रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 840

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २० मार्च २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २० मार्च 2024 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २० मार्च, २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २० मार्च २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २० सप्टेंबर आणि २० मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २० मार्च २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २० मार्च 2024 रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २० मार्च, २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २० मार्च २०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २० सप्टेंबर आणि २० मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील ज्या विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी २८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शैक्षणिक दाखला, ट्रान्सफर सर्टीफिकेट, आधार, पॅन, मतदानकार्ड, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, उत्पन्न दाखला इत्यादी कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय मुंबई शहर/उपनगर, रुम नं. ३, गृहनिर्माण भवन, म्हाडा बिल्डिंग, कलानगर, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१ या पत्त्यावर अर्ज करावेत. २८ मार्च २०२४ नंतर कोणतेही प्रशिक्षणाचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामूल्य मिळतील.

जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व तत्सम बारा पोटजातीमधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी मांतग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा, त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच प्रशिक्षणार्थीने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा.

याअंतर्गत मुंबई शहरातील २०० मुंबई उपनगरातील २०० विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत याकरिता सन-२०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त झाले आहे, असे महामंडळाचे मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हावे – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १४ : सार्वजनिक बांधकाम विभागात परंपरागत सुरु असलेल्या कामांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, चिरकाल टिकणारे नाविण्यपूर्ण काम करून विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करा. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा भाग होण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सरळ सेवेद्वारे नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. सरळ सेवेद्वारे नियुक्त ५२९ कनिष्ठ अभियंत्यांना (स्थापत्य) संपूर्ण राज्यभर नियुक्तीपत्र वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २७ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री श्री.चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, नवनियुक्त उमेदवारांनी सकारात्मक विचार, आत्मविश्वासाने देशाला आणि राज्याला नवी दिशा देणारे काम करावे. राज्य शासनाने भरती प्रक्रिया मोहीम तातडीने व पारदर्शक पद्धतीने राबविली. ७८ हजार उमेदवारांपैकी ५२९ उमेदवारांची नियुक्ती केली आहे.

विकासासाठीचा पारदर्शक कारभार आणि देशाची महासत्तेकडे जाणारी ही वाटचाल असून यामध्ये यशस्वीपणे कार्य कराल, असा विश्वास मंत्री श्री.चव्हाण यांनी व्यक्त केला. २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार असून अमृतमहोत्सवी काळात शासनाचा भाग होत आहात ही अभिमानाची बाब आहे. देश विकसित करण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग महत्वाचा आहे, असे सांगून त्यांनी अभियंत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर म्हणाल्या की, भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा वारसा लाभलेल्या विभागाचा भाग बनून तुम्ही विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देऊ शकता. गुणवत्तेनुसार ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. टीसीएस संस्थेने परीक्षा आणि निकाल लावल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील प्रक्रिया अतिशय गतीने आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून आठ आठवड्यातच नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. या विभागाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नवनियुक्त अभियंत्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, वास्तुविशारद रणजित हांडे, सरळ सेवाद्वारे नियुक्त उमेदवार व त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.

०००

प्रवीण भुरके/श्रद्धा मेश्राम/ससं/

मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १४ : मौजे वाटोळे (ता. पाटण, जि. सातारा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र आहे. यामध्ये अद्ययावत सर्व सुविधा असणार आहे. विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण केंद्र उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, प्रशिक्षण केंद्रात सायबर सेल कार्यान्वित राहणार आहे. या सेलच्या माध्यमातून अवैध मद्य विक्री व निर्मिती, अन्य राज्यातून आवक होणारे अवैध मद्य यामध्ये गुन्हे दाखल करणे, गुन्हे सिद्ध करणे, याबाबत कारवाया कारणे सोयीचे होणार आहे. या प्रशिक्षण केंद्राकरीता ३४८ कोटी रुपयांचा खर्च येणार असून ५० एकर जागा लागणार आहे. तसेच ५१ नवीन पदे प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहेत. पोलिस विभागातील प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य यांची प्रतिनियुक्तीवर सेवा घेवून प्रशिक्षण देण्यात येईल. नवीन पदांवरील व्यक्ती रुजू होईपर्यंत ही व्यवस्था राहील. सध्या विभागातील ७५० पदांची भरती प्रक्रिया सुरू असून एमपीएससीमार्फत १४४ पदे भरण्यात येणार आहेत.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल देणाऱ्या प्रमुख विभागांपैकी एक आहे. या विभागाद्वारे शासनास 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 21 हजार 550 कोटी इतका महसूल जमा करण्यात आलेला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 25 हजार 200 कोटी इतके महसुली उद्दिष्ट आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्यासाठी मोठा महसूल मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात येते. दरवर्षी या उद्दिष्टात वाढ करण्यात येत आहे. त्यानुषंगाने विभागातील अधिकारी/कर्मचारी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी अवैध मद्य विक्री व निर्मितीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत असतात. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक  कारवाया व गुन्हे नोंद करण्यात येतात. हे गुन्हे नोंदविणे, त्याचा तपास करुन गुन्हे सिद्ध करण्यास्तव कायदेशीर तरतुदीचे तसेच तपासकामी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे इ. बाबींचे ज्ञान आवश्यक असते. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची शारीरिक क्षमता वृध्दिंगत करून शारीरिक व कायदेविषयक प्रशिक्षण देण्याकरीता विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारणी करणे गरजेचे होते, अशी माहितीही मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

