बुधवार, मार्च 3, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

रक्त संकलन वाहिनीमुळे जिल्‍ह्यात रक्तसाठा वाढेल – पालकमंत्री संजय राठोड

Team DGIPR by Team DGIPR
जानेवारी 23, 2021
in जिल्हा वार्ता, यवतमाळ
1 min read
0
रक्त संकलन वाहिनीमुळे जिल्‍ह्यात रक्तसाठा वाढेल – पालकमंत्री संजय राठोड
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात दरवर्षी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात येते. रक्तदान करणाऱ्यांची जिल्ह्यात कमतरता नाही. मात्र ग्रामीण भागातील अनेक रक्तदाते शहरात येऊन रक्तदान करू शकत नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वन विभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रक्त संकलन वाहिनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्तसाठा वाढण्यास मदत होईल, असे राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संकलन वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख एम. रामबाबू, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, ऋषिकेश रंजन, व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात रक्ताची वाढती गरज लक्षात घेता महाराष्ट्र वनविकास महामंडळाने रक्तसंकलनासाठी हे सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही रक्त संकलन वाहिनी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करताना मनापासून आनंद होत आहे. जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त तसेच थालेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांना दरमहा रक्त द्यावे लागते. शिवाय अपघातग्रस्तांनाही रक्ताची आवश्यकता असते. अशा वेळी जिल्ह्यात रक्ताचा मुबलक साठा असला पाहिजे. आतापर्यंत सामाजिक संघटना व आरोग्य यंत्रणेच्या वतीने शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन केले जात होते. भविष्यातही रक्तदान शिबिरे आयोजित असली तरी रक्त संकलन वाहिनीद्वारे मात्र ग्रामीण भागात थेट जाऊन इच्छुकांकडून रक्त संकलन करणे अतिशय सोपे झाले आहे. विशेष म्हणजे शिबिरासाठी येणारा खर्च व वेळ या दोन्ही गोष्टींची बचत होईल. या वाहनात जनरेटर व्यवस्था लावण्यात आल्याने रक्त संकलनात अडथळा निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी जिल्ह्याला रक्त संकलन वाहिनीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासंदर्भात आलेल्या पत्रावर लगेच वनमंत्री म्हणून शेरा मारला व महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडे सदर पत्र कार्यवाहीसाठी पाठविले. त्यांनी लगेच होकार कळवून अत्यंत कमी कालावधीत सामाजिक दायित्व निधीतून हे वाहन उपलब्ध करून दिले. या रक्तसंकलन वाहिनीमध्ये एकावेळी दोन रक्तदाते रक्त देऊ शकतात. मात्र भविष्यात एकाचवेळी 10 ते 15 रक्तदाते रक्त देऊ शकेल, अशी मोठी बस उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना त्यांनी महामंडळाला दिल्या. या वाहनाची देखभाल व दुरुस्ती नियमित करावी. यात कुठेही खंड पडू देऊ नका, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, रक्त संकलनामध्ये गत तीन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अव्वल आहे. यावर्षीसुध्दा जास्तीत जास्त रक्त संकलन करा. जिल्ह्याचा भौगोलिक आकार बघता अशा प्रकारच्या आणखी एक-दोन वाहनांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी एम. रामबाबू यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, रक्त संकलन वाहिनी अद्ययावत सोयीसुविधांनी परीपूर्ण आहे. या वाहिनीची किंमत 26 लक्ष असून सहा व्यक्ती बसण्याची यात व्यवस्था आहे. दोन रक्तदाते एकाच वेळी या वाहिनीत रक्तदान करू शकतात. तसेच संकलित रक्ताच्या पिशव्या ठेवण्यासाठी 60 लिटरचा फ्रिज या वाहनात असून स्टाफसाठी बायोटॉयलेटची व्यवस्थासुध्दा आहे. सन 2018 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 123 शिबिरे घेऊन 14003 रक्त पिशव्या संकलित केल्या होत्या. 2019 मध्ये 128 शिबिराच्या माध्यमातून 13500 आणि 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी 142 शिबिराच्या माध्यमातून 9570 रक्त पिशवीचे संकलन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिरे आयोजित करणा-या विविध सामाजिक संघटनांचा प्राधिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात महाआरोग्य सेवा समिती, शिवशक्ती ऑटोडील, निस्वार्थ प्रेरणा प्रतिष्ठाण, सक्षम फाऊंडेशन यांच्यासह 25 संघटनांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किरण भारती यांनी केले. यावेळी उपवनसंरक्षक केशव वाबळे, के.व्ही. भांबुरकर आदी उपस्थित होते.

Tags: रक्त संकलन वाहिनी
मागील बातमी

जिल्हा वार्षिक योजनेच्या ३४९.८७ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

पुढील बातमी

आंभोरा पर्यटन स्थळासाठी निधीची कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

पुढील बातमी
आंभोरा पर्यटन स्थळासाठी निधीची कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

आंभोरा पर्यटन स्थळासाठी निधीची कमतरता पडणार नाही - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मार्च 2021
सो मं बु गु शु श र
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« फेब्रुवारी    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,398
  • 6,739,028

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • माझी कथा
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.