रविवार, ऑगस्ट 10, 2025
Home Blog Page 806

विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार मतमोजणी – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. ३ (जिमाका) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितेले, मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक, शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, पोलीस व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत.

टपाली मतपत्रिकेची मतमोजणी 20 टेबलवर, ETPBS मतमोजणीसाठी 20 टेबल आणि ईव्हीएमची मतमोजणी विधासभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. यामध्ये २८१- मिरज विधानसभा मतदार संघातील ३०९ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८२- सांगली विधानसभा मतदार संघातील ३०८ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८५- पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातील २८५ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८६- खानापूर विधानसभा मतदार संघातील ३४८ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८७- तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील २९९ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी आणि २८८- जत विधानसभा मतदार संघातील २८१ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी 6 विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी 14 टेबलची मांडणी करण्यात आली असून प्रत्येक टेबलसाठी एक सुक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले. ETPBS च्या मतमोजणीसाठी 20 टेबलची मांडणी करण्यात आली असून त्यासाठी एकूण 2 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती केली आहे. तर टपाली मतपत्रिकेच्या 20 टेबलसाठी प्रत्येक टेबलसाठी एक अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक व दोन मतमोजणी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत सैनिक मतदारांच्या 3 हजार 59 आणि टपाली 3 हजार 822 अशा एकूण 6 हजार 881 मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. मतमोजणीसाठी सुमारे 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे म्हणाले की, मतमोजणीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 750 होमगार्ड, 500 अंमलदार, 50 अधिकारी यासह मतमोजणी व अनुषंगिक बाबीसाठी सांगली जिल्हा पोलीस दलातील सुमारे 80 टक्के पोलीस दल बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहे. मतमोजणी व निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही समाज माध्यमांवर गैरसमज पसरवू नये. आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नये. विजयी उमेदवारास विजयी मिरवणूक काढता येणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

०००

प्रशासनाच्या  कार्यपद्धतीवर  नियंत्रण ठेवण्यात विधिमंडळाची भूमिका महत्वपूर्ण – विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे

मुबंई, दि. ३  :  संसदीय कार्यपद्धतीत विधिमंडळाची भूमिका महत्वाची असून प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य विधीमंडळाद्वारे केले जाते, त्यादृष्टीने विधिमंडळाची जबाबदारी ही व्यापक असल्याचे प्रतिपादन विधीमंडळ सचिवालयाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी आज येथे केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात ‘माध्यम साक्षरता अभियान’अंतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात ‘विधीमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, विधीमंडळ चर्चा आणि विशेषाधिकार’ या संदर्भात माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल यांच्यासह विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो उपस्थित होते.

श्री.कळसे म्हणाले की, शासन आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणांकडून योग्य पद्धतीने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीच्या नियमावलीचे पालन करुन घेणारी विधिमंडळ ही अत्यंत सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे शासनाचे धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यापूर्वी विधीमंडळांच्या सभागृहात ते आधी मांडावे लागतात. संसद, विधीमंडळात प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य पार पाडण्यासाठी सदस्यांद्वारे सहा प्रकाराची आयुधे वापरली जातात. यामध्ये  महत्वपूर्ण विषयांवरील सभागृहात चर्चा करणे, तारांकित, अतारांकित प्रश्न उपस्थित करणे, अर्थसंकल्प सभागृहात सादर करुन त्याला मंजुरी घेणे, विधीमंडळाच्या विविध प्रकारच्या समित्यांद्वारे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवणे, कायदा निर्म‍िती प्रक्रिया आणि विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा वापर या वेगवेगळ्या सहा प्रकारच्या माध्यमातून विधिमंडळ प्रशासनावर नियंत्रण ठेवत असते.

