गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 1119

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीची कामे विहित मुदतीत दर्जेदारपणे करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबईदि. 1 :  पावसामुळे  नादुरुस्त झालेले रस्ते तसेच पुलांच्या दुरुस्तीचे कामे तत्परतेने करावीत. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे विहीत मुदतीत दर्जात्मक पद्धतीने पूर्ण करावीतअशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिल्या.

            पूरहानी तसेच खड्डे भरण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरसचिव सदाशिव साळुंखेसचिव श्री. दशपुतेयांच्यासह कार्यकारी अभियंताविभागीय अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री.चव्हाण यांनी राज्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्ती कामांची तसेच पूरहानीनंतर खड्डे भरण्याबाबतच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेऊन संबंधितांना सूचित केले कीपावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावीत. खड्ड्यांची डागडुजी व्यवस्थितरित्या करावीजेणेकरुन पुन्हा होणाऱ्या पावसाच्या पाण्यातही रस्ता व्यवस्थित राहील. नागरिकांना त्रास होणार नाही,याची खबरदारी घेऊन रस्त्यांच्या खड्‌डयांची दुरुस्ती करावी.

            रस्ते देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमवार्षिक देखभाल दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांसाठी गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारांचीच नियुक्ती करावी. कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी आवश्यक प्रमाणात साधनसामुग्रीमनुष्यबळाची उपलब्धता व आवश्यक बाबीची पूर्तता करत असल्याबाबत क्षेत्रीयस्तरावर याचे सनियंत्रण संबंधित अधिकाऱ्यांनी करावे. कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. तसेच  रस्त्यावरील खड्ड्यांचे संनियंत्रण कार्यवाही प्रभावीरित्या करावीअशा सूचना यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी संबंधितांना दिल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ

गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना चिपी विमानतळावरुन प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबईदि. 1 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची  सुविधा नियमितसुरळीतपणे आणि अधिक फेऱ्यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईलअशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले कीपर्यटन जिल्हा म्हणून महत्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगार वृद्धी तसेच स्थानिकांच्या प्रवासाच्या सोयीच्या दृष्टीने चिपी विमानतळावरील विमान प्रवास सेवा ही निश्चितच महत्वाची आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणारे चाकरमानीपर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने देखील ही सेवा अधिक उपलब्ध असणे आवश्यक आहे. विमान प्रवासाची सेवा सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहेसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रोजगार संधी विस्तारण्यासोबतच स्थानिक प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने चिपी विमानतळावरुन पुरेशा प्रमाणात विमान प्रवास सेवा  सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईलअसे मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

0000

वंदना थोरात/विसंअ

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ५२ लाख ५३ हजार ३२४ कर्ज प्रकरणांना मंजुरी

नवी दिल्ली 1 : प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 पासून ते  मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले आहे.

देशातील असंघटित लघु उद्योगांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एप्रिल  2015 मध्ये मुद्रा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर व तरुण या तीन कर्ज प्रकारात 50 हजार ते  10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. देशात आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये 6 कोटी 23 लाख 10 हजार 598 कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली असून, त्यापैकी महाराष्ट्राची 52 लाख 53 हजार 324 कर्ज प्रकरणे मंजूर झालेली आहेत.

नवीन किंवा सध्या सुरू असलेल्या सूक्ष्म उद्योग/व्यवसायाला दहा लाख रुपयांपर्यंतचे संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (पीएमएमवाय) उद्दिष्ट आहे.  शेड्यूल्ड कमर्शियल बँका (एससीबी), बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएपसी) आणि लघु वित्तीय संस्था (एमएफआय) या सभासद कर्ज देणाऱ्या संस्था (एमएलआय) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाख रूपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय (विनातारण) देतात. कर्ज घेण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जिच्याकडे लघु उद्योगासाठी व्यवसाय योजना आहे, ती व्यक्ती या योजनेंतर्गत उत्पादन, व्यापार, सेवा क्षेत्रातील उत्पन्न वाढवणाऱ्या व्यवहारांसाठी कर्ज घेऊ शकते. तसेच शेतीशी संबंधित कामांसाठी तीन कर्ज श्रेणींमध्ये कर्ज उपलब्ध होते. शिशू (50,000 रूपयांपर्यंतचे कर्ज), किशोर (50,000 रूपयांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंत कर्ज) आणि तरुण (5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंत कर्ज)

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महाराष्ट्र राज्यात 41,58,052 मंजूर कर्ज खात्यांची संख्या होती. आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये ह्या कर्ज खाते धारकांची संख्या 52 लाख 53 हजार  324 आहे.  केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सोमवारी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

राज्यातील कोणताही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट नाही

मुंबई, दि. १ : पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट नाही व रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

रेड अलर्ट हा जर २४ तासात २०४ मिमी पाऊस पडला तर  देण्यात येतो. कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला नाही. ऑरेंज अलर्ट हा जर २४ तासात ११५ ते २०४ मिमी पाऊस पडला, तर देण्यात येतो.  रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.

