सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात आगमन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाकडून स्वागत

नागपूर, दि. २७: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर न्या. भूषण गवई यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील (नक्षल विरोधी अभियान), विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार, कुलसचिव डॉ. रागिणी खुबालकर आणि उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधी क्षेत्र आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा 29 जून 2025 पर्यंत नागपुरात मुक्काम असून विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

0000