सिल्लोडच्या धर्तीवर बारामती शहरात उर्दू घर उभारण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १४: अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून सिल्लोडच्या धर्तीवर बारामती शहरात उर्दू घर उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल, त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

डेंगळे गार्डन, कसबा येथे मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने शहरातील मुस्लीम समाजातील व्यवसायिकांना कर्ज मंजुरीपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गफार पी. मूकदूम, सहायक व्यवस्थापक संदेश कदम, आविश म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक रहीम मुलानी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, मुस्लीम कॉ. बँकेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव, तरन्नुम सय्यद, इद्रिस नायकवडी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि वित्त महामंडळाकडून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला कर्जपुरवठा करण्यात येतो. या कर्जपुरवठ्यासाठी  राज्यशासनाच्या हमीची मर्यादा आठ वर्षांसाठी ३० कोटींवरुन ५०० कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाचे भागभांडवल ७०० कोटी रुपयांवरुन १ हजार कोटी रुपये करण्यात आले आहे. महामंडळाच्यावतीने व्यापारी, महिला बचत गटांना सूक्ष्म कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महामंडळाडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या अटी व शर्तीत सुधारणा करुन त्या सुलभ करण्यात आल्या आहेत. महामंडळाला आवश्यकतेप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी विविध पदांची भरती प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

राज्यात अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापन करण्यासोबच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना व्यवसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी शैक्षणिक कर्जाची  मर्यादा २० लाख रुपये करण्यात आले असून त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्सहान मिळण्याबरोबरच स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय, तांत्रिक अणि व्यवासायिक विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी ४० लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता अर्थसंकल्पात १० कोटीहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. झाकेर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेकरीता १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक वर्गासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीच्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल.

बारामती शहराच्या वैभवात भर घालणारा दिमाखदार शादीखाना उभारण्यात आला आहे. उर्दू शाळेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचे कामाला सुरुवात लवकरच सुरु होणार आहे. अल्पसंख्यांक विभागाकडून् बारामती तालुक्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दफनभूमी, संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यात अल्पसंख्यांक महिलांसाठी २ हजाराहून अधिक महिला बचत गट स्थापन करण्यात येणार आहे. यापैकी तालुक्यात अल्पसंख्यांक महिलांचे बचत गट स्थापन करण्यात येईल. समाजातील गोरगरीब नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बारामती परिसरातील अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुस्लीम समाजातील नागरिक पारंपरिक व्यवसाय करीत असून त्यांना शासनाच्यावतीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महामंडळाच्यावतीने मुस्लीम समाजातील १५० व्यवसायिकांना प्रत्येकी रुपये ३ लाख या प्रमाणे ४ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. व्यवसायिकांनी मंजूर कर्जातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्यरित्या करावा. कुटुंबाची प्रगती करावी, कर्ज वेळेवर परत करावे. आगामी काळात महामंडळाच्यावतीने परिसरातील इतर व्यवसायिकांना देखील अशाचप्रकारे निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे श्री. पवार म्हणाले.

यावेळी श्री. सय्यद यांनी विचार व्यक्त केले.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नवीन उपबाजाराचे भूमिपूजन

बारामती, दि. १४: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन उपबाजाराचे भूमिपूजन आणि यांत्रिक चाळणी मशीनचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी सहायक निबंधक मिलींद टाकंसाळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, उपसभापती निलेश लडकत, सचिव अरंविद जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.