येलो अलर्ट हा २४ तासांत ६५ ते ११५ मिमी पाऊस पडला तर देण्यात येतो. पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सातारा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना सध्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

ग्रीन  अलर्ट हा ६५ मिमी पाऊस पडणार असेल तर देण्यात येतो. वरील सर्व जिल्हे वगळून हा अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील या धारणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग हा सामान्य पातळीचा आहे

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाची एकूण क्षमता ७४०.१७  दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ३२४.३२ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे.  जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची एकूण क्षमता २५५ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ५२८ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाची एकूण क्षमता ३०४.१० दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत २३.७० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाची एकूण क्षमता २०२.४४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.  सातारा जिल्ह्यातील धोम बलकवडी धरणाची एकूण क्षमता ११२.१४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ५५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची एकूण क्षमता २१९.९७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १६१ क्युमेक्स. विसर्ग सोडण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाची एकूण क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ९३ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला धरणाची एकूण क्षमता १८३.९४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणाची एकूण क्षमता १६९.६७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १९.५० क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा धरणाची एकूण क्षमता २१६.८७ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १७.२५ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणाची एकूण क्षमता ७७९.३४ दशलक्ष घनमीटर असून आत्तापर्यंत १६९ क्युमेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना व नजीकच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत.

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी भरतीच्या लाटांचा तपशील

दुपारी १२:३४, ४.८४ मीटर

वज्राघात प्रवण जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “दामिनी: लाइटनिंग अलर्ट ॲप” डाउनलोड व  इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटरच्या परिसरातील विजेसाठी जीपीएस नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयच्या खबरदारीचे उपाय देखील सामायिक करते.

नागरिकांनी आपत्तींच्या चेतावणी आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET ॲप” डाउनलोड व इन्स्टॉल करावे. राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेल्या सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे:

फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL

ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून  १ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ७:०० वाजता प्राप्त आकडेवारी नुसार  महाराष्ट्र: हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 1 : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून या विभागातील अधिकारी-कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असतात. लोकांप्रति उत्तरदायित्व ठेवून, सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करावी, असे उद्गार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगरतर्फे चेतना महाविद्यालय, वांद्रे (पू.) येथे मुंबई उपनगर जिल्ह्यात पालकमंत्री श्री. लोढा यांचे हस्ते महसूल सप्ताहाचा शुभारंभ  करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा केला जात आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात आला. तसेच वर्षभरात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कामगिरी केलेल्या 36 एकूण महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र पालकमंत्री  श्री. लोढा यांचे हस्ते देण्यात येऊन गौरविण्यात आले.

महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले. त्यांनी सांगितले की, मुंबई उपनगर जिल्ह्यात महसूल सप्ताह अंतर्गत दि. 01 ते 7 ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार असून त्यामध्ये  महसूल दिन- महसूल अधिकारी व कर्मचारी गुणगौरव व MLRC-155 अंतर्गत प्रकरणे निकाली काढणे इ. उपक्रम, युवा  संवाद अंतर्गत- विद्यार्थ्यासोबत संवाद व ई सेवा केंद्राअंतर्गत दाखल्याचे वाटप करणे, एक हात मदतीचा- अंतर्गत- नैसर्गिक आपत्तीबाबत मॉक ड्रील, दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, महिला, तृतीय पंथीयांना समाज कल्याण विभागातर्फे लाभ वाटप इ., जनसंवाद-अंतर्गत- शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष/ सचिव यांच्यासोबत संवाद, आपले सरकार पोर्टवरील तक्रारींचा निपटारा करणे व शासकीय संदर्भ निकाली काढणे इ. , सैनिक हो तुमच्यासाठी- अंतर्गत- ध्वजनिधी संकलन, माजी सैनिक व जेष्ठ नागरिक संघटनासोबत चर्चा करणे व सैनिक, माजी सैनिक यांचे महसूल विभागातील कामाचा निपटारा करणे इ., महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद अंतर्गत निवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद व महसूल सप्ताह सांगता समारंभ, असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

दत्ता देशमुख यांनी सूत्रसंचालन व निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी आभार मानले

या कार्यक्रमांकरीता जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी  मनोज गोहाड, पंकज देवरे, तेजूसिंग पवार व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

        सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या शासकीय कामांशी थेट जोडलेला विभाग आहे. यासाठी महसूल विभागाने सामान्य माणसाच्या कामांप्रती अधिक संवेदनशील राहून महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख,  प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी विकास खरात, बी. आर. माळी, वर्षा शिंगण, राजीव शिंदे,  विजया पांगारकर, रघुनाथ पोटे, स्नेहल कनिचे यांच्यासह महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            पालकमंत्री म्हणाले, शासनाच्या सर्व योजना राबविण्यात महसूल विभाग आघाडीवर असल्याने या विभागाची नाळ सामान्य माणसाला जोडलेली आहे. महसूल विभागानेही सामान्य माणसाची कामे गतीने करून त्याला शासन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आग्रही भूमिका बजावावी. या पुढील काळात महसूल विभागाने जनतेची कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

            जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी म्हणाले, महसूल विभागाने आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूर, आपत्ती, दुष्काळ, निवडणूक आदि कामांमध्ये या विभागातील अधिकारी कर्मचारी झोकून देऊन काम करतात. लोकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणारा हा विभाग आहे. यापुढेही विभागाने आपल्या चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करावी.

            महसूल विभाग हा शासनाच्या सर्व खात्यांना एकत्र घेऊन काम करणारा विभाग आहे. विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करावी असे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वाती देशमुख यांनी सांगितले.

            उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, तहसीलदार प्रदीप उबाळे, तलाठी शुभांगी थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले.

            कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये तहसीलदार प्रदीप उबाळे, निवास ढाणे, नायब तहसीलदार विनायक महाजन, अव्वल कारकून आशिष देशिंगे, श्रीमती हेमा साबळे, मंडळ अधिकारी तानाजी पवार, फैयाज मुल्ला, महसूल सहाय्यक दिपक माने, श्याम ठाकूर, तलाठी श्रीमती शुभांगी थोरात, गणेश क्षीरसागर, वाहन चालक उत्तम जगताप, शिपाई दत्ता शिंगे, अंकुश खोत, माणिक माळी,  कोतवाल विकास काळबागे,  भीमराव हत्तीकर, गुरुदास माळी, अल्फास मुजावर, पोलीस पाटील श्रीमती अनिता पाटील आणि पहारेकरी या संवर्गात राजकुमार लोटके यांचा समावेश आहे.

            प्रारंभी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

ई-पंचनाम्यानंतर लवकरच ई-नझूल उपक्रम राबविणार- विभागीय आयुक्त

नागपूर, दि. 1 : नागपूर विभागात ई-पंचनामे पद्धती प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. देशात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमानंतर ई –नझूल हा उपक्रम नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात जिल्हास्तरावर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात महसूल सप्ताहाचे उदघाटन आयुक्त श्रीमती बिदरी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) विजय आनंद, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, महसूल उपायुक्त दिपाली मोतीयेळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या उदघाटनपर भाषणात श्रीमती बिदरी पुढे म्हणाल्या की, कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सर्वसामान्य जनतेशी संवाद, प्रतिक्रिया तसेच कार्यतत्परता यावर शासनाची सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिमा अवलंबून असते.  शासनस्तरावर राबविण्यात येणारी ‘ई पद्धती’ शासकीय कामकाजात उपयुक्त ठरत आहे. नागपूर विभागात ई- चावडी, ई-मोजणी या ऑनलाईन पद्धती राबविण्यात येत आहे. नझूल विभागाच्याही अनेक अडचणी आहेत. या अडचणी दूर होण्यास मदतीसाठी लवकरच ई-नझूल तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात येणार आहे. ई नझूल हा उपक्रम नागपूर जिल्ह्यात सर्वप्रथम राबविण्यात येईल. यशस्वीतेनंतर संपूर्ण विभागात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याच्या श्रीमती बिदरी पुढे म्हणाल्या.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले की, यंदा पहिल्यांदाच महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर या सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  काम करताना कर्मचाऱ्यांना अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रकृतीकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची खाजगी रुग्णालयातून आरोग्य तपासणी तसेच घरे उपलब्ध व्हावीत यासाठी येत्या काळात प्रयत्नरत राहणार असल्याचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान महसूल विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्याया अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच कोतवाल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाच जणांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी (नागपूर शहर) हरिष भामरे यांनी आभार मानले.