विधिमंडळाच्या सभागृहात विविध महत्वाच्या विषयावर होणाऱ्या चर्चा या अभ्यासपूर्ण आणि दिशादर्शक ठरणाऱ्या असतात. या चर्चेदरम्यान विविध विधेयके, धोरणाचा मसुदा याच्या सर्व बाजूंवर भाष्य करत त्याचे अवलोकन वेगवेगळ्या दृष्ट‍िकोनातून केले जाते. त्यातून महत्वाच्या प्रश्नावर, समस्येवर अधिक योग्य तो निर्णय घेण्यासाठी शासन प्रशासन यांना मदत होत असते. त्यादृष्ट‍िने चर्चा हा विधीमंडळाचे महत्वाचे नियंत्रण आयुध आहे. त्याचप्रमाणे प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित, अतारांकित या वर्गवारीत विचारली जाणारी प्रश्ने यामाध्यमातून समाजातील विविध ज्वलंत, तातडीच्या आणि गंभीर विषयांकडे लक्ष वेधले जाते. तातडीने एखाद्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रश्नोत्तरे हे आयुध निश्चितच खूप उपयोगी ठरत आलेले आहे. विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून दिशादर्शक काम सभागृहात होत असते. विधिमंडळाच्या सभागृहात मान्यतेसाठी सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प हा प्रशानसनावर नियंत्रण ठेवण्यातील सर्वाधिक महत्वाचे आयुध आहे. विधिमंडळाच्या मान्यतेशिवाय शासन एक रुपया सुद्धा खर्च करु शकत नाही, त्यामुळे अर्थसंकल्पाला विधीमंडळाची मंजुरी मिळणे ही बंधनकारक बाब असून, त्याच सोबत प्रशासनावर नियंत्रणाचे हे प्रभावी आयुध आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या विविध विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विधिमंडळाच्या विविध विषयांवरील समित्या असतात. अशा एकूण ४० समित्यांद्वारा विधिमंडळ प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे अवलोकन करत असते, त्यामुळे या समित्या देखील नियंत्रणाचे उपयुक्त आयुध आहे. कायदा निर्मितीची प्रक्रिया याद्वारे विधिमंडळ सर्व प्रशासकीय यंत्रणांवर नियंत्रण ठेवत असते. त्याचप्रमाणे विधिमंडळाचे विशेषाधिकारांचा वापर करुन प्रशासनाला नियमावलीच्या चौकटीत योग्य पद्धतीने कार्यपद्धती पार पाडण्यासाठी कृतीशील असते.

विधिमंडळाची ही व्यापक जबाबदारी लक्षात घेऊन विधिमंडळाचे अधिकार, कामकाजपद्धती याचा सविस्तर अभ्यास असणे ही  बाब आवश्यक असून सर्व संबंधितांना आपले काम  अधिक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरणारी असल्याचे श्री.कळसे यावेळी म्हणाले.

०००

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/

माध्यम प्रतिनिधींनी कालमर्यादेत केलेले वार्तांकन कौतुकास्पद – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ३ : प्रसार माध्यमांची भूमिका सदोदीत आहे. लोकशाहीमध्ये ही भूमिका जबाबदार आणि प्रभावी बनत आहे. विधिमंडळाचे कामकाज सभागृहात सुरू असते, या कामकाजाविषयी मत, विचार जनता बनवित असते. हे सर्व माध्यम प्रतिनिधींनी केलेल्या वार्तांकनातून होत असते. वेळेच्या मर्यादेत, अचूकतेने प्रसार माध्यमांची कालमर्यादा पाळून प्रतिनिधींनी केलेले वार्तांकन कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज व दस्तऐवज या विषयावर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह,  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, अधिवेशन वार्तांकनामध्ये नवीन आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांच्या चर्चेला प्रसिद्धी मिळाल्यास त्यांचा हुरूप वाढतो. अधिवेशन सुरू असताना अनेक ज्वलंत प्रश्न सभागृहात चर्चेला येत असतात. या विषयांचा माध्यमांकडून त्या त्या वेळी उहापोह होत असतो. मात्र अधिवेशन संपल्यानंतर सदरील विषय मागे पडतात. अशा विषयांना अधिवेशन नसलेल्या काळातही माध्यमांनी प्रकाश टाकला पाहिजे. लक्षवेधी सूचनेचे वार्तांकन करताना लक्षवेधी सुचना मांडणाऱ्या सदस्यांचे नाव असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सध्या डिजीटल माध्यमे येत आहेत. या माध्यमांमधून बऱ्याचवेळा अधुरी माहिती गेलेली असते. त्यामुळे समाजावर विपरीत परिणाम होवू शकतो. त्यामुळे डिजीटल माध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन केले पाहिजे. विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या नवीन माध्यम प्रतिनिधींसाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या समन्वयाने किमान 4 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम ठरविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. विधिमंडळाचे बरेचसे कामकाज ऑनलाईन करण्यात आले आहे. विधेयके, अहवाल संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपूर्ण दस्तऐवज डिजीटल करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या  कार्यपद्धतीमध्ये सुधारणेला बराच वाव असल्याचेही डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तरे घेण्यात आली. उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी उत्तरे दिली. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधी, महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

