आहे. या रॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारप्राप्त नामांकित खेळाडू, एनसीसी कॅडेटस्, आर्मी याटिंग नोडचे क्रीडापटू, क्रीडा अधिकारी, नेहरु युवा केंद्राचे खेळाडू, विविध शाळांतील उद्योन्मुख खेळाडू अशा सुमारे ५०० क्रीडापटूंचा सहभाग असेल.

            या स्पर्धा मुंबईसह राज्यातील नाशिक, नागपूर, जळगांव, अमरावती, औरगांबाद या जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. या स्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

            या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, सर जे. जे. रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा सर्वराज, डॉ. दिलीप गवारी,  बास्केटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मुकुंद धस, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मुथ्थुकुमार, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोशिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, संजय शेटे, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी आदी उपस्थित होते.
000
वृत्त: श्रीमती काशिबाई थोरात/व.स.सं.

‘साहिबजादे’यांच्या धैर्य आणि हौतात्म्याला महाराष्ट्राचा सलाम…

महाराष्ट्र आणि पंजाबचे सामाजिक सुधारणा, साहित्यिक, अध्यात्मिक ऋणानुबंध अनेक शतकांपासून आहेत. संत नामदेव, गुरु गोविंद सिंग, हुतात्मा राजगुरु यांच्यामुळे हे सर्वज्ञात आहेच.. “वीर बाल दिवस” कार्यक्रामच्या  निमित्ताने नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि पंजाबचे हे ऋणानुबंध अधिक दृढ होत आहेत…

महाराष्ट्र आणि पंजाब यांचे शतकांपासूनचे आत्मतीयेचे, आंतरिक नाते आहे. संत नामदेव भारत भ्रमण करीत असताना पंजाबच्या घुमानमध्ये पोहोचले आणि तिथलेच झाले. त्यांच्या वाणीत, कर्तृत्वात ऐवढे बळ होते ज्यामुळे त्यांच्या अभंगांचा अंर्तभाव ‘गुरू ग्रंथ साहेब’या ग्रंथामध्ये आहे. दशमेश (दहावे) गुरू गुरू गोविंदसिंग यांनाही महाराष्ट्रात यावेसे वाटले. नांदेडमध्ये त्यांच्या नावे ‘सचखंड श्री हजूर साहेब’असे शीख अनुयायांचे महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये असणारे साधर्म्य हे अनेक विषयात दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्र आणि पंजाब यांनी कित्येक क्रांतिकारांना जन्म दिला. देशाचे नेतृत्व केले. भगतसिंगासोबत हसत हसत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचेच.  महाराष्ट्र आणि पंजाब चे ऋणानुबंध किती विशेष आहेत. दोन्ही राज्यातील बहुसंख्य जनता ही कृषीनिगडीत व्यवस्थेवर आधारित आहे. पंजाब रेंजीमेंट आणि मराठा रेजीमेंटच्या शौर्यगाथा आपण ऐकतच मोठे झालो आहोत. देशाच्या मातीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महाराष्ट्र आणि पंजाब हे शौर्य आणि धाडस, आणि अध्यात्माची पंरपरा जोपासणारी राज्ये आहेत.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये  साहसाचे बाळकडू घरातूनच मिळते.  माता गुजरी आणि गुरू तेगबहादूर यांच्याकडून अदम्य साहसाचे संस्कार गुरू गोविंदसिंग यांना मिळाले आणि पुढे हाच वारसा त्यांच्या ‘साहिबजादे’ बाबा अजीत सिंग, बाबा जुझार सिंग तसेच ‘छोटया साहिबजादे ’ साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांना मिळाला. अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद त्यासाठी शेवटपर्यंत निसंकोचपणे शौर्याने उभे राहणे या साहिबजाद्यांचे आचरण ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’अशीच आहे. त्यांना २६ डिसेंबरला हौतात्म आले.

हा दिवस ‘वीर बाल दिवस’म्हणून पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचा गुरू गोविंदसिंगशी असलेले नातं बघता या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्ली येथे आयोजित उपक्रमास मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये येथे आंमत्रित करण्यात आले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले संबोधन उपस्थितांच्या  ह्दयाला भिडल्याच्या भावना उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या कार्यक्रमातील उपस्थिती आणि संबोधनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राच्या दृढ संबंधाचे नवे पर्व निर्माण होईल.

अवघे ९ वर्ष आणि ६ वर्ष वय असणारे छोटे साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांनी अदम्य शौर्याचा परिचय देत स्वाभीमानीपणे प्राणार्पण करत त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्यामध्ये गुरू गोविंदसिंग यांचे रक्त असल्यामुळे या साहबजादे यांनी अदम्य धाडस दाखविले. त्यांच्या या अदम्य धाडसाला महाराष्ट्राच्या जनतेचा सलाम. त्यांना विनम्र अभिवादन…

000

अंजु निमसरकर, माहिती अधिकारी

क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी सर्व सुविधा सुसज्ज ठेवा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. २९ : महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान अमरावतीत आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी निवास, भोजन, पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधांसह वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. पांढरपट्टे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सह सचिव प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक उमेश खोडके यांच्यासह आरोग्‍य, प्रादेशिक परिवहन, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करुन विविध खेळांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी राज्य शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात धनुर्विद्या या क्रीडा स्पर्धेचे करण्यात आले असून या स्‍पर्धेत सुमारे शंभर मुले-मुली स्पर्धक म्हणून, पंच, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक मिळून एकूण २९७ खेळाडू सहभागी होत आहे. दि. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत सलग चार दिवस आर्चरी खेळात इंडीयन, कंपाऊंड व रिकर्व्ह प्रकारात क्रीडा संकुलात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या खेळाडूंना मेडल्स व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ५ जानेवारीला सायंकाळी ५.३० वा. होणार आहे, अशी माहिती क्रीडा उपसंचालक श्री. संतान यांनी बैठकीत दिली.

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचे आयोजन

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे मुख्य स्पर्धा केंद्र पुणे असून या स्पर्धेच्या आयोजनाची भव्यता जनसामान्यांना व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अमरावतीत देखील क्रीडा ज्योतीचे मार्गक्रमण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत उद्या दि. ३० डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता विभागीय क्रीडा संकुल येथून होणार आहे. इर्विन चौक- जयस्तंभ चौक- श्याम चौक- राजकमल चौक-राजापेठ चौक-नवाथे चौक-साईनगर चौक- बडनेरा आरडीआयके महाविद्यालय येथून अकोला अशाप्रकारे क्रीडा ज्योतीचे शहरातून मार्गक्रमण होईल. या रॅलीमध्ये महाराष्ट्र ऑलिम्पीक संघटना, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, ज्येष्ठ खेडाळू, क्रीडाप्रेमी यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. या रॅलीत माध्यम प्रतिनिधींनी सुध्दा सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा विभागाद्वारे करण्यात आले आहे.

000

ताज्या बातम्या

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा

0
मुंबई, दि. २८: भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30 पर्यंत 3.4 ते...