शहापूर दुर्घटनेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील सरलांबे येथील समृध्दी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री गर्डर कोसळून झालेल्या अपघातात २० मजुरांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी घटनास्थळी जाऊन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच यावेळी दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करून शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्याच्या दृष्टीने योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

समृद्धी महामार्गाचे शहापूरजवळील सरलांबे येथे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री प्रिकास्ट केलेला कॉलम बसवताना ही दुर्घटना घडली. दुर्घटनास्थळी भेट देऊन मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आज पंतप्रधानांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पुणे येथे होते. मात्र, दुर्घटनेचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या  कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मा. मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, दुर्घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेतील जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींच्या प्रकृतीत तातडीने सुधार होण्याच्या दृष्टीने योग्य ते सर्व उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करत शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांना धीर दिला. तसेच दुर्घटनेबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे तातडीने सखोल चौकशी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासमयी शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माणसाच्या जीवनात बदल घडवण्याची क्षमता महसूल विभागात- पालकमंत्री विजयकुमार गावित

नंदुरबार: दिनांक १ ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) भारतीय प्रशासन यंत्रणेत माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जर कुठल्या विभागाशी वारंवार संबंध येत असेल तर तो महसूल विभाग असून मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता या विभागात आहे. तसेच कुठल्याही शासकीय यंत्रणेला आपले उद्दिष्ट गाठण्यासाठीचा संवाद सेतू महसूल यंत्रणेतूनच निर्माण होतो, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित महसूल दिन-सप्ताह च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषद कृषि सभापती हेमलता शितोळे सर्व तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छा देताना डॉ. गावित म्हणाले, महसूल विभागाच्या कामातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ची जनकल्याणाचा संकल्पना साकार होताना आपल्याला दिसते. संपूर्ण देश, राज्य आणि लोकशाही टिकवण्याचे कार्य महसूल विभागाच्या माध्यमातून होत असते. शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू मानून अहोरात्र काम या विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत असतात. जिल्हा व विभागस्तरावर कुठल्याही विभागाला आपले काम, उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी महसूल विभागाशिवाय पर्याय नसतो. कमालीची व्यापकता आणि तितकीच कमाल सतर्कता ठेवून महसूल विभाग काम करत असल्यामुळे आज मानवी जीवन समृद्ध होताना आपल्याला दिसते आहे. माहिती तंत्रज्ञानाने तर विभागाला मानवी जीवनाच्या परमोच्च अचुकतेवर आणून ठेवले आहे, म्हणूनच विकासाचे स्वप्न साकार होण्याचा विश्वास आपल्याला पदोपदी जाणवतो, त्यामुळे अशा एका दिनातून किंवा सप्ताहातून नाही तर क्षणोक्षणी, पदोपदी या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

कोरोना काळात केलेल्या कामगिरीचे कौतुक करून भविष्यात संपूर्ण जिल्हावासीयांचे  जीवन समृद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी केले. यावेळी ई-ऑफिस प्रणाली साथीच्या १४५ संगणकांचे संच संबंधित यंत्रणांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले. व वर्षभर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव पालकमंत्री व उपस्थितींच्या हस्ते करण्यात आला.

यांचा झाला गौरव….

 तहसिलदार – रामजी राठोड, तहसिल कार्यालय अक्कलकुवा व मिलिंद कुलकर्णी तत्कालीन तहसिलदार, तहसिल कार्यालय शहादा.

नायब तहसिलदार- विजय गोस्वामी, सरदार सरोवर प्रकल्प कार्यालय तळोदा व श्रीमती सुरेखा जगताप, तहसिल कार्यालय नवापूर.

अव्वल कारकुन – कैलास कुवर, सरदार सरोवर प्रकल्प कार्यालय नंदुरबार.

मंडळ अधिकारी – महेंद्र गावीत, अक्कलकुवा, तहसिल कार्यालय अक्कलकुवा.

तलाठी – प्रशांत वळवी, रायपूर, तहसिल कार्यालय नवापूर व  राजेश पवार, बोरवण, तहसिल कार्यालय अक्राणी.

महसूल सहाय्यक – महेंद्र गिरासे, जिल्हा पुरवठा कार्यालय नंदुरबार, दौलत वळवी, तहसिल कार्यालय नंदुरबार, शरद बोरसे, तहसिल कार्यालय अक्कलकुवा व कपिल परदेशी, तहसिल कार्यालय शहादा.

वाहनचालक – अझरुद्दीन काझी, तहसिल कार्यालय अक्राणी.

शिपाई – सिताराम गवळी, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, तेजस वाडीले, उपविभागीय कार्यालय नंदुरबार, विश्वजित वसावे, तहसिल कार्यालय नंदुरबार, रोनक गावीत, तहसिल कार्यालय अक्कलकुवा, व  राजेंद्र शिंदे, तहसिल कार्यालय शहादा.