निलेश तायडे/विसंअ/

शिवडी येथील मतमोजणी केंद्रावर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. ३ : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. या मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

वैद्यकीय सुविधा

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात आवश्यक औषध साठ्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. तसेच पुरेसे ओआरएस (ORS) व ग्लुकोज (Glucose) पावडर याठिकाणी उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी ४ ॲम्बुलन्सची व्यवस्था असून त्यापैकी एक कार्डियक ॲम्बुलन्स असणार आहे. वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेसाठी केईएम हॉस्पिटलमध्ये १० बेड आरक्षित करण्यात आले आहेत. वैद्यकीय मदत वेळेवर मिळण्यासाठी स्वतंत्र वेल्फेअर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मदत कक्ष

मतमोजणी केंद्रावर नियुक्त मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष तर राजकीय प्रतिनिधींसाठी चौकशी कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्याची सुविधा

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षाच्या ठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल टॉयलेट व्हॅनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी मतमोजणीच्या दिवशी स्वच्छता कर्मचारी याठिकाणी उपस्थित असणार आहेत.

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी भोजन व नाश्त्याची व्यवस्था असणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दलाच्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्षात इंटरनेट सुविधा, माध्यम प्रतिनिधींसाठी भोजन व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रातील सर्व कक्ष हे वातानुकूलित करण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रावर उष्णता व पावसाची शक्यता या दोन्ही दृष्ट‍िने खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर नियमित, सुरळीत विद्युत पुरवठा राहावा यासाठी आवश्यकता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात विषारी सापांचा वावर असल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती म्हणून सर्पमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार मतमोजणी

सांगली, दि. ३ (जिमाका) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितेले, मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक, शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, पोलीस व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144  अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत.

टपाली मतपत्रिकेची मतमोजणी 20 टेबलवर, ETPBS मतमोजणीसाठी 20 टेबल आणि ईव्हीएमची मतमोजणी विधासभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. यामध्ये २८१- मिरज विधानसभा मतदार संघातील ३०९ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८२- सांगली विधानसभा मतदार संघातील ३०८ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८५- पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातील २८५ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८६- खानापूर विधानसभा मतदार संघातील ३४८ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८७- तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील २९९ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी आणि २८८- जत विधानसभा मतदार संघातील २८१ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

ईव्च्हीएमच्या मतमोजणीसाठी 6 विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी 14 टेबलची मांडणी करण्यात आली असून प्रत्येक टेबलसाठी एक सुक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले. ETPBS च्या मतमोजणीसाठी 20 टेबलची मांडणी करण्यात आली असून त्यासाठी एकूण 2 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती केली आहे. तर टपाली मतपत्रिकेच्या 20 टेबलसाठी प्रत्येक टेबलसाठी एक अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक व दोन मतमोजणी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत सैनिक मतदारांच्या 3 हजार 59 आणि टपाली 3 हजार 822 अशा एकूण 6 हजार 881 मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. मतमोजणीसाठी सुमारे 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे म्हणाले, मतमोजणीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 750 होमगार्ड, 500 अंमलदार, 50 अधिकारी यासह मतमोजणी व अनुषंगिक बाबीसाठी सांगली जिल्हा पोलीस दलातील सुमारे 80 टक्के पोलीस दल बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहे. मतमोजणी व निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही समाज माध्यमांवर गैरसमज पसरवू नये. आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नये. विजयी उमेदवारास विजयी मिरवणूक काढता येणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

०००

मतमोजणीची जबाबदारी अचुकपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. ३ (जिमाका) : सांगली लोकसभा मतदार संघातील मतमोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ, सुरळीतपणे होण्यासाठी मतमोजणीची जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी अचूकता व सचोटीने पार पाडवी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

४४-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या, मंगळवार ४ जून रोजी होत आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतमोजणीची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी अधिकारी   कर्मचारी  यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत सांगली लोकसभा मतदार संघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी., मतमोजणी निरीक्षक एन. कालिदास, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  म्हणाले की, लोकशाहीच्या उत्सवात सर्वच यंत्रणांनी आतापर्यंत चांगले काम केले असून मतमोजणीमध्येही अशाच प्रकारचे चांगले काम करूया. मतमोजणीचे काम करताना अधिक सतर्क असणे आवश्यक आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांनी मतमोजणीचे काम करावे.

