मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांची भेट

मुंबई, दि. १६ : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली.

यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावातील शेतकऱ्यांना जमीन वाटप प्रकरणासंदर्भात राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/