मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असणारे डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. ‘केसरी’चे विश्वस्त संपादक तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत ‘केसरी’ सारख्या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व लोकशिक्षणाचा ध्यास जनसामान्यांसमोर मांडला. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक बहुआयामी व्यक्तिमत्व गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
०००