मतमोजणीच्या कामात कोणत्याही प्रकारची हयगय होऊ नये याची खबरदारी घ्यावी. पोलीस व सुरक्षा रक्षकांना सहकार्य करावे. मतमोजणीच्या कामासाठी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, अशा सूचना करून जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, मतमोजणी संपेपर्यंत कोणीही मतमोजणीचा हॉल सोडू नये. मतमोजणी कक्षात मोबाईल स्मार्ट वॉच हाताळण्यास व आणण्यास अनुमती नसल्याने या वस्तू कोणीही सोबत आणू नयेत.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी,  सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी., मतमोजणी निरीक्षक एन. कालिदास, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी टपाली मतमोजणी कक्ष, ईटीपीबीएस मतमोजणी कक्ष, ईव्हीएम मतमोजणी कक्षांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

०००

विविध आयुधांचा उपयोग करून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर सभागृहाचा भर – विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे

मुंबई, दि. ३ : राज्याचे कायदेमंडळ हे सार्वभौम आहे. जनतेच्या हिताचे कायदे करणे, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य कायदेमंडळाच्या माध्यमातून होत असते. विविध संसदीय आयुधांचा उपयोग करून सदस्य जनतेचे प्रश्न, समस्या, भोवतालच्या परिस्थितीची माहिती सभागृहाला देतात. या माहितीच्या आधारावर कार्यवाही करून सभागृहात जनतेचे प्रश्न सोडविण्यावरभर देण्यात येतो. सभागृहातील या कार्यवाहीची माहिती जनतेला देण्याचे महत्वाचे काम प्रसारमाध्यमे करीत असतात, असे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे यांनी आज केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात ‘माध्यम साक्षरता अभियान’अंतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात ‘विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना’ या विषयावर सचिव (1) श्री. भोळे यांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रावेळी मंचावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते.

विधिमंडळाला आर्थिक, कायदे निर्मिती व माहिती घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत सचिव (1) श्री. भोळे म्हणाले की, सदस्य आपआपल्या मतदासंघातील प्रश्न सभागृहात तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, औचित्याचे मुद्दे, स्थगन प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, नियम 293 अन्वये चर्चा आदींच्या माध्यमातून मांडत असतात. कामकाजातील या सर्व प्रकारांमध्ये विधेयक हे सर्वात महत्त्वाचे असते. विधेयक विधानसभेने मंजूर केल्यानंतर विधान परिषदेकडे पाठविली जातात. आवश्यकता असल्यास संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात येते. वित्तीय बाबींशी संबधित विधेयक हे सर्वप्रथम विधान सभेत मांडण्यात येते. धन विधेयक ठरविण्याचा अधिकारी विधानसभा अध्यक्षंना असतो.

सचिव (1) श्री. भोळे पुढे म्हणाले, सभागृहातील वित्तीय कामकाज महत्त्चाचे असते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विनियोजन विधेयक पारीत करावे लागते. विधेयक पारीत न झाल्यास अर्थसंकल्पीय तरतूदींचा विनियोग करता येत नाही. तसेच शासकीय विधेयकांसोबत अशासकीय विधेयकेसुद्धा मांडण्यात येतात. शासकीय विधेयकाप्रमाणेच अशासकीय विधेयक राजपत्रात प्रसिद्ध होत असते. सभागृहात सदस्यांना विशेषाधिकार मिळालेले असतात. त्यांना भाषण स्वातंत्र्य असते. तसेच अधिवेशन काळात त्यांना अटक करता येत नाही. यासोबतच विधीमंडळाच्या विविध प्रकारच्या समित्या कार्यरत असून सध्या 40 समित्या आहेत. या समित्यांचे कामकाज वर्षभर सुरू असते. समित्या शासनाला शिफारशी करू शकतात.