कोतवाल – प्रदीप प्रधान, रायंगण, तहसिल कार्यालय नवापूर, विलास ठाकरे, तळवे, तहसिल कार्यालय तळोदा, व भारत नरवे, ब्राम्हणपूरी, तहसिल कार्यालय शहादा.

पोलीस पाटील – श्रीमती दिपमाला पाटील, विखरण, तहसिल कार्यालय नंदुरबार व  आंबिलाला वसावे, अस्तंबा, तहसिल कार्यालय अक्राणी.

 

असा असेल महसूल सप्ताह…

 युवा संवाद: बुधवार, 2 ऑगस्ट, 2023 रोजी “युवा संवाद” उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरीता शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करणे, आधारकार्ड दुरुस्ती केंद्रावर शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे, अद्ययावत करणे तसेच शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.

एक हात मदतीचा: गुरुवार, 3 ऑगस्ट, 2023 रोजी ‘एक हात मदतीचा’ या  कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे, फळबागांचे, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापनाच्या तरतुदीनुसार बाधीत नागरिकांना देय असलेल्या सोईसुविधा, नुकसान भरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचा विमा उतरविण्याकरीता अर्जदारांच्या मागणीनुसार, पिक पेरा अहवाल, सात बारा व 8-अ सारखे उतारे, तलाठीस्तरावरुन देय असलेले विविध दाखले देण्यात येणार आहेत. तसेच  अतिवृष्टी, पुर अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात येईल व तालुक्याच्या अतिदुर्गम गावात महसूल अदालतींचे आयोजन करण्यात येईल.

जनसंवाद: शुक्रवार, 4 ऑगस्ट, 2023 रोजी “जनसंवाद” कार्यक्रमात महसुल अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित असलेली प्रकरणे, अपिले निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच सलोखा योजनेंत गावा-गावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडळस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरीता शिबीरांचे आयोजन करण्यात येईल. तसेच जमिनविषयक आवश्यक असणाऱ्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी प्राप्त अर्जावर कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येतील. तसेच “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींचीही दखल घेऊन या तक्रारी निकाली काढण्यात येणार आहेत.

सैनिकहो तुमच्यासाठी… शनिवार 5 ऑगस्ट, 2023 रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या सीमावर्ती भागामध्ये तसेच अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यात करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.

एक संवाद सेवानिवृत्तांशी:  रविवार, 6 ऑगस्ट, 2023 रोजी ‘महसुल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यात महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात येणार आहेत.

सप्ताहाची सांगता: सोमवार, 7 ऑगस्ट, 2023 रोजी  “महसूल सप्ताह सांगता समारंभ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यात महसूल यंत्रणेमार्फत या कालावधीत राबविलेल्या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ करण्यात येणार आहे.

लस संशोधनातील ‘हाफकिन’चे काम मोलाचे – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

मुंबई, दि. 1 : ‘हाफकिन’ ही नावाजलेली संस्था आहे. या संस्थेचे काम मोठे आहे.  देशातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी हाफकिनची संशोधित लस जगात कौतुकास पात्र ठरली आहे.  लस संशोधनातील हाफकिनचे काम मोलाचे आहे, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

हाफकीन औषध निर्माण महामंडळ येथे मंत्री श्री. आत्राम यांनी आज भेट दिली. त्यावेळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आयुक्त अभिमन्यू काळे, हाफकिन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. शंकरवार, खरेदी कक्षाचे डॉ शिंगारे आदी उपस्थित होते.

अडचणींवर मात करीत हाफकीन संस्थेचे कार्य सुरू असल्याचे सांगत मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, संस्थेसाठी जे चांगले करता येईल, ते करण्याचा प्रयत्न राहणार आहे. संस्थेच्या बळकटीणासाठी प्रयत्न केले जातील. उद्भवलेल्या अडचणींवर मार्ग शोधून पुढे जाण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. बैठकीनंतर मंत्री श्री. आत्राम यांनी हाफकिन औषध निर्माण महामंडळाच्या कफ सिरप उत्पादनाचे पॅकेजिंग व निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली.

हाफकिन औषध निर्माण महामंडळ भेटीनंतर हाफकीन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च ॲण्ड टेस्टिंग संस्थेलाही मंत्री श्री. आत्राम यांनी भेट दिली. यावेळी हाफकिन संग्रहालयाची पाहणी त्यांनी केली.  पाहणीनंतर या संस्थेविषयी सादरीकरणातून माहिती घेतली. यावेळी संस्थेच्या संचालक सीमा व्यास, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. रामटेके उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...