सुपे येथील नवीन उपबाजार विस्तारीकरणाकरीता शासनाची गायरान जमीन १७ एकर २३ गुंठे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने रुपये ७५ लाख मोबदला देऊन खरेदी केली आहे. या उपबाजाराअंर्तगत पहिल्या टप्प्यात भुसार व तेलबिया, चिंच व लिंबू या शेतमाल खरेदी विक्रीकरीता गाळे, व्यापारी गाळे, व्यावसायिक गाळे, कार्यालयीन इमारत, अंतर्गत रस्ते, सरंक्षक भिंत, पाण्याची आदी सुविधा निर्माण करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात शेतकरी व व्यापारी वर्गाला लाभ होणार आहे.

सुपे उपबाजार येथील भुसार शेतमालाची मोठ्याप्रमाणात आवक होत असल्याने शेतकरी व व्यापाऱ्याच्या मालाला चांगल्याप्रकारची ग्रेडींग मिळण्यासाठी यांत्रिक चाळणी यंत्राची उभारणी करण्यात आली आहे.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे लोकार्पण

बारामती, दि. १४: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ आणि बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच उघडा मारुती परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सदनिका गृहप्रकल्पाचे भूमिपूजनदेखील उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे संचालक अनिल कानिटकर, संचालक प्रवीण कोळी, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव, किरण गुजर, बिरजू मांढरे आदी आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील गृह प्रकल्प ५ हजार ५०० चौ.मी. भूखंडावर उभारण्यात आला असून त्याअंतर्गत एकूण १०० सदनिकेचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदरच्या सदनिका १ बीएचके आकाराच्या असून त्याचे क्षेत्रफळ २८.१ चौ.मी. इतके आहे. संपूर्ण गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ९ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाला आहे.

उघडा मारुती परिसरात सुमारे ५ हजार ११३ चौ.मी भूखंडावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पात एकूण ११४ सदनिका आहेत. सदरच्या सदनिका १ बीएचके आकाराच्या असून त्याचे क्षेत्रफळ २८.३१  चौ.मी. आहे. गृह प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १४ कोटी ८३ लाख रुपये खर्च येणार आहे.

या दोन्ही गृह प्रकल्पामुळे बारामती परिसरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध होणार असून त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या शहरातील व्यापारी संकुलाचे लोकार्पण करण्यात आले.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिव्यांग नागरिकांना इलेक्ट्रिक सायकलींचे वितरण

बारामती, दि. १४:  जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अष्टावधानी संतुलन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलीचे वितरण भिगवण रोडवरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे आदी उपस्थित होते.

फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील १०० दिव्यांग नागरिकांना सुमारे ५० लाख रुपयांच्या तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलीचे वितरण करण्यात आले. त्यापैकी आज ५ दिव्यांग नागरिकांना प्रातिनिधिक स्वरुपात तीन चाकी इलेक्ट्रिक सायकली वितरित करण्यात आल्या.

०००

वाढत्या शहरीकरणाचा विचार करुन सौर ऊर्जा प्रकल्पाचा आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १४: आगामी ५० वर्षात बारामती शहराच्या लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मैला शुद्धीकरण प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचा आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कन्हा नदी सुशोभिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या लेंढी नाला व कसबा पूल, श्रीमंत बाबूजी नाईक वाडा तसेच दशक्रिया घाट परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने परिसरात विविध विकास कामे सुरु आहेत. कऱ्हा नदी सुशोभिकरणाअंतर्गत सुरु असलेल्या लेंढी नाला, कसबा पूल व श्रीमंत बाबुजी नाईक वाडा तसेच दशक्रिया घाट येथील विकासकामे करतांना परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे.

विकास कामांमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.  परिसरात असलेल्या वृक्षाला गोल दगडी ओटा करा.कसबा पुलाच्या खालील बाजूस पाण्याशी सुसंगत आणि परिसराला शोभेल अशी रंगरंगोटी करावी. परिसरात अनावश्यक कचरा, वेली काढून परिसरात स्वच्छता राहील , याबाबत दक्षता घ्या. सरळ वाढणारी आणि वाढल्यानंतर वरती पसरणाऱ्या  विविध प्रजातीच्या वृक्षाची लागवड करा.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...