कामकाजाचे वार्तांकन करताना प्रसार माध्यम प्रतिनिधींना या आजच्या कार्यशाळेचा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

०००

निलेश तायडे/विसंअ/

 

कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

मुंबई, दि. ३ :विविध राज्यांचे विधिमंडळ व संसद आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करीत असते. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा उद्देश असतो. नवीन कायदा, वेळोवेळी कायद्यात झालेले बदल आणि बदलाची असणारी आवश्यकता याबाबतची माहिती समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी प्रसारमाध्यमांची असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना निश्चितच उपयोग होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात महासंचालक श्री. सिंह बोलत होते. मंचावर प्रमुख वक्ते म्हणून विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते.

जगभरात बातमीचा प्राथमिक स्त्रोत समाजमाध्यमे झाली असल्याचे सांगत महासंचालक श्री. सिंह म्हणाले की, केवळ बातमीचाच नाही, तर बातमीच्या खात्रीचा स्त्रोतही समाजमाध्यमे झाली आहेत. समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या मजकूराप्रती समाजमाध्यम जबाबदार नसते, तर प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातमीप्रती माध्यमे जबाबदार असतात. त्यामुळे समाज माध्यमांच्या गर्दीतही वृत्तपत्रे, वाहिन्या यांचे महत्त्व अबाधित आहे. माध्यम प्रतिनिधींना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना सदस्यांच्या विशेषाधिकाराला धक्का लागणार नाही, याची दक्षताही घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे म्हणाले की, माध्यमांमध्ये आलेल्या नवपत्रकारांना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना माहितीअभावी बऱ्याच अडचणी येत असतात. अशा नवपत्रकारांना या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा निश्चितच वार्तांकन करताना लाभ होणार आहे. कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना पात्रता ठरविणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात संचालक हेमराज बागुल म्हणाले की,  लोकशाहीच्या गुणात्मक वाढीसाठी चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांची गुणवत्ता वाढ होणे गरजेचे आहे. विधिमंडळातील कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्याची माध्यमांची जबाबदारी मोठी आहे. माध्यमांची गुणवत्ता वाढल्यास लोकशाही गुणात्मकदृष्ट्या सुदृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पल्लवी मुजुमदार यांनी सूत्रसंचलन  केले. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी, महासंचालनायाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

निलेश तायडे/विसंअ/

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

  • ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रानिहाय प्रत्येकी १४ टेबल

  • टपाली मतपत्रीकांच्या मोजणीसाठीही १४ टेबल

मुंबई दि. २ : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) व राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) व नवाब दीन (एस.सी.एस.)यांची नियुक्ती केली आहे.

मतदान केंद्रावरील आवश्यक त्या सोयीसुविधा आणि उपाययोजना बाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांचा सातत्याने आढावा सुरू आहे.

मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

तसेच टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी १४ टेबल व सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

मतदान फेऱ्या
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. यामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघ १८, शिवडी -१९, भायखळा -१९, मलबार हिल-२०,मुंबादेवी -१६, कुलाबा -२० अशा फेऱ्या होणार आहेत.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ
अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघ-१९, चेंबूर- २१, धारावी-१९, शीव-कोळीवाडा -१९, वडाळा-१८, माहिम १८,अशा फेऱ्या असतील.

सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

* मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू*

जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने दिनांक २ जून २०२४ रोजी सकाळी ६:०० ते दिनांक ५ जून २०२४ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत शिवडी येथील मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस उपायुक्त (अभियान) बृहन्मुंबई यांनी निर्गमित केले आहेत.

मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.
0000

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; राज्यातील ४८ मतदारसंघात ४ जूनला मतमोजणी

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी दि. ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे.
राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण
१४५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर !

0
मंत्री, खासदार, आमदारांच्या सुचनांनुसार वाळू माफियांना सोडू नका वाळू तस्करीत सामील अधिकाऱ्यांवरही निगराणी ठेवा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी कडक कारवाई करावी वाळू साठे व...

सिन्नर बसस्थानकाच्या ताफ्यात ५ नवीन बस दाखल

0
नाशिक, दि. ९ (जिमाका वृत्तसेवा): राज्य परिवहन महामंडळातर्फे सिन्नर बसस्थानकास प्राप्त झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील पाच नवीन बसेसचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक...

‘देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चे महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

0
बुलढाणा, (जिमाका) दि. ९ : चिखली तालुक्यातील देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेचे उद्घाटन आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते...

भारत निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द

0
मुंबई, दि.९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई करत ३३४ नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द...

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा...

0
मुंबई, दि.९ : कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्यादृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या राज्यातील...