सोमवार, मार्च 1, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • माझी कथा
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

महाराष्ट्राला भूषणावह ठरेल अशी यशोगाथा निर्माण केली – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

कवठा येथील महिलांच्या सोलर एनर्जी कंपनीचा शुभारंभ

Team DGIPR by Team DGIPR
जानेवारी 26, 2021
in जिल्हा वार्ता, वर्धा
1 min read
0
महाराष्ट्राला भूषणावह ठरेल अशी यशोगाथा निर्माण केली – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मागासवर्गीय महिलांनी उभारलेला राज्यातील पहिलाच प्रकल्प

वर्धा, दि २६ (जिमाका) :- सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला, त्यावेळी त्यांच्यावर चिखल आणि दगडांचा मारा झाला होता. त्यांनी झेललेल्या संकटापेक्षा तुम्ही केलेले कष्ट कमी असले तरी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचेच स्वप्न साकार करीत आहात. ग्रामीण भागातील महिलांनी निर्माण केलेली वेगळ्या प्रकारच्या उद्योगाची ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे ,असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केले

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावात मागासवर्गीय महिलांनी तेजस्वी सोलर एनर्जी को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून या माध्यमातून सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारला आहे. आज याचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उमेदच्या स्वाती वानखेडे, तेजस्वी सोलर एनर्जी कंपनीच्या संचालक संगीता वानखेडे, मनीष कावळे उपस्थित होते.

महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे, शिक्षण घेऊन मोठे होण्याचे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करीत असल्याबाबत त्यांनी तेजस्वी सोलर एनर्जी कंपनीच्या सर्व महिलांचे अभिनंदन केले. या प्रकल्पात तयार होणाऱ्या सोलर पॅनलच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. या फॅक्टरीमध्ये तयार होणारा माल हा गोडाउनमध्ये शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी महिलांना दिली.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर झपाट्याने विकासाच्या कामाला सुरुवात झाली. पण भूतो न भविष्यती असे जागतिक संकट कोरोनाच्या रूपाने मानवावर येऊन पडले. अख्ख्या जगाला थांबावे लागले. अशा या संकटात वर्धा जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक- राजकीय संघटना, पत्रकार यांनी एकोपा ठेवला. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने आपले काम आणि कर्तव्य चोख बजावले. भर उन्हाळ्यात कापूस खरेदी,तूर खरेदी असो की मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्याचा विषय असो शासनाने योग्यरित्या काम करून प्रश्न सोडवलेत. त्याचबरोबर मोठे आर्थिक संकट असूनही कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थांबवला नाही की कपातही केला नाही. जिल्हा विकास निधी सुद्धा आता शंभर टक्के जिल्ह्याला मिळाला आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महिला बचत गट महिला व बाल विकास खाते यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार यांनी नोकरी मागणारे बनण्यापेक्षा महिलांनी दुसऱ्यांना नोकरी देण्याचा पर्याय स्वीकारून उद्योग उभारला आहे. हा उद्योग स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग करण्याचा सल्ला यावेळी दिला.

मागासवर्गीय महिलांना या उद्योगामुळे गावातच रोजगार मिळाला ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे असे मनोगत जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी यावेळी व्यक्त केले.

महिलांनी सुरू केलेला हा राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच आणि देशातील दुसरा प्रकल्प आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मात्र या उद्योगात मोठ्या आणि परदेशी कंपन्या असल्यामुळे आपल्यासमोर गुणवत्ता आणि किंमत या दोन बाबींवर स्पर्धेत टिकणे महत्वाचे आहे. त्यामुळे उद्योगातील उत्पादन गुणवत्तापूर्ण राहील याची काळजी घ्यावी. यासाठी आपल्याला सहकार्य करण्यास मी या क्षेत्राचा आमदार म्हणून सदैव तयार असेल अशी ग्वाही आमदार रणजित कांबळे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओंबासे यांनी प्रास्ताविकात महिलांच्या उद्योगाची माहिती दिली. तर कंपनीच्या संचालिका संगीता वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करताना 3 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा खडतर प्रवास आज आनंद आणि समाधान देणारा ठरत आहे. आमच्यासारख्या 10 वी 12 वी शिकलेल्या महिलांनी घेतलेली ही गरुड झेप प्रशासनाच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी पालकमंत्री केदार व उपस्थित मान्यवरांनी कंपनीची पाहणी करून महिलांच्या प्राविण्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार सत्यजित बडे यांनी व्यक्त केले.

Tags: तेजस्वी सोलर एनर्जी
मागील बातमी

प्रजासत्ताक दिनी शहीद जवानांच्या कुटूंबीयांना मदतीचे धनादेशाचे वितरण

पुढील बातमी

कोरोना काळात जनतेने बाळगलेली सहिष्णूता व एकात्मता हा खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचा गौरव -पालकमंत्री

पुढील बातमी
कोरोना काळात जनतेने बाळगलेली सहिष्णूता व एकात्मता  हा खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचा गौरव -पालकमंत्री

कोरोना काळात जनतेने बाळगलेली सहिष्णूता व एकात्मता हा खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचा गौरव -पालकमंत्री

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

मार्च 2021
सो मं बु गु शु श र
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« फेब्रुवारी    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,157
  • 6,727,680

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • माझी कथा
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.